ऐका सत्य नारायणाssssची कथा!
तुंम्ही म्हणाल...
अहो ..हे सर्व तुंम्ही आंम्हाला कशाला सांगत आहात??? तर..त्याचं कारण असं की आता पुढे तुंम्ही सत्यनारायणाच्या कथेचे २ प्रकार ऐकणार आहात.ते नेमके कशामुळे तयार झाले..याची पूर्वपीठिका माहित असावी. हे सर्व बदल (गेल्या दहा वर्षात..) करत असताना माझ्या(मना)समोर एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे माझ्यासमोर येणार्या धर्म:श्रद्ध माणसाला धर्माच्या नावाखाली मिळणारी पारंपारिक मूल्य मी शक्यतोवर मला टाळता यावी..आणि त्याच्या जागी आधुनिक्/पुरोगामी असं काहि देता आलं नाही..तरी किमान नितीची उपासना घडायला काहितरी कारणीभूत होइल असं काहि देता यावं..आता यातंही एक अडचण नेहमीचीच असते/असणार आहे. ती म्हणजे एखाद्या यजमानानी ही कथा किंवा असा बदल त्याला नको असला,(जसे की कन्या-दानाच्या जागी ..मी आणलेला वधू/वर स्विकाराचा विधी!..होमाशिवाय'ची वास्तुशांत! इत्यादी..) तर मी काय करतो? त्याला हवं ते (पारंपारिक ) काम देऊन मोकळा होतो. असं का बरं मग? कारण तो मला त्याला हवं ते करवून घेण्याचेच पैसे देत असतो. आणि मी ही कुणी समाजसुधारक नव्हे तर एक भटजी आहे. (फारतर..धर्मसुधारणेची इच्छा असलेला भटजी आहे ..असे म्हणता येइल.) त्यामुळे ही मर्यादा मला केवळ पैश्यालाच नव्हे,तर यजमानाला भारतीय घटनेनी दिलेल्या धर्मोपासनेच्या स्वातंत्र्याचा मान राखून पाळावीच लागणार. अर्थात..मी जे जे बदल करतो..ते ही केवळ मला हवे असतात म्हणून नव्हे..तर त्यालाही चालणारे असतात..म्हणूनच! असो..बरच पुराण लावलं. आता मूळ विषयाकडे वळू. सत्यनारायणाच्या कथेत..मी केलेले बदल म्हणजे,नक्की आहे तरी काय??? अध्याय पहिला :- यात सुरवातीच्या काहि वाक्यांनंतर येणारं कर्मविपाकाचं मुल्य मी सरळ उडवुन लावलेलं आहे. आणि पुढे इहलैकिक दु:खांचा पूर्वजन्मात झालेल्या पापांशी असलेला समंधही ...मी रद्दबातल केला आहे. तसेच नारद आणि विष्णुच्या संवादात..ही पूजा पौर्णिमेला केली असता मिळणारं..अधिक फळ! हे टाळून कोणताही शुभकारक दिवस आणि आपलं मन प्रसन्न असेल अशी वेळ..म्हणजेच चांगला मुहुर्त असा फेरबदल केलेला आहे. बाकि पुजेमुळे होणारे फायदे/तोटे तर संपूर्ण कथेत कुठेच शिल्लक ठेवलेले नाहीत. अध्याय दुसरा:- या अध्यायापसून सत्य-देव किंवा सत्य-नावाचा-नारायण असे सूचक उल्लेख पुढे सर्वत्र मी केले आहेत. आणि शतानंद ब्राम्हणाला देव त्याची गरिबी जाऊन श्रीमंती यावी..म्हणून हा उपाय सांगतो..असं जे प्र-लोभन दाखवलय..ते सोडून मी त्याला "हे पूजन केल्यानी तुझी दु:ख दूर होऊन..तुला सन्मार्गाचं दर्शन घडेल(आणि त्या योगेच तू सुखी होशिल!) असं वाक्य टाकलय. पुढे हा शतानंद (लॉट्री लागल्या सारखा) पूजेवर पूजा(स्वतःच्या घरी!) करुन सुखी होत नाही..तर स्वतःजवळ असलेली विद्या इतरांना प्रसादासारखी वाटतो,आणि त्यायोगे लोकप्रतिष्ठा/राजप्रतिष्ठा मिळवुन सुखी होतो..(आणि याची जाणिव) म्हणून त्याला वाटेल तेंव्हा पूजा करतो ..असं दाखवलय. त्यापुढचा त्याला मोळिविक्या भेटण्याचा प्रसंगही बदलवून त्यात पूजेऐवजी नामस्मरण ही पण (वेळप्रसंगी..) पूजा होऊ शकते असं मांडलय. शिवाय या गरीब मोळिविक्याला प्राचिन कथेत कचकाऊन प्रलोभनं/अमिषं दाखवली आहेत..