रामदासांचे भारतभरातील ११११ मठ
स्मार्टफोन, गूगल मॅप्स , रस्ते, वीज, घड्याळे, वहाने यांपैकी काहीच नसताना समर्थ रामदासांनी भारतभर उभ्या केलेल्या व आजवर टिकलेल्या एका जबरदस्त अद्भुत "इंटेलिजन्स नेटवर्क" ची अभ्यासपूर्ण कहाणी...
नमस्कार! एक इतिहास अभ्यासक व "विमुक्त भटका" या नात्याने हे लिखाण करीत आहे. (समर्थ भक्त या नात्याने नव्हे!)
रामदासी संप्रदायामध्ये समर्थांनी ११११ किंवा ११०० रामदासी मठ संपूर्ण भारतभर स्थापन केले असे सांगितले जाते.
कुणालाही प्रथम ऐकताना हे विधान १११ % अतिशयोक्त वाटू शकते. हे ११११ नक्की काय गौडबंगाल आहे?खरेच असे मठ आहेत का?असतील तर कुठे कुठे आहेत हे मठ? सध्या काय स्थितीत आहेत?
पाहुयात! मुळात ११०० हा आकडा खरा की ११११? ११११ या आकड्यामागे एक कारणपरंपरा आहे. "समर्थ रामदासांच्या लिखाणात अनेक कोडी आढळतात व ती सोडवणे हे येणा-या पिढीतील तरुणांपुढचे मुख्य काम आहे." असे समर्थहृदय शंकर श्रीकृष्ण देव म्हणत असत. हे तेच देव ज्यांनी समर्थांच्या अनेक मठांमध्ये फ़िरून लाखो कागद गोळा करून समर्थांचे सर्व लिखाण प्रकाशित केले व हे सर्व महत्वाचे कागद-दस्त धुळ्याला स्वत:च्या राहत्या घराची जागा दान देऊन एक संस्था उभी करून तिथे जतन करून ठेवले, आजही ते समर्थ वाग्देवता मंदिर धुळ्याला उभे आहे. असो.
तर अशाच एका रचनेत समर्थ लिहितात,
अक्रा अक्रा बहु अक्रा। काय अक्रा कळेचिना।
गुप्त ते गुप्त जाणावे। अनंदवनभूवनी॥
या वरून पुढे संप्रदायात समर्थ त्यांनी विस्तारलेल्या हजारहून अधीक मठांच्या जाळ्याबद्द्ल तर बोलत नाहीत ना, अशा शंकेने हा आकडा ११११ मठ असा सांगितला जाऊ लागला. कारण तत्कालीन "भारतवर्षात" (ज्यात अफ़गाणिस्तान, पकिस्तान, बलुचिस्तान, इराण पासून हे ब्रह्मदेश, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, लंका हा सर्व प्रांत गणला जात असे.) समर्थांनी जागोजागी आपले काही शिष्य (सांप्रदायिक आकडा अर्थातच ११!) पाठवून त्यांना तिथे मठस्थापना करावयास लाविली होती. या मठातून रामभक्तीचा प्रसार, प्रचार व अन्य अनेक उत्सवादी चालत जेणॆकरून तत्कालीन हिंदू समाजाला एकत्र येण्यास कारण मिळत असे.
"गुप्त ते गुप्त जाणावे" असे का? तर या मठांमधून खरोखरीच अध्यत्म प्रसाराखेरीज अजून बरीच कार्ये चालत असत असे खात्रीशीरपणे सांगता येते.
शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे व या मठांचे काहीतरी संबंध नक्की असणार अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे कारण परप्रंतात, परभाषीय प्रदेशात आपला स्वभाषीय व स्वविचारांचा व बलदंड मनुष्य मिळणे, ज्याला त्या प्रांताची, तिथल्या भूगोलाची, माणसांची, भाषेची, रीतिरिवाजांची खडान खडा माहिती असेल, तसेच हक्काचा आसरा, निवारा मिळणे हे गुप्तहेरांच्या दृष्टीने स्वर्ग प्राप्त झाल्याप्रमाणेच आहे!
एक महत्वाची नोंद, या लेखात मी वैयक्तिक भेट देऊन पाहिलेल्या, अनुभवलेल्या वा या ना त्या मार्गाने संपर्कित झालेल्या मठांबद्दलच केवळ लिहिणार आहे. अशा मठांची तिथल्या मठपतींची, त्यांच्या भाषांकासह, पत्ता व इमेल आयडीसह एक यादी प्रस्तुत लेखकाने तयार केलेली असून ती दासबोध.कॉम या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या लेखाच्या निमित्ताने अशा अंधारात राहिलेल्या अजून काही मठांबद्दल माहिती वाचकांकडून कळली, व ती यादी अधीक परिपूर्ण झाली तर ती हवीच आहे! असो.
आज या मठांची स्थिती काय आहे? याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की आजही (इ.स. २०१६) असे २५० हून अधीक रामदासी मठ पूर्ण भारतभर कार्यरत आहेत! महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगण, कर्नाटक, गुजराथ, तमिळनाडू उत्तरांचल, राजस्थान इ. राज्यांत आज २०१६ साली देखील हे मठ आढळतात.
