मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकेकाचे जगणे

पथिक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुणाला कशाची पडलेली असते अन कुणाला कशाची कुणाला काय भावतं अन कुणाला काय कुणाला काय सलतं अन कुणाला काय अन ज्याला जे भावतं, जे सलतं त्याला तेच महत्वाचं वाटतं …. कुठे 'गोली मार भेजे में' कुठे 'जिस्म' कुठे 'जय जय राम कृष्ण हरी' कुठे 'जय हिंद' कुठे 'गांधीगिरी' कुठे 'नथ्थुराम' कुठे काय नि कुठे काय या ना त्या प्रकारे घेतो प्रत्येकजण जगणे मोल कुठे सोनेरी कुठे बिलोरी कुठे बेगडी …. पण प्रत्येकाने मोजलेली किंमत मात्र असते अस्सल - रक्ताची अश्रूंची हृदयाची आत्म्याची

वाचने 1377 वाचनखूण प्रतिक्रिया 7

निनाव 13/09/2016 - 01:17
प्रिय पथिक, कविता छानच आहे. विषय अगदी वेगळा आहे, मा.ड्णि देखिल मुक्त आहे. प्रत्येक कविता मीटर मधेच असावी असा काही नियम नाही. लिहीत रहा. हे महत्वचे. मि.पा सर्वा.न्साठी आहे. मला देखिल मराठी टयपिन्ग नवीन आहे. वरील कवि / वाचक वर्गा.न्चे प्रतिसाद - केवळ सकारात्म्क घेणे. असे समजावे कि त्यअन्ना तुम्हा कडून अजून छान येणे अपेक्शित आहे. :) पुढिल लेखनास शुभेछा.