मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नास्तिक

सुमित_सौन्देकर ·

छाण ! अवांतर : नास्तिक ह्या शब्दाचा खरा अर्थ काय हे एकदा जरा नीट तपासुन पहायला पाहिजे सर्व्वांनी असे वाटले :)

तिमा 11/12/2015 - 18:31
मी नास्तिक आहे यांत अभिमानाने मिरवण्यासारखं काहीच नाही. आस्तिकांसाठीही तेच लागू पडते. पण इतरांना उपदेश न करता जर कोणी सत्याचा शोध घेऊ लागला तर, त्यावर एवढे टोमणे कशासाठी ? देव आहे वा देव नाही या दोन्ही गोष्टी पुराव्याने सिद्ध झालेल्या नाहीत, असे एखाद्याला वाटू शकते.

चौकटराजा 11/12/2015 - 20:00
आस्तिक आहे मी तरीही देव पाप देतो यावर नाही विश्वास बिनदिक्कत बोलतो खोटे चिकित्सेचा मज नाही ध्यास

चौकटराजा 11/12/2015 - 20:01
आस्तिक आहे मी तरीही देव पाप देतो यावर नाही विश्वास बिनदिक्कत बोलतो खोटे चिकित्सेचा मज नाही ध्यास

छान कविता ! नास्तिकता प्रामाणिकपणे निभावून न्यायला "वाघाचे काळीज" लागते... आणि त्यापेक्षा अधिक जास्त महत्वाचे म्हणजे नास्तिकतेच्या दंभात वाहून जाणे टाळण्यासाठी "शास्त्रिय प्रामाणिकपणा व सारासारविवेक बाळगणारा मेंदू" जरूर असतो.

छाण ! अवांतर : नास्तिक ह्या शब्दाचा खरा अर्थ काय हे एकदा जरा नीट तपासुन पहायला पाहिजे सर्व्वांनी असे वाटले :)

तिमा 11/12/2015 - 18:31
मी नास्तिक आहे यांत अभिमानाने मिरवण्यासारखं काहीच नाही. आस्तिकांसाठीही तेच लागू पडते. पण इतरांना उपदेश न करता जर कोणी सत्याचा शोध घेऊ लागला तर, त्यावर एवढे टोमणे कशासाठी ? देव आहे वा देव नाही या दोन्ही गोष्टी पुराव्याने सिद्ध झालेल्या नाहीत, असे एखाद्याला वाटू शकते.

चौकटराजा 11/12/2015 - 20:00
आस्तिक आहे मी तरीही देव पाप देतो यावर नाही विश्वास बिनदिक्कत बोलतो खोटे चिकित्सेचा मज नाही ध्यास

चौकटराजा 11/12/2015 - 20:01
आस्तिक आहे मी तरीही देव पाप देतो यावर नाही विश्वास बिनदिक्कत बोलतो खोटे चिकित्सेचा मज नाही ध्यास

छान कविता ! नास्तिकता प्रामाणिकपणे निभावून न्यायला "वाघाचे काळीज" लागते... आणि त्यापेक्षा अधिक जास्त महत्वाचे म्हणजे नास्तिकतेच्या दंभात वाहून जाणे टाळण्यासाठी "शास्त्रिय प्रामाणिकपणा व सारासारविवेक बाळगणारा मेंदू" जरूर असतो.
लेखनविषय:
काव्यरस
असलो जरी मी नास्तिक तरी देवालाच दोष देत मी रडतो कुणासोबत मंदिरात जाता विश्वास नसून पाया पडतो.... नाही विश्वास भूता-खेतावर म्हणत मी टेम्भा मिरावतो ऐकट पडलो की मात्र अंधाराला खुप घाबरतो... खर खोट सिद्ध करायला मीही शप्पत घेतो नजर लावली कुणी म्हणून मीही दूषण देतो... स्वतावर आहे भरोसा तरी शिंक आली की थांबतो नस्तिक्तेच व्याख्यान मात्र अभिमानाने सांगतो... सण संपता निरोप घेता मीही होतो बर भाऊक आहेच खर का मी नास्तिक ते त्या इश्वरालाच ठाउक...