मुळात मठ म्हणजे काय ते ध्यानात घ्यावे. मठ म्हणजे दर वेळॆस एखादा टोलेजंग वाडा व त्यात अतिभव्य देवालय, धावपळ करणारी शिष्य मंडळी इ. असेलच असे नाही. समर्थांच्या बहुतांश मठांत श्रीरामाचे, मारुतीचे अथवा पांडुरंगाचे मंदिर असते. (होय पांडुरंगाचे मंदिर! असेही मठ आहेत! उदा. मेथवडे मठ, अमळनेर-भांड्याचे इथला मठ इ.) परंतु बरेचसे मठ आज वेगळया स्थितीत आहेत. काही मठ अक्षरश: पैशाअभावी पडझड होऊन नष्ट पावले आहेत, पावत आहेत, तर काही मठांमध्ये तर कोट्यावधी रुपयांची जीर्णोद्धाराची कार्ये सुरु आहेत उदा. मिरज वेण्णास्वामी मठ, हनुमानटाकळीचा मठ इ.
काही मठाना ब्रह्मचारी परंपरा असल्याने त्यांचे नावावर आजही शेकडो एकर जमिनी आहेत. तर एकीकडे संसारी मठपतींमध्ये भावाभावात वाटण्या होऊन अनेक मठांना शिवकाळात व मराठेशाहीत मिळालेल्या जमिनी आज त्यांचे नावावर नाहीत.अनेक जमिनी कुळकायद्यात गेलेल्या आहेत. अनेक मठ गांधी हत्येनंतर जाळून खाक झालेले आहेत. (जातीयवाद्यांसाठी माहिती: समर्थांचे मठपती सर्वजातीय होते, आजही शिरवळचे तांबे महाराज यांचे मराठा वंशज मठ पहातात. किंवा मसूरचा मठ पवार नामक एक वृद्ध स्त्री सांभाळते ) काही मठांमध्ये अठरा विशे दारिद्रय आहे, इतके की मठपतीलाही २ वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तर काही मठात रोज लाखो लोकांना अन्नदान होते आहे (उदा. गोंदवले मठ, सज्जनगड मठ) तरीदेखील आपल्या घराण्यातील ही रामदासी परंपरा अनेक रामदासीनी यथानुशक्ती, यथामती कसोशीने जपली आहे. टिकवली आहे, वर्धिष्णू केलेली आहे.
काही मठांवर वारकरी मठपती आहेत (उदा. निजामाबाद मठ, इंदुर बोधन मठ ) तर काही मठांमध्येच सज्जनगड ते पंढरपूर आषाढी/कार्तिकी वारीची परंपरा आहे, उदा. पंढरपूर येथील 3 मठ.
समर्थशिष्य गिरीधर स्वामी यांनी त्यांच्या श्री समर्थप्रताप या ग्रंथात वरीलपैकी काही मठांची यादीच दिलेली आहे, त्यावरून केलेला भूमान (नकाशा) सोबत दिलेला आहेच. परंतु याहून अधीक रामदासी मठ खात्रीशीरपणे आजही जिवंत आहेत! कशावरून? सांगतो! सध्या समर्थस्थापित मठांची नक्की स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याच्या हेतून श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड या रामदासी सांप्रदायाच्या मातृसंस्थेने २०१० साली पहिले रामदासी मठपती सम्मेलन सज्जनगडावर आयोजित केले होते व आता प्रतिवर्षी त्याचे आयोजन होते आहे. या सम्मेलनाला दर वेळेस नवनवे मठपती उपस्थिती लावत आहेत! व या सर्वांचे मत एकच आहे! या सर्वांना असेच वाटत होते की आता रामदासी संप्रदाय जवळपास संपलाच आहे ! आपल्याच घरी, आपणच काय ते रामदासी परंपरा टिकवून ठेवलेली आहे व ती आमरण ठेऊच..परंतु जसे त्यांना कळले की अरे, अन्यही मठ जिवंत आहेत, नव्हे नव्हे जोमाने कार्य करीत आहेत, तेंव्हा हे लक्षात आल्यावर त्यांना काय आनंद झाला असेल कल्पना करून पहा!
आपण एकटे नाहीत, ही भावना विषेशत: सांप्रदयिकांना फ़ार सुखावणारी असते, हुरूप देणारी, बळ देणारी, उभारी देणारी असते. याचे उत्तम उदाहरणा म्हणजे दक्षिणेकडील मठ!
आजही तंजावर सारख्या अति दक्षिणेकडील राज्यात समर्थांचे ६ मठ पूर्ण शक्तीने कार्यरत आहेत! व समर्थ शिष्यांची समाधी मंदिरे इ. पकडता एकून १४ रामदासी स्थाने तिथे आजही उभी आहेत! हे सर्व लोक उत्तम मराठी भाषा आजही लिहितात, वाचतात, बोलतात हे किती विशेष आहे!
आशिया खंडातील अति भव्य ग्रंथालयांपैकी एक व तंजावरकर भोसले घराण्याचा खाजगी ग्रंथसंग्रह असलेले "श्री सरस्वती महाल ग्रंथालय" येथील मराठी विभागप्रमुख म्हणून गेली अनेक दशके भीमराज गोस्वामी हे रामदासी मठपतीच होते! व आजही रामचंद्रबुवा केसकर हे रामदासी मठपतीच ती धुरा समर्थपणे पेलत आहेत! रामचंद्र हे तंजावरी मोडीचे एकमेव तज्ञ असून त्यांनी दक्षिणेत समर्थ संप्रदाय टिकावा म्हणून अत्यंत भरीव योगदान दिलेले आहे. आजही शिवरायांच्या तंजावर गादीतील वंशजांचे व या मठपतींचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत! तंजावरचे भोसले घराण्यातील वंशज आजही दासबोध वाचतात हे प्रस्तुत लेखकाला स्वत: वंशजांनीच सांगितलेले आहे!
