Skip to main content

कट्टा - रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019

लेखक प्रशांत यांनी शुक्रवार, 20/09/2019 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा मालक नीलकांत ह्यांच्या पुण्यनगरीतील आगमनाप्रीत्यर्थ कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019 वेळः सकाळी १०:०० वाजता स्थळः आपले नेहमीचेच पाताळेश्वर, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. मिसळपाव मुक्त संस्थळ असल्याने यायचा जायचा आणि खादाडीचा खर्च प्रत्येकाने आपला आपला करावयाचा आहे.

वाचने 54209
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

कुमार१ ह्यांनी लिहिलेला वृत्तांत खूप आवडला. कंजूस काकांचे इतक्या लांबवर आल्याबद्द्ल खास कौतुक. काही क्षणचित्रे लेण्यांतील गप्पांत रमलेले मिपाकर डावीकडून कंजूस, कुमार१, महासंग्राम, प्रशांत, नीलकांत आणि समीर शेलार a हसरे मिपाकर a

काढलेत प्रचेतस ! धन्यवाद

In reply to by जव्हेरगंज

नंबर एक. आवडेश. लगे रहो. -दिलीप बिरुटे

चलत्चित्र छान केले आहे. आवडले. धन्यवाद.

खुप दिवसांनंतर मिपाकरांना भेटता आले. मिपाकरांना भेटताना नेहमीच एक अनुभव येतो की चेहरा अनोळखी असतो माणुस मात्र ओळखीचा वाटतो. नेहमीच्या चर्चेने गप्पा करण्याइतपत सवयीचे अनोळखी चेहरे पाहून मजा येते. अर्थात त्यानंतर ते लोक आपले जवळचे होतात. कट्ट्याला कंजूस काका आले होते. थोडाच वेळ थांबता येईल हे माहिती असून सुध्दा ते एवढ्या दुरून आले हे विशेष वाटले. कुमार१ सरांशी भेट झाली. सोबतच महासंग्रामसोबत पेपरात काही देतोस का अशी विचारणा झाली मात्र पत्रकार काही ऐकेनात. ते आपले फक्त पाचशे वर अडून बसले. या निमीत्ताने फक्त ५० यांची सुध्दा आठवण निघाली. प्रशांत, वल्ली आणि यशोधरा यांच्याशी गलेमा आणि आगामी दिवाळी अंकाच्या गप्पा झाल्या. प्रकाश घाटपांडे काकांची अनेक वर्षांनी भेट झाली. लोथार मथायस नवीन होते त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. मला कटट्याची एक विशेष मदत होते ती म्हणजे मिपाबाबत प्रत्यक्ष फिडबॅक मिळतो. काय केलं पाहिजे. काय बदल हवाय असे नवनवीन समजते. समीर शेलार तसे नवीन होते पण ते एवढ्या लोकांना ओळखतात आणि श्रामो व बिकाच्या गप्पा झाल्या. एकंदरीत मजा आली. - नीलकांत

In reply to by नीलकांत

+१०, ००१ प्रत्यक्ष नीलकांत यांच्या लेखणीतून वृतान्त ! क्या बात हए ! नमस्कार नीलकांतसाहेब.

संस्थळावर काही काळ वावरल्यानंतर आपण इथल्या एखाद्या व्यक्तीबद्दल मनात एक रेखाचित्र उभे करतो. ते अर्थातच काल्पनिक असते. ते पूर्णपणे आपले कल्पनारंजन असते. या कट्ट्याला मालकमंडळी येणार म्हणून उत्सुकता होतीच. प्रशांत यांचा फोटो आधीच पाहिलेला असल्याने प्रश्न नव्हता. आता नीलकांत हे कसे असतील याचे एक चित्र मनात रेखाटले होते. असा अंदाज केला होता की ते एक मध्यमवयीन, छानपैकी मिशा राखलेले करारी गृहस्थ असावेत ! वास्तव आता आपल्यासमोर फोटोच्या रूपाने आहेच ! उत्साहाने सळसळते तरुण, विनम्र आणि सर्वांच्या सूचना अगदी प्रेमाने ऐकून घेणारे असे. असा कल्पना आणि वास्तवदर्शन यात जो खूप फरक निघतो, तो देखील आनंददायी असतो !

हे कट्टे नेमकं काय प्रयोजनासाठी असतात ? कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ? तेथे काय उपक्रम असतात यावर अधिकृत सविस्तर माहिती हवी होती तसेच कट्टे मिपाच्या ध्येयधोरणात बस्तात काय आणि कट्याला मिपाची ध्येयधोरणे व आचारसंहिता लागु आहे काय ?