<<< आवडून घेतलेलं काही... >>>

प्यारे१ ·

जव्हेरगंज 18/10/2015 - 21:46
आवडेश! हवाएं हडताल पर है शायद आज तुम्हारी खुशबू नही आयी...>>>>> खिक्क्.. शेंगदाणे विक्रेता दिसतोय (बस .. एवढचं लिहितो :) )

रातराणी 18/10/2015 - 21:59
दीदार की तलब हो तो नजरे जमाएं रखना क्योंकी नकाब हो या नसीब सरकता जरूर है... पुण्यातल्या मुली कधी स्कार्फ काढून फिरताना दिसल्या तर समजा आज तुमचं नशीब जोरावर आहे. :)

रातराणी 18/10/2015 - 22:05
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे.. बायकोच्या अबोल्याच टेन्शन नाही येत मला तिनी भांडायचं सोडून दिलं की टरकते माझी :)

जव्हेरगंज 18/10/2015 - 22:17
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे...>>>>>>> तेच म्हणतोय, ऊगा ईकडे तिकडे ऊड्या मारायच्या, बेगामी शादीमे अब्दुला दिवाना, स्वत:ची घागर रिकामी, ऊगा दुसऱ्याच्या पाण्यात ऊड्या मारायच्या. जुबासे बोलना पड्या, खामोशी नही समजते. (प्यारे, तुमच्यासाठी नाही हे!)

नाखु 19/10/2015 - 14:23
मूळ धागा आणि नंतरची वस्त्रे हरणे ही लाजवाब !!!

जव्हेरगंज 18/10/2015 - 21:46
आवडेश! हवाएं हडताल पर है शायद आज तुम्हारी खुशबू नही आयी...>>>>> खिक्क्.. शेंगदाणे विक्रेता दिसतोय (बस .. एवढचं लिहितो :) )

रातराणी 18/10/2015 - 21:59
दीदार की तलब हो तो नजरे जमाएं रखना क्योंकी नकाब हो या नसीब सरकता जरूर है... पुण्यातल्या मुली कधी स्कार्फ काढून फिरताना दिसल्या तर समजा आज तुमचं नशीब जोरावर आहे. :)

रातराणी 18/10/2015 - 22:05
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे.. बायकोच्या अबोल्याच टेन्शन नाही येत मला तिनी भांडायचं सोडून दिलं की टरकते माझी :)

जव्हेरगंज 18/10/2015 - 22:17
जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे...>>>>>>> तेच म्हणतोय, ऊगा ईकडे तिकडे ऊड्या मारायच्या, बेगामी शादीमे अब्दुला दिवाना, स्वत:ची घागर रिकामी, ऊगा दुसऱ्याच्या पाण्यात ऊड्या मारायच्या. जुबासे बोलना पड्या, खामोशी नही समजते. (प्यारे, तुमच्यासाठी नाही हे!)

नाखु 19/10/2015 - 14:23
मूळ धागा आणि नंतरची वस्त्रे हरणे ही लाजवाब !!!
http://www.misalpav.com/node/33278 हलकं घेतलं जावं ही नम्र विनंती >>> सजदे में आज भी झुकते है सर बस, मौला बदल गया देखो... आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं फक्त, कधी बॉसचं कधी बायकोचं. >>> जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे.... आधी माझं स्त्री प्रजातीशी भांडण होतं नंतर मी त्यांना आवडू लागतो (हाय का आवाज फेम पातेल्यातली आमटी) >>> है परेशानियां युं तो बहुत सी जिंदगी में तेरी मोहब्बत सा मगर कोई तंग नही करता.... आहे वैताग भरपूर आयुष्यात तरी तुझ्या एवढं कोणीच पिडत नाही >

बाप्पाचा निरोप घेताना....