मराठ्यांच्या इतिहासाची अनेक दुर्मिळ कागदपत्रे या ग्रंथालयात अभ्यासकांची वाट पहात धूळ खात पडून आहेत! तिथे जाऊन कुणाला याचा अभ्यास करावयाचा असल्यास कुठल्याही समर्थ मठात निवास व अन्य अभ्यासाची सोय आज ३५० वर्षांनीही होऊ शकते! रामेश्वरचे मठपतीही दरवर्षी न चुकता सज्जनगडावर येतात. मण्णारगुड्डी मठ देखील असाच मोठा मठ आहे.
समर्थांची अनेक अस्सल तैलचित्रे तंजावरकर भोसले घराण्याच्या संग्रहात आहेत.
या शिवाय आंध्र-तेलंगणात समर्थांचे ६५ मठ आज शिल्लक आहेत. पैकी निजामाबाद, इंदुर-बोधन, जुक्कल इ. मठ फ़ारच भव्य आहेत व जोमाने कार्य करीत आहेत. जुक्कल येथून तर दर वर्षी दासनवमीला जुक्कल ते सज्जनगड अशी शेकडो तेलुगु समर्थभक्तांची पदयात्रा येते! या मठातील कोणत्याही कार्यक्रमाला किमान ३-४ हजार लोकांची उपस्थिती असतेच असते.
येथील केशव रामदासी मठपती अत्यंत तरुण व उच्चविद्याविभूषित असून त्यांनी स्थानिक तरुणांचे मोठे संघटन उभे केलेले आहे.
कर्नाटकात आज ३६ मठ शिल्लक आहेत (नोंद झालेले) व या प्रत्येक मठाने समर्थ साहित्याचे स्थानिक भाषेत भाषांतर केलेले आहे हे वेगळे सांगणॆ नलगे!
ग्वाल्हेर मठ हा देखील अत्यंत मोठा मठ असून तिथे अनेक कार्यक्रम आजही होत असतात. ज्योतिरादित्य शिंदेंसह सर्व शिंदे सरकार घराण्यातील लोक या मठात "शिवछत्रपतींची गुरुगादी" म्हणून दर्शनाला आवर्जुन येतात. उपेंद्र महाराज शिरगांवकर हे तेथील कार्यभाग बघतात व त्यांच्या समर्थ प्रेस च्या माध्यमातून त्यांनी रामदासांचे सर्व लिखाण हिंदी भाषेत नेलेले आहे! हिंदी भाषकांना ओवी वृत्त फ़ारसे भावत नाही हे पाहून नुकताच त्यांनी दोहाबद्ध दासबोध प्रकाशित करण्यास घेतला आहे!
जयपूर, उदयपूर हे असेच जुने रामदासी मठ! पण त्याहून अप्रूप वाटते ते बद्री येथील २ रामदासी मठांचे! कारण येथुन तिबेट-चीन ची सीमा केवळ ३० किमी आहे!
आज ब-याच मठात कुणी रामदासी शिल्लक नाहीत, तर भक्तगण, अथवा ट्रस्टी तेथील कारभार, पूजाअर्चा पहातात.
परंतु पुच्छ ते मुर्डिले माथा अर्थात डोक्याहून पुढे शेपूट गेलेला पठडीतला समर्थ स्थापित हनुमान आपल्याला तो रामदासांनीच स्वहस्ते बनविलेला असल्याची खात्री देत असतो! (होय, समर्थांचे सर्व मारुती स्वहस्ते बनवलेले आहेत व त्याला माध्यमाचे वावडे नाही, अगदी शेणाचा, मेणाचा, मातीचा, शेंदराचा,लाकडाचा, दगडाचा, कशाचाही मारुती ते बनवत असल्याची इतिहासात नोंद आहे. ) असे अनेक मारुती आपणही किल्ल्यांवर, आपल्या गावात, इतरत्र पाहिले असतील! महाराष्ट्रातील ट्रेकवेड्यांना तर असे शेकडो मारुती क्षणात आठवतील!
मुळात हनुमान हे दैवतच उत्तरेतून महाराष्ट्रात आणून त्याला गावोगावच्या वेशीवर स्थापन करण्याचा मान समर्थांना जातो.समर्थपूर्व काळात मारुतीचे मराठीत स्तवन केलेले आमच्या तरी पाहण्यात अजून आलेले नाही. महाराष्ट्रात परंपरेने भैरवनाथ, देवी, दत्त, गणपती व शंकराची मंदिरे जास्त आहेत. (दक्षिणेला १२०० वर्षांपूर्वी एका हनुमान भक्ताने मारुतीला "आंजनेयस्वामी" असे नाव देऊन त्या नावाने अनेक मारुती मंदिरे स्थापिली आहेत, तेी वेगळी)
अशा अनेक स्थानांचे संशोधन केले तर आजही आपल्याला अनेक अप्रकाशित समर्थ मठांचा शोध लागणार आहे!
समर्थांच्या अनेक घळी हे देखील त्यांचे मठच होत! पैकी शिवथर घळीसारखे मठ (सुंदरमठ) आजही जोमाने कार्यरत आहेत.
या शिवाय हेळवाक घळ, मोरगिरीची घळ, चंद्रगिरीची घळ, तोंडोशीची घळ, दाढोलीची घळ अशी अनेक स्थाने आजही दुर्गम व अस्पर्शित आहेत!