In reply to by जॉनविक्क

अटेंड करायचा अनुभव खुप छान असतो. एकदा आले की पुन्हा यावे वाटते. मिपातल्या दिग्गज सेलिब्रेटीना भेटून भारावून जायला होते. यावेळी कट्टा पुण्यात असून ही उपस्थित राहता आले नाही याचे वाईट वाटले ! एकदा योग जमवून आणा. पहा कसे वाटते. सांगा अम्हालाही अनुभव तुमचा !

In reply to by चौथा कोनाडा

ह्या कट्टा प्रकरणाने मनाची उत्सुकता फारच शिगेला पोहोचली होती. दर वेळी मिपा एक नवीनच सरप्राइज असते. मला आधी वाटले होते की फक्त सास, सम वगैरेंनाच कट्याची परवानगी आहे. पण इथे तर सामान्य वाचकही कट्यास उपस्थित राहून आपल्या आवडत्या मिपा लेखकाला/मिपाकरांना प्रत्यक्ष भेटून अत्यन्त सुखावून जात असला पाहिजे. अतिशय स्तुत्य उपक्रम _/\_

कट्टानुभव कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ? इथे आपण एखादा विषय मांडतो, चर्चा होते. काही जणांना आपल्या विषयाची आवड आहे हे कळतं. मग बरेच लेखन, खरड, वैयक्तिक निरोपही होतात. मग समजतं जवळपास राहात आहे. भेटून तो सभासद कसा आहे ते पाहतो. हीच गम्मत. दीड तासाच्या कट्ट्यात फारसे बोलणं होत नाही. पण तो उद्देश नसतोच. पुन्हा लेखनातून संवाद होतच राहतात. बाकी मिपाधोरण किंवा कोणत्याही छापील माध्यमास संयमित/मर्यादित/व्यक्त होण्याचे धोरण ठेवावेच लागते. मिपाकरांनी एकमेकास भेटून काही बोलणे वगैरे केले त्याचा थेट संबंध कसा लावणार? आचारसंहिता वगैरे प्रश्न मला कळला नाही.

कट्टानुभव कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ? इथे आपण एखादा विषय मांडतो, चर्चा होते. काही जणांना आपल्या विषयाची आवड आहे हे कळतं. मग बरेच लेखन, खरड, वैयक्तिक निरोपही होतात. मग समजतं जवळपास राहात आहे. भेटून तो सभासद कसा आहे ते पाहतो. हीच गम्मत. दीड तासाच्या कट्ट्यात फारसे बोलणं होत नाही. पण तो उद्देश नसतोच. पुन्हा लेखनातून संवाद होतच राहतात. बाकी मिपाधोरण किंवा कोणत्याही छापील माध्यमास संयमित/मर्यादित/व्यक्त होण्याचे धोरण ठेवावेच लागते. मिपाकरांनी एकमेकास भेटून काही बोलणे वगैरे केले त्याचा थेट संबंध कसा लावणार? आचारसंहिता वगैरे प्रश्न मला कळला नाही.

In reply to by कंजूस

आचारसंहिता वगैरे ...
आचारसंहिता वगैरे म्हणजे इथे व्यक्त होताना ती पाळली गेली नाही तर प्रतिसाद संपादित होतो, समज मिळते अथवा बॅनही होऊ शकतो. तसेच कट्ट्यावर व्यक्त होताना काही पथ्ये पाळायची असतात का व ती मिपाचेच रुल्स एक्सटेंड करतात की कसे ?

‘कट्टा’ या विषयाच्या अनुषंगाने मी एक आवाहन करतो. संस्थळावरील लोकांच्या गाठीभेटी याव्यतिरिक्तही अन्य प्रकारचे कट्टा-उपक्रम समाजात चालू असतात. आपल्यातील काही जण अशा उपक्रमांचे सभासद असू शकतील. तर त्याची माहिती /अनुभव स्वतंत्र धागा काढून लिहीता येतील. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील असे काही अनुभव देखील असू शकतात. नमुन्यादाखल माझ्या यासंदर्भातल्या एका जुन्या लेखाचा दुवा देतो: https://misalpav.com/node/40878 जर अशा काही माहितीचे संकलन झाले तर आपण ‘कट्टा’ या शब्दाकडे व्यापक दृष्टीने बघू शकू.

