मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"बकेट लिस्ट "

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
"बकेट लिस्ट "हि कन्सेप्ट फसवी आहे का? आपला पगार उंची न बघता एखाद्य गोष्टीची अपेक्षा धरायची ती पूर्ण नाही झाली की बालटीत टाकायची अन म्हातारपणी रडत बसायचे

वाचने 10032 वाचनखूण प्रतिक्रिया 34

माईसाहेब कुरसूंदीकर 30/05/2018 - 14:39
काही प्रमाणात खरे आहे रे अवी. पूर्वीच्या मानाने गेल्या २० वर्षात नोकरी-व्यवसायाच्या संधी उपल्ब्ध आहेत व पैसाही बर्यापैकी मिळत आहे. त्यातून मग तीशी गाठायच्या आत फ्लॅट हवा. दर दोन वर्षानी परदेशवारी हवीच अशा अपेक्षा असणार्या मुली कमी नाहीत. मग मध्येच ते तुझे रिसेशन का काय येते व स्वप्नांना जरा ब्रेक लागल्यासारखे होते.. पण अपेक्षा मात्र खूप असतात समाजाकडून हल्लीच्या पिढीच्या.. अर्थात दोष त्यांचा नाही.. चंगळवादी शैली आपण आता स्वीकारली आहेच असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सचिन 30/05/2018 - 19:26
आपल्या पिढीला जे दुरापास्त होतं, ते नव्या पिढीला मिळत असेल तर तो चंगळवादीपणा कसा ? नव्या पिढीच्या समस्याही अनेक आहेत ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण ही पिढी हसतमुखाने त्यांच्याशी झुंजत आहे आणि आयुष्याची मजाही लुटत आहे. या "मिलेनिअल्स' मुलांनी साऱ्या जगाला चक्रावून सोडले आहे ... त्यांच्या वेगाने आणि सफाईदारपणाने !!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विजुभाऊ 01/06/2018 - 10:11
खरंय ग मायडे. तुझ्या काळातल्या व्याख्या आत्ताच्या काळात कशा चालतील. तेंव्हाचे चालत काठीला गाठोडे बांधून काशीयात्रेला जायचे. तुझे हे नाही का एकनाथांच्या सोबत जायचे म्हणत होतेच की पण दुसरे महायुद्ध का काय ते सुरू झाले आणि सगळे रेशनची दुकाने बंद पडली होती. काशीत क्षौर करायला देखील नाभीक उपलब्ध होत नव्हते. म्हणून त्यानी जाणे रद्द केले. असे ऐकीवात येते. आजच्या पिढीला नाभीक नसला तरी चालते . रेझर की काय म्हणतात ते वापरतात. पूर्वी ओलांडताना समुद्राच्या पाण्याचा स्पर्ष झाला की प्रायास्चीत घ्यावे लागायचे. रामायणात मात्र याचा उल्लेख केलेला नाहिय्ये. पुराणीकबुवाना विचारले होते मी. हल्ली विमानामुळे आणि पायतल्या बुटाम्मुळे समुद्रच काय पण पावसाच्या पाण्याचाही स्पर्ष होत नाही. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आणि काय बिघडले गो. परदेशात गेले म्हणून . असतात त्यांच्याकडे पैसे जातात ती. कामासाठी शिक्षणासाठी देश सोडणे याला चंगळ कसे म्हणायचे. कच पण गेलाअ होताच की विश्वामित्रांकडे. अर्थात त्याने तिकडे गेल्या नंतर गुरुभगीनी सोबत चंगळ केली ते वेगळे. बघ गो . माझे हे मत आहे. हीचे पण हेच मत आहे. ती म्हणते देखील घरी खोकत बसण्यापेक्षा पार्कात जाऊन बसा. तेवढीच तीला मोकळीक

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ 01/06/2018 - 11:42
कच पण गेला होताच की विश्वामित्रांकडे
या इथे विश्वामित्रांकडे या ऐवजी " शुक्राचार्य" असे वाचावे. हो उगाच वाचकांची पत्रे मधे भडिमार नको. ( लुना वाल्या ब्रम्हे काकांचा अनुभव आहे. त्यावरून बोध घेतो )

सतिश गावडे 30/05/2018 - 14:44
>> "बकेट लिस्ट "हि कन्सेप्ट फसवी आहे का? माहिती नाही >>आपला पगार उंची न बघता एखाद्य गोष्टीची अपेक्षा धरायची ती पूर्ण नाही झाली की बालटीत टाकायची अन म्हातारपणी रडत बसायचे मग काय करायचे म्हणता?