मुळात समर्थ गेल्यानंतर देखील ३५०-४०० वर्षांनी या मठांचा हा काथ्याकूट कशाला? असा प्रश्न कुणास पडला तर ते स्वाभाविक आहे, व त्यामागचे कारण विषद करणे क्रमप्राप्त आहे. आपण आज जो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो तो अत्यंत तोकडा आहे. ३६ वर्षे सामरीक आयुष्य जगलेल्या या महात्म्याची केवळ २०० च्या आसपास अस्सल पत्रे उपलब्ध आहेत. बराचसा इतिहास शत्रूंनी काळाच्या उदरात गडप केलेला आहे. रायगडाच्या इंग्रजांनी जाळलेल्या दफ़्तरखान्यात अशी सर्व पत्रे नष्ट झालेलेआहेत. त्यामुळे अशा समकालीन मठात उपलब्ध असलेले अक्षरधन भारताच्या इतिहासासाठी लाख मोलाचे आहे,
असे जितके मठ सापडतील व तिथले जितके कागद पुन्हा एकदा एकत्र केले जातील तितके आपले इतिहास संशोधन पुढे पुढे जाणार आहे. या मठांचा व शिवाजी महाराजांचा किती जवळचा संबंध होता याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे चाफ़ळची सनद होय! चाफ़ळ हा समर्थ स्थापित पहिला मठ, या मठाचा सर्व खर्च स्वराज्याच्या खजिन्यातून व्हावा या अर्थाची चक्क सनद शिवरायांनी लिहून दिलेली आहे! व अशी सनद केवळ त्यांची कुलस्वामिनी प्रतापगडवासिनी भवानीमाता व चाफ़ळचे प्रभुराम याच मंदिरांना त्यांनी दिली आहे. अगदी तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, जोतिबा, करवीरनिवासिनी, आंबेजोगाई अशा तत्कालिन प्रसिद्ध देवस्थानांनाही हा मान लाभला नाही!
आज या मठांमधील हा अनमोल ठेवा वाळवी, उंदीर, घुशी, महापूर यांचे खाद्य बनून राहिलेला आहे...४०० वर्षांच्या पुढे हे कागद तग धरणे अशक्य आहे! आपण वेळीच हातपाय मारले नाहीत तर अशा फ़ार मोठ्या ठेव्यास आपण खचितच मुकणार आहोत...मुळात असे मठ, मठपती शोधणे, त्यांचे प्रबोधन करणे, या सर्व ठेव्याचे डिजिटायझेशन करणे ही आपल्या व पुढच्या पिढ्यांची आद्य कर्तव्ये आहेत.
नागपूरच्या म.रा. जोशी यांनी ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा संपादित केलेली आहे तेंव्हा त्यांना या ग्रंथांच्या ८०० हून अधीक प्रती रामदासी मठांतूनच मिळाल्याचे ते त्यांनी प्रकाशित केलेल्या दासबोधाच्या प्रस्तावनेत लिहितात. मुळात रोज काहीतरी लिहिण्याचा दंडकच समर्थांनी या मठपतींना घातलेला होता. दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥
व "मठ करोनि ताठा धरु नये" अशी अज्ञा केलेली असल्याने हे सर्व मठ कागदांनी ओतप्रोत भरलेले आहेत. त्याचा करू तितका अभ्यास थोडा आहे!
सध्या असे कार्य काही मोजके तरुण रामदासी करत आहेत उदा. मंदारबुवा रामदासी या सत्पुरुषाने देवदास स्वामींच्या दादेगाव या मठाचा जीर्णोद्धार केलेला आहे. श्रीधर रामदासी हा तरुण राम वडगाव मठातले कागद अभ्यासून जपतो आहे. प्रशांत सबनीस हा तरुण जो सज्जनगडचा सबनीस आहे, त्याचेही संशोधन चालू आहे. सचिन जहागीरदार हा कल्याण स्वामी परंपरेतील डोमगाव मठपती त्याच्या परीनं संघटन करतो आहे. नुकतेच श्री अमित चिंचपुरकर-जोशी या वेदमूर्तींनी रामदासी उत्सव पद्धती व दिनचर्या यांचे संशोधन करून एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. रमण चितळे नामक समर्थ भक्तांनी समर्थांवर व शिवरायांवर लिहिलेली बहुतांश पुस्तके आयुष्यभर गोळा करून जपली आहेत.
राजप्रसाद इनामदार हा कण्हेरी मठाचा मठपती संप्रदायाचे कामात पुन्हा अग्रेसर झालेला आहे, परंतु हि उदाहरणे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी कमी आहेत.
समर्थांच्या आदेशाचेच पालन करायचे असेल तर
मराठा तितुका मेळवावा । आपुला "महाराष्ट्र धर्म" वाढवावा ।
ये विषयीं न करितां तकवा । पूर्वज हासतीं ॥
किंवा
आहे तितुके जतन करावे । पुढे आणखी मेळवावे ।
"महाराष्ट्र राज्य" करावे । जिकडे तिकडे ॥
हे उपदेश आपण ध्यानी घेणे आवश्यक आहे!
सदर लेख वाचून एका जरी व्यक्तीस वरील संकेतस्थळावर जाऊन तेथील मठपतींची यादी काढून, त्यातील आपल्या जवळचा मठ कुठला हे शोधून, तेथील हस्तलिखितांचे जतन, संवर्धन करता आले तर या लेखनप्रपंचाचे सार्थक झाले असे मानता येईल किमानपक्षी आपल्या माहितीतले, ऐकिवातले , गावातले असे मठ जरी आम्हास कळविले (dasbodh.com@gmail.com) तरी ते फार मोठे कार्य होणार आहे!