सुमित_सौन्देकर ·
लेखनविषय:
काव्यरस
निरोप घेऊन जाता जाता क्षणभर बाप्पा मागे फिरला खांद्यावरती हात ठेऊन मनामधल सार बोलला गड्या मला घरी सोडून मंडळामध्ये शोधतोस नावावरल्या व्यापाराला तुही चालना देतोस वाटल होत जोडीन गप्पा मारत दिवस काढू नैवेद्याच्या जोडीने तुझ माझ ताट वाढू सोडून वेड्या घरात मला चौकामध्ये फिरतोस मनामधल मागण्यासाठी बाहेर नवस बोलतोस? नको मला हार-तुरे नकोत असल्या सजावटी भक्त मिळावा साख्यासारखा नकोत चेहरे बनावटी विचार तुमच्या सुखाचाच रे लाच कशाला घेऊ मी नारळ, पैसे घेऊन तुमचे कुठे नेउनि ठेऊ मी चल माझी वेळ झाली जाता जाता इतकच सांगतो मंडपात मूर्ती सुरेख असली तरी मी तुमच्या घरात थांबतो

पायाखालची वीट दे....!

गंगाधर मुटे ·

सौंदाळा 13/07/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे 13/07/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत 13/07/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

सौंदाळा 13/07/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे 13/07/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत 13/07/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.
लेखनविषय:
पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गंगाधर मुटे ·

मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!

विवेकपटाईत 24/06/2015 - 19:36
मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....

मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!

विवेकपटाईत 24/06/2015 - 19:36
मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....
लेखनविषय:

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले

मलाही कविता सुचली

दमामि ·

खेडूत 21/05/2015 - 13:11
अतिसुंदर! अथकपणे अश्याच कविता करा! मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.
तुम्हाला कधी सुचते हो कविता ?
स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात … (आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )

चित्रगुप्त 21/05/2015 - 14:00
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.

तिमा 24/05/2015 - 17:06
आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.

खेडूत 21/05/2015 - 13:11
अतिसुंदर! अथकपणे अश्याच कविता करा! मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.
तुम्हाला कधी सुचते हो कविता ?
स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात … (आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )

चित्रगुप्त 21/05/2015 - 14:00
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.

तिमा 24/05/2015 - 17:06
आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.
मलाही कविता सुचली मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।। सक्काळी सक्काळी उठून ब्रशला पेस्ट मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। १ ।। आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। २ ।। हाफिसात निघताना बुटाची लेस मी बांधली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ३ ।। बायकोच्या आज्ञे वरून रात्री भांडी मी घासली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ४ ।। कवी - अथक घासकडवी (माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती . तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

चलत मुसाफिर 26/04/2015 - 23:55
मुटे साहेब, तुमचं लेखन प्रत्येक वेळी पटतंच असं नाही. पण भावना पोचतात आणि त्या अस्सल असतात असे वाटते.

आयुर्हित 27/04/2015 - 00:09
पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी - गंगाधर मुटे आपणच अमेठीची शेती मध्ये नकारात्मक बोलून ही वेळ आणली आहे.... आपल्यासारख्यांनी "एका झटक्यात कास्तकारी सोडणे" सोपे होईल आता!

काळा पहाड 27/04/2015 - 00:35
शेतकर्‍यांनीच ही स्थिती स्वतः वर ओढवून घेतली आहे. आत्तापर्यंत साखरकारखानदारांच्या पक्षांना, दूधसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या पक्षांना, ह्या राजाला आणि त्या टग्याला मतं देत आले. टग्यानं जलसिंचनाची किती कामं केली या बद्दल जी जाणीव असायला हवी ती फसवलेल्या गेलेल्या शेतकर्‍यांनासुद्धा किती आहे हा प्रश्नच आहे. शिकायबद्दल आणि मेहनत करण्याबद्दल एकूणच दु:स्वास. शिकणार्‍यांची टिंगल करणे. आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपल्याला शिक्षणाची आणि एकूणच कशाचीच गरज कशी नाही याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. बरेच जण स्थानिक राजकारण्याच्या मागं लागून तेवढंच करणे, फटफटीवर बसून त्याचा प्रचार करणे वगैरे गोष्टीत मन लावून काम करतात. रिकामा मिळालेला वेळ गावात गप्पा ठोकण्यात घालवणे, दारू ढोसणे हे आहेच. उगीच काळी माती आमची आई आहे वगैरे १८ व्या शतकातली चमकदार वाक्यं टाकायची आणि बिल्डर आला की त्याला जमीन विकायला सगळ्यात पुढं. यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि सरकारला कोंडीत पकडून आपल्या जमीनीबद्दल ४ पट ऐवजी १० पट पैसे बिल्डर कढून काढून घेण्याची इच्छा आहे.

