मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा फिटनेस विकांत

प्रशांत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत. यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा. मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही ************************* नेहमीप्रमाणे कांही सूचना. १) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे. २) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा. ३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्‍या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;) *************************

वाचन 51505 वाचनखूण प्रतिक्रिया 179

प्रशांत Wed, 12/07/2016 - 21:41
एस, रेवती , पिलीयन रायडर, अजया, स्नेहांकिता, इशा१२३, सानझरी, खेडूत, प्रीत-मोहर, अनिरुद्ध.वैद्य,लीमाउजेट,पिंगू आणि चतुरंग व ईतर मिपाकर यांना यांच्यासोबत २४ (१२+१२ असे) सूर्यनमस्कार घालण्यात येतील

आनंदयात्री Wed, 12/07/2016 - 22:33
शनवार रैवार मिळून ८ माईल ट्रेडमिल वॉकिंगचे उद्दिष्ट ठेवतोय. उत्तम उपक्रम. व्यायामातल्या सातत्यासाठी मोटिव्हेशनची गरज वारंवार भासते, ती अश्या धाग्यातून मिळो. धन्यवाद.

कुंदन Wed, 12/07/2016 - 23:05
Prophet Muhammad कृपेने मोठा विकांत मिळेल. मोठा विकांत असल्याने ६० की मी होतील ३ दिवसात.

नीलमोहर गुरुवार, 12/08/2016 - 20:05
एरवी नियमित चालणं असतं, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, आठवण आणि इच्छा झाली की कधीतरी असतात, मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात, आता तुम्हीच सांगा मालक, अजून वेगळ्या व्यायामाची गरज आणि त्यासाठी स्टॅमिना असेल का :) तरीही मालकांनी कधी नव्हे ते धागा काढलाय म्हटल्यावर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्या जाईल.

In reply to by नीलमोहर

प्रशांत Fri, 12/09/2016 - 22:14
मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात,
नाहि यावर डॉ. अधीक सांगतील. फिट्नेस विकांतापासुन सुरुवात करा आणि नियमित करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करावा म्हणुन मी मित्रासोबत पैज लावतो ज्याने महिन्यात जास्त खाद खाडे केलेत त्यानी पार्टि द्यावी.

एस Fri, 12/09/2016 - 00:47
मिपाकरांनो, उठा, चला, उठा, राष्ट्रवीर हो! सुसज्ज व्हा उठा चला... (आठवण करून दिली. आत्ता झोपा. अजून एक दिवस आहे. शनवार मात्र गाजवा!) गुरूवारवाले, काय अपडेट?

सप्तरंगी Fri, 12/09/2016 - 20:36
चांगले motivation आहे. मी आठवड्यातुन ५ वेळा ४km चालते (फास्ट वॉक), आठवड्याला २०km , एरवी शनिवार-रविवार दांडी मारते पण या शनिवारी आणि रविवारी १०km फास्ट वॉक नक्की करेन.

एस Sat, 12/10/2016 - 05:37
सहा सूर्यनमस्कार घालून झाले आहेत. उद्या उर्वरित सहा. आता सायकलिंग सुरू. @श्रीहासराव, निघालात का औरंगाबादवरून? प्राडॉंची भेट झाली का?

विकांताच ६० सुर्य नमस्काराचं टारगेट पुर्ण झाल :) ६० झाल्यावरही उत्साह होता, म्हणुन अजुन १२ घालुन घेतले. तेव्हा, आजचा आकडा ७२. संध्याकाळी इच्छा झाली तर जीममध्ये जाईल. उद्या जीमला सुटी असल्याने परत सुन घालीन अथवा माझी पण सुट्टी ;) सगळ्यांना शुभेच्छा!

In reply to by प्रशांत

प्रशांत Mon, 12/12/2016 - 15:01
रविवार ची राइड ठरल्याप्रमाणे झाली.मी, नकुल, सागर आणि मोदक रांजनगाव पर्यंय सायकल ने गेलो आणि डॉ सोबत पुण्याला आलो माझी १०६ किमी सायकलींग झाली .