जूलिया 30/05/2018 - 15:18
"बकेट लिस्ट चा अर्थ कसा घेतो यावर अवलंबून आहे. स्वतःला शोधणे, 'to grow yourself'या साठी "बकेट लिस्ट असते. काहितरी नविन शिकण्यासाठी \ करण्यासाठी.............. fb update साध्य असेल तर माहित नाही.

नाखु 30/05/2018 - 15:21
खालून हमखास गळकी असावी, बकेट भरल्याचे दुःख नाही , शिल्लक राहण्याची खंत नाही!!!! खाली हाथ आये थे और खाली हाथ जायेंगे भरोसामंद नाखु पांढरपेशा

In reply to by नाखु

चांदणे संदीप 30/05/2018 - 16:37
खालून हमखास गळकी असावी,
नाखुकाका, बकेट लिस्टीची ही कन्सेप्ट जाम आवडली आपल्याला! Sandy

In reply to by नाखु

ज्ञानोबाचे पैजार 30/05/2018 - 17:01
हे जबरदस्त आवडले पैजारबुवा,

manguu@mail.com 30/05/2018 - 18:07
बरे झाले नाहीतर मराठीत काम करावे ही माधुरीचीही बकेट लिस्ट राहिली असती,

मराठी कथालेखक 30/05/2018 - 19:51
आपल्याला ज्या गोष्टींची खरंच मनापासून खूप विलक्षण आवड (इंग्लिशमध्ये पॅशन ) आहे तेच फक्त बकेट लिस्ट मध्ये असावं. उगाच शेजारचा जातोय परदेशवारीला म्हणून मलाही जायचंय असली उसनी उद्दिष्ट नसावीत. झालंच तर स्वतःच्या इच्छा पुर्ण करायची धडाडी स्वतःकडे असावी..इतरांवर विसंबून राहू नये, सहकार्याची अपेक्षा करणं ठीक आहे पण 'दूसरा कुणीतरी' आपली इच्छा पुर्ण करेल म्हणून झुरत बसू नये. जसे मध्यमवर्गातील नवर्‍याला परदेशवारी परवडत नाही म्हणून त्याच्यावर नाराज राहण्यापेक्षा बायकोने स्वतः हातपाय मारुन त्याकरिता लागणारे पैसे जमवावे असं मी म्हणेन.

डॉ सुहास म्हात्रे 30/05/2018 - 20:38
"बकेट लिस्ट" हे येरागबाळ्याचे काम नोहे. तेव्हा, जमेल त्यांनी ते धाडस करावे, जमत नाही त्यांनी त्याचा नाद सोडून सुखाने रहावे. उगाच "कोल्ह्याला दाक्षे आंबट" या नाटकाचा प्रयोग करण्याने स्वतःच्याच मनःस्थितीवर दुष्परिणाम होण्याचीच जास्त शक्यता आहे. :)

राजेंद्र मेहेंदळे 30/05/2018 - 20:54
बकेट लिस्ट असायला कोणाची काय हरकत आहे? निदान दहा गोष्टी ठरवल्या तर पाच तरी पुर्ण होतीलच की. जमले तर ठीकच, नाही जमले तर रडत बसु नये म्हणजे झाले.