इतर कोणते कट्टे? संस्थळावरील लोकांच्या गाठीभेटी याव्यतिरिक्तही अन्य प्रकारचे कट्टा-उपक्रम समाजात चालू असतात. आपल्यातील काही जण अशा उपक्रमांचे सभासद असू शकतील. तर त्याची माहिती /अनुभव स्वतंत्र धागा काढून लिहीता येतील. दहा वर्षे नियमित चालू असलेला एक कट्टा मुंबईत आहे. आयोजक डॉ उषा देसाई (80) आणि रिनि व्यास (70) आहेत. दर महिन्याला एका रविवारी कट्टा मुंंबईतल्या एका पार्कमध्ये सकाळी साडेसात ते साडेनऊ वेळात होतो. झाडांची ओळख हा विषय. बागेत फिरून झाडांची माहिती घेतात. साधारणपणे पन्नास ते सत्तर लोक येतात. निम्मे पंचवीशीतील असतात. (फक्त सिनिअर सिटिझन हाफ तिकिट नाहीत). कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, खर्च नाही, अवडंबर नाही. मी या कट्ट्याला अधुनमधून जातो. एक लेखही लिहिला आहे -ठाण्यातला पाचू दत्ताजी साळवी उद्यान. याचे फेसबुक पेज Tree Appreciation Walks Mumbai - facebook public group page

मुंबईत फार्मास्युटिकल केमिस्ट्स असोसिएशन वर्षातून तीन कट्टे भरवीत असे. २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट. १००/१५० च्या आसपास लोक असत. बहुतेक सारे औषध कारखान्यात काम करणारे `अन्न आणि औषधे कायद्याखाली मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी. स्थळ असे बोरिवली राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनीतले मॉडर्न बेकरी समोरचे क्रीडांगण वा असेच कोणतेतरी. न्याहारी, जेवण आणि केव्हाही मिळणारा चहा हे सारे वर्गणीत अंतर्भूत असे. मी औषध कंपनीतली नोकरी सोडल्यानंतरही मला चिटणिसांची आमंत्रणपत्रिका आणि दिवाळीचे शुभेच्छापत्र येत असे. माणसे जरी एवढी असली तरी कुठे ८-१०, कुठे २५-३० तर कुठे ४-५ असे अनेक वेगवेगळे गट बसत. नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, औषध नियंत्रण कायद्यातले फेरफार, कामगार कायदे इ. इ. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालत. काही जण फक्त पत्ते कुटत. कोणती चर्चा कुठे चालू आहे हे पाहून आपल्या आवडीप्रमाणे वा गरजेप्रमाणे कोणीही कुठेही घुसत असे. गाण्यांच्या कॅसेटसची देवघेव देखील गाणी उतरवून घेण्यासाठी होई. नवीन संशोधनाबाबत प्रशिक्षण देखील औषध प्रशासनाच्या साहाय्याने दिले जाई. हेपेटायटीस बी, लेप्टोस्पायरॉसिस, चिकुनगुनिया इ. रोगांबद्दल प्राथमिक माहिती आणि समाजजागृती अशा अनेक चांगल्या कार्यक्रमांची माहिती इथे मिळत असे. त्यातच एका फिल्म क्लबचा देखील कट्टा होत असे आणि त्या क्लबतर्फे दर्जेदार सिनेमे दाखवले जात. आपली आवड जाणून काही चित्रपटांना आपल्याला खास आमंत्रित म्हणून आमंत्रण दिले जायचे. 'बायसिकल थीफ'सारखे काही दर्जेदार सिनेमे मी खास आमंत्रित म्हणून पाहिलेले आहेत. अगदी पाचेक वर्षापूर्वी मला माजी सचिवांनी शास्त्रीय संगीताच्या काही डीव्हीडी स्पीड पोस्टने पाठवल्या होत्या. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषणबाजी टाळून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती सांगणे आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे अशा स्वरूपात ३०-४० मिनिटात देखील सैद्धान्तिक आणि अनुभवाचे बोल अशी मोलाची माहिती मिळे.

वा ! टीपी के, कंजूस व सुधीर, उपयुक्त माहिती. टी पी, हे टोस्ट मास्टर के असते ?