In reply to by प्रशांत

इरसाल कार्टं Mon, 12/12/2016 - 23:04
हे भारी आहे, तुम्हाला पुण्यासारख्या शहरात राहून पण सायकलिंग करता येते, इकडे आम्ही गावाकडे आहोत पण रस्ते खूप खराब आहेत छोटे मोठे सगळे. किमान सायकलिंगच्या लायकीचे तर अजिबात नाहीत. असो, आम्ही हरिश्चंद्रगड ची ट्रेक संपवून आलोय आत्ताच अन हॉटेलात आलोय. छान झाली ट्रेक अन त्या निमित्ताने फिटनेस वीकांतही. फोटो टाकेनाच उद्या परवा.

कंजूस Sat, 12/10/2016 - 10:53
प्रशांत, स्ट्रावामधले "elevation 290 meters" हे अल्टिट्युडचे मोजमाप इतर gps route tracerप्रमाणेच गंडलेलं असतं का? खरे gps unit altitude किती दाखवते पुणे/पिंपरी/चिंचवडची? ५५०मिटर्स ना?

एस Sat, 12/10/2016 - 22:34
कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला तरी इथे टाका. 'फिटनेस' महत्त्वाचा आहे. व्यायामप्रकार आपापल्या आवडीनुसार करायचा आहे.

एस Sun, 12/11/2016 - 09:05
आज सहा सूर्यनमस्कार झाले. एकूण काल आणि आज मिळून बारा पूर्ण झाले. पाय मुरगळल्यामुळे चालण्याचे लक्ष्य पूर्ण करता येणार नाही मात्र! :-(

शलभ Sun, 12/11/2016 - 17:00
मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. ह्या वीक च 50 चं टारगेट होतं 47 झाले. शुक्र-शनी रेस्ट घेतली आजच्यासाठी. माझ्याबरोबर मिपाकर अमित जोशी सुद्धा होते. त्यांनीही पूर्ण केली.

दोन्ही दिवस प्रत्येकी दोनेक किमी धावलो. तेवढीच सायकल. पंधरा पुलप्स. पन्नास पुशप्स. बाकी वजनं घेउन हातं-पायं हलवले. तद्नंतर ढेरी साठे क्रंचेस, क्रोस क्रंचेस, रिव्हर्स क्रंचेस झोपून सायकल वगैरे प्रकार केले. मग घरी येउन दुपारभर झोपा काढल्या.

एस Mon, 12/12/2016 - 00:31
मिपा फिटनेस विकांतात अहमहमिकेने भाग घेतलेल्या सर्व मिपाकरांचे जोरदार अभिनंदन आणि आभार! या उपक्रमाला उचलून धरणारे श्री. मोदकराव आणि श्री. प्रशांतराव यांचे आभार. हा एका-दोन दिवसांचा उपक्रम न राहता आपल्या रोजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. पुनरेकवार सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचेही आभार. धन्यवाद! _/\_

In reply to by एस

विंजिनेर Mon, 12/12/2016 - 01:20
हिरव्या पच्चीम किनार्‍यावरचा रविवार अंमळ बाकी आहे. आभार प्रदर्शनाची घाई नको :)

विंजिनेर Mon, 12/12/2016 - 01:17
साडे आठ माईल्स "ईझी" रन मिपा फि. विकांताय स्वाहा - इदं मिपा फि. विकांताय - इदं न मम | एकूण आठवड्यातले माईलेज - २० मैल (३० किमी मात्र)

गवि Mon, 12/12/2016 - 13:05
आता हा वॉर्मअप समजून त्या व्यायामाची उष्णता कमी होण्याच्या आत पुढचा उपक्रम ठरवावा ही विनंती. यंदा चालणे / धावणे या विशिष्ट व्यायामावर भर देणारा सप्ताह ठेवूया का? वर्किंग डेजसहित एका आठवड्यात किती किलोमीटर जमतात ते पाहू या? (आपापल्या शक्त्यनुसार पण किंचित जास्तीचा चॅलेंज घेऊन).

