उंदरांची शर्यत -२
उंदरांची शर्यत (RAT RACE) -२
उंदरांची शर्यत -२
मी विक्रांत वर असताना (१९९०) माझा एक मित्र लेफ्टनंट कमांडर नरेश राणा (हा हॅरियर या लढाऊ विमानाचा वरिष्ठ वैमानिक आणि प्रशिक्षक होता.) याने मला एक प्रकाशचित्र दाखवले. त्यात एकाच फ्रेम मध्ये तीन विमाने होती. सर्वात पुढे मिराज २०००, मध्ये हॅरियर ( ज्यात हा स्वतः होता) आणि सर्वात शेवटी HPT ३२ हे पुढे पंखा असलेले (प्रोपेलर) विमान होते. हा फोटो पाहून मी त्याला आश्चर्याने विचारले कि हा फोटो कसा काढला ( तेंव्हा फोटोशॉप हा शब्द फारच क्वचित कुणी ऐकला असेल).
कारण मिराज २००० चा स्टॉल स्पीड (कमीत कमी वेग ज्या पेक्षा कमी वेगाला इंजिन बंद पडते) हा ताशी २६० किमी आहे तर HPT ३२ चा सर्वात जास्त वेग २८० किमी आहे.हॅरियर हे विमान हेलीकॉप्टर सारखे सरळ वर जाऊ शकते आणि हवेत तरंगू शकते त्याचा सर्वात जास्त वेग ताशी ११८२ किमी आहे. आणि कमीत कमी वेग ० किमी.
त्यावर नरेशनी मला सांगितले कि हा फोटो घेण्यासाठी मिराजच्या आणि HPT ३२ वैमानिकाना फार कष्ट घ्यावे लागले. कारण तिन्ही विमाने एकाच तसबिरीत येण्यासाठी मिराजला आपले इंजिन बंद पडणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागत होती तर HPT ३२ ला पूर्ण वेगात चालवून इंजिन गरम होऊन बंद पडेल का याची भीती वाटत होती. हा फोटो काढेपर्यंत HPT ३२ चे इंजिन बर्न आउट होईल या परिस्थितीत आले होते. फोटो काढल्यावर ताबडतोब त्या विमानाने आपला वेग अगदी कमी केला आणि कसे बसे ते विमानतळावर उतरवले.
१) माझ्याकडे आमच्या परिचयातील एक होतकरू आणि अतिशय हुशार मुलगा, चिन्मय वय वर्षे २७, आला होता. त्याचा रक्तदाब १५०/९४ झाला होता आणि त्याला चक्कर करत होती. डोक्यात घाव पडत होते. हातपाय गार पडले होते. त्याची पूर्ण तपासणी केली तेंव्हा त्याला कोणताही शारीरिक आजार नव्हता. उगाच धोका नको म्हणून मी त्याला शीरेतून ग्लुकोज दिले. अर्थात त्याने फारसा फरक पडला नाही. त्याचे डोळे सारखे फडफडत होते. तोंडाने तो काहीतरी बोलायचं प्रयत्न करत होता. हात पाय सारखे हलत होते आणि तो मला काहीतरी होतंय काही तरी होतंय म्हणत होता. मी त्याला बसवले, प्यायला पाणी दिले आणि त्याला एक ग्लास इलेक्ट्राल प्यायला दिले धीर दिला. थोड्या वेळानें तो व्यवस्थित झाला. त्याचा रक्तदाब सुद्धा कमी झाला.
हि त्याची स्थिती मुलुंड स्थानकात झाली होती. गाडीतून उतरल्यावर अशी स्थिती झाली तेंव्हा लोकांनी त्याला मदत करून माझ्या दवाखान्यात आणले. त्याची परत व्यवस्थित तपासणी केली असता त्याला कोणताही शारीरिक आजार नव्हता. मला असे जाणवत होते कि हा त्याचा आजार मानसिक असावा. तरीही मी त्याच्या काही मूलभूत चाचण्या करून घेतल्या. ज्यात रक्त चाचण्या, स्ट्रेस इको कार्डिओग्राफी आणि फुप्फुसांची क्षमता( PFT) इत्यादी होते. या सर्व चाचण्या व्यवस्थित होत्या. यानंतर मी त्याचे समुपदेशन केले. त्यात काही आश्चर्यकारक गोष्टी बाहेर आल्या.