!! जय जय रघुवीर समर्थ !!
-www.dasbodh.com
नमस्कार! एक इतिहास अभ्यासक व "विमुक्त भटका" या नात्याने हे लिखाण करीत आहे. (समर्थ भक्त या नात्याने नव्हे!)
रामदासी संप्रदायामध्ये समर्थांनी ११११ किंवा ११०० रामदासी मठ संपूर्ण भारतभर स्थापन केले असे सांगितले जाते.
कुणालाही प्रथम ऐकताना हे विधान १११ % अतिशयोक्त वाटू शकते. हे ११११ नक्की काय गौडबंगाल आहे?खरेच असे मठ आहेत का?असतील तर कुठे कुठे आहेत हे मठ? सध्या काय स्थितीत आहेत?
पाहुयात! मुळात ११०० हा आकडा खरा की ११११? ११११ या आकड्यामागे एक कारणपरंपरा आहे. "समर्थ रामदासांच्या लिखाणात अनेक कोडी आढळतात व ती सोडवणे हे येणा-या पिढीतील तरुणांपुढचे मुख्य काम आहे." असे समर्थहृदय शंकर श्रीकृष्ण देव म्हणत असत. हे तेच देव ज्यांनी समर्थांच्या अनेक मठांमध्ये फ़िरून लाखो कागद गोळा करून समर्थांचे सर्व लिखाण प्रकाशित केले व हे सर्व महत्वाचे कागद-दस्त धुळ्याला स्वत:च्या राहत्या घराची जागा दान देऊन एक संस्था उभी करून तिथे जतन करून ठेवले, आजही ते समर्थ वाग्देवता मंदिर धुळ्याला उभे आहे. असो.
तर अशाच एका रचनेत समर्थ लिहितात,
अक्रा अक्रा बहु अक्रा। काय अक्रा कळेचिना।
गुप्त ते गुप्त जाणावे। अनंदवनभूवनी॥
या वरून पुढे संप्रदायात समर्थ त्यांनी विस्तारलेल्या हजारहून अधीक मठांच्या जाळ्याबद्द्ल तर बोलत नाहीत ना, अशा शंकेने हा आकडा ११११ मठ असा सांगितला जाऊ लागला. कारण तत्कालीन "भारतवर्षात" (ज्यात अफ़गाणिस्तान, पकिस्तान, बलुचिस्तान, इराण पासून हे ब्रह्मदेश, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, लंका हा सर्व प्रांत गणला जात असे.) समर्थांनी जागोजागी आपले काही शिष्य (सांप्रदायिक आकडा अर्थातच ११!) पाठवून त्यांना तिथे मठस्थापना करावयास लाविली होती. या मठातून रामभक्तीचा प्रसार, प्रचार व अन्य अनेक उत्सवादी चालत जेणॆकरून तत्कालीन हिंदू समाजाला एकत्र येण्यास कारण मिळत असे.
"गुप्त ते गुप्त जाणावे" असे का? तर या मठांमधून खरोखरीच अध्यत्म प्रसाराखेरीज अजून बरीच कार्ये चालत असत असे खात्रीशीरपणे सांगता येते.
शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे व या मठांचे काहीतरी संबंध नक्की असणार अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे कारण परप्रंतात, परभाषीय प्रदेशात आपला स्वभाषीय व स्वविचारांचा व बलदंड मनुष्य मिळणे, ज्याला त्या प्रांताची, तिथल्या भूगोलाची, माणसांची, भाषेची, रीतिरिवाजांची खडान खडा माहिती असेल, तसेच हक्काचा आसरा, निवारा मिळणे हे गुप्तहेरांच्या दृष्टीने स्वर्ग प्राप्त झाल्याप्रमाणेच आहे!
एक महत्वाची नोंद, या लेखात मी वैयक्तिक भेट देऊन पाहिलेल्या, अनुभवलेल्या वा या ना त्या मार्गाने संपर्कित झालेल्या मठांबद्दलच केवळ लिहिणार आहे. अशा मठांची तिथल्या मठपतींची, त्यांच्या भाषांकासह, पत्ता व इमेल आयडीसह एक यादी प्रस्तुत लेखकाने तयार केलेली असून ती दासबोध.कॉम या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या लेखाच्या निमित्ताने अशा अंधारात राहिलेल्या अजून काही मठांबद्दल माहिती वाचकांकडून कळली, व ती यादी अधीक परिपूर्ण झाली तर ती हवीच आहे! असो.
आज या मठांची स्थिती काय आहे? याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की आजही (इ.स. २०१६) असे २५० हून अधीक रामदासी मठ पूर्ण भारतभर कार्यरत आहेत! महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगण, कर्नाटक, गुजराथ, तमिळनाडू उत्तरांचल, राजस्थान इ. राज्यांत आज २०१६ साली देखील हे मठ आढळतात.
मुळात मठ म्हणजे काय ते ध्यानात घ्यावे. मठ म्हणजे दर वेळॆस एखादा टोलेजंग वाडा व त्यात अतिभव्य देवालय, धावपळ करणारी शिष्य मंडळी इ. असेलच असे नाही. समर्थांच्या बहुतांश मठांत श्रीरामाचे, मारुतीचे अथवा पांडुरंगाचे मंदिर असते. (होय पांडुरंगाचे मंदिर! असेही मठ आहेत! उदा. मेथवडे मठ, अमळनेर-भांड्याचे इथला मठ इ.) परंतु बरेचसे मठ आज वेगळया स्थितीत आहेत. काही मठ अक्षरश: पैशाअभावी पडझड होऊन नष्ट पावले आहेत, पावत आहेत, तर काही मठांमध्ये तर कोट्यावधी रुपयांची जीर्णोद्धाराची कार्ये सुरु आहेत उदा. मिरज वेण्णास्वामी मठ, हनुमानटाकळीचा मठ इ.
