नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
133900
प्रतिक्रिया
637
मिसळपाव
प्रतिक्रिया
करविभागातील पूर्व वरिष्ठ
विनोदी चित्रफीत. IPC 378
In reply to करविभागातील पूर्व वरिष्ठ by डॉ सुहास म्हात्रे
आयकरविभागाच्या एका वरिष्ठ
In reply to विनोदी चित्रफीत. IPC 378 by मार्मिक गोडसे
अजून एक मनोरंजक बातमी...
In reply to विनोदी चित्रफीत. IPC 378 by मार्मिक गोडसे
या माहितीवर एकदम भयाण शांतता
In reply to अजून एक मनोरंजक बातमी... by डॉ सुहास म्हात्रे
विष्णूबंधू गुप्ता : काही रत्ने
In reply to करविभागातील पूर्व वरिष्ठ by डॉ सुहास म्हात्रे
विडिओ बघाच
In reply to विष्णूबंधू गुप्ता : काही रत्ने by पिजा
तो बोलतोय ते १००% सत्यच आहे
In reply to विष्णूबंधू गुप्ता : काही रत्ने by पिजा
सर, अत्यंत हुकलेला माणूस आहे
In reply to करविभागातील पूर्व वरिष्ठ by डॉ सुहास म्हात्रे
सरकार आजपावेतो किती पैसे जमा
(अ) अजून ३० डिसेंबर २०१६ ही
In reply to सरकार आजपावेतो किती पैसे जमा by पुंबा
म्हात्रे काका, मी
In reply to (अ) अजून ३० डिसेंबर २०१६ ही by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या भावना समजू शकतो. पण,
In reply to म्हात्रे काका, मी by पुंबा
३१ तारखेचे आकडे अखेरचे नसून
In reply to म्हात्रे काका, मी by पुंबा
सरकार आजपावेतो किती पैसे जमा
In reply to सरकार आजपावेतो किती पैसे जमा by पुंबा
काळा पैसा केवळ नोटा आल्या
In reply to सरकार आजपावेतो किती पैसे जमा by पुंबा
+१००
In reply to काळा पैसा केवळ नोटा आल्या by अनुप ढेरे
पण ढेरेशास्त्री, बँकेत पैसे
In reply to काळा पैसा केवळ नोटा आल्या by अनुप ढेरे
बरोबर. सो यशापयश इन्कम
In reply to पण ढेरेशास्त्री, बँकेत पैसे by पुंबा
अर्र.. गायब झाला प्रतिसाद.
In reply to बरोबर. सो यशापयश इन्कम by अनुप ढेरे
पैसा बँकेत गेला म्हणजे तो
नोटाबंदी अयशस्वी झाली आहे असा अपप्रचार करत असलेल्यांसाठी काही खास बातम्या...
१. I-T dept’s black money cell flooded with calls, emails कोणाला काळाबाजारासंबंधी माहिती असल्यास ती सरकारला कळविण्यासाठीचा इमेल अॅड्रेस : blackmoneyinfo@incometax.gov.in २. Cashless means less cash, not no cash: Arun Jaitley ३. Demonetisation not last action against corruption: NITI Ayog chief hints at more schemes ४. People who were claiming that demonetization will not lead to any effective action against black money, should keep track of their claims’ laughable futility in the following continuously updated blog…आणि नवीन वर्षानिमित्त येणार्या महत्वाच्या सुवार्तांपैकी पहिली !!!
Law against 'benami' properties to be operationalised soon: PM Modi "अजून पुढे काय करणार, अजून पुढे काय करणार ?" असे विचारणार्यांना त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे एक एक करत मिळत जातील असे दिसू लागले आहे ;) :)अरे..
In reply to पैसा बँकेत गेला म्हणजे तो by डॉ सुहास म्हात्रे
४९ दिवस झाले
नाही मिळाले तरी चालतील ..
In reply to ४९ दिवस झाले by कपिलमुनी
एकीकडे म्हणतात नोटाबंदीमुळे
In reply to नाही मिळाले तरी चालतील .. by चौकटराजा
भूतपूर्व प्लॅनिंग कमिशन मेंबर
नोटाबंदीमुळे बॅकांमध्ये जमा
नोटबंदी व सरकारच्या बाजूने
In reply to नोटाबंदीमुळे बॅकांमध्ये जमा by मार्मिक गोडसे
नरेंद्र जाधवांचे विचार
In reply to नोटबंदी व सरकारच्या बाजूने by संदीप डांगे
आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर
In reply to नोटबंदी व सरकारच्या बाजूने by संदीप डांगे
या प्रतिसादाचे उत्तर खुद्द
In reply to आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर by डॉ सुहास म्हात्रे
नोटबंदी आत्ताच कशाप्रकारे करणे गरजेचे
In reply to या प्रतिसादाचे उत्तर खुद्द by संदीप डांगे
व्हिक्टीम कार्ड कि काय ते
In reply to नोटबंदी व सरकारच्या बाजूने by संदीप डांगे
एक्झॅक्टली.. हा पैसा जो जमा
In reply to नोटाबंदीमुळे बॅकांमध्ये जमा by मार्मिक गोडसे
सौरा जी,
In reply to एक्झॅक्टली.. हा पैसा जो जमा by पुंबा
मान्य. लोकांनी, मोदींच्या
In reply to सौरा जी, by विशुमित
जर खरंच कायदा सुव्यवस्थेचा
In reply to सौरा जी, by विशुमित
आतापर्यंतचं जाऊ द्या, पण
In reply to जर खरंच कायदा सुव्यवस्थेचा by हतोळकरांचा प्रसाद
होऊ शकतोच कि, नाकारण्यासारखं
In reply to आतापर्यंतचं जाऊ द्या, पण by पुंबा
परिस्थिती बिघडलेली होती असे
In reply to होऊ शकतोच कि, नाकारण्यासारखं by हतोळकरांचा प्रसाद
अर्थ स्पष्ट आहे (म्हणजे
In reply to परिस्थिती बिघडलेली होती असे by संदीप डांगे
चला, जास्त त्रासाची परिस्थिती
In reply to अर्थ स्पष्ट आहे (म्हणजे by हतोळकरांचा प्रसाद
परत तेच! तुम्ही तुम्हाला हवा
In reply to चला, जास्त त्रासाची परिस्थिती by संदीप डांगे
मला काहीही अर्थ काढायचे नाहीत
In reply to परत तेच! तुम्ही तुम्हाला हवा by हतोळकरांचा प्रसाद
हसण्याशिवाय काही करू शकत नाही
In reply to मला काहीही अर्थ काढायचे नाहीत by संदीप डांगे
हसण्यावारी नेल्याबद्दल
In reply to हसण्याशिवाय काही करू शकत नाही by हतोळकरांचा प्रसाद
त्याबाबतीत निश्चिन्त रहा हो
In reply to हसण्यावारी नेल्याबद्दल by संदीप डांगे
२ आठवड्या पूर्वी इंदापूरच्या
In reply to जर खरंच कायदा सुव्यवस्थेचा by हतोळकरांचा प्रसाद
अहो इंदापूरच कशाला अजूनही
In reply to २ आठवड्या पूर्वी इंदापूरच्या by विशुमित
जनता मोदींच्या पाठी ५०
In reply to अहो इंदापूरच कशाला अजूनही by हतोळकरांचा प्रसाद
हो नक्की वाढवतो! काय करणार
In reply to जनता मोदींच्या पाठी ५० by विशुमित
अन जर त्यांना पैसे
In reply to सौरा जी, by विशुमित
गावच्या कट्ट्यावरील गप्पा तुन
In reply to अन जर त्यांना पैसे by अनुप ढेरे
ओ साहेब, इथे फक्त घरच्या
In reply to गावच्या कट्ट्यावरील गप्पा तुन by विशुमित
व्हिक्टीम कार्ड कि काय ते
In reply to ओ साहेब, इथे फक्त घरच्या by संदीप डांगे
कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ
दुखने काय आहे नक्की ?
