आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने?
मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी? फक्त आर्थिक दुर्बलांना किंवा मागासलेल्या जातींना सधन करण्यासाठी?
आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये?
आश्चर्य वाटतं- पण तितक्याच वेदना होतात! जर हे आरक्षण आर्थिक दुर्बलांना सधन करण्यासाठी असतं तर मग सरकार गरीबांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा दारिद्ररेषेखालील लोकांसाठी जे विविध उपाय-योजना आखत असतं ते कुठल्या नियमानं करत असतं?
आणि मुळात आरक्षण हे जातीवरच भर देणारं का आहे?
कोण विचार करतं याचा? कोणीच नाही!
फक्त प्रश्न आला कि एकच उत्तर- आरक्षण बंद करा! बस्स.
संपलं?
आपण फँड्री सिनेमा बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?... सगळं शांत!
का बरं असं?
का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठीइतकाच मर्यादित असतो का?
एक किस्सा सांगतो- काल्पनिक नाही कालचाच घडलेला आहे. कोणाचं नाव इथं सांगत नाही मी, फक्त चौघा मित्रांत झालेली चर्चा मी इथे देतो. कदाचित मी हा मुद्दा का सांगतोय हे अधिक स्पष्ट होईल.
"अरे उसमें तो ९५ मे आडमिशन हो जाता है|"
"ह्यॅ! किसने कहाँ?"
"सच में, अगर तू कास्टवाला रहेगा ना तो तेरा अॅडमिश आराम से हो जाएगा.."
"अच्छा- उसके लिए ना? मुझे लगा अपनी बात कर रहा है तू|"
"अरे SC के लिए तो ८५% है! पता है?"
"कौन वो भंगी?"
"नही SC वाला"
"वही- भंगी! साला यहाँ पे हमें अॅडमिशन मिलता नहीं और इन भिखारी को मुफ्त का मिल जाता है!"
"कुछ भी बोल- लेकीन जो है- वो है|"
"क्या फालतू में, इनको सर चढाती है गवर्नमेंट? हर जगह इनको रिझर्वेशन चाहीए होता है|"
(तिसरा) "हर जगह नही होता- XXXXX कॉलेज में तो SC हो, तो भी ९० का कट ऑफ है|"
"वो एक जगह हुई, लेकिन बाकीके जगह पे तो ये भिखमंगे आते ही है ना?"
"देख तू कास्ट के बारें में ऐसा नही बोल सकता"
"क्यु- मुझे क्या किसी का डर है क्या? मै तो कॉलेजमें और बाहर भी उनको भंगी ही बुलाता हूँ"
"देख ***** तू यहीं बात किसी कास्टवाले के सामने कहेगा ना, तो वो सीधे तुम्हारे उपर केस कर देगा|"
"तू क्यु इतना डर रहा है?"
"डरने का सवाल नहीं- मेरे साथ ऐसा हुआ है, इसलिए मै बोल रहा हूँ|"
"मुझे तो इतना गुस्सा आता है ना इनके उपर"
"गुस्सा तो मुझे भी आता है- लेकीन हम कुछ नही कर सकते, लॉ ही ऐसा है| तू बाकी जगह पें उनकों कितनी भी गालियाँ दे, तुझे कोई नही रोकेगा, पर पब्लिक प्लेस में तू ऐसा नही बोल सकता|"
"लेकीन इनको रिझर्वेशन देते क्यु है?"
"देख- असली रिझन तो मुझे भी नही पता, लेकीन इसी वजह से वो आगे निकल जाते है|"
"साला, इनका रिझर्वेशनही पुरा बंद करना चाहीए| जरुरत ही क्या है इनकों रिझर्वेशन देने कि?"
"जाने दे नं, वैसे भी करेंगे क्या वो रिझर्वेशन लेके? गाँव जाके हल ही चलाऐंगे!"
या वाक्यावर सगळेजळ हसायला लागले.
थोड्या वेळानंतर पहिला मुलगा निघून गेला. जाताना पुन्हा त्याने तसं ओपनली बोलू नको म्हणून त्या मुलाला बजावलं. पण त्या मुलाला मात्र त्याचं बोलणं पटलं नाही. तो त्याच मुद्द्यावर आपल्या दुसर्या मित्राबरोबर बोलायला लागला..
"क्या डरता है रे ये? भंगी को भंगी नही बोलेंगे तो क्या बोलेंगे?"
"वो बहोत डरपोक है|"
"नहीं तो क्या? हमारे गाँव में तो ये लोग पहले कचरा उठाते थे, पता है? कोई भाव नहीं देता इन्हें"
त्याचा मित्र नुसताच कुचेष्टेने हसला-
"कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि...
अरे बैठना तो दूर ये लोक- यही एस सी वाले- हमारे सामने से जाते वक्त चप्पल भी पहनके नही जा सकते!"
ही संपुर्ण चर्चा ऐकल्यावरही समाजातून जात हा प्रकार कायमचा नष्ट झाला आहे असं वाटतं का?