काही मठाना ब्रह्मचारी परंपरा असल्याने त्यांचे नावावर आजही शेकडो एकर जमिनी आहेत. तर एकीकडे संसारी मठपतींमध्ये भावाभावात वाटण्या होऊन अनेक मठांना शिवकाळात व मराठेशाहीत मिळालेल्या जमिनी आज त्यांचे नावावर नाहीत.अनेक जमिनी कुळकायद्यात गेलेल्या आहेत. अनेक मठ गांधी हत्येनंतर जाळून खाक झालेले आहेत. (जातीयवाद्यांसाठी माहिती: समर्थांचे मठपती सर्वजातीय होते, आजही शिरवळचे तांबे महाराज यांचे मराठा वंशज मठ पहातात. किंवा मसूरचा मठ पवार नामक एक वृद्ध स्त्री सांभाळते ) काही मठांमध्ये अठरा विशे दारिद्रय आहे, इतके की मठपतीलाही २ वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तर काही मठात रोज लाखो लोकांना अन्नदान होते आहे (उदा. गोंदवले मठ, सज्जनगड मठ) तरीदेखील आपल्या घराण्यातील ही रामदासी परंपरा अनेक रामदासीनी यथानुशक्ती, यथामती कसोशीने जपली आहे. टिकवली आहे, वर्धिष्णू केलेली आहे.
काही मठांवर वारकरी मठपती आहेत (उदा. निजामाबाद मठ, इंदुर बोधन मठ ) तर काही मठांमध्येच सज्जनगड ते पंढरपूर आषाढी/कार्तिकी वारीची परंपरा आहे, उदा. पंढरपूर येथील 3 मठ.
समर्थशिष्य गिरीधर स्वामी यांनी त्यांच्या श्री समर्थप्रताप या ग्रंथात वरीलपैकी काही मठांची यादीच दिलेली आहे, त्यावरून केलेला भूमान (नकाशा) सोबत दिलेला आहेच. परंतु याहून अधीक रामदासी मठ खात्रीशीरपणे आजही जिवंत आहेत! कशावरून? सांगतो! सध्या समर्थस्थापित मठांची नक्की स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याच्या हेतून श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड या रामदासी सांप्रदायाच्या मातृसंस्थेने २०१० साली पहिले रामदासी मठपती सम्मेलन सज्जनगडावर आयोजित केले होते व आता प्रतिवर्षी त्याचे आयोजन होते आहे. या सम्मेलनाला दर वेळेस नवनवे मठपती उपस्थिती लावत आहेत! व या सर्वांचे मत एकच आहे! या सर्वांना असेच वाटत होते की आता रामदासी संप्रदाय जवळपास संपलाच आहे ! आपल्याच घरी, आपणच काय ते रामदासी परंपरा टिकवून ठेवलेली आहे व ती आमरण ठेऊच..परंतु जसे त्यांना कळले की अरे, अन्यही मठ जिवंत आहेत, नव्हे नव्हे जोमाने कार्य करीत आहेत, तेंव्हा हे लक्षात आल्यावर त्यांना काय आनंद झाला असेल कल्पना करून पहा!
आपण एकटे नाहीत, ही भावना विषेशत: सांप्रदयिकांना फ़ार सुखावणारी असते, हुरूप देणारी, बळ देणारी, उभारी देणारी असते. याचे उत्तम उदाहरणा म्हणजे दक्षिणेकडील मठ!
आजही तंजावर सारख्या अति दक्षिणेकडील राज्यात समर्थांचे ६ मठ पूर्ण शक्तीने कार्यरत आहेत! व समर्थ शिष्यांची समाधी मंदिरे इ. पकडता एकून १४ रामदासी स्थाने तिथे आजही उभी आहेत! हे सर्व लोक उत्तम मराठी भाषा आजही लिहितात, वाचतात, बोलतात हे किती विशेष आहे!
आशिया खंडातील अति भव्य ग्रंथालयांपैकी एक व तंजावरकर भोसले घराण्याचा खाजगी ग्रंथसंग्रह असलेले "श्री सरस्वती महाल ग्रंथालय" येथील मराठी विभागप्रमुख म्हणून गेली अनेक दशके भीमराज गोस्वामी हे रामदासी मठपतीच होते! व आजही रामचंद्रबुवा केसकर हे रामदासी मठपतीच ती धुरा समर्थपणे पेलत आहेत! रामचंद्र हे तंजावरी मोडीचे एकमेव तज्ञ असून त्यांनी दक्षिणेत समर्थ संप्रदाय टिकावा म्हणून अत्यंत भरीव योगदान दिलेले आहे. आजही शिवरायांच्या तंजावर गादीतील वंशजांचे व या मठपतींचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत! तंजावरचे भोसले घराण्यातील वंशज आजही दासबोध वाचतात हे प्रस्तुत लेखकाला स्वत: वंशजांनीच सांगितलेले आहे!