चलत मुसाफिर 26/04/2015 - 23:55
मुटे साहेब, तुमचं लेखन प्रत्येक वेळी पटतंच असं नाही. पण भावना पोचतात आणि त्या अस्सल असतात असे वाटते.

आयुर्हित 27/04/2015 - 00:09
पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी - गंगाधर मुटे आपणच अमेठीची शेती मध्ये नकारात्मक बोलून ही वेळ आणली आहे.... आपल्यासारख्यांनी "एका झटक्यात कास्तकारी सोडणे" सोपे होईल आता!

काळा पहाड 27/04/2015 - 00:35
शेतकर्‍यांनीच ही स्थिती स्वतः वर ओढवून घेतली आहे. आत्तापर्यंत साखरकारखानदारांच्या पक्षांना, दूधसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या पक्षांना, ह्या राजाला आणि त्या टग्याला मतं देत आले. टग्यानं जलसिंचनाची किती कामं केली या बद्दल जी जाणीव असायला हवी ती फसवलेल्या गेलेल्या शेतकर्‍यांनासुद्धा किती आहे हा प्रश्नच आहे. शिकायबद्दल आणि मेहनत करण्याबद्दल एकूणच दु:स्वास. शिकणार्‍यांची टिंगल करणे. आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपल्याला शिक्षणाची आणि एकूणच कशाचीच गरज कशी नाही याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. बरेच जण स्थानिक राजकारण्याच्या मागं लागून तेवढंच करणे, फटफटीवर बसून त्याचा प्रचार करणे वगैरे गोष्टीत मन लावून काम करतात. रिकामा मिळालेला वेळ गावात गप्पा ठोकण्यात घालवणे, दारू ढोसणे हे आहेच. उगीच काळी माती आमची आई आहे वगैरे १८ व्या शतकातली चमकदार वाक्यं टाकायची आणि बिल्डर आला की त्याला जमीन विकायला सगळ्यात पुढं. यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि सरकारला कोंडीत पकडून आपल्या जमीनीबद्दल ४ पट ऐवजी १० पट पैसे बिल्डर कढून काढून घेण्याची इच्छा आहे.
लेखनविषय:
लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला

मराठी

वेल्लाभट ·

टवाळ कार्टा 09/04/2015 - 10:59
लय भारी...पण ते "माज आहे मराठीचा" खटकले...माज करणारा समोरचा कोण आहे हे न बघता माज करतो...त्यात मराठी अ-मराठी असे काहीही नसते...उ.दा. रिक्षावाले, सर्कारी कर्मचारी, मामालोक, बाईकवर झेंडे लाउन फिरणारे,....लिस्ट बरीच मोठी आहे

In reply to by टवाळ कार्टा

वेल्लाभट 09/04/2015 - 11:38
मला तुझा मुद्दा नाही कळला टका. 'गर्व नाही; माज आहे मराठी असल्याचा' वगैरे उक्त्या असलेल्या टी शर्टचं उदाहरण दिलं मी. माज करण्याचं नव्हे.

नाखु 09/04/2015 - 11:57
मुखात असेल मराठी तर ती मनात असण्याला अर्थ आहे मनातच ती नसेल तर आपला मराठी जन्मच व्यर्थ आहे
परवाचा इंग्रजी कलगी-तुरा पाहता हा बाण मर्मभेदी आहे आशयघन मुक्तकाव्य

टवाळ कार्टा 09/04/2015 - 10:59
लय भारी...पण ते "माज आहे मराठीचा" खटकले...माज करणारा समोरचा कोण आहे हे न बघता माज करतो...त्यात मराठी अ-मराठी असे काहीही नसते...उ.दा. रिक्षावाले, सर्कारी कर्मचारी, मामालोक, बाईकवर झेंडे लाउन फिरणारे,....लिस्ट बरीच मोठी आहे

In reply to by टवाळ कार्टा

वेल्लाभट 09/04/2015 - 11:38
मला तुझा मुद्दा नाही कळला टका. 'गर्व नाही; माज आहे मराठी असल्याचा' वगैरे उक्त्या असलेल्या टी शर्टचं उदाहरण दिलं मी. माज करण्याचं नव्हे.