त्यांनाही मी टाळलेलं आहे. थोडक्यात..परमेश्वरी आशिर्वादाच्या योगे माणसाच्या जीवनात मुळातच असलेला प्रयत्नवाद..सदाचरण हेच फळ-मिळायला कारणीभूत असतं...हे मी या दुसर्या अध्यायाचं बीज बनवलं आहे. अध्यात तिसरा:- हा फेमस साधुवाणी एपिसोड आहे.. भरपूर चमत्कार..लबाड्या केल्या तरी फळणारा देव..तसेच निष्कारण त्रासात टाकणारा आणि पूजा केल्यावर-सोडणारा असा-देव..मी उडवून लावलेला आहे. किंबहुना पहिल्यांदाच राजा उल्कामुख हा..हे पूजन पुत्रप्राप्तीसाठी करतो..असं दाखवलय तिथुनच बदल सुरु केलाय.. राजा हे पुजन कशासाठी करतो..? तर राज्य चालविण्यासाठी जी बुद्धी इच्छा शक्ति लागते..ती देणारा(अश्या मनोकामना)पूर्ण करणारा हा देव आहे म्हणून!.. नंतर साधुवाणी हेच पूजन का करतो? तर.. मूळ कथेत अपत्यप्राप्तीसाठी पूजा हा हेतू दर्शविलाय..मी तो बदलून..आयुष्यात जे न्यून आहे..ते(योग्य मार्गानी.) पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना साधुवाण्याकडून करविली आहे.पुढे मग साधुवाण्याची बायको(मुलं झाल्यावर..साधुवाण्याला देवाचे ऋण मानावे म्हणून पूजा करायला लावते..तो ती टाळतो..आणि नंतर पुढे बोलल्याप्रमाणे मुलिच्या विवाहावेळी करत नाही..वचनभंग करतो..त्यामुळे त्याला चोरिचा आळ येऊन तुरुंगात पडावं लागतं.. हा भाग साधारण तसाच ठेवलाय.(कारण आरपार बदलेली कथा कुणालाच अवडत नाही..हा अनुभव आहेच!) तरिही पुन्हा तुरुंगातून सुटायला पुन्हा पूजेचा प्रकार मी ठेवलेला नाहीच.. शिवाय इकडे साधुवाण्याच्या घरच्यांनी पुजा प्रार्थना केली..आणि लगेच तो (त्या योगे) तिकडे सुटला ..हा चमत्कारिक पणा बदलून..मी त्या चंद्रकेतू राजाला..नीट तपास पूर्ण झाल्यावर हे कळलं..की हे दोघं चोर नसून व्यापारीच आहेत..आणि मग त्यांनी यांना सोडलं..असं सांगुन या अध्यायाला शेवटाला आणलय..मूळ कथेत हे सर्व राजाला सत्यनारायणानी स्वप्नात येऊन ..कुठलिहि कारणमिमांसा न देता "हे चोर नाहीत..यांना सोडून दे " असं सांगितलेलं आहे. (पुढे हिच गोष्ट्/कथा चवथ्या आध्यायात पूर्ण होते..) अध्याय चवथा:- या अध्यायात साधुवाण्याने घरीजाताना मार्गात विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राम्हणांना दक्षिणा देऊन प्रवास सुरु केला असा मुद्दा आहे.. हा मी सुरवातीपासूनच कधिही सांगितलेला नाही. पुढे सत्यनारायण संन्यासी वेष धारण करुन येतो..नौकेत काय आहे? विचारतो..साधुवाणी खोटं बोलतो..त्याची परिणिती नौकेतल्या द्रव्यनाशात होते..मग पुन्हा संन्याशाचे पाय धरणे..संन्याश्याने त्याला पूजेविषयी सुनावणे..साधुवाण्याने त्याला हो'कार देणे..नौकेतील धनंद्रव्य पुन्हा मिळविणे..यात मी.. प्रसंग तोच ठेऊन मूल्यबदल केलाय..आधिच्या कथेत सांगितल्या प्रमाणे साधुवाण्याला दामदुप्पट धन विनासायास मिळतं..मग फुकट मिळालेल्या धनानी माणूस असत्य बेताल वर्तन करतो..त्याला यामुळेच जवळ असलेलं धन..द्र्व्य सुख देत नाही..(नष्ट होतं..पालापाचोळ्यासमान होतं) हा मानवी जिवनातला धागा पकडून नंतर..हे साधुवाण्याच्या लक्षात येतं..पैश्याची आसक्ती संपते..देवाला केवळ मूर्तीतच नाही तर दिन दु:खितांमधेही पहावं.. सदाचरणी राहुन परमेश्वराचं नाव घेण्याचा मार्ग अवलंबावा .. हे सर्व कळतं... असा बदल मी त्यात केला आहे.. पुढे साधुवाण्याचं घरी जाणे..