मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

पाषाणभेद ·

पाषाणभेद 24/08/2020 - 17:22
ताक. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

चित्रगुप्त 24/08/2020 - 18:23
धडा मस्त लिवलाय पाभौ. हा भाग १ झाला. आता दर दोन-तीन महिनांनी मधल्या काळातील घटनांचा आढावा घेत आणखी पुढले लेख लिहीत रहावे. करोनाचा प्रभाव - देशी आणि जागतिक - यांचाही आढावा घ्यावा, असे वाटते. ही एक लेखमालिकाच होऊ शकते. पुभाशु.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 25/08/2020 - 22:55
नको हो चित्रगुप्तजी, थोडक्यात गोडी असते. अन तसेही हा धडा नॉस्टॅल्जीया किंवा जून्या आठवणी असलेल्या मिपावरील लेखमालीकेसाठी लिहीलेला होता. म्हणजे असे की, पुढल्या दशकातल्या मुलांना हा धडा असेल अन त्यांना आता २०२० मध्ये काय घडले ते वाचता येईल. बाकी काय, परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे? अहो, उलट तुम्ही जास्त फिरतात हिंडतात. तुम्हीच लिहा की एखादा चित्रलेख!!

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 26/08/2020 - 03:20
@पाषाणभेदः
परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?
सध्या अमेरिकेत आलेलो आहोत, आणि इकडे येण्यापूर्वीचे, प्रवासातले आणि आल्यावर केलेल्या कोरोनाशी संघर्षाचे वर्णन केलेला खालील लेखही लिहीला आहे. http://www.misalpav.com/node/47307
लिहा की एखादा चित्रलेख!!
आणखी एक नवा चित्रेलेख 'माळवा - काही आठव्णी, काही चित्रे' हा श्रीगणेश लेखमालेत येऊ घातला आहे.

पाषाणभेद 24/08/2020 - 17:22
ताक. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

चित्रगुप्त 24/08/2020 - 18:23
धडा मस्त लिवलाय पाभौ. हा भाग १ झाला. आता दर दोन-तीन महिनांनी मधल्या काळातील घटनांचा आढावा घेत आणखी पुढले लेख लिहीत रहावे. करोनाचा प्रभाव - देशी आणि जागतिक - यांचाही आढावा घ्यावा, असे वाटते. ही एक लेखमालिकाच होऊ शकते. पुभाशु.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 25/08/2020 - 22:55
नको हो चित्रगुप्तजी, थोडक्यात गोडी असते. अन तसेही हा धडा नॉस्टॅल्जीया किंवा जून्या आठवणी असलेल्या मिपावरील लेखमालीकेसाठी लिहीलेला होता. म्हणजे असे की, पुढल्या दशकातल्या मुलांना हा धडा असेल अन त्यांना आता २०२० मध्ये काय घडले ते वाचता येईल. बाकी काय, परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे? अहो, उलट तुम्ही जास्त फिरतात हिंडतात. तुम्हीच लिहा की एखादा चित्रलेख!!

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 26/08/2020 - 03:20
@पाषाणभेदः
परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?
सध्या अमेरिकेत आलेलो आहोत, आणि इकडे येण्यापूर्वीचे, प्रवासातले आणि आल्यावर केलेल्या कोरोनाशी संघर्षाचे वर्णन केलेला खालील लेखही लिहीला आहे. http://www.misalpav.com/node/47307
लिहा की एखादा चित्रलेख!!
आणखी एक नवा चित्रेलेख 'माळवा - काही आठव्णी, काही चित्रे' हा श्रीगणेश लेखमालेत येऊ घातला आहे.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या

माहितगार ·

माहितगार 12/09/2020 - 10:22
बातमीत सुखकारक भाग दिसला नाही की घाबरवताय म्हणायचे, सुखकारक भाग ऐकला की निष्काळजीपणाने जगायचे भोगायचे आणि खापरपुन्हा आरोग्य यंत्रणेच्या माथी फोडायचे. बातमीचा सुखकारक नंतर देतो पण अती आत्मविश्वास किंवा कोरोनाची धास्ती पोकळ म्हणण्याच्या खालील दोन परिणामांचे नेमके काय करायचे ?
An increase of 16.91 per cent has been registered in the death of patients without co-morbidities
The critical rate, however, has also increased from 5.54 per cent, which has led to critical patients struggling to find beds.
...A week later, Pune Metropolitan Region, which has among the highest concentration of urban and semi-urban spaces in the district, registered its single highest 24-hour tally with 4,935 new patients. As on Thursday, it had 40,152 active patients. ...
सुखकारक भाग वाचा पण सुखावून निष्काळजी होऊ नका अनेक दुसर्‍या मानवी जीवांचा प्रश्न आहे, केवळ तुमच्या स्वतःच्या नव्हे.
The percentage of active cases dropped from 15.9 to 14.68. The mortality rate has improved as it reduced from 2.39 per cent to 2.34 per cent, while the recovery rate has increased from 81.7 per cent to 82.97 per cent.
संदर्भ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/september-surge-active-cases-top-40000-in-pune-region/articleshow/78069697.cms https://indianexpress.com/article/cities/pune/pune-more-deaths-of-patients-without-co-morbidities-recorded-in-pmc-this-week-6592508/ सुरक्षीत अंतर, मास्क, प्रत्येक स्पर्षजन्याचे स्पर्षा आधी आणि नंतर निर्जुंतुकीकरण सोप्पच आहे, न पाळून अवघड करू नका

दैनिक सकाळच्या बातमीवर आधारीत 'आता तरी भानावर या' या शीर्षकाचा मी धागा काढला. काही मिपाकरांनी त्याची 'जिलबी' म्हणून संभावना केली
आपल्या धाग्यास ज्या मिपाकरांनी 'जिल्बी' म्हणून संभावना केली असेल, त्या मिपाकरांमधे मीही एक होतो, मिपाकरांनी असे म्हणायला नको. 'इथं परस्थिती काये' भान असायला पाहिजे. धाग्याला जिल्बी खरं म्हणायची वेळ येऊ नये. पण, संयमाचा बांध कधीतरी फुटतोच. बाकी,त्याबद्दल आजही कोणता पश्चाताप नाही. -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/09/2020 - 13:07
पुण्याची आजची स्थिती पहाता त्यावेळचा सकाळचा लेख आणि माझा धागा दोन्ही समयोचितच होते. सुयोग्य दक्षता न घेणार्‍यांबद्दल बांध कुणाचा फुटावयास हवा ? संयमाने दक्षता बाळगून इतरांना दक्षतेचा सल्ला दिल्या नंतरही पाळली जात नाही हे पहाण्याची वेळ येणार्‍यांचा की दक्षता न पाळणार्‍या निष्काळजी लोकांचा आणि त्यांची पाठराखण करणार्‍यांचा?

माहितगार 13/09/2020 - 09:20
मे २०२० मध्ये कोविडने मुंबईत कळस गाठला असताना मे २०१९ पेक्षा जवळपास दुप्प्ट मृत्यू झाले. गेल्या दहा वर्षातीलतरी मृत्युंचा उच्चांक केला. मे महिन्या पर्यंत पॉझीटीव्ह म्हणून रिपोर्ट न झालेल्या पण मृत घोषीत करण्यासाठी हॉस्पीटल कडे आलेल्या मृतांचा मृत्यू कोविड ने झाला नाही ना याची अंशतः खात्री केली जात होती, आकडेवारी हाता बाहेर जाते आहे पाहून प्रशासनाने ही चाचणी बंद केली. (ट्रेस आणि ट्रॅकला हरताळ या निर्णयामुळे फासला गेला तो तुर्तास बाजूस ठेऊ) मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या अधिकृत प्रशासकीय आकडा फक्त 6,395 मात्र होता, पण एकुण मृत्यू 49,040 झाले, वर्ष २०१९ च्या याच ५ महिन्याच्या कालावधीतील मृत्यू 35,982 होते म्हणजे गत वर्षापेक्षा 13,058 अधिक मृत्यू म्हणजे टक्केवारीने मुंबईत ३७ टक्क्याच्या आसपास मृत्यूदर १ मार्च ते ३१ जुलै या पाच महिन्याच्या काळात वाढला. मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या तांडवाचा हिशेब मांडताना अपघाती मृत्यू २०१९ च्या या कालावधीतील जवळपास २/३ ने कमी झाले ते वगळावे लागतात. तर कोविड साथीचे मार्च ते जुलै पाच महिन्यातील ९०० च्या आसपासही मृत्यू कोविड कालीन वाढीचा भाग मानावा लागतो . हे दोन टक्के मृत्यू जोडले तर इटलीतही साथ टोकावर असताना सर्वसाधारणपणे मृत्यूदर गतवर्षापेक्षा ३९ टक्क्याने वाढला होता - आम्ही युरोमेरीकेपेक्षा काही बरे करतो आहोत या फुशारकीत बहुधा तथ्य नसावे. बाहेरगावचे लोक उपचारासाठी येतात त्यांचे मृत्यूही ह्यात पकडले जातात ज्या कोविडेतर रुग्णांना उपचार न मिळाल्याने मृत्यू झाले असतील त्याचे ही आकडे यात असतील अशी सारवा सारव प्रशासन करताना दिसते - जर बहुतांश वाढीव मृत्यू हॉस्पीटलला न पोहोचता झाले असतील तर प्रशासनाचा हा बचाव पटणारा वाटत नाही, सर्व मृतांचे पॉझीटीव्ह असणे तपासले असते तर मुंबई सोडून पळून उर्वरीत राज्य आणि भारतात जाणार्‍यांना अंशतः तरी क्वारंटाईन करून प्रसार टाळता आला असता. त्या शिवाय मुंबईत टेस्टींग आंणि उपचार सुविधा उपलब्ध असून मृत्यूदर ३९ टक्क्याने वाढलेला ज्या भागात टेस्टींग आंणि उपचार सुविधांचा अभाव असलेल्या उर्वरीत महाराष्ट्राचे काय? पुण्यातली गेल्या वर्षा सोबतची तुलना आलेली नाही पण आयसीयु बेडची उपलब्धता अगदी काठावर आहे, अँब्युलन्स उपलब्धता आणि स्मशानभूमीवरील सुविधा आणि कर्मचार्‍यांची स्थिती गंभीर तणावात आहे. संदर्भ https://indianexpress.com/article/cities/mumbai/covid-outbreak-64349-deaths-in-mumbai-this-year-6587188/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-coronavirus-live-updates-mumbai-thane-pune-unlock-4-guidelines-cases-deaths-vaccine-sero-survey-news-6579764/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-mumbai-pune-coronavirus-live-updates-cases-deaths-vaccine-6591491/ https://www.hindustantimes.com/pune-news/chase-the-virus-pune-dist-admin-to-start-100-per-cent-testing-at-164-hotspots-in-next-ten-days/story-pz8iesNbbM0I67JSuoaLUI.html https://www.mid-day.com/articles/why-should-pune-with-a-population-of-just-31-2-lakh-account-for-the-highest-number-of-covid-19-cases-in-india/22986237