In reply to कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ by मार्मिक गोडसे
=)) =))
In reply to कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ by मार्मिक गोडसे
जनतेला ठरवूद्या की.
In reply to कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ by मार्मिक गोडसे
जाऊंद्या साहेब. झोपी
In reply to जनतेला ठरवूद्या की. by lakhu risbud
नशीब भाजपाला यश मिळाले.
In reply to जाऊंद्या साहेब. झोपी by डॉ सुहास म्हात्रे
<<<<ज्यांना नुकत्याच
In reply to जाऊंद्या साहेब. झोपी by डॉ सुहास म्हात्रे
एक्झॅक्टली! खरतर भाजप परभूत
In reply to <<<<ज्यांना नुकत्याच by विशुमित
<<<खरतर भाजप परभूत झाला असता
In reply to एक्झॅक्टली! खरतर भाजप परभूत by हतोळकरांचा प्रसाद
>>
In reply to <<<खरतर भाजप परभूत झाला असता by विशुमित
खरतर भाजप परभूत झाला असता तर हेच समीकरण सरसकट लावलं असतं का हा कळीचा मुद्दा आहे! -- हो त्याला वाव होता कारण immediate इफेक्ट मानला गेला असता.आपण विश्लेषण चष्मा लावून करत असल्याचे खुल्या संस्थळावर स्पष्टपणे कबूल केल्याबद्दल अनेकानेक आभार ! (हल्ली असा प्रामाणिक स्पष्टवक्तेपणा विरळ झाला आहे) :) ;)माझ्या डोळ्या चा नंबर अजून ही
In reply to >> by डॉ सुहास म्हात्रे
प्रतीसादांचे अर्धसहस्त्रक
राजकिय चर्चांचे कधी फलित निघत
In reply to प्रतीसादांचे अर्धसहस्त्रक by पुंबा
करेक्ट. कारण एखादी बाजू
In reply to राजकिय चर्चांचे कधी फलित निघत by संदीप डांगे
नोटाबंदीनंतर आता ५० दिवसांची
नोटाबंदीचा मूळ उद्येश
डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट
In reply to नोटाबंदीचा मूळ उद्येश by डॉ सुहास म्हात्रे
बघुया ! आता किती समजावले तरी
In reply to डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट by विशुमित
Rs 4 lakh crore of cash
नोटाबंदीविरोधात मोर्चा
In reply to Rs 4 lakh crore of cash by डॉ सुहास म्हात्रे
Central Statistics Office
<<<"नेहमीच्याच यशस्वी जागतिक
In reply to Central Statistics Office by डॉ सुहास म्हात्रे
भारताचे कल्याण झाले पाहिजे
In reply to <<<"नेहमीच्याच यशस्वी जागतिक by विशुमित
भारताचे कल्याण झाले पाहिजे कोणी करेल त्याला माझ्या लेखी महत्व आहे.याला +१००,००० ही विचारसरणी बहुसंख्य (बहुसंख्य, कारण सगळे तसे करणे शक्य नाही ही वस्तूस्थिती आहे, दुर्दैवाने) लोकांनी प्रामाणिकपणे कृतीत आणली तर भारताला खरेच उत्तम भवितव्य आहे, यात वाद नाही. (या वाक्यातला ठळक भाग कळीचा मुद्दा आहे.)"नेहमीच्याच यशस्वी जागतिक अर्थतज्ज्ञांच्या" भाषणांच्या "राजकिय लेखकांना" या आकड्यांतील "(नेहमीप्रमाणेच नसलेली) खोट शोधून काढायला (पक्षी : मॅन्युफॅक्चर करायला )" अजून तरी जमलेले दिसत नाही :)पर्वताएवढी नकारात्मक टीका करायला आपल्या राजकारण्यांना राई हाती येण्याची वाट पहायची गरज नसते. सत्याचा विपर्यास करून किंवा अगदी कल्पनेतूनही राई तयार करून तिचा पर्वत बनवण्याच्या कलेत ते तरबेज आहेत हे वारंवार दिसते. त्याचबरोबर, गैरसोईच्या मुद्द्यांचा डोळ्यासमोर असलेला पर्वत आस्तित्वातच नाही असे ठामपणे सांगून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे ही कला तर त्यांच्याकडे जन्मजात आहे असेच दिसते ! या पार्श्वभूमीचा विचार करून ते वाक्य लिहिलेले आहे.प्रामाणिकपणे कृतीत आणली तर
In reply to भारताचे कल्याण झाले पाहिजे by डॉ सुहास म्हात्रे
पोस्ट ट्रुथ इकॉनॉमिक्स
In reply to भारताचे कल्याण झाले पाहिजे by डॉ सुहास म्हात्रे
परत तीच टेप लावतो.
