मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(इच्छा अधूरी..)

नीलमोहर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शून्य मनाने बसलो होतो अंधारात आला तो तिकडून! सांगितले खुणावत येतीय भेटाया तुला! किती आसुसलो मी! निव्वळ चखण्यावर न भागणार एकेका घोटा तहानलो मी! आज आस सारी मिटणार दिसली ती नजरेस बनली जी माझी होण्यासाठी! आता रिता झाला गिलास नवा पेग भरून घेण्यासाठी! थांब बे पेताडा मालक गरजला! बिल भरशील? पेग भराया निघाला! सा* गरिबी आड आली क्वार्टरही हाती न लागली! खंबा लावायची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! बाटली गेली माघारी बेवड्याचा संताप झाला! आणि दारू सोडून बेवडा बार बाहेर निघाला! ___________________ प्रेरणा: __/\__ ** डेडपूल, प्रथम तर इतक्या सुरेख संकल्पनेचे बारा वाजवल्याबद्दल माफी असावी. मात्र एखाद्या रचनेचे विडंबन म्हणजे ती रचना उत्तम असल्याची पावती असते (आणि नाईलाजास इलाज नसतो ;) तेव्हा कृपया राग मानू नये. धन्यवाद.

वाचने 2379 वाचनखूण प्रतिक्रिया 10

नीमो अतिशय झकास जमले आहे विडंबन. बाटली गेली माघारी बेवड्याचा संताप झाला! आणि दारू सोडून बेवडा बार बाहेर निघाला! अगदी दणदणीत एंड जमलाय.

In reply to by टवाळ कार्टा

प्रचेतस 03/05/2016 - 14:21
लीलाधर हे विडंबने करीत नसतात. त्यांची स्वतंत्र प्रतिभा फळा, कट्ट्यावरी, साय, आण्णा, किसमिस अशा विविध रुपांनी बाहेर पडत असते.