...अजून सहाच महिने राहिलेत; शरीर-समृद्धी-संकल्प पूर्ण करा
प्रज्ञापराध ! म्हणजे तुम्हाला कळतंय की एखादी गोष्ट तुमच्या शरीराला , आरोग्याला हानिकारक आहे तरीही तुम्ही करता , करत राहता . आरबट चरबट खाणे , चिप्स , फॅक्टरी प्रोड्युस्ड मीट, मैदा , पाव , चहा, कॉफी , खंडीभर साखर घातलेले कोल्डिंक्रस, सोडा , अल्कोहोल , स्मोकिंग , तंबाखु , व्यायामाचा आळस, रात्री उशीरापर्यंत जागरणं , सकाळी उशीरा उठणे , नित्यनेम न पाळणे. वगैरे वगैरे. आपल्याला माहीती आहे हे आरोग्याला चांगले नाही पण तरीही आपण करत राहतो , हा आहे प्रज्ञापराध . प्रज्ञा अर्थात बुध्दीचा अपमान !बस हा एक रोग टाळला तर बाकी कोणतेच रोग होण्याची शक्यता कमी होऊन जाते ! बस्स येवढं करा , बाकी आपोआप जुळुन येईल ! शुभेच्छा ! शुभास्ते सन्तु पंथानः || चरैवति चरैवति ||
In reply to वाह. उत्तम. by प्रसाद गोडबोले
In reply to वाह. उत्तम. by भागो
Do not breathe. Air is polluted!संदर्भ कळला नाही. "दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, भस्त्रिका भ्रामरी, कपालभाती इ. प्राणायाम करा" असं काही आहे का?
In reply to वाह. उत्तम. by भागो
Do not breath.अहो , हे तर मी तुम्हाला अन मिपावरच्या अजुन कित्येक डुप्लिकेट आयडींना कधी पासुन सांगतोय. =))))
In reply to वाह. उत्तम. by प्रसाद गोडबोले
१० दिवसात ३.५ किलो वजन कमी केलेले, पोटाचा घेर १-१.५ इंच कमी झालेला .अभिनंदन! आहार विहार काय होता अन् योगासने कोणती केली होती? विस्तारानं सांगितलं तर उपयोगी पडेल. (तुमच्या लेखमालिकेत थोडाफार उल्लेख आहे.) --- १. माझे पुण्यातील एक स्नेही व त्यांची पत्नी या दोघांनी दिवसभरात केवळ दोनदा जेवणे असं करून बरेचसे बारीक झाले होते. २. माझा एक हैदराबादी मित्र, वर्षभरापूर्वी १२० किलो, सध्या ९५ किलो आहे. त्याने आहार तज्ञाकडून घेतलेला कार्यक्रम वर्षभरापासून नित्यनेमाने करत आहे. रोज सकाळ संध्याकाळ चार-पाच चार-पाच किलोमीटर चालतो. पण हे तिघेही लोक त्यांचं वजन कमी झाल्यानंतर सुरकुतलेले दिसत आहेत. म्हणजे हा हैदराबाद मित्र त्याची एकूणच शरीर-चण कमी झाली आहे असा दिसतो. मतभिन्नतेच्या आदरासहित मला असं वाटतं की पोटावरची व इतर ठिकाणची अतिरिक्त चरबी निघून जावी पण एकूणच बांधा लहान होऊ नये किंवा खांदे पाडून चालत आहे असे दिसू नये. - शंकेखोर कांदा लिंबू
In reply to १० दिवसात ३.५ किलो वजन कमी by कांदा लिंबू
डॉक्टर दिक्षित म्हणाले तसे. ह्याला जौन धर्मात ब्यासना असं म्हणतात. पण ह्याचे दोन दुष्परिणाम माझ्या निदर्शनास आले आहेत - हे करत असताना व्यायाम न केल्यास ह्याने फॅट लॉस न होता मसल लॉस होतो. आणि दुसरे म्हणजे - ह्या डायेटचा युरिक अॅसिड रिटेन्शन सोबत काहीतरी संबंध असावा असा माझा एक कयास आहे , तस्मात सांधेदुखीवाल्यांनी असले काही करु नये. डायबेटीस वाल्यांना तर हायपो ग्लायसेमिया