In reply to Central Statistics Office by डॉ सुहास म्हात्रे
जी उद्दिष्ट्ये मनात धरून
In reply to परत तीच टेप लावतो. by पुंबा
-२% जीडीपीच्या नाचवलेल्या
In reply to जी उद्दिष्ट्ये मनात धरून by मार्मिक गोडसे
घाई करताय
In reply to -२% जीडीपीच्या नाचवलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
डीमॉनेटायझनचे ५० दिवस
In reply to घाई करताय by मार्मिक गोडसे
काढायलासुचायला ?! =)) =)) =)) ते विनोद वाचायची नक्कीच घाई झाली आहे :)अति घाई कोठे नेई ???
In reply to डीमॉनेटायझनचे ५० दिवस by डॉ सुहास म्हात्रे
साहेब, मूळ मुद्दाच तुमच्या
In reply to अति घाई कोठे नेई ??? by विशुमित
तुम्ही प्रतिसाद गोलगोल
In reply to साहेब, मूळ मुद्दाच तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य मुद्दे...
In reply to तुम्ही प्रतिसाद गोलगोल by विशुमित
मनमोहन सिंगांनी केलेला दावा
In reply to मुख्य मुद्दे... by डॉ सुहास म्हात्रे
हीच स्टँडर्ड पद्धत आहे.
In reply to मनमोहन सिंगांनी केलेला दावा by विशुमित
(मी फक्त "घाई" हा शब्द वापरला
In reply to मनमोहन सिंगांनी केलेला दावा by विशुमित
(मी फक्त "घाई" हा शब्द वापरला असताना " 'घिसाड'घाई " हा शब्द एवढे उतेजीत होऊन वापरण्याचे प्रयोजन नाही समजले. सिनियर लोकांना प्रश्न विचारलेले आणि एक ठराविक पक्षाप्रतीच्या प्रामाणिकपणा बद्दल शंका उपस्थित केल्याचे आवडत नसावे, बहुदा..!!)http://www.misalpav.com/comment/923175#comment-923175 इथे विशुमत या आयडीनेघिसाडघाईने कोणी अतिशयोक्त उदाहरणे आहेत, हे कळू शकेल का?हा मजकूर कोणी लिहिला ???!!! तो तुम्ही लिहिला नसल्यास समस्या आहे व आयडी हॅक झाल्याचे प्रशासनाला कळवावे. ;) (हघ्या) असो. मुळात घिसाडघाईने तुम्ही दावे केले असे मी कोठेच म्हटलेले नाही. तशी घिसाडघाई करणार्या तज्ज्ञ व तथाकथित तज्ञांना उद्येशून तो शब्द होता आणि त्याच्या पुराव्याखातर मी तुमच्या मागणीवरूनच दोन जागतिक किर्तीच्या अर्थज्ज्ञांनी ५० दिवसाची मुदत संपण्याच्या बर्याच आधी केलेले व केवळ कल्पनेवर आधारीत असलेले दावे दिले आहेत. ते घिसाडघाईने केलेले दावे अर्थकारणाने नव्हे तर राजकारणाने प्रेरीत होते हे मी आधिही म्हटले आहे आणि आजही माझे तेच मत आहे. हे पाहता, तुम्ही तो शब्द स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याचे कारण समजले नाही ! मुख्य म्हणजे माझ्या कोणत्याच प्रतिसादातले कोणतेच वाक्य कोणत्याच एका मिपाकराला उद्येशून नाही... तो शब्द सर्वच भारतिय (व सद्या नोटबंदीचा विषय असल्याने विरोधी पक्षातील) राजकारण्यांसाठी सामायीकपणे लागू होतो आणि हे काही मीच पहिल्यांदा सांगत आहे असेही नाही. सर्वसामान्य नागरीकासाठीही ते गुपित नाही, याबद्दल तुम्ही सहमत असाल असा माझा अंदाज आहे. खाली एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, माझे मत असे आहे...वेळ घेऊन, तथ्ये तपासून, विचारपूर्वक मत देण्याची पद्धतिची तुम्ही पाठराखण करता आहात हे स्वागतार्ह आहे. धन्यवाद ! माझेही तेच मत आहे. माझ्या मूळ प्रतिसादातला एक महत्वाचा मुद्दा, "विरोधकांकडून तसे पूर्वी झाले नव्हते व बर्याचदा होत नाही", असाच आहे :) फक्त आपल्याला सोईचे असेल तेव्हाच ते तत्व वापरावे, गैरसोईचे असले तर विसरावे, हे चुकीचे होईल, नाही का ?बाजू अंगावर आली की मुद्दा टाळणे हे भारतिय राजकारणात आश्चर्याचे नाही. तरीही, जर "पूर्ण माहिती घेऊन मगच विचारपूर्वक टीका करू" या विचाराने विरोधी पक्ष आता गप्प असले तर, जरी ते वागणे त्यांच्या भूतकाळाशी विसंगत असले तरीही, स्वागतार्हच आहे. त्या निमित्ताने भारतिय लोकशाही एक पाऊल पुढे गेली असे म्हणता येईल. आणि त्यामुळे मला आनंद व अभिमानच वाटेल. असो. गैरसमज सोडून इथेच थांबूया. यासंबंधी अजून काही नवीन आकडे-तथ्ये बाहेर आली तर परत चर्चा करूच. कसे ?ते थांबले नाही तर मी ही
In reply to मुख्य मुद्दे... by डॉ सुहास म्हात्रे
रिज़र्व बॆंकेच्या नोटा मोजून
In reply to डीमॉनेटायझनचे ५० दिवस by डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
In reply to रिज़र्व बॆंकेच्या नोटा मोजून by नितिन थत्ते
अजून किती महिने लागणार आहेत
In reply to डीमॉनेटायझनचे ५० दिवस by डॉ सुहास म्हात्रे
त्या छोटाश्या धाग्यात मुख्यतः
In reply to अजून किती महिने लागणार आहेत by मार्मिक गोडसे
...अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही सुरवात असून एका वर्षात असंघटित क्षेत्रासह संघटित क्षेत्राचीही संपूर्ण माहिती, आकडेवारीतून जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनीच खाली जाण्याचा अंदाज आहे.आणिआता मात्र त्यांच्यातही केंद्र सरकार हस्तक्षेप करून आपल्या सोयीनुसार आकड्यांचा खेळ करीत असल्याचे दिसते. त्यामुळेच सरकारी आकडेवारीत नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करणे, तुलना करताना मागील विकासदर मुद्दाम कमी दाखविणे, असंघटित क्षेत्राची आकडेवारी लपविणे असे आरोप राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय बॅंकिंक क्षेत्रातून केले जात आहेत, याचीही गांभीर्याने नोंद केंद्र सरकारने घ्यायला हवी. शेवटी हा सरकार आणि देशाच्याही विश्वासार्हततेचा प्रश्न आहे.१. असे मोघम आरोप करताना संबंधात काही सबळ पुरावे दिले असते तर त्या छोट्याशा लेखाला जरा तरी विश्वासार्हता आली असती. आता तरी तसे म्हणता येत नाही. २. "...केंद्र सरकार हस्तक्षेप करून आपल्या सोयीनुसार आकड्यांचा खेळ करीत असल्याचे दिसते." अशी सुरुवात करून त्यानंतरच्या वाक्यात "याचीही गांभीर्याने नोंद केंद्र सरकारने घ्यायला हवी." असे म्हटले आहे. "सरकार घोळ करत आहे याची सरकारनेच नोंद घ्यावी" म्हणजे नक्की काय म्हणायचेय ?! :) त्याऐवजी, गैरप्रकार झाल्याचे पुरावे सादर करून ते थांबविण्याचा सरकारवर दबाव आणणे अपेक्षित होते. ३. वर उद्धृत केलेल्या आरोपांपैकी दुसर्या वचनामधिल "तुलना करताना मागील विकासदर मुद्दाम कमी दाखविणे" हा पुराव्याविना केलेला दावा/आरोप तर मी मूळ प्रतिसादात दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्राच्या संदर्भदुव्यातील मजकूरावरून धडधडीत असत्य दिसत आहे. त्या दुव्यात, "The Central Statistics Office (CSO) ने जीडीपी मोजताना... The growth rate was on a higher base after the CSO revised 2015-16 GDP growth rate to 7.9 per cent from the earlier provisional estimate of 7.6 per cent" असे स्पष्ट लिहिले आहे. म्हणजेच, जीडीपीचा वाढदर मोजताना सन २०१५-१६ चा अंदाजे (प्रोव्हिजनल) ७.६% हा दर न वापरता त्याऐवजी नवीन आकडे हाती आल्यानंतर वाढलेला ७.९% हा दर वापरलेला आहे. हे पाहिल्यावर तर मग बाकीच्या मोघम आरोपांचीही विश्वसनियता अजूनच कमी झाली आहे.अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही
In reply to त्या छोटाश्या धाग्यात मुख्यतः by डॉ सुहास म्हात्रे
अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही सुरवात असून एका वर्षात असंघटित क्षेत्रासह संघटित क्षेत्राचीही संपूर्ण माहिती, आकडेवारीतून जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनीच खाली जाण्याचा अंदाज आहे.मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकतो. पण, सद्याच्या गरमागरमीच्या वातावरणात ते मी माझ्याजवळच ठेवून "वेट अँड वॉच" पॉलिसी स्वीकारली आहे.मी माझ्या अल्पमतीप्रमाणे
In reply to अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही by मार्मिक गोडसे
मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकतो. पण, सद्याच्या गरमागरमीच्या वातावरणात ते मी माझ्याजवळच ठेवून "वेट अँड वॉच" पॉलिसी स्वीकारली आहे.सहमत. ही उत्तम पॉलिसी आहे. डिमॉनेटायनचे सर्व परिणाम प्रत्यक्षात दिसायला आणि त्यामुळे अर्थकारणावर झालेले तातपुरते नकारात्मक आणि दीर्घकालिन सकारात्मक बदल आकड्यांत दिसायला २ ते ४ तिमाह्या जातील असे तर अनेक समतोल विश्लेषक पहिल्यापासून बोलत आहेत. माध्यमे टीआरपी खेचण्यासाठी "भडक-आकर्षक" गोष्टी चढाओढीने प्रसिद्ध करत असतात. त्यामुळे, समतोल विश्लेषकांच्या शांत शैलीपेक्षा राजकिय गदारोळ नेहमीच नको तेवढा भाव खाऊन जातो. :) मात्र, आकड्यांनी सिद्ध केलेल्या जीडीपीसारख्या पुराव्यांचे महत्व त्यामुळे कमी होत नाही. यावेळेस जीडीपीत फार मोठी घट आली असती किंवा त्याच्या मोजणीत काही गडबड असल्याचा संशय घेण्याजोगी जागा असती तर विरोधी पक्ष तिकडे दुर्लक्ष न करता सरकारवर हिरीरीने तुटून पडले असते, हे सांगायला फार मोठा अर्थतज्ज्ञ किंवा राजकारणी विश्लेषक असण्याची गरज नाही, नाही का ? :)>>अर्थकारणावर झालेले तातपुरते
In reply to मी माझ्या अल्पमतीप्रमाणे by डॉ सुहास म्हात्रे
हा नेहमीप्रमाणे तुम्ही विनोदी
In reply to >>अर्थकारणावर झालेले तातपुरते by नितिन थत्ते
जीडीपी
In reply to हा नेहमीप्रमाणे तुम्ही विनोदी by डॉ सुहास म्हात्रे
प्री-एम्प्ट
In reply to जीडीपी by नितिन थत्ते
थत्तेकाका, तुम्ही तज्ज्ञ आहात
In reply to जीडीपी by नितिन थत्ते
म्हणजे काही स्पष्टीकरण नाही
In reply to थत्तेकाका, तुम्ही तज्ज्ञ आहात by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही नेहमी स्पष्टीकरणे देत
In reply to म्हणजे काही स्पष्टीकरण नाही by नितिन थत्ते
अन्यथा आलूची फॅक्टरी आहेच.. !