प्रसाद गोडबोले 30/05/2018 - 21:47
बकेटलिस्ट हे आजच्या पिढीच्या भरकटलेपणाचे द्योतक आहे असे वाटते कधीकधी ! परपजलेसनेस चा धडधडीत पुरावा वाटतो ! स्वप्नं बघावीत , जरुर बघावीत पण त्याच्या आधी "हे का ? कशासाठी? " ह्या प्रश्नांची उत्तरे असली पाहिजेत. नुसते फेसबुकवर टाकायला ? की इन्स्टाग्रामवर टाकयला की युट्युबवर टाकायला ? कि चार जणांना सांगुन स्वतःचे कौतुक करुन घ्यायला ? आजकाल जो तो लेह लडाखच्या ट्रिप करतोय ? अन धडाधड फेसबुकात फोटो अन युटुबवर व्हिडिओ ! ते पाहुन इतर जणांच्या बकेटलिस्टीत अजुन वाढ ! अरे पण का कशा साठी हा व्याप ह्याचे उत्तर आहे का ? समजा उद्या अचानक मोबाईल, कॅमेरा , सोशलमिडीया, ब्लॉगिंग , इन्टरनेट बंद झाले , तुम्ही जे करताय ते कोणालच दाखवणे शक्य नाहीये अशी परिस्थीती आली तर तुम्ही हे सारे सव्यापसव्य कराल काय ? आणि सम्जा दुर्दैवाने नाहीच करु शकलात पुर्ण स्वप्ने , तर अपुर्णतेची टोचणी लाऊन उगाच चरफडत बसणार का ? ह्या सार्‍यांपेक्षा साधा उपाय आहे , बघा पटतो का , एक कर्तव्यांची लिस्ट करा : आपल्याला आपल्या कुटुंबाप्रती काही कर्तव्ये आहेत , आपल्या समाजाप्रती काही कर्तव्ये आहेत , आपल्या देशाप्रती काही कर्तव्ये आहेत आणि आपल्या धर्माप्रती काही कर्तव्ये आहेत ! ती मन लाऊन पुर्ण करा आणि मोकळे व्हा ! नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्याह्यो अकर्मणः | आता एकदा मोकळे झालात कि विचार करा एक स्वतंत्र कोणतेही कर्तव्य असे उरलेले नसलेला एक माणुस म्हणुन तुम्हाला काय करायला आवडेल ? काय आवडेल ही लिस्ट करा , काय करायचे आहे ही लिस्ट नको ! एकदा कर्जाची खते इंद्रायणीत बुडवली की मोकळे ! मग अभंग करा कि भंडार्‍यावर जाऊन एकांताचा आनंद घ्या ! संजीवन समाधी घ्या की सुखाने संसार करा , भारतभर मठ मारुतीची मंदिरे स्थापन करत फिरा कि काहीही उपद्व्याप न करता एखाद्या गावात नामस्मरणात दंग होवुन बसा! कर्तव्य असं काही नाही आणि इच्छा अशी काही उरलेलीच नाही अशी जी अवस्था आहे ती फार आनंदमय आहे, त्यानंतर काहीही करा अथवा करु नका , सारेच आनंदमय आहे . पण त्यासाठी आही बकेटलिस्टच ईंद्रायणीत बुडवावी लागेल ! कसल्याश्या निरर्थक गोष्टीत अडकलेले मन आधी मोकळं करावं लागेल ! इंद्रियांचिया संगति । जिये पसरु होतसे मति । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥ समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

manguu@mail.com 30/05/2018 - 23:04
सगळेच मोक्षाला गेले तर स्वर्गात गर्दी होईल की. भवसागरात तरंगायला कुणी नको का ? त्यांची पुस्तके वाचायला , त्यांच्या मठात फिरायला कुणी नको का ?

In reply to by manguu@mail.com

प्रसाद गोडबोले 31/05/2018 - 00:18
तुम्ही कुठला गांजा मारता ? धरमशाला हिमाचल इथला कि केरळचा ? कि उगाच आपला सांगली सोलापुर भागातला ? मोक्ष काय ? स्वर्ग काय ? भवसागर काय अन मठ काय ? उगाचच काहीही होय ? एकाचा एकाला ताळतंत्र नाही , अन मोक्ष झाल्यावर स्वर्गात जातात हे तुम्हआला कोणी सांगितलं =))))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले 01/06/2018 - 22:16
सपोर्ट बद्दल धन्यवाद सर :) आपला स्पष्ट मोटो आहे , लाजायचं नाही , बिनधास्त बोलायचं , एक घाव दोन तुकडे ! इथं कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या तुकारामांनीच म्हणले आहे - भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी|| :)

कपिलमुनी 31/05/2018 - 00:50
अकु ला जिलबी पाडल्यावर पुन्हा एकदा इकडे फिरकलेले बघायचे आहे , एकच बादली भर इच्छा आहे
हात्तिच्या, हेला म्हणत्यात व्हय बकेट लिस्ट. माह्या वाटलं दुसरं कायबाय असंन. दर्ररोज सक्काळी भर्रतो आन रिकामी करतो की वो आंगुळीच्या येळी.

गामा पैलवान 31/05/2018 - 12:51
मार्कस ऑरेलियस,
तुम्ही कुठला गांजा मारता ?
ते कुठलाही गांजा मारीत नाहीत. फक्त नशेचं सोंग घेतात. म्हणतात ना खरोखर झोपलेल्यास उठवता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्यास उठवता येत नाही. तशीच यांची नकली नशा कधीच उतरंत नाही. आ.न., -गा.पै.

शशिकांत ओक 02/06/2018 - 22:32
माधुरी उर्फ मधुरा चेहर्‍यावर वयस्कर दिसली. पण फिगर स्लिम ट्रिम थोडे मिसमॅच वाटले. नकटा सुमीत तिच्या समोर दिसायला कमी पडतो पण काम, गाणे म्हणणे यात भरपाई होते. मलेशियाच्या पार्श्वभूमीवरचे गाणे रंग दे मुझे गेरुवा ची आठवण करवतो. https://youtu.be/kELHQK-__Zw