कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
ओळखीचं हसून बोलायला हवं..
किती ती धूळ गैरसमजांची,
मनाला स्वच्छ झाडायला हवं..
कुठंतरी आत सलतंय का काही?
समजूतीचं मलम तिथं लावायला हवं..
जे झालं ते झालं, ते होणारच होतं
अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं..
पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय
आनंदानं जीवन आता जगायला हवं..
अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं
एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
4369
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
साधी पण छान आहे
बर्याच खपल्या काढणारी कविता.
आवडली!
This is like day dreaming.
साधी, सुंदर..
सोप्या ओळी, सुंदर अर्थ.
सुरेख कविता
............
In reply to सुरेख कविता by पैसा
त्यातलं हे कडवं तर अगदी जीव घेणं
In reply to ............ by शिव कन्या
खुपच छान झालीय कविता.....
कविता आवडली.
छान कविता.
बाडिस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to छान कविता. by सस्नेह
छान आहे.
आवडली...
जुन्या जखमा वर आणणारी कविता.
सर्वाना धन्यवाद.