In reply to तुम्ही नेहमी स्पष्टीकरणे देत by मोदक
शहजादे साहेब नक्की "नारीयलका
In reply to अन्यथा आलूची फॅक्टरी आहेच.. ! by सचु कुळकर्णी
राहुल गांधी असे काहीही
In reply to शहजादे साहेब नक्की "नारीयलका by मोदक
चारसभांमधील मोदी मला
In reply to राहुल गांधी असे काहीही by हतोळकरांचा प्रसाद
थत्ते काका , किती वेळ
In reply to म्हणजे काही स्पष्टीकरण नाही by नितिन थत्ते
३. वर उद्धृत केलेल्या
In reply to त्या छोटाश्या धाग्यात मुख्यतः by डॉ सुहास म्हात्रे
पूर्वी काळ्या पैशानी ही
In reply to ३. वर उद्धृत केलेल्या by मार्मिक गोडसे
पूर्वी काळ्या पैशानी ही विक्री होत होती तर जीडीपीत त्याने वाढ कशी व्हायची? ह्याचा अर्थ काळ्या पैशाच्या खरेदी विक्रीमुळे सरकारचा महसूल बुडत नव्ह्ता. मग नोटाबंदी कशासाठी केली. त्यांची ती सूज आणि आता झाली ती वाढ?आता दिसणारी जीडीपीतील अपेक्षेपेक्षा कमी तूट होण्यामागे अभूतपुर्व करसंकलन व उत्तम खरीपाच्या उत्पन्नाचे खात्रीने हाती आलेले आकडे आहेत, हे मी पूर्वीच्या एका प्रतिसादांत लिहिले होते... त्याला काहींनी आक्षेप घेतला होता. पण ते असोच. उत्तम करसंकलन हे कारण पुढच्या तिमाहीत लक्षणीयरित्या (कारण चवथ्या तिमाहित सर्वात जास्त करसंकलन होते, यावेळेस तर खूप मोठे मासे गळाला लागलेले आहेत) व त्यानंतर कायमस्वरूपी (कारण एकदा करव्यवस्थेत आल्यावर संपूर्ण करमुक्तता दाखवणे सोपे नाही) जीडीपी वर नेण्यास, तेवढेच किंवा कांकणभार जास्तच मदत करेल; असे माझे मत आहे. बँकांत आणि सरकारच्या हाती खेळणार्या पैश्याचा विनियोग पायाभूत सुविधा आणि संसाधन उभे करण्यात होईल व त्यामुळे व्यापार-उद्योगधंदे-रोजगार यांना चालना मिळेल. अर्थातच त्याचेही अनेक सकारत्मक रिपल इफेक्ट्स सपोर्टींग /सप्लाइंग उद्योगांवर होतात. हे सर्वच घटक जीडीपी वाढीस मदत करतात. मात्र, ही जीडीपीतील (वैध कृतींनी झालेली) वाढ असेल, (काळ्या पैश्यांचा सहभाग असलेल्या कृतींनी आलेली) सूज नाही. हा फरक अर्थव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे ! *************** महसूल प्रक्रियेसंबंधीचा तुमचा प्रश्न लहान आहे पण वास्तव व त्यावर अवलम्बून असलेले उत्तर किचकट आहे. ते समजायला ती प्रक्रिया जराश्या खोलात जाऊन पहायला पाहिजे. समजा कॅशमध्ये गाडी/जमीन/फ्लॅट विकत घेणारा काळा पैसा वापरत आहे... १. विकणार्याच्या कृतीचे परिणाम : अ) विकणारा 'नोंदणीकृत संस्था (कंपनी)' असल्यास : कंपनीला त्यांच्या विक्रीतून आलेला सर्व (कॅश/चेकने आलेला) पैसा त्यांचे उत्पन्नच दाखवणे भाग असते. तेव्हा त्यांना काळा पैसा निर्माण करणे शक्य नाही. म्हणजे जेवढी विक्रिची किंमत तेवढी सर्व जीडीपीत सामील होऊन तिची वाढ होते... त्यातील काळ्या पैशाच्या भागामुळे होणार्या वाढीला ती बेकायदेशीर कृतीने झालेली असल्याने वाढ न म्हणता सूज म्हणतात. कारण इथे ती वाढ दिसत असली तरी तिने इतर ठिकाणी (यापुढे ठळक केलेल्या शब्दांत दाखविल्याप्रमाणे) बेकायदेशीररित्या सरकारी उत्पन्न बुडवलेले असते. आ) विकणारा 'व्यक्ती' असल्यास : कॅशची देवाणघेवाण होऊन एकाकडचा काळा पैसा दुसर्याच्या हाती जाईल... म्हणजे देणार्याने पूर्वी त्यावरचा आयकर चुकवला होता आणि आता विकणारा त्याचे उत्पन्न लपवून आयकर चुकवेल, म्हणजे सरकारचा दुहेरी तोटा झाला. २. विकत घेणार्याच्या कृतीचे परिणाम : नोंदणीकृत कंपनीकडून विकत घेणारा जर सर्व किंवा काही प्रमाणात काळा पैसा वापरत असेल तर... ते शोधून काढणे व सिद्ध करणे, करविभागाने पुरावे जमा करून, जप्ती आणून, "त्याच्याकडे ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती आहे", हे सिद्ध केल्याशिवाय (उदा: जयललिता प्रकरण) शक्य नसते. ही प्रक्रिया किती किचकट व म्हणूनच विरळा आहे ते सांगायला नकोच. या प्रकारात, त्या विकत घेणार्याने त्याच्या काळ्या पैश्याच्या प्रमाणात सरकारकडे त्याने भरायला हवा होता तो आयकर भरला नाही (ज्यामुळे तो पैसा काळा आहे असे आपण म्हणतो), तेवढेसरकारचे उत्पन्न बुडाले. ३. सरकारी विक्रिकर, रजिस्ट्रेशन फी, इत्यादीवर होणारा परिणाम : अ) जेव्हा जेव्हा विक्रीचे मुल्य कमी दाखवले जाते (जमीन/फ्लॅट व्यवहारंत) तेव्हा लपवलेल्या किमतीच्या प्रमाणात सरकारी कर बुडवला जातो. आ) नोंदणीकृत संस्थांकडून विकत घेतलेल्या गाड्यांच्या संबंधातले कर चुकवणे कठीण असते. यावरून सहज ध्यानात येईल की कॅशच्या व्यवहारांत गाड्या विकणार्या नोंदणीकृत संस्था सोडून इतरांना काळा पैसा तयार करणे व फिरवत ठेवणे आणि त्यामधून सरकारी कर चुकवणे (म्हणजे पर्यायाने तुमचे आमचेच नुकसान करणे) सहज शक्य होते. नवीन कायद्यांमुळे कॅश व्यवहारांवर