नाखु 09/04/2015 - 11:57
मुखात असेल मराठी तर ती मनात असण्याला अर्थ आहे मनातच ती नसेल तर आपला मराठी जन्मच व्यर्थ आहे
परवाचा इंग्रजी कलगी-तुरा पाहता हा बाण मर्मभेदी आहे आशयघन मुक्तकाव्य
महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं.

कावळा *** लकी नसतो;

चुकलामाकला ·
लेखनविषय:
आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो; कावळा *** लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला कावळा ***! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत कावळा *** त? गाडी पुढे सरकते.. पार्किंग मिळते ... बाहेर पडता बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात कावळा परत घात करतो! हळूच *** अन् भावी डेट ची वाट लावतो. संसार होतो...

..का आज सारे गप्प

मंदार दिलीप जोशी ·

एस 26/12/2014 - 16:41
कविता आवडली. ह्या प्रश्नावर भारतीय समाजात तितकी चलबिचल झाली नाही याचे एक कारण म्हणजे बोडोंचा प्रश्नही त्यांच्या बाजूने समजण्यासारखा आहे. बोडो जमाती आज त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्यांक ठरण्याच्या मार्गावर आहे. आसामच्या उत्तरेकडील या भागात खालील आदिवासी आणि बांगलादेशातून घुसलेले बेकायदेशीर लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. अर्थात हा एक मुद्दा झाला. ह्या प्रश्नाचे इतरही असंख्य पदर आहेत. आणि अशा अमानवीय दहशतवादाची जितकी निर्भत्सना करावी तितकी कमीच आहे.

In reply to by एस

बहुगुणी 29/12/2014 - 19:51
सहा वर्षांपूर्वी मी इथे लिहिलेल्या 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या एका स्फुटाची आठवण झाली. स्वॅप्स म्हणताहेत तशी ही बहुपदरी समस्या आहे, त्यातील सीमेपलिकडून होणारं स्थलांतर (आणि दहशतवाद्यांची आवक) ही समस्या कित्येक वर्षे unresolved आहे, त्याविषयी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये २००८ मध्ये एका हताश ऑफिसरने हे म्हंटलं होतं: "While all attention was on Mumbai and the western frontier, no additional resources were deployed in the east. We did our best to nab as many as we could but many more could have got away through the extremely porous border," a senior officer said. Only about 550 km of the border with Bangaldesh in Bengal has been fenced. Of the remaining, nearly 267 km is a natural riverine boundary. मला वाटतं भारतीय समाज, आर्मी आणि राजकीय नेतृत्वाने आपली मानसिकता बदलण्याबरोबरच आपल्या आर्मी व सरकारने प्राधान्याने सच्छिद्र पूर्व सीमेचा बंदोबस्त करणं अतीव गरजेचं आहे.

श्रीगुरुजी 26/12/2014 - 20:37
बाहेरच्या लोकांनी असे कृत्य केले तर संताप दाखविता येतो आणि सहानुभूतीही दाखविता येते. पण आपल्याच लोकांनी असं केलं तर दोन्ही दाखविता येत नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ!

In reply to by काळा पहाड

hitesh 30/12/2014 - 10:01
काँग्रेसच्या काळात सगळ्या बातम्या समजत होत्या. मोदी आल्यापासुन दंगल , युद्धे याच्या बातम्या फारशा येत नाहीत. आसाम घडत असताना सगळे मेडियावाले भारतर्त्न भाज्पेयीना आरती ओवाळत होते

In reply to by hitesh

काळा पहाड 30/12/2014 - 12:25
काँग्रेसला विसरा आता. राहूल आणि सोनिया "आत" जाणार आहेत. राहिलेल्या काँग्रेस नेत्यांना भाजप घरवापसी करून प्रवेश देणार आहे. बाकी आसामचा प्रश्न काँग्रेसमुळेच निर्माण झालाय. त्याचा, काश्मीरचा अशा गोष्टींचा हिशेब चुकता करणं बाकी आहेच.