In reply to by डॉ श्रीहास

केडी Mon, 12/12/2016 - 15:37
डॉक पुन्हा एकदा अभिनंदन! भेटून खरंच छान वाटलं काल सगळ्यांना! कीप रायडींग! आता लक्ष २०१७! डेक्कन क्लीफ हँगर! किंवा BRM कम्प्लिट करा सगळी सिरीज!

पिलीयन रायडर Mon, 12/12/2016 - 22:14
मुलाला शुक्रवार रात्रीतुन ताप आल्याने पुढचे दोन दिवस त्याच्याच मागे गेलेत. सपशेल विसरुन गेले की असं काही करायचं होतं. अजुन २ दिवस तर असेच जातील. झोप होत नाहीये नीट त्यामुळे सुर्यनमस्कार घालायला गेले तर साष्टांग नमस्कार घालताना तिथेच झोपुन जाईन! जे काही करेन ते लिहीते इथे.

गवि Tue, 12/13/2016 - 22:42
आज तीन किमी सलग. तुलनेत वाढीव वेगाने. इथल्या इतरांच्या मानाने तीन किमी म्हणजे काहीच नाही. पण एकेकाळी अर्धा किमीदेखील चालण्याची मारामार होती, त्या तुलनेत ही वाढलेली स्टॅमिनापातळी फार आनंददायक वाटते. हळूहळू साडेतीन मग चार असं करता येईल.

गवि Tue, 12/13/2016 - 22:43
आज तीन किमी सलग. तुलनेत वाढीव वेगाने. इथल्या इतरांच्या मानाने तीन किमी म्हणजे काहीच नाही. पण एकेकाळी अर्धा किमीदेखील चालण्याची मारामार होती, त्या तुलनेत ही वाढलेली स्टॅमिनापातळी फार आनंददायक वाटते. हळूहळू साडेतीन मग चार असं करता येईल.

मित्रहो Sun, 01/01/2017 - 22:09
काल नवीन वर्षाचा निरोप १०२ किमी सायकल हैद्राबाद ते चेवेला आणि तसेच परत. मस्त रोड आहे. आज रिकव्हरी राइड ४५ किमी चिलकूर आणि आसपास. एकूणच आठवडाभरात २०३ किमी. साऱ्या राइड एकट्यानेच. बरेच दिवसानंतर मिपावर आलो. दहा ते बारा डिसेंबर मधे सुद्धा एक शतकी राइड ११५ किमी. हैद्राबाद क्लब राइडच्या मार्गाने. भयंकर हाल झाले होते. प्रचंड भूक लागली आणि खायला काही मिळत नव्हते. सध्याच्या वातावरणात सकाळी थंडीचा आळस सोडला तर मग सायकलींगला भरपूर मजा येते. २०१६ मधे ४५०० किमी सायकल चालविली. सायकलींग साठी वर्ष मस्त गेले. एकदम पैसा वसूल.