आंम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं त्यात एक डायलॉग होता-"जात नाही ती जात!"
जात
दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो!
पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती?
याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.
एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात?
अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही!
आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती, त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे, ऑफिसात काम करत असताना ते एका चपराश्याला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो! यावेळी आंबेडकरांचं पद- त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किंमतीचं नसतं! तो तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवतो.
असा एकच नाही- अनेक प्रसंग आंबेडरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मुळ धरत गेली.
पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो.
कारण-
त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच!
बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत!
त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....
वाचने
72961
प्रतिक्रिया
374
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज काल सगळे रोहीत शर्मा झाले
कित्येक कायदेतज्ञ असतील ?
हम्म
In reply to कित्येक कायदेतज्ञ असतील ? by माहितगार
मागे मी टाकलेल्या या
बराय. :)
In reply to मागे मी टाकलेल्या या by अत्रुप्त आत्मा
नाही कसं अन्नूशेट? आहो
In reply to बराय. :) by अन्नू
मला एक समजत नाही. आरक्षण
In reply to नाही कसं अन्नूशेट? आहो by अत्रुप्त आत्मा
शिवाय एक गोष्ट इथे आवर्जुन
In reply to मला एक समजत नाही. आरक्षण by अन्नू
सह्मत
In reply to शिवाय एक गोष्ट इथे आवर्जुन by प्रसाद१९७१
+१
In reply to सह्मत by नया है वह
आणि
In reply to सह्मत by नया है वह
ब्राह्मण १९४८ सालीच शहाणे
In reply to शिवाय एक गोष्ट इथे आवर्जुन by प्रसाद१९७१
बंधो, परत एकदा आरक्षण! तेव्हा
लेखक वा संपादक मंडळाला विनंती
धन्यवाद. पण
In reply to लेखक वा संपादक मंडळाला विनंती by उगा काहितरीच
जात नाही ती जात
ख चांगला आहे. समाजात वावरताना
ह्म्म .. !
असं कसं काय ? काहीच्या काय
In reply to ह्म्म .. ! by विटेकर
आरक्षणाने
In reply to असं कसं काय ? काहीच्या काय by अविनाश लोंढे.
म्हणूनच तर मी वर म्हटले आहे
In reply to आरक्षणाने by विटेकर
मनूने केलेल्या 'आरक्षणामुळे'
In reply to म्हणूनच तर मी वर म्हटले आहे by अन्नू
मनूने काय आरक्षण केलं?
In reply to मनूने केलेल्या 'आरक्षणामुळे' by अविनाश लोंढे.
कायदा करून जात जात नाही
In reply to ह्म्म .. ! by विटेकर
मानसिकता बदलायला हवी
In reply to कायदा करून जात जात नाही by अन्नू
आरक्षणाने उच्च जातितील योग्य
In reply to मानसिकता बदलायला हवी by पंतश्री
जरी बोलणार्याला
In reply to आरक्षणाने उच्च जातितील योग्य by अन्नू
असे काही करता येणार नाही का
In reply to जरी बोलणार्याला by प्रसाद१९७१
असे काही करता येणार नाही का
In reply to जरी बोलणार्याला by प्रसाद१९७१
पण जर त्यांची आर्थिक स्थिती
In reply to असे काही करता येणार नाही का by अन्नू
आरक्षणाची गरज
... ही आहे मानसीक गुलामगिरी
In reply to आरक्षणाची गरज by अविनाश लोंढे.
उच्च अन नीच
In reply to ... ही आहे मानसीक गुलामगिरी by अन्नू
क्रीमी लेयर सर्व आरक्षीत
In reply to उच्च अन नीच by अविनाश लोंढे.
being practical
In reply to क्रीमी लेयर सर्व आरक्षीत by सुबोध खरे
क्रिमी लेयरची योग्य मर्यादा
In reply to क्रीमी लेयर सर्व आरक्षीत by सुबोध खरे
लेखातलं एक गृहीतक साफ चुकलंय
घटनेत आरक्षणाची तरतूद त्यांना
In reply to लेखातलं एक गृहीतक साफ चुकलंय by गामा पैलवान
आंबेडकरांचे विचार विकसित होत होते
In reply to घटनेत आरक्षणाची तरतूद त्यांना by अन्नू
पुढे घटना लिहितांना (१९४७ ते
In reply to आंबेडकरांचे विचार विकसित होत होते by गामा पैलवान
आरक्षण स्वातंत्र्योत्तर सुरू झालेय.
In reply to पुढे घटना लिहितांना (१९४७ ते by अन्नू
१९५० सालापर्यंत... त्या
In reply to आरक्षण स्वातंत्र्योत्तर सुरू झालेय. by गामा पैलवान
आरक्षण अजुनही गरजेचे आहे! खुप
दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द
संधी कमी झाल्या असे कोण बोलले
In reply to दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द by श्रीगुरुजी
नाही कॉर्पोरेट मधे यशस्वी
In reply to संधी कमी झाल्या असे कोण बोलले by कैलासवासी सोन्याबापु
आता कमी जागा उपलब्ध आहेत.