येणार्या सीमांमुळे हे बहुतांश टाळता येणे शक्य होईल. त्यामुळे, जो काही जीडीपीचा आकडा असेल तो निरोगी अर्थव्यवस्थेचे लक्षण. आता, कॅश व्यवहारांवर बंधने आल्याने काळा पैसा वापरता न आल्याने विशेषतः चैनीच्या (लक्झरी) वस्तूंची (उदा: महागड्या गाड्या/जमिनी/करोडोंच्या किमतींचे फ्लॅट्स/इ) खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीडीपी कमी होईल. त्यावरचा उपाय म्हणून सरकारने काही योजना अगोदरच जाहीर केल्या आहेत : १. कमी किमतीच्या घरांच्यावर व्याजदरात सूट. २. बँकांच्या सर्वसाधारण करांचे दर खाली आणणे, इ नंतर अजून अनेक उपाय येण्याची शक्यता आहे. याने खाली दिल्याप्रमाने निरोगी जीडीपी वाढीला मदत होईलच, बहुसंख्य जनतेच्या जनतेच्या जीवनमानावर सकारत्मक परिणाम होतील... १. कमी / तुलनेने कमी किमतीच्या घरांची/गाड्यांची जरूर असलेल्या लोकांची संख्या लाखांत/करोडोत आहे. त्यांना घर/गाडी घेणे सुलभ झाले तर त्यांच्यामुळे झालेली जीडीपीतली वाढ लक्षणीय आणि मुख्य म्हणजे निरोगी वाढ असेल. मोजक्या संखेत विकल्या जाणार्या लक्झरी वस्तूंच्या विक्रितून आलेल्या सूजेला ती नजिकच्या काळात ओलांडेल असे आडाखे आहेत. २. सर्वसामान्यांच्या वाढलेल्या (घर/गाडी, इ) मागणीमुळे, त्या वस्तू तयार करणार्या उद्योगांना चालना मिळेल. अर्थात त्यातले रोजगार वाढतील. याला रिपल इफेक्ट्स म्हणतात. ३. मुख्य म्हणजे, या सर्व कारवाईमुळे आवश्यक गरजा सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात येण्यास मदत होईल... जे कोणत्याही जनताभिमुख सरकारचे प्रथम कर्तव्य असते. विषय किचकट आणि अनेक एकमेकात गुंतलेल्या कृती-परिणामांचा आहे. थोडक्यात सगळे सांगणे शक्य नाहीच. जेवढे सोपे करून आणि कमी शब्दांत *************** जीडीपी वाढ आणि सूज यामुळे जनतेवर होणार्या परिणामांतला कळीचा फरक : वैध कृतींमुळे जीडीपीमध्ये झालेली वाढ, आपल्या बरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर सकारत्मक फरक घडवून आणते... त्याविरुद्ध अवैध कृतींमुळे जीडीपीमध्ये आलेली सूज, बलस्थानांशी संबंधीत मोजक्या लोकांच्या हितसंबधांमध्ये वाढ करत राहते. *************** येत्या वर्षभरात प्रत्यक्ष परिणाम पुढे पुढे येत जातील आणि मग इतर गोष्टी स्पष्ट करून सांगायची गरज उरणार नाही असा माझा अंदाज आहे. त्यामुळे, आता इतकेच पुरे.(चच्चा मोड ऑन)
In reply to पूर्वी काळ्या पैशानी ही by डॉ सुहास म्हात्रे
येथे चच्चा म्हणजे माझ्याकडे
In reply to (चच्चा मोड ऑन) by मोदक
:)
In reply to येथे चच्चा म्हणजे माझ्याकडे by नितिन थत्ते
नोटाबंदीमुळे ह्या असंघटीत
In reply to पूर्वी काळ्या पैशानी ही by डॉ सुहास म्हात्रे
नोटाबंदीमुळे ह्या असंघटीत क्षेत्राला फटका बसल्यामुळे जीडीपीत घट होणार नाही का?१. हा फटका बसला यात वाद नाही पण तो विरोधकांनी केलेल्या दाव्यांइतका भयानक वगैरे नव्हता. कारण... अ) या क्षेत्रातल्या लोकांना निषेधमोर्चांत आणणे तुलनेने फार सोपे असते. विरोधकांच्या कसोशिच्या प्रयत्नांनंतरही त्यांना ते करणे जमले नाही. आ) नोटाबंदीनंतरचे निवडणूकींचे निर्णय. गाजावाजा केला गेला तेवढा लोकक्षोभ असता तर भाजप आतापर्यंत गारद व्हायला हवा होता ! तेव्हा अधिक विश्लेषणाची गरज नाही. २. असंघटीत क्षेत्राचे जीडीपीतील योगदान : अ) काटेकोर मोजमापच कधी घेतले गेलेले नाही कारण कॅश अर्थव्यवस्थेत ते अशक्यच होते. अर्थात, असंघटीत क्षेत्राचा जीडीपीतला हिस्सा केवळ एक दुरान्वयाने ठरवलेली रक्कम असते. यासाठी, अपोर्शन्ड, जक्स्ट्रापोलेटेड, एस्टीमेटेड, इ इ इ सरकारी शब्द आहेत; पण सगळ्यांचा अर्थ एकच : "नक्की माहीत नाही. सगळा अंदाजपंचे व्यवहार आहे !". आख्खा भारत देश सोडाच, "केवळ तुम्ही राहत असलेल्या शहरातला किंवा अगदी तुमच्याच उपनगरातल्या असंघटीत क्षेत्रात काम करणार्या (रोख पैसे घेऊन गरज पडेल तसे किंवा दिवसाच्या/महिन्याच्या बोलीवर घरात/व्यवसायात/उद्योगधंद्यांत काम करणार्या) लोकांचे एकूण वार्षीक उत्पन्न किती आहे याची तुम्ही मोजदाद करत आहात अशी कल्पना करा", मग मला काय म्हणायचे आहे त्याची बरीचशी कल्पना येईल ! या प्रक्रियेची तोंडोळख करून घ्यायची असल्यास इथून सुरुवात करायला हरकत नाही : http://nceuis.nic.in/Final_Booklet_Working_Paper_2.pdf सगळे मुद्दे माहित करून घ्यायला अजून खूप वाचन जालावरही मिळल. आ) वरच्या परिस्थितीमुळे, असंघटीत क्षेत्रामध्ये अनेक गैरप्रकार चालतात व कामगारांची पिळवणूक होते हे काही गुपीत नाही. त्या क्षेत्रात पहिले तर आयकर चुकविण्यासाठी हिशेबच ठेवले जात नाहीत आणि आयकर विवरण भरले जात नाही. जेथे हिशेब ठेवले जातात तेथे कामगाराला हिशेबात दाखविलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन दिले जाण्याचे प्रमाण लक्षणिय आहे; म्हणजे व्यय कृत्रिमरित्या वाढवून फायदा कमी दाखवायचा आणि आयकर कमी भरायचा, हे नेहमीच होते. इ) यापुढे, या क्षेत्रातही बँक/डिजिटल पद्धती वापरणे सक्तीचे करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हे १००% करणे अशक्य आहे. परंतू, बहुतांश असंघटीत क्षेत्र याखाली आल्यास सर्व स्तरांवर खालील महत्वाचे फायदे होतील : इ.