In reply to by मित्रहो

राजेंद्र देवी Mon, 01/02/2017 - 13:59
हे असेच चालायचे ... लहानपणी एक पाय नाचिव रे गोविंदा किंवा चाल चाल बाळा तुझ्या पायात वाळा पासून चालणे सुरू झाले ते तेवढ्यापुरतेच मर्यादित होते. म्हणजे तसे लहानपणापासून आपण किती चाललो हे आपणास लक्षात येत नाही. गावी १०वी पर्यंत पायात चप्पल हा प्रकार नव्हता. सगळीकडे अनवाणीच फिरायचे. ११वी ला अहमदनगराला शिकण्यास गेलो अन पायात पहिल्यांदा स्लीपर आली. नगरला असताना जवळच असणारे केडगाव येथे एकदा यात्रेसाठी चालत गेलो होतो. नंतर कॉलेज शिक्षण घेण्यासाठी पुन्हा गावी परत आलो. कॉलेज शिक्षण पूर्णं करून नोकरीसाठी पुणे गाठले व येथेच स्थायिक झालो. असो हा थोडक्यात पूर्व इतिहास. पुण्यात सायकल स्कूटर अन नोकरीच्या जागी कंपनीच्या बसने प्रवास अन बैठे काम म्हणजे थोडक्यात चालणे हा प्रकार फारच कमी. फक्त गणपती पाहण्यासाठी जे काही पायी हिंडलो असेल तेवढेच. माझ्या कंपनीतील सहकारी सतत कुठे ना कुठेतरी पायी दौरा करीत असत व त्याचे रसभरीत वर्णन करीत असत. ते ऐकून मलाही वाटे की आपणही थोडे चालावे म्हणून सरावासाठी रोज १-२ की.मी. सुरुवात केली. वयाची पन्नाशी उलटून गेल्याने हा सराव हळूहळू वाढवितं होतो. शेवटी एकदा सहकाऱ्यांना सांगितले की मला पण तुमच्या बरोबर पायी यावयाचे आहे. पहिली भ्रमंती ठरविली कात्रज बोगदा. म्हणजे कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. तेथून बसने घरी. ६.३० ते १०.३० या वेळेत हे चालने पूर्णं केले. पौर्णिमेची रात्र असल्याने मजा आली. बोगद्यामध्ये जरी दिवे असले तरी बॅटरी वापरणे अपरिहार्य होते कारण लोखंडी ऍगल पायात आडवे येत होते अन गाड्यांचा धूर पण भरपूर होता कात्रजच्या या यशस्वी चालीनंतर काही दिवसांनी ठरविले की ऑफिस सुटले की अकुर्डी ते देहू हे अंतर चालत जावयाचे. हे अंतर फक्त १२ की. मी. होते. तुकारामाच्या समाघीचे दर्शन घेऊन व येताना बसने घरी परतलो. चालताना भंडारा डोंगर पाहिला व पुढील वेळी येथे यावयाचे ठरवले पण तो योग आला नाही. अशा प्रकारे पायी चालण्याचा छंदच जडला. असेच एकदा सहजच ठरविले की का आपण ऑफिसमधून घरी बसने जाण्यापेक्षा चालतच जाऊ नये ? झाले. अकुर्डी ते दगडूशेठ गणपती असे २० की. मी. अंतर ५.३० ते रात्री ९.३० वेळेत पूर्णं केले. जुलै महिन्यात (भर पावसात) सहकाऱ्यांनी ठरविले म्हणून सिंहगडावर जायचे ठरले. पहाटे ५ वा. स्वारगेट ला रेनकोट वै. घालून हजर. पाऊस चालूच होता. मित्रांची वाट पाहत होतो पण कोणी आलेले दिसले नाही. वाटले पुढील थांब्यावर येतील पण कोणी आले नाही. आता काय करावयाचे. वाट माहिती नाही. योगायोगाने बसमध्ये एक कंपनीतील ओळखीचा चेहरा दिसला. तो खूपच अनुभवी होता अन मी नवशिका. असो. त्याच्याबरोबर सिंहगड भर पावसात चढावयास सुरुवात केली पण त्याचा वेग जास्ती होता व त्याला माझ्यावेगाने चालणे अवघड वाटत होते. शेवटी त्याला