Rajesh188 13/09/2020 - 09:30
Corona नियंत्रीत करण्यात पाकिस्तान नी उत्तम कार्य केले आहे. साधीचे रोग कसे नियंत्रित करावेत हे पाकिस्तान कडून शिकून घ्या असे who नी म्हंटले आहे. बहुमत नी सत्तेवर बसलेल्या bjp सरकार नी तबोडतोप सत्ता सोडली पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 14/09/2020 - 11:10
पाकीस्तान बाबत लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. सर्वसाधारण मृत्यूदरच अधिक असेल तर वाढीव मृत्यूदर कमी भरेल अर्थात भारतीय उपमहाद्विपात सांख्यिकीची वानवा आहेच. मुंबईच्या मागच्या वर्षाच्या मृतूदराच्या तुलनेत या वर्षाचा मृत्यूदर पाहील्या नंतर कोविड कालिन मृत्यूदर ३७ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले. पाकीस्तानचीही अशी आकडेवारी समोर येईल तेव्हा नेमका परिणाम सांगता येईल.

माहितगार 12/09/2020 - 10:22
बातमीत सुखकारक भाग दिसला नाही की घाबरवताय म्हणायचे, सुखकारक भाग ऐकला की निष्काळजीपणाने जगायचे भोगायचे आणि खापरपुन्हा आरोग्य यंत्रणेच्या माथी फोडायचे. बातमीचा सुखकारक नंतर देतो पण अती आत्मविश्वास किंवा कोरोनाची धास्ती पोकळ म्हणण्याच्या खालील दोन परिणामांचे नेमके काय करायचे ?
An increase of 16.91 per cent has been registered in the death of patients without co-morbidities
The critical rate, however, has also increased from 5.54 per cent, which has led to critical patients struggling to find beds.
...A week later, Pune Metropolitan Region, which has among the highest concentration of urban and semi-urban spaces in the district, registered its single highest 24-hour tally with 4,935 new patients. As on Thursday, it had 40,152 active patients. ...
सुखकारक भाग वाचा पण सुखावून निष्काळजी होऊ नका अनेक दुसर्‍या मानवी जीवांचा प्रश्न आहे, केवळ तुमच्या स्वतःच्या नव्हे.
The percentage of active cases dropped from 15.9 to 14.68. The mortality rate has improved as it reduced from 2.39 per cent to 2.34 per cent, while the recovery rate has increased from 81.7 per cent to 82.97 per cent.
संदर्भ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/september-surge-active-cases-top-40000-in-pune-region/articleshow/78069697.cms https://indianexpress.com/article/cities/pune/pune-more-deaths-of-patients-without-co-morbidities-recorded-in-pmc-this-week-6592508/ सुरक्षीत अंतर, मास्क, प्रत्येक स्पर्षजन्याचे स्पर्षा आधी आणि नंतर निर्जुंतुकीकरण सोप्पच आहे, न पाळून अवघड करू नका

दैनिक सकाळच्या बातमीवर आधारीत 'आता तरी भानावर या' या शीर्षकाचा मी धागा काढला. काही मिपाकरांनी त्याची 'जिलबी' म्हणून संभावना केली
आपल्या धाग्यास ज्या मिपाकरांनी 'जिल्बी' म्हणून संभावना केली असेल, त्या मिपाकरांमधे मीही एक होतो, मिपाकरांनी असे म्हणायला नको. 'इथं परस्थिती काये' भान असायला पाहिजे. धाग्याला जिल्बी खरं म्हणायची वेळ येऊ नये. पण, संयमाचा बांध कधीतरी फुटतोच. बाकी,त्याबद्दल आजही कोणता पश्चाताप नाही. -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/09/2020 - 13:07
पुण्याची आजची स्थिती पहाता त्यावेळचा सकाळचा लेख आणि माझा धागा दोन्ही समयोचितच होते. सुयोग्य दक्षता न घेणार्‍यांबद्दल बांध कुणाचा फुटावयास हवा ? संयमाने दक्षता बाळगून इतरांना दक्षतेचा सल्ला दिल्या नंतरही पाळली जात नाही हे पहाण्याची वेळ येणार्‍यांचा की दक्षता न पाळणार्‍या निष्काळजी लोकांचा आणि त्यांची पाठराखण करणार्‍यांचा?

माहितगार 13/09/2020 - 09:20
मे २०२० मध्ये कोविडने मुंबईत कळस गाठला असताना मे २०१९ पेक्षा जवळपास दुप्प्ट मृत्यू झाले. गेल्या दहा वर्षातीलतरी मृत्युंचा उच्चांक केला. मे महिन्या पर्यंत पॉझीटीव्ह म्हणून रिपोर्ट न झालेल्या पण मृत घोषीत करण्यासाठी हॉस्पीटल कडे आलेल्या मृतांचा मृत्यू कोविड ने झाला नाही ना याची अंशतः खात्री केली जात होती, आकडेवारी हाता बाहेर जाते आहे पाहून प्रशासनाने ही चाचणी बंद केली. (ट्रेस आणि ट्रॅकला हरताळ या निर्णयामुळे फासला गेला तो तुर्तास बाजूस ठेऊ) मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या अधिकृत प्रशासकीय आकडा फक्त 6,395 मात्र होता, पण एकुण मृत्यू 49,040 झाले, वर्ष २०१९ च्या याच ५ महिन्याच्या कालावधीतील मृत्यू 35,982 होते म्हणजे गत वर्षापेक्षा 13,058 अधिक मृत्यू म्हणजे टक्केवारीने मुंबईत ३७ टक्क्याच्या आसपास मृत्यूदर १ मार्च ते ३१ जुलै या पाच महिन्याच्या काळात वाढला. मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या तांडवाचा हिशेब मांडताना अपघाती मृत्यू २०१९ च्या या कालावधीतील जवळपास २/३ ने कमी झाले ते वगळावे लागतात. तर कोविड साथीचे मार्च ते जुलै पाच महिन्यातील ९०० च्या आसपासही मृत्यू कोविड कालीन वाढीचा भाग मानावा लागतो . हे दोन टक्के मृत्यू जोडले तर इटलीतही साथ टोकावर असताना सर्वसाधारणपणे मृत्यूदर गतवर्षापेक्षा ३९ टक्क्याने वाढला होता - आम्ही युरोमेरीकेपेक्षा काही बरे करतो आहोत या फुशारकीत बहुधा तथ्य नसावे. बाहेरगावचे लोक उपचारासाठी येतात त्यांचे मृत्यूही ह्यात पकडले जातात ज्या कोविडेतर रुग्णांना उपचार न मिळाल्याने मृत्यू झाले असतील त्याचे ही आकडे यात असतील अशी सारवा सारव प्रशासन करताना दिसते - जर बहुतांश वाढीव मृत्यू हॉस्पीटलला न पोहोचता झाले असतील तर प्रशासनाचा हा बचाव पटणारा वाटत नाही, सर्व मृतांचे पॉझीटीव्ह असणे तपासले असते तर मुंबई सोडून पळून उर्वरीत राज्य आणि भारतात जाणार्‍यांना अंशतः तरी क्वारंटाईन करून प्रसार टाळता आला असता. त्या शिवाय मुंबईत टेस्टींग आंणि उपचार सुविधा उपलब्ध असून मृत्यूदर ३९ टक्क्याने वाढलेला ज्या भागात टेस्टींग आंणि उपचार सुविधांचा अभाव असलेल्या उर्वरीत महाराष्ट्राचे काय? पुण्यातली गेल्या वर्षा सोबतची तुलना आलेली नाही पण आयसीयु बेडची उपलब्धता अगदी काठावर आहे, अँब्युलन्स उपलब्धता आणि स्मशानभूमीवरील सुविधा आणि कर्मचार्‍यांची स्थिती गंभीर तणावात आहे. संदर्भ https://indianexpress.com/article/cities/mumbai/covid-outbreak-64349-deaths-in-mumbai-this-year-6587188/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-coronavirus-live-updates-mumbai-thane-pune-unlock-4-guidelines-cases-deaths-vaccine-sero-survey-news-6579764/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-mumbai-pune-coronavirus-live-updates-cases-deaths-vaccine-6591491/ https://www.hindustantimes.com/pune-news/chase-the-virus-pune-dist-admin-to-start-100-per-cent-testing-at-164-hotspots-in-next-ten-days/story-pz8iesNbbM0I67JSuoaLUI.html https://www.mid-day.com/articles/why-should-pune-with-a-population-of-just-31-2-lakh-account-for-the-highest-number-of-covid-19-cases-in-india/22986237

Rajesh188 13/09/2020 - 09:30
Corona नियंत्रीत करण्यात पाकिस्तान नी उत्तम कार्य केले आहे. साधीचे रोग कसे नियंत्रित करावेत हे पाकिस्तान कडून शिकून घ्या असे who नी म्हंटले आहे. बहुमत नी सत्तेवर बसलेल्या bjp सरकार नी तबोडतोप सत्ता सोडली पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 14/09/2020 - 11:10
पाकीस्तान बाबत लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. सर्वसाधारण मृत्यूदरच अधिक असेल तर वाढीव मृत्यूदर कमी भरेल अर्थात भारतीय उपमहाद्विपात सांख्यिकीची वानवा आहेच. मुंबईच्या मागच्या वर्षाच्या मृतूदराच्या तुलनेत या वर्षाचा मृत्यूदर पाहील्या नंतर कोविड कालिन मृत्यूदर ३७ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले. पाकीस्तानचीही अशी आकडेवारी समोर येईल तेव्हा नेमका परिणाम सांगता येईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ पहिल्या १०८ दिवसात जे १०,००० गेले त्यातले ५२% मुंबईतले होते, नंतरच्या १०,००० मुंबईचा टक्का घसरून १९% म्हणजे गेल्या ३७ दिवसातील १०,००० मृत्यू पैकी ८१ % उर्वरीत महाराष्ट्रातून आलेत.