In reply to by काळा पहाड

hitesh 30/12/2014 - 13:46
नानाचा डायलॊग आठवला."बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे...." नमोभक्तांच्या कानाची काळजी वाटते आहे.

In reply to by hitesh

काळा पहाड 30/12/2014 - 14:26
मी नमोभक्त नाहिये हो. (सध्याचे) गांधी (आणि वड्रा) विरोधी आहे. त्यासाठी मला नमो चालतील, केजरीवाल चालतील. मुलायम चालतील. अपवादः ममता बॅनर्जी (हिच्या ऐवजी राहुल गांधी सुद्धा चालतील).

पैसा 30/12/2014 - 13:53
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही. तुम्ही एकगट्ठा मतदान करून सरकारे बदला, पण दुसरा येतो त्याच्याकडे पाहिले तर आधीचा परवडला म्हणायची पाळी येते कारण कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्यापेक्षा तसाच चिघळत ठेवणे याना व्होट बँकेसाठी आवश्यक वाटते. धन्य तो आमचा महान भारत अन धन्य ते आमचे पुढारी.

In reply to by पैसा

मदनबाण 30/12/2014 - 14:31
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही. +१००

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climb

गंमतच आहे. शेजारी बळी पडलेल्या लेकरांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे लोक इथे आपल्या घरात बळी गेलेल्या लोकांबद्दल चकार शब्द का काढत नाहीत असे विचारणारे तथाकथीत देशभक्त लोक 'तिथे पाकिस्तानने जे पेरले त्याची फळे ते भोगताहेत, त्यांच्याबद्दल काय सहानुभूती बाळगायची' असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतःमात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडात बळेी गेलेल्यांबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय

In reply to by विशाल कुलकर्णी

hitesh 30/12/2014 - 18:29
तीच तर हिंदुत्ववाद्यांची गंमत आहे... पाकिस्तानी माता जेंव्हा आक्रोशकरताना बोलल्या की ही मुले भारताची किंवा अमेरिकेची होती का ? तेंव्हा त्यात हिंदुत्ववाद्यांना भारतद्वेष दिसला. अतीव दु:खाच्या वेळी आपलंच मूल का बळी गेलं शेजार्‍याचं का नाही , असे विचारले तर तो म्हणे भारतद्वेष झाला. स्वतःच्या मुलाचं हित शाबुत ठेउन दुसर्‍याच्या मुलांचा बळी जा वा ही इच्छा म्हणे अ‍ॅब्नॉर्मल ! स्वताच्या पोराला राजा करण्यासाठी दुसर्‍याच्या पोराला वनवासात घालणार्‍या , स्वतःच्या पोरासाठी नवर्‍याच्या मांडीवरुन सवतीची पोरं उठवणार्‍या बायका कुठल्या धर्मातल्या ? हे बघायला मात्र यान्ना वेळ नाही !

In reply to by विशाल कुलकर्णी

अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडाबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय.>> अर्थात तसा तो आहेच. आणि तोच आहे. का नसावा? आपल्या लोकांच्या हत्या दिसत नाहीत आणि पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल पुळका आहे अशा भंपक लोकांच्या वृत्तीवर प्रहार करणे हाच उद्देश आहे मुळात कवितेचा. असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतः मात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. >> हे कसं काय बुवा ठरवलंत? ते अतिरेकीही वाईटच. दुसरं म्हणजे भारत सरकार पूर्वोत्तर रा़ज्यांच्या परवडीबद्दल जबाबदार असेलही, नव्हे आहेच, पण अतिरेकी निर्माण, प्रोत्साहन आणि ट्रेनिंगचे काम भारताने आजवर कधीही केलेले नाही. तेव्हा भारताच्या बाबतीत सरसकटीकरण करताच येणार नाही. तिसरं, असंख्य ठिकाणी निषेध व्यक्त केलेलाच आहे. पण खरी गंमत म्हणजे पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल गळे काढणारेच लोक आसामच्या हत्त्याकांडाबाबत मौन बाळगून आहेत..