पुढे जाण्यास सांगून मी माझी चढाई चालूच ठेवली. पाऊस भरपूर होता. वरून पावसाच्या धारा अन रेनकोट मध्य घामाच्या धारा. पायवाटेवरून पाण्याचे लोट वाहत होते त्यामुळे त्या पाण्यातूनच वाट तुडवीत होतो. रस्ता नीट कळत नव्हता. पावसामुळे थोडेच लोक आले होते व ते पण केव्हाच वर चढून गेले होते. कसाबसा धापा टाकत पाऊण सिंहगड सर केला तेव्हा माझ्याबरोबर असणारा कंपनीतील सहकारी वर जाऊन परत फिरला होता. त्याने धीर दिला अन म्हणाला आता थोडेच राहिले आहे, बरोबर येऊ का? त्याला नकार दिला अन सांगितले की मी ह्या पावसात आता तुझ्याबरोबर परत उतरणार नाही. तू जा. मी जीपने खाली येईन. आणि मी देवाचे नाव घेत तसाच गड सर केला. हा अनुभव फारच वेगळा अन रोमांचकारी होता. जीपने उतरून बसने घरी परतलो अन मित्रांना फोन केला की ते का आले नाही. त्यांना तर मी सिंहगडावर जाऊन आलो यावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटले की मी काही या पावसात येत नाही व त्यांनी पण पावसामुळे येणे रद्द केले. यानंतर साघारणतः पुढच्या महिन्यात कंपनी(अकुर्डी) ते आळंदी असे चालत जायचे ठरले अन १८ की. मी. प्रवास ४ तासात पूर्णं केला. आळंदीला दर्शन घेऊन बसने घरी परतलो. घरची मंडळी म्हणू लागली की एवढे चालू नका पण चालायची खुमखुमी काही कमी होत नव्हती. एकदा रविवारी कोथरुडला नातेवाइकांकडे जायचे होते. तेव्हा सहज गंमत म्हणून बसने न जाता मी ते ८ की. मी. अंतर चालत गेलो. परगावी सुद्धा हातात सामान वै. नसेल तर स्टॅड ते घर चालतच जायचो. सकाळी चालण्याची मजा काही औरच आहे. अजिबात थकवा जाणवत नाही. थोड्याचं दिवसाने टूम निघाली. राजगड करायचा आहे. अर्थात पौर्णिमेची रात्र निवडली होती. गुंजवणे मार्गे जायचे ठरले. कंपनी सुटल्यावर स्वारगेट वरून निघालो अन रात्री ८ वा̱. गुंजवणे ला पोहचलो. रात्रीच गड चढावयास सुरवात करून १२ वा. वर गडावरती पोहचलो. तेथील मंदिरात जेवण करून झोपलो. सकाळी बालेकिल्ला केला , संजीवनी माची केली अन दुपारी २ वा. गड उतरण्यास सुरुवात केली. गुंजवणे ते कात्रज जीप व नंतर बसने घरी. (या लेखात गडाचे वर्णन वै. लिहितं नाही कारण ते सर्वत्र उपलब्ध आहे. ) असो. काही दिवसांनी पुन्हा कंपनीच्या बसने तळेगावला उतरून तेथून चालत शिरगाव (प्रती शिर्डी) ला १६ की. मी. चालत मुंबई पुणे मार्गे अकुर्डीला आलो अन बसने घरी. काही दिवसानंतर पुन्हा टूम निघाली की आळंदीला जायचे पण या वेळेस ते दगडूशेठ ते आळंदी असे २४ की. मी. चालावयाचे. पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत ते पूर्णं केले. अधे मध्ये २-३ वेळा रवीवारी सिंहगड चढणे उतरणे चालूच होते. आता चालण्यास वेग आला होता व सरावलो होतो. साधारणतः ५० मिनिटात वर जाता येत होते. वर पोहताच १ ग्लास सरबत अन लगेच परत खाली उतरणे. पण राजगडच्या ट्रेकने गड पुन्हा पुन्हा बोलवू लागले होते. सर्वांनी ठरविले की यावेळी हरिश्चंद्र गड