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक ·

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.
लेखनविषय:

हागिया सोफियाचे निमीत्त

माहितगार ·

माहितगार 01/08/2020 - 13:01
* उपरोक्त धागा लेखात ऐतिहासिक संदर्भ नमुदकरताना खुपसे संदर्भ वापरलेले नाहीत त्यामुळे त्रुटी असू शकतात. * अधिक वाचनासाठी काही संदर्भ ** आखातातील वर्चस्वाची नवी समीकरणे दैनिक सामना ** तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर! महानगर ** बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज ** Hagia Sophia इंग्रजी विकिपीडिया लेख ** https://en.wikipedia.org/wiki/Istanbul ** https://en.wikipedia.org/wiki/Constantinople

भीमराव 01/08/2020 - 14:07
सध्या कुराण वाचीत आहे. मुहम्मद मुळचा टोळी व्यवस्थेचं आपत्य. विविध इष्ट देवतेची पुजा करणाऱ्या टोळ्या एकत्र करण्यासाठी मुहम्मदनं बरेचशे आदेश त्याच्या अनुयायांना दिले होते (जे मुर्ती पुजे विरोधी होते) तसेच बरेच आदेश इसाई व ज्यु लोकांविरुद्ध सुद्धा दिले होते. कुराण वाचत असताना काही गोष्टी मला समजत आहेत त्या पुढील प्रमाणे. १. कुराण मुसलमान सोडून इतर लोकांना मुलभूत मानवी स्वातंत्र्य सुद्धा देत नाही. २. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत ३. कुराण किंवा कुराणचे अनुयायी सहिष्णू नाहीत. ४. कुराण च अंतिम ध्येय येन केन प्रकारे सगळे मार्ग नष्ट करून एकच मार्ग कायम ठेवणं हे आहे. ५. कुराण सरळ शब्दात धार्मिक दहशत पसरवतं टिप. माझे वैयक्तिक विचार सेक्युलॅर आहेत. वर दिलेल्या गोष्टी मी कुराण वाचत असताना मला समजल्या त्या दिलेल्या आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. वरील उतारा जर धार्मिक भावनेला चिथावत असेल तर त्यामधे माझा दोश नाही. संपादक मंडळ- अक्षेपार्ह असेल तर वर लिहिले काढून टाकले तरी चालेल

In reply to by भीमराव

माहितगार 01/08/2020 - 16:13
मुस्लिमांमधील समस्या मुलतः वैचारीक नवजागरण आणि उत्क्रांतीत कमी पडत असण्याची आहे. बाकी धर्मीय धर्मग्रंथातही समस्या आणि अडचणीच्या जागा आहेत पण व्यक्तीपुजा आणि ग्रंथ महात्म्याला काळाच्या ओघात सुयोग्य जागी मुरड घातली गेली, तशी मुरड घालण्यात मुस्लीम समाज प्रगती करणारच नाही असे नाही पण तो खूपच सावकाश आहे. अर्थात ज्यांना त्यांच्यात सामाजिक उत्क्रांती घडून हवी आहे त्यांना हा वैचारीक लढा विचारांनी द्यावा लागणार आहे, मुस्लिमांवर सेक्युलॅरीझम अथवा इतर धर्मीय सत्ता केवळ कृत्रिमपणे लादून होणार नाही. कारण असे कृत्रिमपणे लादण्याचे प्रयोग रशिया ते इतर अनेक उदाहरणातून खुपसे यशस्वी नसल्याचे दिसून आले आहे. समाजाच्या वैचारीक प्रबोधनाची जागा इतर उपायांनी पूर्णतः घेतली जाऊ शकत नाही.

In reply to by भीमराव

एस 02/08/2020 - 02:21
प्रतिसादाशी सहमत आहे. हाया सोफ्या या चर्चचे मशिदीत रूपांतर करणे आणि नंतर पुन्हा संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करणे ह्या दोन्ही गोष्टी धर्मांधता दर्शवितात. जगभरातच अतिउजव्या किंवा धर्मवेड्या सत्ताधाऱ्यांची संख्या आणि त्यांचे बळ वाढत चालले आहे आणि या गोष्टीचा थेट तोटा हा कल्याणकारी लोकशाही, पर्यावरण, गरिबी निर्मूलन व निधर्मवाद ह्या मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या रूपाने समोर येत आहे. इस्लामला तर्कसंगत चिकित्सा मान्य नाही. इस्लामला इतर धर्मियांचे साधे अस्तित्त्वदेखील मान्य नाही. नरहर कुरुंदकरांची याबाबतीतील मते ही इस्लामप्रेमी आणि इस्लामद्वेष्टे या दोन्हींनी अभ्यासून पहावीत अशीच आहेत. सवांतर - पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक समाजाने आज बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व हे ह्या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. त्यांचे अभिनंदन आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतीस मानवंदना.

In reply to by भीमराव

सुनील 02/08/2020 - 07:09
२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत
कुराणात बौद्ध आणि हिंदू या धर्मांचे उल्लेख आहेत हे वाचून मन भरून आले! आणि शिख धर्माचाही उल्लेख आहे हे वाचून तर डोळे पाण्याने डबडबले शिवाय कंठही दाटून आला!! असेच विविध धर्मग्रंथ वाचीन चला आणि आम्हाला बोधामृत पाजीत चला, ही विनंती!

Gk 01/08/2020 - 14:50
जावळीचे वंशज भोसलेंच्या वारसांना आमची जिंकलेली इस्टेट परत करा असे म्हणतील

In reply to by Gk

माहितगार 01/08/2020 - 15:20
मनुष्यभावना आणि जनभावना ह्या व्यक्तिगत लाभाच्या आणि समुह लाभाच्या मालमत्तेतही गुंतलेल्या असतात नाही असे नाही. पण त्यापेक्षा ही अधिक त्या सांस्कृतिक वारस्यात अधिक गुंतलेल्या असतात. त्यात त्यांच्या सांस्कृतिक स्वत्वाची भावना निगडीत असण्याची बर्‍यापैकी शक्यता असते. ईस्ट इंडिया कंपनी काळात केलेली मालमत्ता लूटीचे डिटेल्स बर्‍यापैकी कागदोपत्री असले तरी त्याबद्दलचा दावा तेवढ्या आग्रहाने केला जात नाही जेवढ्या आग्रहाने छ. शिवाजी महाराजांच्या तलवार अथवा चित्र विषयक दावा केला जाईल. नेमके याच बाबतीत सेक्युलर मंडळी सांस्कृतिक वारस्याचे मुल्य सर्वसाधारण मालमत्तेप्रमाणे करण्यास जातात आणि मानवी जनभावना समजण्यास कमी पडतात. परिणामी जनतेच्या नजरेतून उतरून सेक्युलॅरीझमचा खातमा होण्यास स्वतःच मदत करतात असे होत नाही का?

In reply to by Gk

गामा पैलवान 01/08/2020 - 15:27
Gk, जावळीची इस्टेट हे प्रार्थनास्थळ आहे का? नाही म्हणायला अफझुल्याचं थडगं परत घेऊन तिथला अनधिकृत दर्गा पाडला पाहिजे. आ.न., -गा.पै.

Gk 02/08/2020 - 07:40
इतिहासातील पाडापाडी प्रत्येक वेळेला लाभदायकच ठरेल असे नाही. स्टॅलिनने महायुद्धाच्या वेळी इतका प्रांत जिंकला की त्या उन्मादात त्याने तैमुरलनग चे थडगे उकरून कवटी घेऊन गेला, त्यानंतर त्याची प्रचंड हार झाली , मग कुणीतरी बोलले , गप ते थडगे आहे तसे बांध म्हणून. http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-changed-the-course-of-world-war-ii बाबरही त्याच खानदानातील.....

In reply to by Gk

Gk 02/08/2020 - 08:09
शाहण्याने आपले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे असे गाणे आहे https://youtu.be/cUz7fWGdDkI दुसर्याचे खणले की पनवती लागते

In reply to by आनन्दा

Gk 10/09/2020 - 14:56
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulently-from-bank-accounts-of-ram-mandir-trust-fir-registered-2308707.html/amp In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

In reply to by Gk

सुबोध खरे 11/09/2020 - 10:32
आपल्याला कधी कोणी फसवले नाही का? फसवणूक हि सर्वत्र आहे. भिकाऱ्याच्या वाटीतील भीक चोरणारी माणसे जगात आहेत मग एखाद्या श्रीमंत ट्रस्ट मध्ये अफरातफर होईल यात काय विशेष?

In reply to by Gk

सुबोध खरे 12/09/2020 - 22:20
ते चौकीदार चोर है ला प्रत्युत्तर म्हणून काढलं होते. पण सर्वोच्च न्यायालयाने पप्पूला इतकी जोरदार चपराक मारली की बाकीच्यांना चौकीदार व्हायची गरजच पडली नाही.