मराठ्यांच्या इतिहासाची अनेक दुर्मिळ कागदपत्रे या ग्रंथालयात अभ्यासकांची वाट पहात धूळ खात पडून आहेत! तिथे जाऊन कुणाला याचा अभ्यास करावयाचा असल्यास कुठल्याही समर्थ मठात निवास व अन्य अभ्यासाची सोय आज ३५० वर्षांनीही होऊ शकते! रामेश्वरचे मठपतीही दरवर्षी न चुकता सज्जनगडावर येतात. मण्णारगुड्डी मठ देखील असाच मोठा मठ आहे.
समर्थांची अनेक अस्सल तैलचित्रे तंजावरकर भोसले घराण्याच्या संग्रहात आहेत.
या शिवाय आंध्र-तेलंगणात समर्थांचे ६५ मठ आज शिल्लक आहेत. पैकी निजामाबाद, इंदुर-बोधन, जुक्कल इ. मठ फ़ारच भव्य आहेत व जोमाने कार्य करीत आहेत. जुक्कल येथून तर दर वर्षी दासनवमीला जुक्कल ते सज्जनगड अशी शेकडो तेलुगु समर्थभक्तांची पदयात्रा येते! या मठातील कोणत्याही कार्यक्रमाला किमान ३-४ हजार लोकांची उपस्थिती असतेच असते.
येथील केशव रामदासी मठपती अत्यंत तरुण व उच्चविद्याविभूषित असून त्यांनी स्थानिक तरुणांचे मोठे संघटन उभे केलेले आहे.
कर्नाटकात आज ३६ मठ शिल्लक आहेत (नोंद झालेले) व या प्रत्येक मठाने समर्थ साहित्याचे स्थानिक भाषेत भाषांतर केलेले आहे हे वेगळे सांगणॆ नलगे!
ग्वाल्हेर मठ हा देखील अत्यंत मोठा मठ असून तिथे अनेक कार्यक्रम आजही होत असतात. ज्योतिरादित्य शिंदेंसह सर्व शिंदे सरकार घराण्यातील लोक या मठात "शिवछत्रपतींची गुरुगादी" म्हणून दर्शनाला आवर्जुन येतात. उपेंद्र महाराज शिरगांवकर हे तेथील कार्यभाग बघतात व त्यांच्या समर्थ प्रेस च्या माध्यमातून त्यांनी रामदासांचे सर्व लिखाण हिंदी भाषेत नेलेले आहे! हिंदी भाषकांना ओवी वृत्त फ़ारसे भावत नाही हे पाहून नुकताच त्यांनी दोहाबद्ध दासबोध प्रकाशित करण्यास घेतला आहे!
जयपूर, उदयपूर हे असेच जुने रामदासी मठ! पण त्याहून अप्रूप वाटते ते बद्री येथील २ रामदासी मठांचे! कारण येथुन तिबेट-चीन ची सीमा केवळ ३० किमी आहे!
आज ब-याच मठात कुणी रामदासी शिल्लक नाहीत, तर भक्तगण, अथवा ट्रस्टी तेथील कारभार, पूजाअर्चा पहातात.
परंतु पुच्छ ते मुर्डिले माथा अर्थात डोक्याहून पुढे शेपूट गेलेला पठडीतला समर्थ स्थापित हनुमान आपल्याला तो रामदासांनीच स्वहस्ते बनविलेला असल्याची खात्री देत असतो! (होय, समर्थांचे सर्व मारुती स्वहस्ते बनवलेले आहेत व त्याला माध्यमाचे वावडे नाही, अगदी शेणाचा, मेणाचा, मातीचा, शेंदराचा,लाकडाचा, दगडाचा, कशाचाही मारुती ते बनवत असल्याची इतिहासात नोंद आहे. ) असे अनेक मारुती आपणही किल्ल्यांवर, आपल्या गावात, इतरत्र पाहिले असतील! महाराष्ट्रातील ट्रेकवेड्यांना तर असे शेकडो मारुती क्षणात आठवतील!
मुळात हनुमान हे दैवतच उत्तरेतून महाराष्ट्रात आणून त्याला गावोगावच्या वेशीवर स्थापन करण्याचा मान समर्थांना जातो.समर्थपूर्व काळात मारुतीचे मराठीत स्तवन केलेले आमच्या तरी पाहण्यात अजून आलेले नाही. महाराष्ट्रात परंपरेने भैरवनाथ, देवी, दत्त, गणपती व शंकराची मंदिरे जास्त आहेत. (दक्षिणेला १२०० वर्षांपूर्वी एका हनुमान भक्ताने मारुतीला "आंजनेयस्वामी" असे नाव देऊन त्या नावाने अनेक मारुती मंदिरे स्थापिली आहेत, तेी वेगळी)
अशा अनेक स्थानांचे संशोधन केले तर आजही आपल्याला अनेक अप्रकाशित समर्थ मठांचा शोध लागणार आहे!
समर्थांच्या अनेक घळी हे देखील त्यांचे मठच होत! पैकी शिवथर घळीसारखे मठ (सुंदरमठ) आजही जोमाने कार्यरत आहेत.
या शिवाय हेळवाक घळ, मोरगिरीची घळ, चंद्रगिरीची घळ, तोंडोशीची घळ, दाढोलीची घळ अशी अनेक स्थाने आजही दुर्गम व अस्पर्शित आहेत!