चा धोका असल्याने त्यांन्नी तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीच करु नये . बाकी तुमचा बांधा हा जेनेटीक आहे, तुम्हाला तुमच्या आईवडीलांकडुन मिळालेला आहे त्यात तुम्ही बदल करु शकत नाही. पण जे मिळाले ते व्यवस्थित कसे टिकवता येईल ह्याचे उपाय आपण नक्की करु शकतो. बाकी फॅट बर्निंग ही अतयंत सायंटिफिक प्रक्रिया आहे त्यावर इथे सविस्तर माहीती आहे - https://www.youtube.com/watch?v=vuIlsN32WaE&t=225s त्यामुळे वजनाचा जास्त विचार न करता आयुर्वेदाचा दृष्टीने हा विचार करावा - समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियाः। प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थः इत्यभिधीयते ॥ किंवा अजुन थोडे डिटेल मध्ये - अन्नाभिलाषो भुक्तस्य परिपाकः सुखेन च । सृष्टविण्मूत्रवातत्वं शरीरस्य च लाघवम् ॥ सुप्रसन्नेन्द्रियत्वं च सुखस्वप्न प्रबोधनम् । बलवर्णायुषां लाभः सौमनस्यं समाग्निता ॥ विद्यात् आरोग्यलिंङ्गानि विपरीते विपर्ययम् । – ( काश्यपसंहिता, खिलस्थान, पञ्चमोध्यायः ) - इत्यलमदिवसभरात केवळ दोनदा जेवणे
In reply to आहार >> by प्रसाद गोडबोले
भ्रस्त्रिका प्राणायममला कपालभातीं प्राणायाम लिहायचे होते, विचारांच्या ओघात चुकीने भ्रस्त्रिका लिहिले गेले. भस्त्रिका प्राणायाम देखील प्राणायामाचा एक अवघड प्रकार असल्याने गुरुगम्यच आहे, प्रत्यक्ष गुरुंचा मार्गदर्शनाशिवाय करु नयेच. केवळ अनुलोम विलोम आणि कपालभांती इंतरनेट / युट्युबवर पाहुन करण्यास हरकत नाही.
In reply to वाह. उत्तम. by प्रसाद गोडबोले
In reply to >> १० दिवसात ३.५ किलो वजन कमी by अमर विश्वास
पुढच्या दहा दिवसात किती किलो वाढले ते ही सांगामी मेडीटिव्ह ह्या अॅप वर व्हायटाल स्टॅट सतत ट्रॅक करत असल्याने तुम्हाला अचुक उत्तर देउ शकतो. १० दिवसात १.१ किलो वजन वाढले. त्यानंतर नित्यनेम पुढे कायम केल्यावर परत ३००-५०० ग्रॅ कमी झाले. त्या नंतर आता जवळापास एक महिना उलटुन गेला तरी तिथेच स्टेबल आहे. सो नेट नेट ८०० ग्र. वजन वाढले. बाकी - तुमच्या प्रश्नाचा रोख तिरकस वाटला म्हनुन अजुन काही लिहितो - मला कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाही, मी काही वजन कमी करवण्याचे क्लास घेत नाही. ध्यान किंव्वा योगाचे तर नाहीच नाही , मला कसलेही मार्केटिंग करण्यात मुळीच रस नाही. कांदा लिंबु आमच्या गट.क्र. १ मधील वाटले म्हणुन मी मनस्वीपणे सहज प्रतिसाद दिला. बस इतकेच. मी आधीही वारंवार म्हणलो आहे की- ज्ञान हे मर्यादित लोकांकरिताच असले पाहिजे. तुम्ही असं समजा की हे आयुर्वेद , आयुर्वेदिक आहार , जीवनपध्दती , योगासने, सुर्यनमस्कार , ध्यान वगैरे सर्व थोतांड आहे, सुडोसायन्स आहे, बामणाचे कसब आहे. ते त्यांच्याकरिता सोडुन द्या. अन्य लोकांकरिता - लिपोसक्शन हा पोटाचा घेर कमी करण्याचा खात्रीलायक उपाय आहे तो करणे उत्तम !