In reply to by Gk

सुबोध खरे 13/09/2020 - 13:29
हो ना श्री राहुल गांधी यांनी कोणताही पुरावा नसताना निवडणुकीच्या अगोदर श्री मोदी भ्रष्ट आहेत अशी राळ उडवून देण्याचा जुमला केला. निवडणुकीत एका गालावर मतदारांनी आणि दुसऱ्या गालावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

माहितगार 18/08/2020 - 23:32
अमीर खा(रस्ता)न तुर्कस्थानला आधुनिक कालीन खलिफा बनवु पहाणार्‍या एर्दोगानांच्या पत्नीस तुर्कस्थानात जाऊन भेटल्याचे वृत्त आहे. तथाकथित सेक्युलर मंडळींनी व्हॉटाबाऊटरी करत त्याची पाठराखण चालू केली आहे. भारतातील बहुसंख्यच सोडून द्या, ख्रिश्चनचर्चचे पुन्हा एकदा मस्जिदीकरण करण्याच्या कृत्य एर्दोगानाने करुन काही आठवडेही पार पडलेले नसताना हा महाभाग एर्दोगानाच्या पत्नीस आंमत्रण मागवून भेटतो हे भारतीय अल्पसंख्यांकातील ख्रिश्चनांना पटेल काय ? हे जर पटणे शक्य असेल तर राहुल गांधीनी सुद्धा एर्दोगानांना जाऊन भेटावे आणि तिथुन पुढचे विमान आजोळच्या व्हॅटीकनचे घेऊन पोप महाशय काय कौतुक करतात किंवा आजोळची मंडळी काय म्हणतात ते समजून घ्यावे . राहुल गांधींचे नाव इथे यासाठी काढले की नाही काढले तर मिपावरील तथाकथित सेक्युलर सुद्धा अमिरखानची पाठराखण करण्यात मागे पुढे पहाणार नाहीत. काल अमीरखानचे चित्रपट पाहीले याची आज लाज वाटण्याची वेळ आली, तर कुणि कुणाही भविष्यातील अमीरखानावर विश्वास नेमके कसा ठेवायचा असा प्रश्न विचारल्यास कोणा सेक्युलराकडे काय उत्तर असेल कल्पना नाही. काही वेडे मोदीच्या पद विषयक जबाबदार्‍या न लक्षात घेता मोदी एर्दोगानला भेटू शकतात तर अमिरखान का नाही असाही प्रश्न विचारतील, अमीरखान पंतप्रधान नाही भारता बद्दलचा एर्दोगानाचा व्यवहार बदलवण्याची त्याची क्षमता असती तर त्याने २०१७च्या एर्दोगान सोबतच्या भेटीतच ते करुन दाखवले असते. अमीर खा-र-स्ता-न ने काय सिद्ध केले त्याचे त्यालाच माहित. अशा लोकांवर भारतीय स्त्रीयांना स्टॉकहोम सिंड्रोम कसा काय होतो हे न उलगडणारे कोडे असावे.

In reply to by माहितगार

Gk 12/09/2020 - 22:13
https://www.thehindu.com/news/national/congress-targets-narendra-modi-over-his-visits-to-china/article31823005.ece मोदी पंतप्रधान नव्हते तेंव्हाही ते चीनला जात होते , कुणी कुणाला भेटावे , हा ज्याचा प्रश्न आहे. परदेशी लोक मोदींना येऊन भेटत असतील , तसे इथलेही लोक दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांकडे जात असतील

In reply to by माहितगार

सुबोध खरे 13/09/2020 - 00:31
काही लोकांना त्या कशाशी खातात हे माहितीही नसते. आणि त्याबद्दल खंत खेद सुद्धा नसतो. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका

माहितगार 01/08/2020 - 13:01
* उपरोक्त धागा लेखात ऐतिहासिक संदर्भ नमुदकरताना खुपसे संदर्भ वापरलेले नाहीत त्यामुळे त्रुटी असू शकतात. * अधिक वाचनासाठी काही संदर्भ ** आखातातील वर्चस्वाची नवी समीकरणे दैनिक सामना ** तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर! महानगर ** बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज ** Hagia Sophia इंग्रजी विकिपीडिया लेख ** https://en.wikipedia.org/wiki/Istanbul ** https://en.wikipedia.org/wiki/Constantinople

भीमराव 01/08/2020 - 14:07
सध्या कुराण वाचीत आहे. मुहम्मद मुळचा टोळी व्यवस्थेचं आपत्य. विविध इष्ट देवतेची पुजा करणाऱ्या टोळ्या एकत्र करण्यासाठी मुहम्मदनं बरेचशे आदेश त्याच्या अनुयायांना दिले होते (जे मुर्ती पुजे विरोधी होते) तसेच बरेच आदेश इसाई व ज्यु लोकांविरुद्ध सुद्धा दिले होते. कुराण वाचत असताना काही गोष्टी मला समजत आहेत त्या पुढील प्रमाणे. १. कुराण मुसलमान सोडून इतर लोकांना मुलभूत मानवी स्वातंत्र्य सुद्धा देत नाही. २. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत ३. कुराण किंवा कुराणचे अनुयायी सहिष्णू नाहीत. ४. कुराण च अंतिम ध्येय येन केन प्रकारे सगळे मार्ग नष्ट करून एकच मार्ग कायम ठेवणं हे आहे. ५. कुराण सरळ शब्दात धार्मिक दहशत पसरवतं टिप. माझे वैयक्तिक विचार सेक्युलॅर आहेत. वर दिलेल्या गोष्टी मी कुराण वाचत असताना मला समजल्या त्या दिलेल्या आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. वरील उतारा जर धार्मिक भावनेला चिथावत असेल तर त्यामधे माझा दोश नाही. संपादक मंडळ- अक्षेपार्ह असेल तर वर लिहिले काढून टाकले तरी चालेल

In reply to by भीमराव

माहितगार 01/08/2020 - 16:13
मुस्लिमांमधील समस्या मुलतः वैचारीक नवजागरण आणि उत्क्रांतीत कमी पडत असण्याची आहे. बाकी धर्मीय धर्मग्रंथातही समस्या आणि अडचणीच्या जागा आहेत पण व्यक्तीपुजा आणि ग्रंथ महात्म्याला काळाच्या ओघात सुयोग्य जागी मुरड घातली गेली, तशी मुरड घालण्यात मुस्लीम समाज प्रगती करणारच नाही असे नाही पण तो खूपच सावकाश आहे. अर्थात ज्यांना त्यांच्यात सामाजिक उत्क्रांती घडून हवी आहे त्यांना हा वैचारीक लढा विचारांनी द्यावा लागणार आहे, मुस्लिमांवर सेक्युलॅरीझम अथवा इतर धर्मीय सत्ता केवळ कृत्रिमपणे लादून होणार नाही. कारण असे कृत्रिमपणे लादण्याचे प्रयोग रशिया ते इतर अनेक उदाहरणातून खुपसे यशस्वी नसल्याचे दिसून आले आहे. समाजाच्या वैचारीक प्रबोधनाची जागा इतर उपायांनी पूर्णतः घेतली जाऊ शकत नाही.

In reply to by भीमराव

एस 02/08/2020 - 02:21
प्रतिसादाशी सहमत आहे. हाया सोफ्या या चर्चचे मशिदीत रूपांतर करणे आणि नंतर पुन्हा संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करणे ह्या दोन्ही गोष्टी धर्मांधता दर्शवितात. जगभरातच अतिउजव्या किंवा धर्मवेड्या सत्ताधाऱ्यांची संख्या आणि त्यांचे बळ वाढत चालले आहे आणि या गोष्टीचा थेट तोटा हा कल्याणकारी लोकशाही, पर्यावरण, गरिबी निर्मूलन व निधर्मवाद ह्या मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या रूपाने समोर येत आहे. इस्लामला तर्कसंगत चिकित्सा मान्य नाही. इस्लामला इतर धर्मियांचे साधे अस्तित्त्वदेखील मान्य नाही. नरहर कुरुंदकरांची याबाबतीतील मते ही इस्लामप्रेमी आणि इस्लामद्वेष्टे या दोन्हींनी अभ्यासून पहावीत अशीच आहेत. सवांतर - पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक समाजाने आज बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व हे ह्या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. त्यांचे अभिनंदन आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतीस मानवंदना.

In reply to by भीमराव

सुनील 02/08/2020 - 07:09
२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत
कुराणात बौद्ध आणि हिंदू या धर्मांचे उल्लेख आहेत हे वाचून मन भरून आले! आणि शिख धर्माचाही उल्लेख आहे हे वाचून तर डोळे पाण्याने डबडबले शिवाय कंठही दाटून आला!! असेच विविध धर्मग्रंथ वाचीन चला आणि आम्हाला बोधामृत पाजीत चला, ही विनंती!

Gk 01/08/2020 - 14:50
जावळीचे वंशज भोसलेंच्या वारसांना आमची जिंकलेली इस्टेट परत करा असे म्हणतील

In reply to by Gk

माहितगार 01/08/2020 - 15:20
मनुष्यभावना आणि जनभावना ह्या व्यक्तिगत लाभाच्या आणि समुह लाभाच्या मालमत्तेतही गुंतलेल्या असतात नाही असे नाही. पण त्यापेक्षा ही अधिक त्या सांस्कृतिक वारस्यात अधिक गुंतलेल्या असतात. त्यात त्यांच्या सांस्कृतिक स्वत्वाची भावना निगडीत असण्याची बर्‍यापैकी शक्यता असते. ईस्ट इंडिया कंपनी काळात केलेली मालमत्ता लूटीचे डिटेल्स बर्‍यापैकी कागदोपत्री असले तरी त्याबद्दलचा दावा तेवढ्या आग्रहाने केला जात नाही जेवढ्या आग्रहाने छ. शिवाजी महाराजांच्या तलवार अथवा चित्र विषयक दावा केला जाईल. नेमके याच बाबतीत सेक्युलर मंडळी सांस्कृतिक वारस्याचे मुल्य सर्वसाधारण मालमत्तेप्रमाणे करण्यास जातात आणि मानवी जनभावना समजण्यास कमी पडतात. परिणामी जनतेच्या नजरेतून उतरून सेक्युलॅरीझमचा खातमा होण्यास स्वतःच मदत करतात असे होत नाही का?

