प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Nov 2019 - 8:31 am

प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...

*

प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे.

आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते..

*

प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन होते..प्रेमाच्या विचाराचे तरंग मनात आले कि प्रेमाचा विचार सुरु होतो...मनात घोळणा~या प्रेमाच्या विचाराने प्रेमाची अनुभुति, व प्रेमानुभव निर्माण होतात.

*

तुम्हि कुठल्याच व्यक्तिवर तो पर्यंत प्रेम करु शकत नाहि जो पर्यंत तुमच्या मनात त्याचा बद्दल सन्मानाचि, आदराचि भावना नाहि...सर्वात प्रथम तुमच्या मनांत स्वत:बद्दल आत्म सन्मानाचि भावना तुम्हि निर्माण करायला हवि...व ति निर्माण करताना स्वत:स विचारा " माझ्यात असे काय आहे ज्या बद्दल मला स्वत:चा आदर आहे?

*

.प्रेमाचे गणीत विचित्र असते...प्रेम मिळवायचे असेल तर आधि ते मुक्त पणे वाटावे लागते..प्यार बाटते चलो...जितके प्रेम तुम्हि वाटत चालाल तितके बदल्यात तुम्हाला ते परत मिळत राहिल...सदह्रुदयी व्हा, प्रेमळ व्हा व त्या प्रमाणे वागा, वागायचा प्रयत्न करा...प्रेमसंबंधाला होकार देवुन त्यात झोकुन देण्या पुर्वी असा विचार करु नका कि हि व्यक्ति माझ्या साठी काय करेल??उलट पक्षि असा विचार मनांत येवु द्या कि मी माझ्या साथिदारासाठी काय करु शकेल????साथिदारा बाबतचि हि समर्पणाचि भावना हेच सुखि प्रेम संबंधांचे रहस्य आहे...

*

प्रेम म्हणजे एकमेकाच्या डोळ्यात पहाणे नसुन,दोघांनि एखाद्या गोष्टीकडे, एकाच विचाराने,एकाच वेळी बरोबरीने बघणे असेच नव्हे काय??...प्रेम म्हणजे त्या व्यक्तिस आहे तशी गुण दोषा सकट स्विकारणे..ति कशी दिसते? तिच्यात काय गुण आहेत याचे मुल्यमापन करुन नव्हे...मैत्रीच्या मातितच प्रेमाचि बिजे रुजतात व अंकुरतात.........

*

स्पर्ष प्रेम व्यक्त करण्याचे प्रभावि साधन आहे..जि भावना अनेक शब्दात तुम्हि व्यक्त करु शकणार नाहि ते काम एक हळुवार स्पर्ष करुन जातो...स्पर्षाने मानसिक व शारीरीक बंधने संपतात...व एक निराळा प्रेम संवाद सुरु होतो........

*

ज्या कुणावर प्रेम करीत असाल त्यास मुक्त सोडा, मोकळीक द्या...बंधनात अडकवु नका...त्यास जायचे तिकडे जावु द्या..जर ते प्रेम तुमचेच असेल तर तुमच्या कडे नक्किच परत येईल,आणी जर आले नाहि तर ते तुमचे नव्हतेच..कधिच नव्हते..तो एक तुमचा भ्रम होता..बंधनात प्रेम फुलत नाहि....प्रेम म्हणजे एक भयमुक्त,अहंकार विरहित अवस्था..अनुभव........

*

जर तर,किंतु परंतु, च्या पलीकडली एक सुखद अवस्था,...प्रेम म्हणजे..आज पासुन मी भयमुक्त आहे,माझ्या भुतकाळातल्या घटना चुका,आता मला घाबरवु शकत नाहि अशी एक नविन भयमुक्त,आत्मविश्वास पुर्ण अश्या नव्या जिवनाची सुरवात.......

*

तुम्हि जर आपल्या साथिदारा कडुन अमर्याद प्रेमाचि अपेक्षा करीत असाल तर,त्याच्या प्रेमाशि,त्याच्याशी तुमचि बांधिलकी,प्रतिबध्ध्ता हवि,...व ति तुमच्या बोलण्यातुन वागण्यातुन,कृतितुन पदोपदि दिसावयास हवि...तुमच्या ह्या कमिट्मेंट मुळे, प्रेमास एक ताकद मिळत असते..व त्याचि गोडिहि वाढत असते...जेंव्हा कुणाच्या प्रेमाशि तुम्ही वचन बध्ध असता त्या वेळी त्यातुन सुटुन जाणे हा पर्याय कधिच नसतो...वचन बध्धते मुळे प्रेमाचे नाजुक बंधने अजुन मजबुत होतात........

*

एक मेका बद्दल वाटणारे आकर्षण हा प्रेमातला खुप महत्वाचा भाग आहे...ह्या आकर्षणा मुळे प्रेम फुलत रहाते..मनातुन शरीरा कडे असा हा अल्हादकारी,रोमांचक असा प्रवास असतो...ते शरीरा पुरते मर्यादित नसते तर तुम्हाला वाटणारा विश्वास,प्रेम,उत्साह,यातुन ये जागृत होत असते...प्रेम व सुखाचा तो एक असा सागर आहे ज्यात रोज बुडुन जायचे असते व जिवन जगायचे असते...जिवन समृध्ध पणे जगण्यासाठी ति एक प्रेरणा व मानसीक स्तरावर,आत्मीक प्रेमानुभव देणारी एक शक्ति आहे................

*

प्रेमात परस्परावरील विश्वासास खुप महत्व आहे...शंकेचा एक विचारहि तुमच्या साथीदाराच्या मनांत भिति, तणाव व खळबळ निर्माण करु शकतो..जर तुमच्या मनांत विश्वासाचि भावना नसेल तर प्रेमाची संपुर्ण अनुभुति तुम्हास कधिच मिळणार नाहि...आपल्या साथिदारावर प्रेम करताना त्याच्या मनांत "ह्याचे प्रेम अक्षय आहे" अशी भावना निर्माण होवु द्या.... प्रेमात वचन बध्ध होण्या पुर्वी स्वत:स विचारा कि "माझा त्याच्यावर/तिच्यावर पुर्ण १००% विश्वास आहे?" जर उत्तर हो असेल तरच पुढ्चे पाऊल टाका...नसेल तर पदरी निराशाच येणार नाहि का?...............

व्यक्त व्हा..व सहजिवनाची सुरवात करा व अक्षय आनंद अनुभवा....

प्रेमकाव्यविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 1:36 pm | मुक्त विहारि

मस्त

तर एव्हाना चुंबनाचा वर्षावच झाला असता..

माझ्यात असे काय आहे ज्या बद्दल मला स्वत:चा आदर आहे?

भयंकर आवडले सॉलिड गुगली टाकलीत साहेब.

एक शंका आलीय मनात तीबी लघु

जाऊदे इचारूनच टाकतो

प्रेमात वचन बध्ध होण्या पुर्वी स्वत:स विचारा कि "माझा त्याच्यावर/तिच्यावर पुर्ण १००% विश्वास आहे?" जर उत्तर हो असेल तरच पुढ्चे पाऊल टाका...

जर प्रेमात वाचनबध्ध झालो आणि बंधनात अडकल्यावर सुद्धा साथीदाराच्या मनात संशय असेल तर काय करावे गृदेव ?

चुम्बनाचा वर्षाव राहिला हो