In reply to प्रश्नाचा रोख कळाला नाही. by प्रसाद गोडबोले
In reply to प्रश्नाचा रोख कळाला नाही. by प्रसाद गोडबोले
"तुम्ही असं समजा की हे आयुर्वेद , आयुर्वेदिक आहार , जीवनपध्दती , योगासने, सुर्यनमस्कार , ध्यान वगैरे सर्व थोतांड आहे, सुडोसायन्स आहे,"मी आयुर्वेदाचा विरोधक नाही आणि दैनंदिन वापरातली दंतकांती टूथपेस्ट, चव आवडत असल्याने अधून-मधून हवाबाण हरडे आणि पुदीनहराच्या कॅप्सूल टाईप गोल गोळ्या मिळतात त्यांचा एका विशिष्ट कारणासाठी 'मुखशुद्धी' करण्यासाठी क्वचित प्रसंगी चावून खाण्यासाठी अशा २-३ गोष्टी सोडल्यास कुठल्या आयुर्वेदिक औषधांचा किंवा अन्य उत्पादनांचा उपभोक्ताही नाही त्यामुळे त्या उपचार पद्धती, आहार ह्यावर काही टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही. पण एकाच शहरात राहत असल्याने दोन तीन खाजगी कट्ट्यांच्या निमित्ताने झालेली भेट आणि फोन-व्हॉट्सऍप वर असलेल्या संपर्कापुरते मर्यादित असलेले एक मिपाकर अरुण पाटील, मिपा आयडी रंगीला रतन ह्यांचे १२ जून रोजी हृदयविकाराने निधन झाल्याचे काल समजले. सहा सात महिन्यांपूर्वी ब्लॉकेजेसचे निदान झाल्यावर सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम असलेल्या ह्या बांधकाम व्यावसायिकाने आधुनिक उपचार घेण्याचे सोडून (कुठे त्याचे नाव घेत नाही पण) आयुर्वेदिक उपचार घेण्यातून वयाच्या ४३-४४ व्या वर्षी आपला जीव गमावला ह्याचे आश्चर्य वाटले. तसे ते, हृदयविकारच काय कॅन्सर वरील उपचारांसाठीही अनेक लोक 'सर्वस्वी' आयुर्वेदिक उपचारांवर कसे काय अवलंबून राहतात ह्याविषयी नेहमीच वाटते म्हणा!
"लिपोसक्शन हा पोटाचा घेर कमी करण्याचा खात्रीलायक उपाय आहे तो करणे उत्तम !"ह्याचाही दीर्घकाळासाठी उपयोग होतो कि नाही ह्याविशयी साशंक आहे. एका परिचिताने हे केले होते पण दोनेक वर्षांनी पुन्हा त्याचे आकारमान जवळपास पूर्वीप्रमाणेच झाले. अर्थात जिभेवर बिलकुल ताबा नसणे हे त्यामागचे त्याच्याबाबतीतले कारण असू शकते हे देखील मान्यच! आणि एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते कि कोविडची लस घेतल्यापासून असे कित्येक जण गेल्या दोन तीन वर्षात अकाली मृत्यू पावलेले बघितले आहेत आणि बहुसंख्यवेळी हृदयविकार हेच कारण असल्याचे जाणवले.
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
आणि एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते कि कोविडची लस घेतल्यापासून असे कित्येक जण गेल्या दोन तीन वर्षात अकाली मृत्यू पावलेले बघितले आहेत आणि बहुसंख्यवेळी हृदयविकार हेच कारण असल्याचे जाणवले.यात मात्र तथ्य आहे हे हळूहळू समोर येत आहे.माझ्या वडिलांना कोवीड नंतर काही काळातच सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता.तेव्हा डॉक्टरांनी लसीमुळे हे घडलं असंच सांगितलं होतं.
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते कि कोविडची लस घेतल्यापासून असे कित्येक जण गेल्या दोन तीन वर्षात अकाली मृत्यू पावलेले बघितले आहेत आणि बहुसंख्यवेळी हृदयविकार हेच कारण असल्याचे जाणवले.हेही धक्कादायक आहे. "कोविडच्या लशींचे अल्पकालीन व दीर्घकालीन दुष्परिणाम" असं काही संशोधन झालेलं आहे का?
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
In reply to "तुम्ही असं समजा की हे by टर्मीनेटर
In reply to रंगीला रतन ह्यांना by प्रसाद गोडबोले
फक्त आयुर्वेद किंवा फक्त अलोपथी , ह्यातील कोणताही टोकाचा आग्रह बरा नव्हे. समत्व हवे , सारासार विवेक्क हवा.१००% सहमत! आणि त्यासाठीच वरच्या प्रतिसादातील, "हृदयविकारच काय कॅन्सर वरील उपचारांसाठीही अनेक लोक 'सर्वस्वी' आयुर्वेदिक उपचारांवर कसे काय अवलंबून राहतात ह्याविषयी नेहमीच वाटते म्हणा!" ह्या वाक्यात 'सर्वस्वी' ह्या शब्दाचा वापर केला आहे!
In reply to अभिनंदन! by Bhakti
Burpees २० करा ,mountain climbers - ४०-६०,squat - ३०-५०,jumping jacks-१०० ने सुरूवात करा.अहो सुरुवात एवढ्यानं करायची तर मग शेवट कितीनं करायचा? ;-) Well, on a serious note, हे मी लिहून ठेवलंय ऍटलिस्ट जेवढे जमेल तेवढे आज संध्याकाळपासून सुरू करत आहे. धन्स्!
योगामध्ये रोज प्राणायाम करा-अनुलोम विलोम दिवसातून ३-४ वेळा ५-१० मिनिटे!योग दिवसातून अनेक वेळा करतात हे माहीत नव्हतं. करून पाहीन.
In reply to Burpees २० करा ,mountain by कांदा लिंबू
योग दिवसातून अनेक वेळा करतात हे माहीत नव्हतं. करून पाहीन. अगदी सूर्यनमस्कारही कधीही करू शकता,फक्त सकाळीच असं काही नाही.
In reply to चाळीशीनंतर आहाराने पोट कमी by कंजूस
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चाळीशीनंतर आहाराने पोट कमी करणे जरा अवघडच असते. व्यायामाने नाहीच हे माझे मत.
पोट घेर सर्वात शेवटी कमी होतं,कंकाका, प्रा डॉ, असं बोलू नका हो, पामराला जरा धीर द्या! ;-)
In reply to -१ by कांदा लिंबू
In reply to उत्तम धागा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्वी नियमित बॅडमिंटन खेळायचो यामुळे वजन कमी होणे असे काही झाले नाही पण दिवसभर उत्साहाची फूल ब्याट्री असायची.हं. आमच्या अपार्टमेंटातही जाड, बारीक, मध्यम लोक रोज बॅडमिंटन खेळतात पण त्यांचीही शरीरयष्टी बदलली असं काही दिसत नाही. उत्साह मात्र दिसतो हे खरं. --- तुम बॅडमिंटनां खेलने तो हैदराबाद आ जाओ बड़े भाई, गच्चीबौली में जाके तुमारकू को पुलेला गोपीचंद अकादमी में खिलातुं। भोत लोगां एंजॉय करते व्हांपे, मालूम?
In reply to बॅडमिंटन by कांदा लिंबू
तुम बॅडमिंटनां खेलने तो हैदराबाद आ जाओ बड़े भाई, गच्चीबौली में जाके तुमारकू को पुलेला गोपीचंद अकादमी में खिलातुं। भोत लोगां एंजॉय करते व्हांपे, मालूम?क्या बात है मस्त. हिंदीच्या दक्खनी बोलीभाषेत 'नको' सारखे काही मराठी शब्द येतात, तेही मला आवडतं, एक चांगली आठवण. लिहिते राहा या विषयावर. ''कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडापर अगर तुझको शक है मुझपर नहीं निकलूंगी बाहर मैं पानी को जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो'' सध्या वजन कितीय तुमचं ? आणि वय. गोष्टी खासगी आहेत, सांगितलं पाहिजे असे काही नाही. पण कुठून कुठे जायचं आहे म्हणून ही उत्सुकता. -दिलीप बिरुटे ( वजनदार) :)
In reply to अवांतर-सवांतर-हैदराबादी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या वजन कितीय तुमचं ? आणि वय. गोष्टी खासगी आहेत, सांगितलं पाहिजे असे काही नाही. पण कुठून कुठे जायचं आहे म्हणून ही उत्सुकता.उंची पाच फूट साडेसात इंच आहे. सध्याचे वजन ८३ किलो आहे. कोविड पूर्वी ७० ते ७२ किलो मध्ये असायचे. वय (धाग्यातून) -
मी सध्या ४६ वर्षीय शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा, निरोगी, तरुण पुरुष आहे.--- माझे उद्दिष्ट वजन कमी करणे हे नाही. म्हणजे, वजन कमी झाले तर त्याला काही हरकत नाही, पण खांदे पाडून चालतोय, खूपच रोड झालोय असे दिसणे आवडणार नाही. बांधेसूद दिसावे हा हेतू आहे.
In reply to उत्तम धागा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to थोडसं माझं सांगतो, by कांदा लिंबू
अतिचंद्रमनअतिचंक्रमन असे वाचावे.
In reply to थोडसं माझं सांगतो, by कांदा लिंबू
In reply to शक्यतो दर रविवारी दहा ते पंधरा किलोमीटर चालतो आहे. by कर्नलतपस्वी
शाम होते ही दो पटियाले लगते है। कभी कभार काजू कबाब सजते है। कुछ भी ना मिले तो जले हुये पापड भी चलते है।या ओळी भावल्या . यात पटियाले च्या ऐअवजी पुणेरी करता येणार नाहीत का ?