In reply to by Gk

गामा पैलवान 01/08/2020 - 15:27
Gk, जावळीची इस्टेट हे प्रार्थनास्थळ आहे का? नाही म्हणायला अफझुल्याचं थडगं परत घेऊन तिथला अनधिकृत दर्गा पाडला पाहिजे. आ.न., -गा.पै.

Gk 02/08/2020 - 07:40
इतिहासातील पाडापाडी प्रत्येक वेळेला लाभदायकच ठरेल असे नाही. स्टॅलिनने महायुद्धाच्या वेळी इतका प्रांत जिंकला की त्या उन्मादात त्याने तैमुरलनग चे थडगे उकरून कवटी घेऊन गेला, त्यानंतर त्याची प्रचंड हार झाली , मग कुणीतरी बोलले , गप ते थडगे आहे तसे बांध म्हणून. http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-changed-the-course-of-world-war-ii बाबरही त्याच खानदानातील.....

In reply to by Gk

Gk 02/08/2020 - 08:09
शाहण्याने आपले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे असे गाणे आहे https://youtu.be/cUz7fWGdDkI दुसर्याचे खणले की पनवती लागते

In reply to by आनन्दा

Gk 10/09/2020 - 14:56
https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulently-from-bank-accounts-of-ram-mandir-trust-fir-registered-2308707.html/amp In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

In reply to by Gk

सुबोध खरे 11/09/2020 - 10:32
आपल्याला कधी कोणी फसवले नाही का? फसवणूक हि सर्वत्र आहे. भिकाऱ्याच्या वाटीतील भीक चोरणारी माणसे जगात आहेत मग एखाद्या श्रीमंत ट्रस्ट मध्ये अफरातफर होईल यात काय विशेष?

In reply to by Gk

सुबोध खरे 12/09/2020 - 22:20
ते चौकीदार चोर है ला प्रत्युत्तर म्हणून काढलं होते. पण सर्वोच्च न्यायालयाने पप्पूला इतकी जोरदार चपराक मारली की बाकीच्यांना चौकीदार व्हायची गरजच पडली नाही.

In reply to by Gk

सुबोध खरे 13/09/2020 - 13:29
हो ना श्री राहुल गांधी यांनी कोणताही पुरावा नसताना निवडणुकीच्या अगोदर श्री मोदी भ्रष्ट आहेत अशी राळ उडवून देण्याचा जुमला केला. निवडणुकीत एका गालावर मतदारांनी आणि दुसऱ्या गालावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

माहितगार 18/08/2020 - 23:32
अमीर खा(रस्ता)न तुर्कस्थानला आधुनिक कालीन खलिफा बनवु पहाणार्‍या एर्दोगानांच्या पत्नीस तुर्कस्थानात जाऊन भेटल्याचे वृत्त आहे. तथाकथित सेक्युलर मंडळींनी व्हॉटाबाऊटरी करत त्याची पाठराखण चालू केली आहे. भारतातील बहुसंख्यच सोडून द्या, ख्रिश्चनचर्चचे पुन्हा एकदा मस्जिदीकरण करण्याच्या कृत्य एर्दोगानाने करुन काही आठवडेही पार पडलेले नसताना हा महाभाग एर्दोगानाच्या पत्नीस आंमत्रण मागवून भेटतो हे भारतीय अल्पसंख्यांकातील ख्रिश्चनांना पटेल काय ? हे जर पटणे शक्य असेल तर राहुल गांधीनी सुद्धा एर्दोगानांना जाऊन भेटावे आणि तिथुन पुढचे विमान आजोळच्या व्हॅटीकनचे घेऊन पोप महाशय काय कौतुक करतात किंवा आजोळची मंडळी काय म्हणतात ते समजून घ्यावे . राहुल गांधींचे नाव इथे यासाठी काढले की नाही काढले तर मिपावरील तथाकथित सेक्युलर सुद्धा अमिरखानची पाठराखण करण्यात मागे पुढे पहाणार नाहीत. काल अमीरखानचे चित्रपट पाहीले याची आज लाज वाटण्याची वेळ आली, तर कुणि कुणाही भविष्यातील अमीरखानावर विश्वास नेमके कसा ठेवायचा असा प्रश्न विचारल्यास कोणा सेक्युलराकडे काय उत्तर असेल कल्पना नाही. काही वेडे मोदीच्या पद विषयक जबाबदार्‍या न लक्षात घेता मोदी एर्दोगानला भेटू शकतात तर अमिरखान का नाही असाही प्रश्न विचारतील, अमीरखान पंतप्रधान नाही भारता बद्दलचा एर्दोगानाचा व्यवहार बदलवण्याची त्याची क्षमता असती तर त्याने २०१७च्या एर्दोगान सोबतच्या भेटीतच ते करुन दाखवले असते. अमीर खा-र-स्ता-न ने काय सिद्ध केले त्याचे त्यालाच माहित. अशा लोकांवर भारतीय स्त्रीयांना स्टॉकहोम सिंड्रोम कसा काय होतो हे न उलगडणारे कोडे असावे.

In reply to by माहितगार

Gk 12/09/2020 - 22:13
https://www.thehindu.com/news/national/congress-targets-narendra-modi-over-his-visits-to-china/article31823005.ece मोदी पंतप्रधान नव्हते तेंव्हाही ते चीनला जात होते , कुणी कुणाला भेटावे , हा ज्याचा प्रश्न आहे. परदेशी लोक मोदींना येऊन भेटत असतील , तसे इथलेही लोक दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांकडे जात असतील

In reply to by माहितगार

सुबोध खरे 13/09/2020 - 00:31
काही लोकांना त्या कशाशी खातात हे माहितीही नसते. आणि त्याबद्दल खंत खेद सुद्धा नसतो. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका
लेखनविषय:
लेखनप्रकार
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्या निमीत्ताने बर्‍याच जुन्या गोष्टी उगाळणे होईल. त्यात एक तुलना तुर्कस्थानातील ताज्या हागिया सोफिया धर्मस्थळ घडामोडीशी करण्याचा मोह अनेकांना आवरणार नाही आहे. काय आहे हे हागिया सोफिया प्रकरण ? एका वाक्यात सांगायचे झाले तर, एक मूळचे प्राचिन ख्रिश्चन धार्मिक स्थळ ज्याचे एका मध्ययुगीन तुर्कस्थानी आक्रमक सत्तेने उघड हडेलहप्पीने मस्जिदीकरण केले, जे सेक्युलर दबावाखाली मागची ८६ वर्षे संग्रहालय स्वरुपात होते ते मस्जिदी ऊपयोगास पुन्हा नुकतेच खुले केले गेले, जे अंशतः आंतरराष्ट्रीय चर्चेचे कारण बनले.

कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे

माहितगार ·

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही
लेखनप्रकार
माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली. ....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus, AIIMS चे डॉ.

पाताळ लोक!

लई भारी ·

विखि 23/05/2020 - 21:31
अब क्या रोटी खाके जायेगा के.... वाला सिन लैच भारी. सिरिज मध्ये बर्‍यापैकी भाग अपेक्षित होते. सिक्रेड गेम्स, मिर्झापुर मुळे बहुतेक अ‍ॅजे ऑडीयेन्स म्हनुन आपली पण बैठक जमलीये बहुतेक त्यामुळ असावं :) प्लॉट रेग्युलर वाटला पण त्यावर कलाकार भारी पडले, भट्टी जमली त्यामुळ. खास करुन हाथिराम चौधरी-जयदीप अहलावत जबरदस्त काम केलय या माणसाने. विद्युत जाम्वालच्या कमांडो मध्ये पण भारी वाटला होता, विद्युतच्या कायच्या काय अ‍ॅक्शन मुळ्ं जरा बाजुला पडल्यागत वाटला. भारी कलाकारे. विशाल त्यागी- अभिषेक बॅनर्जी, अजुन एक उभरता कलाकार. काही संवाद नसताना भाव खाउन जातो. संजीव मेहरा- नीरज काबी, एवढा चील अभिनय बरेच दिवस बघितला न्हवता. सिक्रेड गेम्स मधला 'पारुलकर' पण असाच थन्ड डोक्याचा होता. भारी. गुल पनाग - उगं घुसवल्यासारखी वाटली. हाथिरामला कानाखाली भारी मारली पण :) चिनीची श्टोरी पण अन्गावर येते. राजेश शर्माचा ग्वाला गुज्जर २/३ सिन मध्ये करामत करुन जातो.

mrcoolguynice 25/05/2020 - 10:21
पाताल लोक पर एक और विवाद, बीजेपी विधायक की शिकायत- अनुष्का शर्मा पर लगे रासुका गाजियाबाद के लोनी से बीजेपी विधायक नंदकिशोर गुर्जर ने पाताल लोक पर आपत्ति जताई है. नंदकिशोर गुर्जर ने लोनी थाने में अनुष्का शर्मा के खिलाफ केस दर्ज करने के लिए शिकायत दी है. गुर्जर ने इस वेब सीरीज पर कई गंभीर आरोप लगाए हैं.

mrcoolguynice 27/05/2020 - 07:26
BJP Leader Wants Virat Kohli To Divorce Anushka Sharma Because She Produced ‘Pataal Lok’ 17 hours ago · 84.7K Shares Take a deep breath and prepare to be stunned at the priorities of our elected officials, because one of them, has taken out the time during a pandemic, to file an FIR against Anushka Sharma.