१) असंघटीत क्षेत्रामधल्या उलाढालीचे १००% अचूक नाहीत, पण पूर्वीपेक्षा खूप विश्वासू आकडे मिळतील... म्हणजे जीडीपीचे आकडे अधिक विश्वासू बनतील. इ.२) वेतनातली फसवाफसवी कमी होऊन कामगाराचा फायदा होईल. इ.३) या क्षेत्रात, वर सांगितल्याप्रमाणे, करचुकवेगिरी ही सामान्य स्थिती आहे. तिच्यात सुधारणा होऊन करसंकलन वाढेल. हे क्षेत्र बरबाद झाले असे अतीव करुणेने बोलणे राजकिय दृष्ट्या फायद्याचे आहे. या क्षेत्रामुळे मिळणार्या किती आणि कोणत्या सेवा शहरी व ग्रामीण भागांत बंद झाल्या आहेत याचा अंदाज तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून आणि तुमच्या इतर ठिकाणच्या विश्वासू माणसांच्या अनुभवावरून बांधू शकता. त्याचबरोबर हे लोक नुकत्याच झालेल्या निवडणूकांत मतदार होते हे पण विसरून चालनार नाही. इतर काही असले तरी, या सेवा फारकाळ बंद ठेवणे त्यातील कामगारांइतकेच किंवा जास्तच उद्योजकांना गैरसोईचे आहे. ती जवळ जवळ पूर्णपणे कॅश अर्थव्यवस्था असल्याने नोटाबंदी झाल्यावर सुरुवातीला तिला मोठा झटका बसणारच. मात्र आता सहजी उपलब्ध कॅश व बँक/डिजिटल व्यवस्थेचा वाढता उपयोग यामुळे ती रुळावर येणे आणि तिच्यातला वैधपणा वाढणे अपेक्षित आहे. माझ्या दृष्टीने, अजून एक महत्वाचा फायदा असा की, या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन मिळणे सुलभ होईल व त्यांच्या आर्थिक पिळवणूकीला जरातरी पायबंद बसेल. काही काळाने, बहुतेक पुढच्या दोन तीन तिमाह्यांत, हाती येणारे खर्या उत्पन्नाच्या आकड्यांमुळे असंघटीत क्षेत्राचे जीडीपीमधले योगदान वाढले तर मला तरी त्याचे आश्चर्य वाटणार नाही.हा फटका बसला यात वाद नाही पण
In reply to नोटाबंदीमुळे ह्या असंघटीत by डॉ सुहास म्हात्रे
फटका बसला हे मान्य
In reply to हा फटका बसला यात वाद नाही पण by मार्मिक गोडसे
फटका बसला हे मान्य केल्याबद्द्ल धन्यवाद.हे पहिल्यापासूनच कधी आणि कोणी नाकारले होते !!!???
फक्त "तो फटका आकांडतांडव केले गेले तेवढा मोठा नक्कीच नव्हता" हे म्हटले जात होते आणि तेच जनतेनेही आपल्या कृतीने (निषेध मोर्चे बारगळणे, निवडणूकीतल्या मतदानाचा कौल, इ) दाखवून दिलेले आहे. तरीही त्याबद्दल संशय आहेच का ?! की हे नेहमिचेच यशस्वी "सोईस्कर-दुर्लक्षास्त्र" आहे ?! =)) =))>>आ) नोटाबंदीनंतरचे
In reply to नोटाबंदीमुळे ह्या असंघटीत by डॉ सुहास म्हात्रे
हा न्याय लावायचा तर ज्या
In reply to >>आ) नोटाबंदीनंतरचे by नितिन थत्ते
असं आहे, चाचा...
In reply to हा न्याय लावायचा तर ज्या by नितिन थत्ते
आता दिसणारी जीडीपीतील
In reply to पूर्वी काळ्या पैशानी ही by डॉ सुहास म्हात्रे
कारण खरीपाच्या हंगामात
In reply to आता दिसणारी जीडीपीतील by मार्मिक गोडसे
कारण खरीपाच्या हंगामात नोटाबंदी झालीच नव्हती. उगाचच आयते श्रेय कोण बरे घेऊ देइल?अरे कर्मा ! आता हे पण परत परत सांगावेच लागेल का ? नोव्हेंबर-डीसेंबरमध्ये वाढलेल्या करसंकलनाची जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा हे मी स्पष्ट केले होते आणि इथल्या काही तज्ञांना ते "सोईचे" वाटले नव्हते म्हणून इस्काटून सांगितले होते. ते थोडक्यात परत एकदा... खरीपाच्या हंगामात नोटाबंदी झाली नाही... पण ज्या खरीपाची पेरणी झाली त्याच्या उत्पन्नामुळे देशाच्या जीडीपीत किती भर पडली हे (पीक कापून त्याच्या विक्रिचे/विक्रियोग्य उत्पन्न स्पष्ट झाल्यानंतरच) नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये (ज्या महिन्यांत नोटबंदी झाली) उर्फ तिसर्या आर्थिक तिमाहीत स्पष्ट होते. अर्थात खरीपाच्या हंगामाच्या उत्पन्नाचा नक्की परिणाम (अंदाज नाही) तिसर्या तिमाहीच्या जीडीपीत दिसतो... त्या अगोदर नाही !तुमच्या मुद्दलात फार गोंधळ
In reply to आता दिसणारी जीडीपीतील by मार्मिक गोडसे
तुमच्या मुद्दलात फार गोंधळ
In reply to तुमच्या मुद्दलात फार गोंधळ by डॉ सुहास म्हात्रे
त्यांनी तुमच्याकडे क्लास
In reply to तुमच्या मुद्दलात फार गोंधळ by मार्मिक गोडसे
किती उद्दिष्ट्ये पूर्ण झाली
In reply to परत तीच टेप लावतो. by पुंबा
किती उद्दिष्ट्ये पूर्ण झाली याची आकडेवारी कधी व कुठे मिळेल?