हा मुलगा अतिशय हुशार होता यात शंकाच नव्हती परंतु आपला एकुलता एक मुलगा म्हणून त्याची आई त्याच्या आयुष्याच्या घोड्यावर स्वार होऊन त्याला धावडवत होती. याला आय आय टी च्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात काही प्रवेश मिळाला नाही. परंतु त्याला कोणत्याही चांगल्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला असता. परंतु आपल्याला मुंबई आय आय टी मध्येच जायचे आहे हे त्या मुलावर बिम्बवले गेले होते म्हणून त्याने एक वर्ष ढोर मेहनत करून ती प्रवेश परीक्षा परत दिली. या वेळेस त्याला प्रवेश मिळाला परंतु त्याचा यादीतील क्रमांक १५०० च्या आसपास आला होता. पण मुंबई आय आय टी मध्येच जायचे आहे मग तेथे उपलब्ध असलेल्या जागांपैकी ५ वर्षाच्या मेटॅलर्जी मध्ये थेट एम टेक साठी प्रवेश मिळवला. तेथे पण इलेक्ट्रिकल किंवा कॉम्पुटर मध्ये शाखा बदलण्यासाठी त्याने पहिल्यावर्षी ढोर मेहनत केली. परंतु तसा प्रयत्न तेथे असलेले सर्वच करत असल्याने त्याला काही शाखा बदलून मिळाली नाही.मग सतत उत्तम सीजीपीए मिळ्वण्यासाठी एकंदर पाच वर्षे त्याने प्रचंड मेहनत केली. या उत्तम सीजीपीए वर त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये महिना २ लाखाची नोकरी मिळाली. या कंपनीत तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत काम करत होता. परंतु त्या कंपनीला अपेक्षित असणारी कामगिरी त्याला झेपेना. शेवटी दोन वर्षांनी कंपनीने त्याला राजीनामा द्यायला सांगितले. आता याने एका भारतीय कंपनीत नोकरी धरली. तेथे पगार महिना दीड लाख होता परंतु त्यांनी त्याला चांगले काम केल्यास अधिकचा ६ लाख रुपये बोनस देऊ असे आश्वासन दिले होते.
आज तो माझ्याकडे आला ते त्याला कंपनीने सध्या परिस्थिती चांगली नाही तेंव्हा तुला ते ६ लाख रुपये देता येतीलच याची खात्री नाही असे असून सुचवले होते. याचा प्रचंड तणाव घेऊन हा मुलगा अशी शारीरिक स्थिती घेऊन माझ्याकडे आला होता. यावर त्याची आई तुला नको असेल तर सोडून दे नोकरी म्हणून सुचवत होती. त्याने घर घेतले आहे वडील निवृत्त आहेत. त्यांना निवृत्ती वेतन नाही. आई गृहिणी अशा स्थितीत नोकरी सोडून देणे हि काही सोपी गोष्ट नाही. आणि लगेच दुसरी त्याच तोलामोलाची नोकरी मिळणे सोपे नाही. बाजाराची परिस्थिती माहिती नसता याची आई आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यावर लादून त्याला पळवते आहे हि वस्तुस्थिती
एक दोन वेळा त्याच्याशी बोलल्यावर त्याची मानसिक स्थिती माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला एका उत्तम मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवले आहे. तेथे त्याचा इलाज उत्तम तर्हेने होऊन त्याला आता असा त्रास होणे बंद झाले आहे.
२) मागच्या आठवड्यात असाच एक मित्र माझ्या कडे सल्ल्यासाठी आला होता. त्याच्या मुलाचा रक्तदाब वाढला आहे म्हणून १६०/१०० वय २६ फक्त. त्या मित्राचा मुलगा सी ए होऊन एका प्रथितयश कंपनीत नोकरीला आहे. त्याचे कॉलेजमधीलच एका मुलीबरोबर प्रेम होते आता तिच्याशीच लग्न झालंय . त्यांनी स्वतःचे पुण्यात घर घेतले आहे. दिसायला सर्व दृष्ट लागण्यासारखे आहे. त्या मुलाची पूर्ण रक्त तपासणी केली असता बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. नवरा बायको मध्ये सकृतदर्शनी तणाव नाही. आईवडिलांपासून दोघे वेगळेच राहत आहेत.
मग प्रश्न काय आहे?