अभिरुप 28/05/2020 - 14:15
वेबसिरीज साधारणतः एका भागात संपवत नाहीत. उत्कंठा दुसर्या भागापर्यंत वाढवून ठेवतात. त्यामुळे बेबसिरीज पहायला कंटाळा येतो. पण पाताल लोक एकदम भारी. एकतर संपूर्ण कथानक दाखवले आहे आणि सुखांत असल्यामुळे मनःशांती सुद्धा मिळते आणि कलाकारांचा अभिनय तो क्या केहने!!! अप्रतिम अभिनय, अनुरुप कास्टिंग आणि खिळवून ठेवणारे कथानक जे सद्यस्थितीशी साधर्म्य दाखवते. त्यामानाने या सिरीज मध्ये इतर वेबसिरीजसारखे अश्लील द्रुश्यांचा आणि अनावश्यक हिंसेचा भडिमार नाही. त्यामुळे मजा आली. अगदि एक संपूर्ण फिल्म पाहिल्याचं समाधान लाभले.

In reply to by भीमराव

चौकस२१२ 30/05/2020 - 09:55
९ भागांची हि मालिका बघायला लागल्यावर प्रथम तरी हा प्रश्न मनात हि आला नवहता,,,साधारण पणे मकबूल, मिर्झापूर , गॅंग ऑफ वैश्यपूर इत्यादी पाहून आवडलेल्या.. साधारण त्याच धर्तीवरील पण थोडी वेगळी म्हणून आवडायला लागली. उत्तम अभिनय , लिखाण आणि दिग्दर्शन... काही भागांनंतर हि मालिका हिंदुविरोधी आहे असं ऐकू आलं .. तरी चालू ठेवली पण २-३ भागात त्यातील "हिंदुविरोधी" पेक्षा असं एम्हणुयात कि हिंदूंनाच लक्ष करणारी " आणि "जो काही अन्याय होतो तो हिंदूच फक्त मुसलमांन्वर करतात " हा अजेंडा, टोकाचे पोलिटिकल करेकंटनेस " असा रंग दिसू लागला.. त्यामुळे सोडून दवावी असे वाटू लागले .. पण काम इतकी चांगली होती आणि मूळ कथा धरून ठेवणारी असल्यामुळे पुढे बघत राहिलो ... पूर्ण बघितला हे चांगलाच केलं असे म्हणेन मग यात आपल्या प्रश्नाचे उत्तर काय? तर माझ्यामते ते असे .. जसा पिके हा चित्रपट एक उत्तम कहाणी आणि हेतू असून सुद्धा धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "आपल्याला का सारखे वाईट दाखवतात" असे वाटायला लावतो तसेच काहीसे .. जश्या ब्रुक बॉण्ड चहा च्या काही जाहिराती उत्तम मांडणी आणि हेतू असून सुद्धा धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "आपल्याला का सारखे वाईट दाखवतात" असे वाटायला लावतो तसेच काहीसे .. जसे अनिस आणि इतर चांगल्या समाजवादी लोकांचे कार्य आणि विधाने पाहून धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "हे चांगले काम आहे पण त्यात फक्त हिंदूंच्याच चालीरीती वर जास्त भर का?" असे वाटते तसेच काहीसे - जसे mr and mrs अय्यर या चित्रपटात एक उत्तम कहाणी आणि हेतू असून सुद्धा धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "आपल्याला का सारखे वाईट दाखवतात" असे वाटायला लावतो तसेच काहीसे दुर्दैवाने हा "हिन्दुफोबिया पण अस्तित्वात आहे" हे "पुरोगामी" मान्य करणार नाहीत तरी मी म्हणेन आपण हि मालिका पहा...

चौकस२१२ 30/05/2020 - 17:48
mr and mrs अय्यर मधिल हिंदू आतंकवाद्यांचा प्रसंग ( बस वरील हल्ला ) हा एक मुख्य कलाटणी देणारा प्रसंग आहे आणि त्यावर तो चित्रपट उभा आहे तसाच पातळ लोकमधील रेल्वे स्टेशन वरील आठवणीतलं प्रसंग ( केशरी ध्वज आले ..) किंवा पातळ लोक मधील "वाजपेई " या नेत्याकचय जातीवरून लिहिलेले संवाद या दिग्दशकांच्या पृष्ठभागात एवढा दम आहे का कि हे चित्र उलटे करून ९० साली काश्मिरी पंडितांवर "४ दिवसात धर्म बदल नाहीतर स्वतःची भूमी सोडून चालते व्हा " यावर वेब्सिरीज किंवा चित्रपट ते काढतील ? या कलाप्रेमी प्रेमळ माणसांना बाजीराव मस्तानी, मनकर्णिका, केसरी, पानिपत आणि तान्हाजी खुपतो ... ह .... खोर

mrcoolguynice 30/05/2020 - 23:53
Cognitive dissonance is the term used to describe the uneasiness "people" feel when they have conflicting ideas or views. After making a mistakes "people" tend to justify their decisions which lead to the mistakes, even if they know they did the wrong thing. "People" try to avoid or diminish the feeling of having done something wrong and try to justify situation instead of admitting error. Justifications are made through the confirmation bias The confirmation bias is the tendency of people to look at information which supports their current belief or conviction. Doing so can make them find information that supports their case even if there is no evidence, or worse, it can make contradictory evidence look like supporting evidence.

In reply to by mrcoolguynice

mrcoolguynice 31/05/2020 - 11:45
**spoiler alert. Viewers please note the religion of following sample pivital characters in your mind. And also the religion of those crime perpetrators. - inspector hathi singh (victim of critical parenting, victim of drpartmental chatugiri, victim of system) - inspector's son ( school bullying ) - vishsl tyagi's 3 undrrage sisters (victim of rape and murder, by own relatives) - vishal tyagi (victim of patriarchy society, political system, criminal org) - tope singh's mother (victim of gang rape) -tope singh and his relatives (victim of cast based bullying abuses, physical intimidation) -chanda Mukherjee (victim of poverty based sexual compromise) Timebeing this is just sample.... *Every well educated viewer should see , think, and decide own their own, about their opinions.

चौकस२१२ 31/05/2020 - 07:46
आणि आपला मुद्दा काय साहेब? बरं म्हणजे आपल्याला असे म्हणायचे आहे का कि वरील २ प्रतिक्रियांमध्ये मी पाताळ लोक किंवा मी अँड मिसेस अय्यर वर जी "टीका" केली आहे ते म्हणजे ..Cognitive dissonance याचे स्वरूप आहे? तसे स्पष्ट बोला ना... आणि जर तसे असेल तर हा खुलासा ... एक तर मी शेवटी हि प्रतिक्रिया दिली आहे कि "तरी आपण हि मालिका जरूर बघा... मला जर आंधळा विरोध करायचा असता तर मी असे का म्हणालो असतो ? हे सर्व निरीक्षण जे लोक करीत आहेत ते एक तर धर्मांध हिंदू नाहीत,, काहीतरी तारतम्य बाळगून काहीतरी तोच तोच असलेला समान धागा ( हिन्दुफोबिया ) दिसतोय ..कधी अंधुकसा कधी स्पष्ट असे वाटते म्हणून बोलतात -खास करून त्या ब्रुक बॉण्ड च्या जाहिराती आठवा.. मनुष्य स्वभावातील कोते पण फार उत्तम पणे त्यात दाखवला आहे शंकांचं नाही पण प्रश्न हा येतो अरे वारंवार एकाच धर्माचे का वाईट? आणि जो धर्म ज्याने अनादी काळापासून इतर धर्मियांना सामावून घेतले... कुठेतरी या मागे एक सुप्त हेतू ( अजेंडा) आहे .. आणि तो दाखवलं तर लगेच हे Cognitive dissonance याचे स्वरूप अशी जर कोणी त्याची बोळवण करत असेल तर ते मान्य तर नाहीच पण अपमानास्पद आहे .

विखि 23/05/2020 - 21:31
अब क्या रोटी खाके जायेगा के.... वाला सिन लैच भारी. सिरिज मध्ये बर्‍यापैकी भाग अपेक्षित होते. सिक्रेड गेम्स, मिर्झापुर मुळे बहुतेक अ‍ॅजे ऑडीयेन्स म्हनुन आपली पण बैठक जमलीये बहुतेक त्यामुळ असावं :) प्लॉट रेग्युलर वाटला पण त्यावर कलाकार भारी पडले, भट्टी जमली त्यामुळ. खास करुन हाथिराम चौधरी-जयदीप अहलावत जबरदस्त काम केलय या माणसाने. विद्युत जाम्वालच्या कमांडो मध्ये पण भारी वाटला होता, विद्युतच्या कायच्या काय अ‍ॅक्शन मुळ्ं जरा बाजुला पडल्यागत वाटला. भारी कलाकारे. विशाल त्यागी- अभिषेक बॅनर्जी, अजुन एक उभरता कलाकार. काही संवाद नसताना भाव खाउन जातो. संजीव मेहरा- नीरज काबी, एवढा चील अभिनय बरेच दिवस बघितला न्हवता. सिक्रेड गेम्स मधला 'पारुलकर' पण असाच थन्ड डोक्याचा होता. भारी. गुल पनाग - उगं घुसवल्यासारखी वाटली. हाथिरामला कानाखाली भारी मारली पण :) चिनीची श्टोरी पण अन्गावर येते. राजेश शर्माचा ग्वाला गुज्जर २/३ सिन मध्ये करामत करुन जातो.

mrcoolguynice 25/05/2020 - 10:21
पाताल लोक पर एक और विवाद, बीजेपी विधायक की शिकायत- अनुष्का शर्मा पर लगे रासुका गाजियाबाद के लोनी से बीजेपी विधायक नंदकिशोर गुर्जर ने पाताल लोक पर आपत्ति जताई है. नंदकिशोर गुर्जर ने लोनी थाने में अनुष्का शर्मा के खिलाफ केस दर्ज करने के लिए शिकायत दी है. गुर्जर ने इस वेब सीरीज पर कई गंभीर आरोप लगाए हैं.

mrcoolguynice 27/05/2020 - 07:26
BJP Leader Wants Virat Kohli To Divorce Anushka Sharma Because She Produced ‘Pataal Lok’ 17 hours ago · 84.7K Shares Take a deep breath and prepare to be stunned at the priorities of our elected officials, because one of them, has taken out the time during a pandemic, to file an FIR against Anushka Sharma.