एस 26/12/2014 - 16:41
कविता आवडली. ह्या प्रश्नावर भारतीय समाजात तितकी चलबिचल झाली नाही याचे एक कारण म्हणजे बोडोंचा प्रश्नही त्यांच्या बाजूने समजण्यासारखा आहे. बोडो जमाती आज त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्यांक ठरण्याच्या मार्गावर आहे. आसामच्या उत्तरेकडील या भागात खालील आदिवासी आणि बांगलादेशातून घुसलेले बेकायदेशीर लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. अर्थात हा एक मुद्दा झाला. ह्या प्रश्नाचे इतरही असंख्य पदर आहेत. आणि अशा अमानवीय दहशतवादाची जितकी निर्भत्सना करावी तितकी कमीच आहे.

In reply to by एस

बहुगुणी 29/12/2014 - 19:51
सहा वर्षांपूर्वी मी इथे लिहिलेल्या 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या एका स्फुटाची आठवण झाली. स्वॅप्स म्हणताहेत तशी ही बहुपदरी समस्या आहे, त्यातील सीमेपलिकडून होणारं स्थलांतर (आणि दहशतवाद्यांची आवक) ही समस्या कित्येक वर्षे unresolved आहे, त्याविषयी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये २००८ मध्ये एका हताश ऑफिसरने हे म्हंटलं होतं: "While all attention was on Mumbai and the western frontier, no additional resources were deployed in the east. We did our best to nab as many as we could but many more could have got away through the extremely porous border," a senior officer said. Only about 550 km of the border with Bangaldesh in Bengal has been fenced. Of the remaining, nearly 267 km is a natural riverine boundary. मला वाटतं भारतीय समाज, आर्मी आणि राजकीय नेतृत्वाने आपली मानसिकता बदलण्याबरोबरच आपल्या आर्मी व सरकारने प्राधान्याने सच्छिद्र पूर्व सीमेचा बंदोबस्त करणं अतीव गरजेचं आहे.

श्रीगुरुजी 26/12/2014 - 20:37
बाहेरच्या लोकांनी असे कृत्य केले तर संताप दाखविता येतो आणि सहानुभूतीही दाखविता येते. पण आपल्याच लोकांनी असं केलं तर दोन्ही दाखविता येत नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ!

In reply to by काळा पहाड

hitesh 30/12/2014 - 10:01
काँग्रेसच्या काळात सगळ्या बातम्या समजत होत्या. मोदी आल्यापासुन दंगल , युद्धे याच्या बातम्या फारशा येत नाहीत. आसाम घडत असताना सगळे मेडियावाले भारतर्त्न भाज्पेयीना आरती ओवाळत होते

In reply to by hitesh

काळा पहाड 30/12/2014 - 12:25
काँग्रेसला विसरा आता. राहूल आणि सोनिया "आत" जाणार आहेत. राहिलेल्या काँग्रेस नेत्यांना भाजप घरवापसी करून प्रवेश देणार आहे. बाकी आसामचा प्रश्न काँग्रेसमुळेच निर्माण झालाय. त्याचा, काश्मीरचा अशा गोष्टींचा हिशेब चुकता करणं बाकी आहेच.

In reply to by काळा पहाड

hitesh 30/12/2014 - 13:46
नानाचा डायलॊग आठवला."बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे...." नमोभक्तांच्या कानाची काळजी वाटते आहे.

In reply to by hitesh

काळा पहाड 30/12/2014 - 14:26
मी नमोभक्त नाहिये हो. (सध्याचे) गांधी (आणि वड्रा) विरोधी आहे. त्यासाठी मला नमो चालतील, केजरीवाल चालतील. मुलायम चालतील. अपवादः ममता बॅनर्जी (हिच्या ऐवजी राहुल गांधी सुद्धा चालतील).