करूया. मग काय ऑफिस सुटले की राजगुरुनगरला उतरून खिरेश्वर ला बसने गेलो. रात्री (पौर्णिमा) ९ वाजता सुरुवात केली अन टोलार खिंडीत १२ वा. पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा गड चढावयास सुरुवात केली. रात्री २वा. गडावर पोहचलो. गुहेत जागा नसल्याने तेथील झोपडीत आश्रय घेतला. फेब्रुवारी महिना होता तरीपण गडावर खुप थंडी होती. सकाळी स्नान करून तारामती पॉइंट पाहून दुपारी विश्रांती घेतली. ४ वाजता प्रसिद्धं कोंकण कडा पाहण्यास गेलो. अप्रतिम व अवर्णीनीय. तेथून गुहेत जागा मिळवली. रात्री खिचडी खाऊनं झोपलो. सकाळी उठून पाचनाई मार्गे गड उतरलो व पुण्यास परतलो. अधूनमधून कंपनी (अकुर्डी) ते घरी (रविवार पेठ) अशी चालत जाण्याची हुक्की येई. हे २० की. मी. अंतर अंदाजे ४ तासात पूर्णं होई. असेच एका रवीवारी चतुर्थी येत होती. हा योग साधून आम्ही सारस बाग गणपती ते थेउर २५ की. मी. सोलापूर रस्त्याने गेलो. पहाटे ५ ला सुरुवात केली व १० वा. थेउरला पोहचलो. १ तास रांगेत उभे राहिलो व दर्शन घेतले अन बसने घरी परत. आमचे सर्व चालणे साधारणात १ महिन्याच्या अंतराने असे. वातावरण , वेळ, प्रसंग पाहून ठरवीत असू. मध्ये बरेच दिवस हालचाल नव्हती अन चुळबूळ सुरू झाली कारण माझे एक सहकारी श्री. मराठे हे चालण्यात एकदम तरबेज. त्यांनी ३-४ वेळा पुणे ते अक्कलकोट, पुणे ते पंढरपूर, पुणे ते पंढरपूर व तेथून अक्कलकोट असे पायी प्रवास रोज ५० ते ६० की. मी. वेगाने पूर्णं केले होते. २५० ते३००की. मी. चालणे व बसने परत. अर्थात माझी तेवढी तयारी नसे. पण मला वाटे की आपण एका दिवसात किती चालू शकू? हे पाहावे म्हणून त्यांना एकदिवसीय पायी प्रवासाचे मनोगत सांगितले अन ठरले की चालत नारायणपुरला जायचे. रात्री ८ वा. (पौर्णिमा) शंकर महाराज मठापासून सुरुवात केली. कात्रज बोगद्याजवळ नास्ता केला. पुढे कैलास ची भेळ रात्री १२ वा. खाऊनं पहाटे ४ वाजता नसरापुर फाटा गाठला. पाय खूपच दुखू लागले होते अन फोड पण आले होते. परत फिरावे असे वाटू लागले पण मन हार मानावयास तयार नव्हते. शेवटी तसेच चालत चालत पहाटे ६ वाजता बालाजीला (नारायणपुर) पोहचलो. तेथे अंघोळ करून दर्शन घेतले व जीप/ बसने घरी परत आलो. हा ४२ की. मी. चा टप्पा गाठू शकलो. आतापर्यंतचा हा माझा सर्वात मोठा पल्ला. पण हायरे दैवा ... पुढे पुढे माझे गुडघे दुखू लागले. औषधाने थोडे बरे वाटे पण त्रास वाढू लागला. डॉ. नि चालण्यास बंदी केली आणि माझा २-३ वर्षाचा चालीत्सोव बंद पडला. मनाची खुप तयारी असली तरी आता शरीर साथ देईनासे झाले. आता गरजेपुरते थोडे चालतो. असो हे सर्व जसे आठवेल तसे लिहून काढले आहे. आपण काय करू शकतो हे आपणास केल्याशिवाय कळत नाही. आपली ताकद आपण अजमावून पाहत नाही. पन्नाशीनंतर मी हे सर्व करू शकलो यावर माझाच विश्वास बसत नाही. अजूनही खुप चालावे वाटते. दुर्ग खुणावतात पण ... हे असेच चालायचे राजेंद्र देवी.