अभिरुप 28/05/2020 - 14:15
वेबसिरीज साधारणतः एका भागात संपवत नाहीत. उत्कंठा दुसर्या भागापर्यंत वाढवून ठेवतात. त्यामुळे बेबसिरीज पहायला कंटाळा येतो. पण पाताल लोक एकदम भारी. एकतर संपूर्ण कथानक दाखवले आहे आणि सुखांत असल्यामुळे मनःशांती सुद्धा मिळते आणि कलाकारांचा अभिनय तो क्या केहने!!! अप्रतिम अभिनय, अनुरुप कास्टिंग आणि खिळवून ठेवणारे कथानक जे सद्यस्थितीशी साधर्म्य दाखवते. त्यामानाने या सिरीज मध्ये इतर वेबसिरीजसारखे अश्लील द्रुश्यांचा आणि अनावश्यक हिंसेचा भडिमार नाही. त्यामुळे मजा आली. अगदि एक संपूर्ण फिल्म पाहिल्याचं समाधान लाभले.

In reply to by भीमराव

चौकस२१२ 30/05/2020 - 09:55
९ भागांची हि मालिका बघायला लागल्यावर प्रथम तरी हा प्रश्न मनात हि आला नवहता,,,साधारण पणे मकबूल, मिर्झापूर , गॅंग ऑफ वैश्यपूर इत्यादी पाहून आवडलेल्या.. साधारण त्याच धर्तीवरील पण थोडी वेगळी म्हणून आवडायला लागली. उत्तम अभिनय , लिखाण आणि दिग्दर्शन... काही भागांनंतर हि मालिका हिंदुविरोधी आहे असं ऐकू आलं .. तरी चालू ठेवली पण २-३ भागात त्यातील "हिंदुविरोधी" पेक्षा असं एम्हणुयात कि हिंदूंनाच लक्ष करणारी " आणि "जो काही अन्याय होतो तो हिंदूच फक्त मुसलमांन्वर करतात " हा अजेंडा, टोकाचे पोलिटिकल करेकंटनेस " असा रंग दिसू लागला.. त्यामुळे सोडून दवावी असे वाटू लागले .. पण काम इतकी चांगली होती आणि मूळ कथा धरून ठेवणारी असल्यामुळे पुढे बघत राहिलो ... पूर्ण बघितला हे चांगलाच केलं असे म्हणेन मग यात आपल्या प्रश्नाचे उत्तर काय? तर माझ्यामते ते असे .. जसा पिके हा चित्रपट एक उत्तम कहाणी आणि हेतू असून सुद्धा धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "आपल्याला का सारखे वाईट दाखवतात" असे वाटायला लावतो तसेच काहीसे .. जश्या ब्रुक बॉण्ड चहा च्या काही जाहिराती उत्तम मांडणी आणि हेतू असून सुद्धा धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "आपल्याला का सारखे वाईट दाखवतात" असे वाटायला लावतो तसेच काहीसे .. जसे अनिस आणि इतर चांगल्या समाजवादी लोकांचे कार्य आणि विधाने पाहून धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "हे चांगले काम आहे पण त्यात फक्त हिंदूंच्याच चालीरीती वर जास्त भर का?" असे वाटते तसेच काहीसे - जसे mr and mrs अय्यर या चित्रपटात एक उत्तम कहाणी आणि हेतू असून सुद्धा धार्मिक नसलेल्या हिंदूंना पण "आपल्याला का सारखे वाईट दाखवतात" असे वाटायला लावतो तसेच काहीसे दुर्दैवाने हा "हिन्दुफोबिया पण अस्तित्वात आहे" हे "पुरोगामी" मान्य करणार नाहीत तरी मी म्हणेन आपण हि मालिका पहा...

चौकस२१२ 30/05/2020 - 17:48
mr and mrs अय्यर मधिल हिंदू आतंकवाद्यांचा प्रसंग ( बस वरील हल्ला ) हा एक मुख्य कलाटणी देणारा प्रसंग आहे आणि त्यावर तो चित्रपट उभा आहे तसाच पातळ लोकमधील रेल्वे स्टेशन वरील आठवणीतलं प्रसंग ( केशरी ध्वज आले ..) किंवा पातळ लोक मधील "वाजपेई " या नेत्याकचय जातीवरून लिहिलेले संवाद या दिग्दशकांच्या पृष्ठभागात एवढा दम आहे का कि हे चित्र उलटे करून ९० साली काश्मिरी पंडितांवर "४ दिवसात धर्म बदल नाहीतर स्वतःची भूमी सोडून चालते व्हा " यावर वेब्सिरीज किंवा चित्रपट ते काढतील ? या कलाप्रेमी प्रेमळ माणसांना बाजीराव मस्तानी, मनकर्णिका, केसरी, पानिपत आणि तान्हाजी खुपतो ... ह .... खोर

mrcoolguynice 30/05/2020 - 23:53
Cognitive dissonance is the term used to describe the uneasiness "people" feel when they have conflicting ideas or views. After making a mistakes "people" tend to justify their decisions which lead to the mistakes, even if they know they did the wrong thing. "People" try to avoid or diminish the feeling of having done something wrong and try to justify situation instead of admitting error. Justifications are made through the confirmation bias The confirmation bias is the tendency of people to look at information which supports their current belief or conviction. Doing so can make them find information that supports their case even if there is no evidence, or worse, it can make contradictory evidence look like supporting evidence.

In reply to by mrcoolguynice

mrcoolguynice 31/05/2020 - 11:45
**spoiler alert. Viewers please note the religion of following sample pivital characters in your mind. And also the religion of those crime perpetrators. - inspector hathi singh (victim of critical parenting, victim of drpartmental chatugiri, victim of system) - inspector's son ( school bullying ) - vishsl tyagi's 3 undrrage sisters (victim of rape and murder, by own relatives) - vishal tyagi (victim of patriarchy society, political system, criminal org) - tope singh's mother (victim of gang rape) -tope singh and his relatives (victim of cast based bullying abuses, physical intimidation) -chanda Mukherjee (victim of poverty based sexual compromise) Timebeing this is just sample.... *Every well educated viewer should see , think, and decide own their own, about their opinions.

चौकस२१२ 31/05/2020 - 07:46
आणि आपला मुद्दा काय साहेब? बरं म्हणजे आपल्याला असे म्हणायचे आहे का कि वरील २ प्रतिक्रियांमध्ये मी पाताळ लोक किंवा मी अँड मिसेस अय्यर वर जी "टीका" केली आहे ते म्हणजे ..Cognitive dissonance याचे स्वरूप आहे? तसे स्पष्ट बोला ना... आणि जर तसे असेल तर हा खुलासा ... एक तर मी शेवटी हि प्रतिक्रिया दिली आहे कि "तरी आपण हि मालिका जरूर बघा... मला जर आंधळा विरोध करायचा असता तर मी असे का म्हणालो असतो ? हे सर्व निरीक्षण जे लोक करीत आहेत ते एक तर धर्मांध हिंदू नाहीत,, काहीतरी तारतम्य बाळगून काहीतरी तोच तोच असलेला समान धागा ( हिन्दुफोबिया ) दिसतोय ..कधी अंधुकसा कधी स्पष्ट असे वाटते म्हणून बोलतात -खास करून त्या ब्रुक बॉण्ड च्या जाहिराती आठवा.. मनुष्य स्वभावातील कोते पण फार उत्तम पणे त्यात दाखवला आहे शंकांचं नाही पण प्रश्न हा येतो अरे वारंवार एकाच धर्माचे का वाईट? आणि जो धर्म ज्याने अनादी काळापासून इतर धर्मियांना सामावून घेतले... कुठेतरी या मागे एक सुप्त हेतू ( अजेंडा) आहे .. आणि तो दाखवलं तर लगेच हे Cognitive dissonance याचे स्वरूप अशी जर कोणी त्याची बोळवण करत असेल तर ते मान्य तर नाहीच पण अपमानास्पद आहे .
लेखनविषय:
लेखनप्रकार
बऱ्याच दिवसांनी सलग एक सिरीज बघता आली. लॉकडाऊन सुरु झाल्यावर कामातून वेळ मिळाल्यावर काही मराठी, हिंदी सिरीज बघून इंग्रजीच बघायच्या असं ठरवलं होत. मग अलीकडे या प्राईम वरच्या सिरीज ची जाहिरात बघितली आणि सुरुवातीची परीक्षणं पण चांगली असल्यामुळे बघायचं ठरवलं. २-३ दिवसात मिळून ९ भाग संपवले(प्रत्येकी ४० मिनिट साधारण). विशेष म्हणजे बॉलिवूड मानसिकता असल्याने अधांतरी शेवट आपल्याला आवडत नाही आणि वेब सिरीज म्हटलं कि पुढच्या भागाची सोय म्हणून एकदम अर्ध्यातच सोडून देतात तो प्रकार इथे नाही आहे. आणि प्रश्नांची‘उत्तर’ तर लागतात आपल्याला; थोडं फार ओपन एंडेड ठीक आहे पण अगदीच डोक्याला शॉट नको होतो.