एवढी घाई का करताय ?
In reply to किती उद्दिष्ट्ये पूर्ण झाली by पुंबा
एवढी घाई का करताय ?
In reply to किती उद्दिष्ट्ये पूर्ण झाली by पुंबा
अरे हो.. भाजपच्या सोयीची
In reply to एवढी घाई का करताय ? by विशुमित
हे आकडे मखलाशी करुन काढले
In reply to Central Statistics Office by डॉ सुहास म्हात्रे
लोकसत्तेचा उल्लेख आला आणि
In reply to हे आकडे मखलाशी करुन काढले by अभिजीत अवलिया
म्हणजे
In reply to लोकसत्तेचा उल्लेख आला आणि by डॉ सुहास म्हात्रे
आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर
In reply to लोकसत्तेचा उल्लेख आला आणि by डॉ सुहास म्हात्रे
हे Q-३ चे रिझल्ट्स आहेत आणि
फर्स्ट डे
आकडेवारी आणि क्लिस्ट प्रतिसाद नको
मी छोटा माणूस आहे
नोटाबंदी फायदा आणि तोटा
अवांतराशी सहमत.
In reply to नोटाबंदी फायदा आणि तोटा by अनरँडम
तुमचे हे विधान पूर्णपणे
In reply to नोटाबंदी फायदा आणि तोटा by अनरँडम
तुमचे हे विधान पूर्णपणे पूर्वग्रहदुषित आहे हे प्रथम नोंदवतो.ते तसे आहे हे कसे याचे दीर्घ विश्लेषण मी याच विषयावरच्या माझ्या एका प्रतिसादात अगोदर केले आहे. ते पहावे म्हणजे माझे विधान पूर्वगृहदूषित नसून सकारण आहे हे ध्यानात येईल. माझ्या त्या विश्लेषणाच्या बाजूचे लेख त्यानंतर माध्यमांतही वाचनात आलेले आहेत. मनमोहनसिंगांच्या अर्थतज्ज्ञ व माननिय महोदय लेबलांच्यामागे मागे लपून काँग्रेसने आपला कार्यभाग साधण्याचे प्रसंग काही कमी नाहीत. त्याचा वारंवार अतिरेक होत आहे हे पाहून, Parliamentary Standing Committee of Finance च्या सभेत आपल्या पक्षाचाच सहसभासद असलेल्या दिग्विजयसिंहाने विचारलेल्या खोचक प्रश्नांना, गव्हर्नर उर्जित पटेल यांनी उत्तर देण्याअगोदर, "पटेल यांनी उत्तर देऊ नये" असे तेथेच स्पष्ट विरोधी मत "मनमोहनसिंग" यांनी नोंदवले होते. अश्या तर्हेने प्रश्न अडवणे म्हणजे "तो प्रश्न बेजबाबदारपणे विचारला आहे असे म्हटल्यासारखे (पक्षी : अपमानस्पद)" असते. अश्या तर्हेने आपल्याच साथिदाराचा प्रश्न अडवण्याचे दुसरे कुठले उदाहरण, असेलच तर, अत्यंत विरळ असेल. त्यानंतर, बहुदा त्यावरूनच बोध घेऊन काँग्रेसने, निदान आरबीआयवर टीप्पणी करणे तरी, पूर्णपणे थांबवले आहे. माझे मत पूर्वग्रहदुषित आहे असा दावा करताना, मनमोहनसिंगांचा गैरवाजवी उपयोग होत आहे ही सर्वसामान्य माध्यमांत असलेली गोष्ट तुमच्या नजरेत नाही याचे आश्चर्य वाटले ! :) *************** वेळ घेऊन, तथ्ये तपासून, विचारपूर्वक मत देण्याची पद्धतिची तुम्ही पाठराखण करता आहात हे स्वागतार्ह आहे. धन्यवाद ! माझेही तेच मत आहे. माझ्या मूळ प्रतिसादातला एक महत्वाचा मुद्दा, "विरोधकांकडून तसे पूर्वी झाले नव्हते व बर्याचदा होत नाही", असाच आहे :) फक्त आपल्याला सोईचे असेल तेव्हाच ते तत्व वापरावे, गैरसोईचे असले तर विसरावे, हे चुकीचे होईल, नाही का ?म्हात्रे साहेब
बाकी सगळं जाऊं द्या
भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !झाला का आनंद ?"प्रोस आणि कॉन्सचा इनपुट
In reply to बाकी सगळं जाऊं द्या by संजय क्षीरसागर
मुद्याचं बोलाल तर बरं!
In reply to "प्रोस आणि कॉन्सचा इनपुट by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्याच शब्दांत (कारण असे
In reply to मुद्याचं बोलाल तर बरं! by संजय क्षीरसागर
तुमच्याकडे मुद्दाच नाही !
In reply to तुमच्याच शब्दांत (कारण असे by डॉ सुहास म्हात्रे
भ्रष्टाचार अजिबात कमी झालेला नाही आणि आता तर तो पूर्वपदावर आला आहे. महागाई कमी होण्याचं सोडा, ती वाढतेच आहे. निर्चलनीकरणानं काहीही साध्य झालेलं नाही .तुमच्याइतक्या सर्वज्ञानीला
In reply to तुमच्याकडे मुद्दाच नाही ! by संजय क्षीरसागर
साधी गोष्ट आहे हो, त्यासाठी मुद्दा सोडून किती वायफळ लिहीता !
In reply to तुमच्याइतक्या सर्वज्ञानीला by डॉ सुहास म्हात्रे
भ्रष्टाचार अजिबात कमी झालेला नाही आणि आता तर तो पूर्वपदावर आला आहे. महागाई कमी होण्याचं सोडा, ती वाढतेच आहे. निर्चलनीकरणानं काहीही साध्य झालेलं नाही .