नदीवाकल्या पाउसचिंब झाडाला
वा-याने ढुशी द्यावी अन
सारे तुषार पाण्यावर झंकारून
तरंग उमटावे
तसं काहीसं आठवणींच असतं,
कुणीतरी समोरून जातं
मग सारी आठवणींची वर्तुळं
आयुष्य व्यापून टाकतात.
सतत स्वप्नात दिसणारं
कुणीतरी समोर दिसतं अवचित
तसं ते तिथच असतं
मग जाणवतं अरे हे तर तेच !
मग पानगळाल्या हिवाळ्यातल्या
झाडावर साठलेल्या दवांसारखं
उन्हात चमचमून
सारं प्रकाशोत्सवासारखं होतं.
अंग झोब-या गार वा-यात
कुणीतरी समोर येतं,
पश्मीना शालीसारखं
मग काश्मीर झाली भावना
विस्तवदुरडी होवून
सारं जगणं उबदार बनवते,
जेव्हा ते अकस्मात निघून जातं
तेव्हा पश्मीना शालीसाठी
मारली जाणारी हरणं आठवतात
तडफडणारी.
उन्हाळ्यात सुकवल्या तेंदूची
गोठल्या हिवाळ्यात बिडी
करावी,
तसा तो सहवास
सारा सुगंधीत तंबाखूचा धूर
छाती भरून घेते,
थरथरणारं शरीर
गच्चगोठलं धुरांड होवून
फक्त बघत राहतं.
कधीतरी महाबळेश्वरच्या
हिमपावसात भिजल्यावर
ग्रेपवाईन मध्ये घेतलेला
तो आश्वासक पेग
अन
मग सा-या थंडीचा
केलेला विस्तव,
समुद्रकाठावरच्या विषम
शहरातसुध्दा
चटके देत राहतो.
चटक्यानंतर टम्म फुगलेल्या
फोडातून
लालसर पाणी वाहतं
मग जाणवतं
संपलेला तो सहवास,
मस्तकात उरलेली ती
थंडीची नशा,
बारच्या वातानुकुलीतात फक्त
भास होतात थंडपणाचे !
उष्णता तिथेच राहिली
आहे
ह्याचे प्रत्यंतर सतत येत रहाते
कारण
आता तू फोनसुध्दा उचलत नाहीस !
विजयकुमार.........
०८ . ०२. २०१०, मुंबई
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2428
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप दुरावा जानव्तो . विजय
कविता खासच.
वा!
सुंदर!
+++१११ हेच म्हणतो! केवळ
In reply to सुंदर! by साती
बहु गुनि जि बरोबर कांगडीच
अप्रतिम!
कविता आवडली
____/\____
एक नंबर कविता! पह्यलं आणि
फारच