पैसा 30/12/2014 - 13:53
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही. तुम्ही एकगट्ठा मतदान करून सरकारे बदला, पण दुसरा येतो त्याच्याकडे पाहिले तर आधीचा परवडला म्हणायची पाळी येते कारण कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्यापेक्षा तसाच चिघळत ठेवणे याना व्होट बँकेसाठी आवश्यक वाटते. धन्य तो आमचा महान भारत अन धन्य ते आमचे पुढारी.

In reply to by पैसा

मदनबाण 30/12/2014 - 14:31
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही. +१००

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climb

गंमतच आहे. शेजारी बळी पडलेल्या लेकरांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे लोक इथे आपल्या घरात बळी गेलेल्या लोकांबद्दल चकार शब्द का काढत नाहीत असे विचारणारे तथाकथीत देशभक्त लोक 'तिथे पाकिस्तानने जे पेरले त्याची फळे ते भोगताहेत, त्यांच्याबद्दल काय सहानुभूती बाळगायची' असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतःमात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडात बळेी गेलेल्यांबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय

In reply to by विशाल कुलकर्णी

hitesh 30/12/2014 - 18:29
तीच तर हिंदुत्ववाद्यांची गंमत आहे... पाकिस्तानी माता जेंव्हा आक्रोशकरताना बोलल्या की ही मुले भारताची किंवा अमेरिकेची होती का ? तेंव्हा त्यात हिंदुत्ववाद्यांना भारतद्वेष दिसला. अतीव दु:खाच्या वेळी आपलंच मूल का बळी गेलं शेजार्‍याचं का नाही , असे विचारले तर तो म्हणे भारतद्वेष झाला. स्वतःच्या मुलाचं हित शाबुत ठेउन दुसर्‍याच्या मुलांचा बळी जा वा ही इच्छा म्हणे अ‍ॅब्नॉर्मल ! स्वताच्या पोराला राजा करण्यासाठी दुसर्‍याच्या पोराला वनवासात घालणार्‍या , स्वतःच्या पोरासाठी नवर्‍याच्या मांडीवरुन सवतीची पोरं उठवणार्‍या बायका कुठल्या धर्मातल्या ? हे बघायला मात्र यान्ना वेळ नाही !

In reply to by विशाल कुलकर्णी

अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडाबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांनाच दोष देणारा दिसतोय.>> अर्थात तसा तो आहेच. आणि तोच आहे. का नसावा? आपल्या लोकांच्या हत्या दिसत नाहीत आणि पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल पुळका आहे अशा भंपक लोकांच्या वृत्तीवर प्रहार करणे हाच उद्देश आहे मुळात कवितेचा. असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतः मात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. >> हे कसं काय बुवा ठरवलंत? ते अतिरेकीही वाईटच. दुसरं म्हणजे भारत सरकार पूर्वोत्तर रा़ज्यांच्या परवडीबद्दल जबाबदार असेलही, नव्हे आहेच, पण अतिरेकी निर्माण, प्रोत्साहन आणि ट्रेनिंगचे काम भारताने आजवर कधीही केलेले नाही. तेव्हा भारताच्या बाबतीत सरसकटीकरण करताच येणार नाही. तिसरं, असंख्य ठिकाणी निषेध व्यक्त केलेलाच आहे. पण खरी गंमत म्हणजे पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल गळे काढणारेच लोक आसामच्या हत्त्याकांडाबाबत मौन बाळगून आहेत..
लेखनविषय:
काव्यरस
..का आज सारे गप्प आपल्यांची हाक आली! कुंपणापार ती निरागस अन् आसामी का निराळी? तेव्हा पेटले गहिवर वन्हि झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली आज आपुलेच वाहता रक्त का वाटे व्यथा निराळी? तुम्हा न गोड लागे तेव्हा अन्न अन् पाणी गात्रे आज ती थिजली अन् बसली दातखीळ साली! ना शब्द करुणा ल्याले ना ओल डोळा आली आज पुन्हा का तुमची विवेकबुद्धी नग्न झाली? ना निषेध दिसला कोठे ना दिसल्या षंढ चर्चा का आज शब्द रुसले अन् मने रिकामी झाली? माणुसकीचा य