कट्ट्याला काही खास मजा आलेली दिसत नाही. खाण्यापिण्याची काही खास मजा नाही. उन्हातान्हात, पावसात चांगलीच रखडपट्टी झाली असावी. फोटोही तेच तेच फिरवून छापावे लागलेले दिसतात. चर्चेचे विषयही काही फारसे चमचमीत वाटले नाहीत. एकूण विशेष मजा आलेली दिसत नाही. एकंदरीत पुणे येथील कट्टे ठाण्याप्रमाणे कितपत मनोरंजक, सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणारे बांधिलकी दाखवणारे असतात याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते असे परखड मत नोंदवून मी खाली बसतो. कोण आयोजक होतं बरं यावेळी? धन्यवाद. (प्रशांत, पुढील दोनशे प्रतिसादांची सोय केल्याबद्दल अल्प शुल्क पेपालने स्वीकारतो)

In reply to by गवि

एकंदरीत पुणे येथील कट्टे ठाण्याप्रमाणे कितपत मनोरंजक, सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणारे बांधिलकी दाखवणारे असतात याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते असे परखड मत नोंदवून मी खाली बसतो.
अगदी अगदी..!
कोण आयोजक होतं बरं यावेळी?
वल्लीशेठ होते म्हणे, पण ( नेहमीप्रमाणे कारणे दाखवून माघार) ऐनवेळी मग प्रशांतकडे जवाबदारी आली. पण कसे का असेना, प्रशांतसेठ निभावून नेतात. मग कट्टा असो, की सायकल प्रवास, की मित्र असोत. बाय द वे गविशेठ, मी जर आलो असतो तर मला तुमच्या शेजारी उभे राहुन फोटो घ्यायचा होता. काढू दिला असता की धुसफुस केली असती ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीची लेणी पायपीट आयोजन वगळता इतरत्र धरसोड असतेच वृत्ती. पण अर्रर्र, आपले प्रशांतशेठ होते का फायनल आयोजक? दिलगिरी. एक उत्तम कट्टा. पुकप्र.

In reply to by गवि

एक उत्तम कट्टा. पुकप्र.
असेच म्हणतो. मिपाकट्टा म्हणजे तरी काय असतो. भेटणे, बोलणे, लिहिणे, प्रोत्साहन देणे. आणि जालीय आयडी-व्यक्तिमत्वांच्या मुखवट्यात प्रत्यक्ष काही क्षण सुखाचे. अरुण कोल्हटकरांची क्षमा मागून, त्यांच्या कवितेत बदल करुन लिहितो. ''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा नको ठेवू आमचे सर्वांचे प्रतिसाद पावसात भिजो, शाही फुटो, ही अक्षरं विरघळोत, आमच्या लेखनांचा लगदा होवो. या जालजगतात, आमच्याच मिपाच्या अंश सापडो.'' प्रशांतसेठ, छान झाला कट्टा. आता औरंगाबादला करु कट्टा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा नको ठेवू आमचे सर्वांचे प्रतिसाद पावसात भिजो, शाही फुटो, ही अक्षरं विरघळोत, आमच्या लेखनांचा लगदा होवो. या जालजगतात, आमच्याच मिपाच्या अंश सापडो.''
तुमच्या या प्रतिभेपायी बाकी कसे का असेनात, आम्ही तुम्हाला वंदनीय मानतो. (अर्थात वय हाही एक भाग आहेच.)

In reply to by गवि

तुम्ही दोघेही 'दो हंसो का जोडा' आहात. एकाचा प्रतिसाद आला की दुसरा येतो, दुसर्‍याचा आला की पहिला येतो.

In reply to by गवि

=))

In reply to by प्रचेतस

वेरुळला केलात तर मी येईन.
हा असेल तर पायपीट, वणवण वॉर्निंग देणं हे जनहितार्थ कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण त्या लेण्यांशी एकरुप होण्याबाबत मात्र __/\__ एकदा कैलासाच्या दारात काहीजण उभे असताना अमुक पावले सरळ जाऊन डावीकडे पहा की तमुक मूर्ती. पुढे डावीकडे अमुक पावले तिथे अमुक क्रमाने या मूर्ती. तिथून किती पायऱ्या वर चढल्यावर नेमकं समोर काय येईल हे हा मनुष्य बसल्या जागेवरून त्यांना संदेश पाठवून सांगत होता.

In reply to by गवि

तुम्हि ठाण्याला कट्टा ठरवा आम्हि येवु. बर्‍याच लोकांना जेवणासाठी थांबणे शक्य नसल्याने यावेळी जेवणाचा बेत हुकला.

जसं बुद्धिबळ खेळणाऱ्याला आपल्यापेक्षा वरचढ /समतुल्य प्रतिस्पर्ध्याशी खेळायचं असतं तसं काही कट्टेकऱ्यांचही असतं बहुतेक. नाही तर ते टाळतात.