मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाई माझी कंबर लचकली..

आजी ·
लेखनप्रकार
हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या "चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे." काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.) "गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?" "कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?

सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नवरा: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे. बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे. नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला. बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल. मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील. बायको: तुझ्या मुलालाही पुढचे शिक्षण अमेरिकेत घ्यायचे आहे.

‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शेवटची (मराठी) कादंबरी वाचली होती त्याला आता १३ वर्षे उलटून गेली होती. ती ग्रंथालयातून आणून आणि पान अन् पान न वाचता काहीशी उडतउडत संपवली होती. आयुष्याच्या त्या टप्प्यावर मनोमन वाटू लागलं होतं की आता कादंबरी व कथावाचन नकोस वाटतंय; कल्पिताचे दीर्घवाचन हा काही आता आपला प्रांत राहिलेला नाही. पुढे 2019मध्ये ग्रंथालय कायमचे बंद केले आणि तिथून पुढे दरवर्षी मोजकी पुस्तके विकत घेऊनच वाचतोय. ग्रंथालयातून पुस्तक आणताना माणूस निवडीबाबत काहीसा शिथिल असतो. परंतु पुस्तक विकत घ्यायचे म्हटल्यानंतर तो (अति) चिकित्सक बनतो !

वेड्या आईची वेडी माया

रानरेडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा. खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता . रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा अँटी सोशल इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची.

अभंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
संसदेत नाही । फिरकले पायी । महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।। जुने मढे सारे । काढिले बाहेरी । नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।। एपस्टिन यादी । येईल बाहेरी । हीच भीती उरी । दाटलेली ।।३।। शिक्षण, बेकारी । तशी महागाई । बोलणेच नाही । विषयांवर ।।४।। आत्महत्या करी । राजा शेतकरी । जंगले व्यापारी । लुटविती ।।५।। निवडणुकीवेळी । गोड गोड बोली । वचनांची झोळी । रिकामीच ।।६।। सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव । जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।। संसदेचा वेळ । वायाचि गेला हा । 'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।

भारत-म्यानमार फाळणी

केदार भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे.