खर्याखुर्या प्रेमासारखा
पाऊस तेव्हा दाटायचा
बरोब्बर सात जूनला
येवून तो भेटायचा....!!
अडचणी होत्या चिकार
सर्व दूर करायचा,
मन हुरहुरलं की
हात तो धरायचा ....!!
तेव्हाचा पाऊस खरा
खरा पाऊस वाटायचा,
प्रत्येकाच्या आठवांत
घर तो थाटायचा ....!!
लहान, थोर, वडीलधारे
आदर तो राखायचा,
सार्यांच्या चेहर्यावर
आनंद तो माखायचा....!!
रसायन, फवारे वगैरे
लाडावलेला नसायचा,
येरे येरे पावसाच्या
गाण्यालाही फसायचा....!!!!
प्रतिक्रिया
16 Jun 2015 - 3:38 pm | Jyoti Deshpande
chan jamali aahe kavita.........
kharach,
aachi paaus asach asayacha !!!!
17 Jun 2015 - 9:32 pm | पद्मावति
साधी सरळ. शेवटचा परिच्छेद तर सुरेखच.
18 Jun 2015 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा
@ रसायन ,फवारे वगैरे
लाडावलेला नसायचा,
येरे येरे पावसाच्या
गाण्यालाही फसायचा....!!!!>> ह्हे ह्हे ह्हे! हा साधेपणा आवडला.
18 Jun 2015 - 12:47 am | रुपी
आवडली.
बाकी लहानपणीपासून दुष्काळी भागातच आहे. काही वर्षांपूर्वी जिकडे राहायला आले तिथेही पाऊस कमी होत होत आता दुष्काळच आहे!
प्रत्येकाच्या आठवांत
घर तो थाटायचा ....!! >>> आठवांत म्हणजे काय?
19 Jun 2015 - 11:39 pm | गोल्या
आठवांत म्हणजे आठवणीत /मनात
18 Jun 2015 - 7:58 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली.
19 Jun 2015 - 7:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खर्याखुर्या प्रेमासारखा
पाऊस तेव्हा दाटायचा.
-दिलीप बिरुटे
19 Jun 2015 - 11:43 pm | गोल्या
हौसला अफजाई का शुक्रीया ।
21 Jun 2015 - 11:46 pm | वेल्लाभट
उत्तम ! जम्या है !