अल्टर्ड कार्बन- वेबसिरीज ओळख

कपिलमुनी ·

मदनबाण 17/05/2020 - 22:58
मुनी तुम्ही छान छान वेब सिरीज सुचवता. पल्याडला तुम्ही मला अल्टर्ड कार्बन सुचवली होती, तीचा पहिला सिझन पाहिला आणि आवडला देखील. दुसरा सिझन डाउनलोड मारुन ठेवला आहे, अजुन हवा तसा निवांतपणा मिळाला नसल्याने अजुन पाहणे बाकी आहे. अश्याच वेब सिरीज सुचवत रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile

सोत्रि 06/09/2021 - 17:30
ओक्के! ब्लॅक मिरर नाबाची एक वेब सिरीज होती, त्यात एक अशीच गोष्ट होती. consciousness ला डिजीटाइझ करून चिप मधे स्टोअर करायचे आणि चीप नवीन शरीरात टाकायची. - (डिजीटल) सोकाजी

मदनबाण 17/05/2020 - 22:58
मुनी तुम्ही छान छान वेब सिरीज सुचवता. पल्याडला तुम्ही मला अल्टर्ड कार्बन सुचवली होती, तीचा पहिला सिझन पाहिला आणि आवडला देखील. दुसरा सिझन डाउनलोड मारुन ठेवला आहे, अजुन हवा तसा निवांतपणा मिळाला नसल्याने अजुन पाहणे बाकी आहे. अश्याच वेब सिरीज सुचवत रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile

सोत्रि 06/09/2021 - 17:30
ओक्के! ब्लॅक मिरर नाबाची एक वेब सिरीज होती, त्यात एक अशीच गोष्ट होती. consciousness ला डिजीटाइझ करून चिप मधे स्टोअर करायचे आणि चीप नवीन शरीरात टाकायची. - (डिजीटल) सोकाजी
आत्मा अमर आहे, माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा हे शरीररुपी वस्त्र सोडून नवे रूप धारण करतो असे तत्वज्ञान आपण बऱ्याच वेळी ऐकलेले असते. पण नवे शरीर असले तरी आत्मा फॉरमॅट झालेला असतो, त्यामुळे गतजन्माची काहीही आठवण नसते. ते नवा गडी नवे राज्य असा प्रकार आहे. पण ...... पण जर नवे शरीर आणि तोच आत्मा असेल तर ? अर्थात पन्नाशीचा आत्मा लहान शरिरात राहून बोअर होईल, त्यामुळे शरीर सुद्धा योग्य वयाचे हवे. त्यातही सिलेक्शन असेल तर उत्तम ! जन्मत: केआरके असेल तरी नंतर एसआरके चे शरीर मिळेल . अल्टर्ड कार्बन ही याच कल्पनेवर आधारित वेब सीरिज आहे.

मसाया - Messiah

कपिलमुनी ·

एका निराळा विशयावरील मालिकेचि ओळख करुन दिल्याबद्दल आभार मुनिवर .... नक्किच पाहिली जाइल

mrcoolguynice 12/05/2020 - 00:29
Any Messiah coming forward ? For Covid vaccine ? Or Messiah waiting now, for modern science to invent vaccine? So afterwards Messiah can say, "Arrey isaka upaay to hamaare, Vedo me sadiyo pahale se likha hua hai... "

सस्नेह 12/05/2020 - 09:51
अजूनही लोकांना अशा कल्पनांमध्ये रस वाटतो याचा अर्थ आस्तिकता वाढतेय असा घ्यायचा का ?

टवाळ कार्टा 12/05/2020 - 20:28
काही काही वेळा थोडा रेंगाळल्यासारखे वाटते पण अख्खी सिरीज मस्तय, बघताना आपण सगळे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत असतो, शेवटचा सीन मस्त केलाय

In reply to by प्रचेतस

मालिका बघण्यासाठी पैसे मोजावे लागतात ? भारतात ? कसे शक्य आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

प्रचेतस 13/05/2020 - 20:44
:) टोरेंटचा मार्ग आहेच पण आताशा स्ट्रिमिंगची इतकी सवय झालीय की डाउनलोड करून ते हार्डडिस्कमध्ये टाकून ती हार्ड डिस्क टीव्हीला जोडून बघण्याइतकाही उत्साह राहात नाही. शिवाय काही काही फॉर्मेट टीव्हीवर चालत नाहीत ते लॅपटॉप/मोबाईलवर बघायला नकोसे वाटते. शिवाय आधीच प्राईम, हॉटस्टार सबस्क्राइब केले असल्याने आहे तेच पुरेसे होते :)

आपण इथे लिहिल्यामुळे उत्सुकतेपोटी ही मालिका पाहिली. शक्यतो मी वेब सिरिज पाहायच्या टाळतो कारण त्यात खुपच हिंसाचार, अश्लील दृष्ये आणि अभद्र भाषेचा उपयोग केलेला असतो. मात्र ही मालिका त्याला अपवाद ठरली. एक चांगली सुचवणी केल्याबद्द्ल आपले आभार. अशाच प्रकारच्या मालिका कोणी बघीतल्या असतील तर इथे नक्कीच त्याबद्द्ल लिहा !

एका निराळा विशयावरील मालिकेचि ओळख करुन दिल्याबद्दल आभार मुनिवर .... नक्किच पाहिली जाइल

mrcoolguynice 12/05/2020 - 00:29
Any Messiah coming forward ? For Covid vaccine ? Or Messiah waiting now, for modern science to invent vaccine? So afterwards Messiah can say, "Arrey isaka upaay to hamaare, Vedo me sadiyo pahale se likha hua hai... "

सस्नेह 12/05/2020 - 09:51
अजूनही लोकांना अशा कल्पनांमध्ये रस वाटतो याचा अर्थ आस्तिकता वाढतेय असा घ्यायचा का ?

टवाळ कार्टा 12/05/2020 - 20:28
काही काही वेळा थोडा रेंगाळल्यासारखे वाटते पण अख्खी सिरीज मस्तय, बघताना आपण सगळे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत असतो, शेवटचा सीन मस्त केलाय

In reply to by प्रचेतस

मालिका बघण्यासाठी पैसे मोजावे लागतात ? भारतात ? कसे शक्य आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

प्रचेतस 13/05/2020 - 20:44
:) टोरेंटचा मार्ग आहेच पण आताशा स्ट्रिमिंगची इतकी सवय झालीय की डाउनलोड करून ते हार्डडिस्कमध्ये टाकून ती हार्ड डिस्क टीव्हीला जोडून बघण्याइतकाही उत्साह राहात नाही. शिवाय काही काही फॉर्मेट टीव्हीवर चालत नाहीत ते लॅपटॉप/मोबाईलवर बघायला नकोसे वाटते. शिवाय आधीच प्राईम, हॉटस्टार सबस्क्राइब केले असल्याने आहे तेच पुरेसे होते :)

आपण इथे लिहिल्यामुळे उत्सुकतेपोटी ही मालिका पाहिली. शक्यतो मी वेब सिरिज पाहायच्या टाळतो कारण त्यात खुपच हिंसाचार, अश्लील दृष्ये आणि अभद्र भाषेचा उपयोग केलेला असतो. मात्र ही मालिका त्याला अपवाद ठरली. एक चांगली सुचवणी केल्याबद्द्ल आपले आभार. अशाच प्रकारच्या मालिका कोणी बघीतल्या असतील तर इथे नक्कीच त्याबद्द्ल लिहा !
लेखनविषय:
जगभरातील धर्म पाहिले तर त्यात एक सामायिक बाब दिसून येते, ती म्हणजे प्रत्येक धर्मात असणारे अवतार, प्रेषित, देवदूत किंवा संदेशवाहक ! हे अवतार , प्रेषित यांनी लोककल्याणासाठी जन्म घेतला आणि धर्माचा प्रसार केला असे त्यांचे अनुयायी मानतात. अजुन एक कॉमन गोष्ट की हे अवतर, प्रेषित यांनी चमत्कार केलेत आणि ते पुन्हा जन्म घेतील यावर त्यांच्या अनुयायांचा ठाम विश्वास असतो. आजच्या युगात जर कोणीएक मनुष्य पुढे आला आणि अविश्वसनीय कामे केली, लोकांनी त्याला मसीहा मानायला सुरुवात केली तर काय ?

खऱ्या आनंदाचा साक्षात्कार

chittmanthan.OOO ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भिडूलोक आपल्या प्रत्येकामध्ये एक भटक्या, एक जंगली दडलेला असतो ज्याची स्वतःची एक बकेट लिस्ट असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी स्वतःच अस्तित्व विसरावे असा एक तरी प्रवास करावा असं वाटतं असत. पण सांगू का आपली पहुंच खूप छोटी आहे...हो हो नक्कीच..तुम्ही जर "जिंदगी ना मिलेगी दोबारा" बघितला असेल तर एक दोन जागा परदेशातल्या असतील.तरीही जिथं तुमचं स्वप्न पूर्ण होत तिथं अलेक्झांडर सुपरट्राम्प चा संघर्ष चालू होतो( हे वाक्य अनन्या पांडे च चोरून मारलेल आहे तर तेवढं समजून घ्या.). तुम्ही म्हणाल हा अलेक्झांडर कोण? हा असा विचित्र माणूस आहे ज्याला पैसा, सत्ता सब कुछ मोहमाया वाटते.

व्हॅलेंटाईन्स डे, प्रेम आणि गूगल ट्रेंड्स (संयत प्रगल्भता)

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
धागा लेख उद्दीष्टात गैर आणि झेपण्यास अवघड अशी कोणतीच बाब नाही आणि मिपाच्या सर्वसाधारण मो़कळ्या चौकटीत बसणारे आहे तरी सुद्धा तुलनेची माहिती देताना काही शब्द प्रयोग येऊ शकतात हे लक्षात घेऊन कुणि अती प्रगल्भतेच्या आशेने आले तर हिरमोड होऊ नये म्हणून धागा शीर्षकात संयत प्रगल्भता हे नमूद केले आहे. गूगल ट्रेंड्स ही लोक गूगलवर काय शोधतात याची ढोबळ तौलनिक माहिती उपलब्ध करणारी रोचक सेवा आणि विवीध विषयास अनुसरुन मी मिपावर वेळोवेळी गूगल ट्रेंड्सचे विश्लेषण उपलब्ध करत आलो आहे त्याच मालेत यावेळी व्हॅलेंटाईन डे . सर्वसाधारण समज आणि वास्तवात बर्‍याचदा अंतर असते.