In reply to नाही कॉर्पोरेट मधे यशस्वी by श्रीगुरुजी
घटनेत आरक्षण ९० टक्के तर
In reply to आता कमी जागा उपलब्ध आहेत. by अन्नू
पण
In reply to घटनेत आरक्षण ९० टक्के तर by श्रीगुरुजी
अर्थात राखीव जागा ठेवल्याचा
In reply to दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द by श्रीगुरुजी
+१
In reply to अर्थात राखीव जागा ठेवल्याचा by संदीप डांगे
संधी कमी होणे
In reply to अर्थात राखीव जागा ठेवल्याचा by संदीप डांगे
लोकसंख्येच्या प्रमाणात चांगली
In reply to संधी कमी होणे by चैतन्य ईन्या
ह्म्म
In reply to लोकसंख्येच्या प्रमाणात चांगली by संदीप डांगे
चैतन्य साहेब,
In reply to ह्म्म by चैतन्य ईन्या
नेमक्या कुठल्या सीट्स कमी
In reply to चैतन्य साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
नुसते महाविद्यालय उत्तम असुन
In reply to नेमक्या कुठल्या सीट्स कमी by श्रीगुरुजी
बाप्पु - तुमची उदाहरणे ही
In reply to नुसते महाविद्यालय उत्तम असुन by कैलासवासी सोन्याबापु
अपवाद उदाहरण होऊ शकत नाही हे
In reply to बाप्पु - तुमची उदाहरणे ही by प्रसाद१९७१
पेडगाव ट्रीप चालू देत
In reply to अपवाद उदाहरण होऊ शकत नाही हे by कैलासवासी सोन्याबापु
बापु आणि डांगे, तुम्ही
In reply to पेडगाव ट्रीप चालू देत by चैतन्य ईन्या
एक ता.क.
In reply to बापु आणि डांगे, तुम्ही by कैलासवासी सोन्याबापु
बापू जावू द्यात
In reply to एक ता.क. by कैलासवासी सोन्याबापु
मुद्दा मांडलाच आहे तर सांगतो.
In reply to चैतन्य साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
मला असलेले मार्क आणि मिळू
In reply to ह्म्म by चैतन्य ईन्या
डांगे साहेब - ब्राम्हणांनी (
In reply to लोकसंख्येच्या प्रमाणात चांगली by संदीप डांगे
उलट आहे
In reply to डांगे साहेब - ब्राम्हणांनी ( by प्रसाद१९७१
+1
In reply to अर्थात राखीव जागा ठेवल्याचा by संदीप डांगे
४०-४५ टक्के आरक्षणामुळे तीन
In reply to अर्थात राखीव जागा ठेवल्याचा by संदीप डांगे
अशी अपेक्षा कशाला हवी? संधी
In reply to ४०-४५ टक्के आरक्षणामुळे तीन by श्रीगुरुजी
या १ लाख कॉलेजपैकी फक्त
In reply to अशी अपेक्षा कशाला हवी? संधी by संदीप डांगे
जागांचाच प्रश्न आहे ना? मग
In reply to या १ लाख कॉलेजपैकी फक्त by श्रीगुरुजी
घसरलात संघावर ?
In reply to जागांचाच प्रश्न आहे ना? मग by संदीप डांगे
मा. संपादक महाशय,
In reply to घसरलात संघावर ? by विटेकर
सोन्याबापु
In reply to मा. संपादक महाशय, by कैलासवासी सोन्याबापु
ही बघा एक न्यूज़
In reply to सोन्याबापु by विटेकर
ही बघा एक न्यूज़
In reply to सोन्याबापु by विटेकर
जे झाले ते वाईट झाले पण …
In reply to ही बघा एक न्यूज़ by कैलासवासी सोन्याबापु
जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम
In reply to घसरलात संघावर ? by विटेकर
...पास
In reply to जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम by संदीप डांगे
माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण
In reply to ...पास by विटेकर
डांगे ब्वा ले +१
In reply to माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण by संदीप डांगे
बाकी चालु द्यात पण उद्या
In reply to माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण by संदीप डांगे
आयला हो की. संघाचा आणि
In reply to बाकी चालु द्यात पण उद्या by मृत्युन्जय
इत्स ओके कोम्रेद
In reply to आयला हो की. संघाचा आणि by संदीप डांगे
याउप्पर , तुमची खरोखरच जाणून
In reply to ...पास by विटेकर
उगाच आपला एक हायपोथेटिकल प्रश्न!
In reply to जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम by संदीप डांगे
कार्यक्रम काय आहे हेच कळले
In reply to उगाच आपला एक हायपोथेटिकल प्रश्न! by अनिरुद्ध.वैद्य
आता १०० जागा आहेत. ५० राखीव
In reply to जागांचाच प्रश्न आहे ना? मग by संदीप डांगे
नक्की आजार काय आहे हो? खरंच
In reply to आता १०० जागा आहेत. ५० राखीव by श्रीगुरुजी