पुरुषांचं स्ट्रायव्हिंग हा जसा तमाम स्त्रीवर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच बायकांचं संसारींग हा पण आहे. पण याकडे तमाम स्री वर्ग जाणूनबुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत. महाभारतात नाही का, पाच पुरुष एकीशी लग्न करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या १००% स्त्रीयांना संसाराचे नियम हे दोन्हीकडून पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दीडदशकं मी सगळीकडे माझी बायको घेवून जातोयं (अर्थात माझं संसारींग हा विषय परत कधीतरी), आणि या दीड दशकात मला जे जाणवलं आहे तेच सांगतो आहे.
खरतरं लग्नाच्या ज्या अटी असतात त्या दोघांना सुरळीतपणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात. पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर नेमक्या वेळी मोडण्यासाठी असतात. यांना भलत्याच गोष्टींची एवढी घाई असते की त्या नवर्याचं प्रपोजल काय आहे याचा विचार न करता सरळ दुसराच विषय काढतात. विषय बदलत असताना धोक्याचा सिग्नल देणे, किंवा हातात हात घेऊन विचारपूस करणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता, पुढे काय वाढून ठेवलंय याचं नवर्यांना काही स्वप्न पडलेलं असतं का? की ही गेम बदलणार आहे म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातल्या काही दिव्यांगना संसार स्वत:च्या मालकी हक्काचा असल्यासारख्या वागतात. हळु बोलायचं तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मध्यरात्री किंवा मग एकदम काही डल्ला मारायच्या वेळी बोलतात. जशी यांना सावकाश बोलायला बंदीच केली आहे. तुम्ही कितीही सिग्नल द्या, यांना काहीही फरक पडत नाही. उपलब्ध सोयी आणि यांच्या डिमांडसमधे खंडीभर अंतर नक्कीच असतं.
सगळं सरळ होत असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात आळी-पाळीवाल्या, मूड-नाहीवाल्या पण आल्या. आपण दोन्ही बाजुच्या सुखाला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसतं. दोन्हीकडची सोय आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे नेमक्या वेळी भलत्याच विषयावर हुज्जत घालणे. अहो मान्य आहे आमचंही थोडं चुकलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण या गाडी जिथल्यातिथे थांबवणार. जरा म्हणून खाली उतरणार नाहीत आणि मागच्या प्रकरणांवरुन किंवा पुढच्या सुधारणांवरुन भांडत बसणार. यामुळे आपल्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी थांबून राहिल्या आहेत, आपण पुन्हा एकदा गैरसोय करुन ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. काम झाल्यावर मगं भांडाना अरे, कोण नाही म्हणतं? पण नाही, या तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात त्या, ज्यांना नातेवाईक आपल्यापुढे गेलेले चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर त्या संसार मोडतील, नवर्याला हार्ट-अॅटॅक देतील, पण त्या नातेवाईकांच्या गाडीच्या पुढे जातील.
मी असं नाही म्हणत आहे, पुरुष गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी बायकाच आहेत. तो हॉर्नसुद्धा वाजवत नसतांना इतका गोंधळ घालतात की तो बिचारा गोंधळून जातो.
वाचने
6200
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
पॉर्न????
हॉर्न म्हटलं असतं तर
In reply to पॉर्न???? by कपिलमुनी
भारी जनलय ...
बाप्रे !!!
पुढचा विषयः
अगदी खरं.
In reply to पुढचा विषयः by एस
अत्यंत विचारगर्भ धागा
यावरुनच घर `ओळंब्यात' नाही
In reply to अत्यंत विचारगर्भ धागा by चौकटराजा
अरारारा!
मस्तच...
आई गं
=)) कचकून सहमत
In reply to आई गं by दिपक.कुवेत
कशाला तक्रारी करताय पळा लवकर
बायकांचं संसारींग सुधारलं तर
In reply to कशाला तक्रारी करताय पळा लवकर by कंजूस
अच्छा हे कारण आहे तर भ्रमराच्या रुणझुणीचे
हॅ, हॅ, हॅ!!
In reply to अच्छा हे कारण आहे तर भ्रमराच्या रुणझुणीचे by लंबूटांग
हॅ, हॅ, हॅ!!
In reply to हॅ, हॅ, हॅ!! by संजय क्षीरसागर
ते विडंबन, प्रकाशित झालेल्या दुसर्या पोस्टला उत्तर आहे
In reply to हॅ, हॅ, हॅ!! by लंबूटांग
टुकार !
तुमच्या नाराजीचं कारण कळलं नाही, पण काही हरकत नाही.
In reply to टुकार ! by मदनबाण
+१
In reply to टुकार ! by मदनबाण
विडंबनाचा दर्जा कच्च्या मालावर अवलंबून असतो
In reply to +१ by मराठी कथालेखक