मुलाचे आणि मुलीचे प्रेम होते.मुलीचे वडील स्वतः सी ए असून एका मोठ्या कंपनीत संचालक आहेत. भरपूर पैसे मिळतात. याचा मेहुणा पण सी ए आहे आणि तो सुद्धा पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. माझा मित्र मध्यमवर्गीय स्थितीतील आहे तर याचे सासू सासरे उच्च मध्यमवर्गीय ते उच्च वर्गीय यात आहेत. मुलाला मुलीशी लग्न करायचे होते म्हणून त्याने खूप मेहनत करून यशस्वीपणे सी ए केलं. त्यानंतर त्याला चांगली नोकरी पण लागली. या नोकरीत तो प्रचंड मेहनत करतो आहे त्यामुळे सलग त्याला तीन वर्षे उत्तम कर्मचारी म्हणून पारितोषिक मिळाले आहे.( नोकरी जाण्याची अजिबात भीती नाही) तरीही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त धावून हा मुलगा उरी फुटतो आहे. कारण बायको लहानपणापासून उच्च वर्गातील असल्यामुळे तिच्या अपेक्षा जास्त आहेत.खर्च हि जास्त आहेत (कदाचित तुलना वडिलांशी होते आहे) मुलगी सुद्धा अतिशय सालस आहे पंरतु आपला खर्च जास्त आहे असे तिला वाटत नाही कारण त्याची तिला लहानपणापासून सवय आहे. आणि हा मुलगा या अपॆक्षाना पुरे पडण्यासाठी आणि स्वतःला लायक सिद्ध करण्यासाठी फार कष्ट करतो आहे. त्यातून त्याचा रक्तदाब वाढला आहे.
त्याला मी समुपदेशनासाठी बोलावले आहे. पाहू या येतोय का?
या दोन्ही बाबतीत मला HPT ३२ या विमानाची आठवण होते. फार कष्टाने हे विमान एक वेग गाठू शकते आणि तो वेग फार वेळ ठेवला तर त्याचे इंजिन जळून जाण्याचा धोका असतो.
आपली कुवत आणि मानसिक स्थिती पाहून जर हि मुले काम करतील तर थोडे कमी पैसे मिळाले तरी तणावमुक्त आणि सुखी जीवन जगू शकतील.
या दोन्ही मुलांच्या बाबतीत असेच होताना मला स्पष्टपणे दिसते आहे. दोन्ही मुले जवळच्या व्यक्तींच्या अपेक्षाना पुरे पाडण्यात उरी फुटत आहेत. एवढा तणाव घेऊन तारुण्यातच वृद्धत्व येणारी माणसे या पिढीत बरीच दिसतील अशी शंका मला भेडसावते आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
किती सुंदर रित्या उदाहरणं
हम्म
सुंदर विवेचन !
हे थोडा ससा आणि कासवाच्या
खरे आहे. दुर्दैवाने आपल्या
मुलांचे बालपण कोमेजून गेले
मुलांचे बालपण कोमेजून गेले
तरी त्या काळातील लोकांना
माझ्या अकरावी बारावीच्या
चांगला विषय
जोपर्यंत उप्लब्ध संधी आणी
सुन्न आणि खिन्न करणारे अनुभव.
यावर उपाय काय ???
आयचा घो डॉक्टर!(काही चांगले
खूप चांगला लेख
कंपनीत टिअर १ संस्थांमधून
अात्ताही अामच्या कंपनीत टिअर
ही जीवघेणी शर्यत जिंकणे म्हणजे काय
किरकोळ काम करून कोण्ही महिना
सुंदर विवेचन !
चांगल्या दर्जाचे मनुष्य बळ हवं असेल तर
चांगल्या दर्जाचे मनुष्य बळ हवं असेल तर
https://youtu.be/tyrqUlTQHos
निष्कर्ष
पहिल्या पिढीतील उद्योजक मुळात
खूप छान
नॉट फेल्युअर बट लो एम इज
मला तो विमानाचा फोटो वर्णनातून फारच आवडला
नाही.
छान मुद्दा
माझं एक गृहीतक आहे.
RAT RACE म्हणजे नक्की काय?
A rat race is a fierce,
खूपच सुंदर लेख. छोटे उदाहरण
छान लेख आणि सुंदर विवेचन...
अती सुंदर
डोळ्यात अंजन घालणारा लेख