In reply to शक्यतो दर रविवारी दहा ते पंधरा किलोमीटर चालतो आहे. by कर्नलतपस्वी
In reply to वाह... बहोत खुब कर्नल साहब! by टर्मीनेटर
जीवनातील कुठल्याही क्षेत्रात शिस्त आणी सातत्य हाच मूलमंत्र.शतशः सहमत. दुर्दैवाने हे माझ्याबाबतीत फारसे होत नाहीय. अर्थात, काही बाबतीत मी अगदी शिस्त पाळतो. काही काळासाठी मांसाहार सोडला आहे आणि आता त्याकडे ढुंकूनही पाहत नाही.
सत्तरी उलटणार आहे पण आज भी खडी चम्मच चाय आणी पटियाला ऑन द राॅक्स चलता है.अभिनंदन. चहा वगळता बाकी तुमचा आदर्श ठेवावा म्हणतो! कर्नलतपस्वी व टर्मी भौ, कविता आवडल्या.
In reply to मी माझे वजन, साखर इ कधी मोजत by arunjoshi123
जीवनातील कुठल्याही क्षेत्रात शिस्त आणी सातत्य हाच मूलमंत्र.-- अगदी नेमके सांगितलेत. बाकी आता वजन कमी कसे करावे वगैरे विषयांवरील चर्विताचर्वण कंटाळवाणे वाटू लागले आहे. हल्ली सगळ्यांना सगळेच ठाऊक असते, (खरेतर गरजेपेक्षाही जास्तच) कायप्पा, तूनळीवर अशा माहितीचा भडिमार सुरु असतो. पण आपण स्वतः ते प्रत्यक्षात व्यवस्थितपणे करत रहाणे - (शिस्तशीर जीवन आणि प्रयत्नातले सातत्य) हे महत्वाचे.
तेव्हा डॉक्टरांनी लसीमुळे हे घडलं असंच सांगितलं होतं.लशीच्या दुष्परिणामाबद्दल कोणीतरी सुरुवातीपासून बोंबलंत होते. पण लक्षांत कोण घेतो. जणू लस हाच विषाणू आहे : https://misalpav.com/comment/1140773#comment-1140773 -नाठाळ नठ्या
In reply to अवांतर : घातक लस by नठ्यारा
In reply to माझ्या मित्राने नाही म्हणजे by Bhakti
"आपल्याला तर माहितीच आहे ना इम्युनिटी कशी वर्क करते ,मग या घाईघाईत बनवलेल्या लसीचे गिनीपिग कशाला व्हायचे?"अगदी अगदी... ह्याच विचारांतुन मी पण 'नाही म्हणजे नाहीच घेतली' ही लस! दोन डोस घेऊन झालेले कुटुंबातील अन्य तीन 'लसवंत' सदस्य आणि पुढे काहीच दिवसांच्या फरकाने 'लस न घेतलेला' मी बाधीत झाल्यावरच्या अनुभवाविषयी ‘ओमायक्रॅान’ हा धागाही मिपावर काढला होता. त्या आजारातुन बरे होण्यास मला बाकिच्या 'लसवंत' कुटुंबियांपेक्षा थोडा अधिक वेळ लागला होता आणि त्रासही त्यांच्यापेक्षा थोडा अधिक झाला होता एवढाच काय तो त्यांनी घेतलेल्या लसीचा फायदा मला तरी जाणवला! आणि हो, तुमच्या 'समविचारी' मित्राला माझा नमस्कार सांगा...
- रक्तदाब - ७०-१२० च्या मध्ये असणे
- रक्तसाखर - १००-१५० च्या मध्ये असणे
- स्पष्ट आवाज व उच्चार असणे
- स्पष्ट नजर असणे
- स्पष्ट ऐकू येणे
- दोन-पाच मजले चढले तर फारसा दम न लागणे
- तीस किलोचे तांदुळाचे पोते सहज उचलून नेता येणे
- स्त्रीची मासिक पाळी व्यवस्थित होणे
- भरपूर कामेच्छा व शक्ती असणे
- लघवी / शौचास साफ होणे
- पुरेशी भूक लागणे व जेवल्यावर तृप्त वाटणे
- शांत झोप लागणे, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटणे
- गरज पडल्यास दोनेक किलोमीटर न थांबता धावता येणे
- असे काही श्रम केल्यावर अल्प वेळात श्वास व हृदयगती सामान्य पातळीवर येणे
- एकूणच सुदृढ, सक्षम, उत्साही वाटणे
- इत्यादी
- हे निकष दर वर्षी / दर सहा महिने / दर तीन महिने / दर महिना वगैरे अंतराने पूर्ण करता येणे
In reply to आरोग्य-समृद्धी बद्धल माझे विचार - by वामन देशमुख
वाह. उत्तम.