मुळात समर्थ गेल्यानंतर देखील ३५०-४०० वर्षांनी या मठांचा हा काथ्याकूट कशाला? असा प्रश्न कुणास पडला तर ते स्वाभाविक आहे, व त्यामागचे कारण विषद करणे क्रमप्राप्त आहे. आपण आज जो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो तो अत्यंत तोकडा आहे. ३६ वर्षे सामरीक आयुष्य जगलेल्या या महात्म्याची केवळ २०० च्या आसपास अस्सल पत्रे उपलब्ध आहेत. बराचसा इतिहास शत्रूंनी काळाच्या उदरात गडप केलेला आहे. रायगडाच्या इंग्रजांनी जाळलेल्या दफ़्तरखान्यात अशी सर्व पत्रे नष्ट झालेलेआहेत. त्यामुळे अशा समकालीन मठात उपलब्ध असलेले अक्षरधन भारताच्या इतिहासासाठी लाख मोलाचे आहे,
असे जितके मठ सापडतील व तिथले जितके कागद पुन्हा एकदा एकत्र केले जातील तितके आपले इतिहास संशोधन पुढे पुढे जाणार आहे. या मठांचा व शिवाजी महाराजांचा किती जवळचा संबंध होता याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे चाफ़ळची सनद होय! चाफ़ळ हा समर्थ स्थापित पहिला मठ, या मठाचा सर्व खर्च स्वराज्याच्या खजिन्यातून व्हावा या अर्थाची चक्क सनद शिवरायांनी लिहून दिलेली आहे! व अशी सनद केवळ त्यांची कुलस्वामिनी प्रतापगडवासिनी भवानीमाता व चाफ़ळचे प्रभुराम याच मंदिरांना त्यांनी दिली आहे. अगदी तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, जोतिबा, करवीरनिवासिनी, आंबेजोगाई अशा तत्कालिन प्रसिद्ध देवस्थानांनाही हा मान लाभला नाही!
आज या मठांमधील हा अनमोल ठेवा वाळवी, उंदीर, घुशी, महापूर यांचे खाद्य बनून राहिलेला आहे...४०० वर्षांच्या पुढे हे कागद तग धरणे अशक्य आहे! आपण वेळीच हातपाय मारले नाहीत तर अशा फ़ार मोठ्या ठेव्यास आपण खचितच मुकणार आहोत...मुळात असे मठ, मठपती शोधणे, त्यांचे प्रबोधन करणे, या सर्व ठेव्याचे डिजिटायझेशन करणे ही आपल्या व पुढच्या पिढ्यांची आद्य कर्तव्ये आहेत.
नागपूरच्या म.रा. जोशी यांनी ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा संपादित केलेली आहे तेंव्हा त्यांना या ग्रंथांच्या ८०० हून अधीक प्रती रामदासी मठांतूनच मिळाल्याचे ते त्यांनी प्रकाशित केलेल्या दासबोधाच्या प्रस्तावनेत लिहितात. मुळात रोज काहीतरी लिहिण्याचा दंडकच समर्थांनी या मठपतींना घातलेला होता. दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥
व "मठ करोनि ताठा धरु नये" अशी अज्ञा केलेली असल्याने हे सर्व मठ कागदांनी ओतप्रोत भरलेले आहेत. त्याचा करू तितका अभ्यास थोडा आहे!
सध्या असे कार्य काही मोजके तरुण रामदासी करत आहेत उदा. मंदारबुवा रामदासी या सत्पुरुषाने देवदास स्वामींच्या दादेगाव या मठाचा जीर्णोद्धार केलेला आहे. श्रीधर रामदासी हा तरुण राम वडगाव मठातले कागद अभ्यासून जपतो आहे. प्रशांत सबनीस हा तरुण जो सज्जनगडचा सबनीस आहे, त्याचेही संशोधन चालू आहे. सचिन जहागीरदार हा कल्याण स्वामी परंपरेतील डोमगाव मठपती त्याच्या परीनं संघटन करतो आहे. नुकतेच श्री अमित चिंचपुरकर-जोशी या वेदमूर्तींनी रामदासी उत्सव पद्धती व दिनचर्या यांचे संशोधन करून एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. रमण चितळे नामक समर्थ भक्तांनी समर्थांवर व शिवरायांवर लिहिलेली बहुतांश पुस्तके आयुष्यभर गोळा करून जपली आहेत.
राजप्रसाद इनामदार हा कण्हेरी मठाचा मठपती संप्रदायाचे कामात पुन्हा अग्रेसर झालेला आहे, परंतु हि उदाहरणे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी कमी आहेत.
समर्थांच्या आदेशाचेच पालन करायचे असेल तर
मराठा तितुका मेळवावा । आपुला "महाराष्ट्र धर्म" वाढवावा ।
ये विषयीं न करितां तकवा । पूर्वज हासतीं ॥
किंवा
आहे तितुके जतन करावे । पुढे आणखी मेळवावे ।
"महाराष्ट्र राज्य" करावे । जिकडे तिकडे ॥
हे उपदेश आपण ध्यानी घेणे आवश्यक आहे!
सदर लेख वाचून एका जरी व्यक्तीस वरील संकेतस्थळावर जाऊन तेथील मठपतींची यादी काढून, त्यातील आपल्या जवळचा मठ कुठला हे शोधून, तेथील हस्तलिखितांचे जतन, संवर्धन करता आले तर या लेखनप्रपंचाचे सार्थक झाले असे मानता येईल किमानपक्षी आपल्या माहितीतले, ऐकिवातले , गावातले असे मठ जरी आम्हास कळविले (dasbodh.com@gmail.com) तरी ते फार मोठे कार्य होणार आहे!
!! जय जय रघुवीर समर्थ !!
-www.dasbodh.com
वाचन
32274
प्रतिक्रिया
0