त्याच्या बायकोने(लीलावतीने) मुलिला(कलावतीला) "सत्यनारायण पूजा करुनच यांना भेटायला नदिवर ये" असं सांगणे..तिने पूजा करुन,परंतू प्रसाद न घेता येणे..मग नौका बुडणे..कलावतीने "पति पुन्हा प्राप्त झाला नाही,तर त्याच्या पादुका घेऊन सती जाइन" असं बोलणे..मग साधुवाण्याने पूजा केल्यावर नौका जावयासह परत वरती येणे.. हा सर्व चमत्कारीक आणि अनैतिक कथा भाग..वगळून..मी त्या जागी- साधुवाणी घरी येतो..संन्याश्याच्या दर्शनानी/उपदेशानी आपलं जीवन कसं सन्मार्गी झालं..हे कुटुंबियांना सांगतो..पुढचं सगळं आयुष्य हा साधुवाणी त्याला वाटेल तेंव्हा* (कृतज्ञता म्हणून..) सत्यदेवाचं नामस्मरण/पूजन करुन सदाचारी जीवन जगण्यात घालवतो..आणि या पद्धतीनी जगल्यावर त्याला शेवटी फळं काय मिळतं बरं??? तर वृद्धापकाळी मृत्यु जवळ आल्यानंतर/येइपर्यंत, त्याची इहलोकावरची आस(स्वार्थपूर्णआशा)..पूर्ण संपलेली असते..सुखी अंतःकरणानी तो भगवंताच्या भेटीला जाऊ शकतो.. असं दाखवून..मी या प्रकारच्या प्राप्त होणार्या अवस्थेला..इहलौकिक मोक्ष अश्या नव्या संकल्पनेत सादर केलेलं आहे. ..याच मुद्द्यावर हा अध्याय संपवलेला आहे. (* :- मूळ कथेत साधुवाणी पुढे आयुष्यभर दर पौर्णिमेला ही पूजा करतो..असं सांगुन हा जो..प्रॉडक्ट गिर्हाइकाला अॅटेज करण्याचा प्रयत्न सर्व कथेत झालेला आहे..तो मी उडवला आहे.) अध्याय पाचवा:- ही अंगध्वज राजाची गोष्ट..हा राजा जंगलात जातो..शिकार खेळतो..तिथे गोपालकांनी केलेल्या पूजेला नमस्कार करत नाही..त्यांनी दिलेला प्रसादंही जमिनीवर टाकतो..याची परिणीती म्हणून देवाचा कोप होऊन..त्याचं राज्य जातं..शंभर मुलांचा मृत्यू होतो..सत्यनारायण परत केल्यानी हे सगळं परत मिळतं..असा हा कथाभाग आहे..आणि शेवटी या पाच अध्यायातल्या गोष्टींना आधाराला धरून..लोकांना ही पूजा करण्याचं महत्व..काहि प्रमाणात भीती आणि मोह घालून सांगत हे सर्व संपवलेलं आहे. मी यात राजाला शिकार खेळण्याचं व्यसन आहे असं दाखवून..गोपालकांनी दिलेल्या प्रसादाचा त्याग इथपर्यंत सर्व तसच ठेऊन..त्याची परिणीती त्याचं राज्य शत्रुनी बळकावण्यात दाखवली आहे..पुढे हा राजा दु:ख्खी अंतःकरणानी,राज्य गेलं..म्हणून जंगलात इतस्ततः भटकत असताना याच गोपालकांच्या दृष्टीला पडतो..असं दाखवून्,गोपालकां कडून राजाला एक उपदेश करवलाय..त्यात ते राजाला असं सांगतात..की -हे राजन.. तू प्रसाद टाकलास तेंव्हाच तुला ..हे असं काहितरी फळ मिळणार हे आंम्ही ओळखलं होतं..अभक्त सुद्धा(जे अधार्मिक असतात असे लोक...) ते ही प्रसाद अन्न समजुन खातात.(फेकून देत नाहीत..) याच वर्तनाला प्रथमधर्म..म्हणजे मनुष्यधर्म म्हणतात.. तुझ्याकडे हा मनुष्यधर्म नव्हता..म्हणूनच राजधर्म(हा त्यानंतरच येणारा..) दुसरा धर्मही नव्हता/राहिला नाही ..म्हणून तुझ्याकडे राज्यपालनाची बुद्धी राहिली नाही(शिकारी खेळत बसलास) आणि राज्य शत्रूनी नेलं..."या स्पष्टी-करणानंतर..राजा देवासमोर पश्चाताप बुद्धिनी अशी शपथ घेतो..की- "मी तुझ्या आशिर्वादानी आणि माझ्या बळावर राज्य तर परत मिळविनच..परंतू तू मला तिथे राजधर्म पाळता यावा यासाठी मनुष्यधर्म पालन करण्याची बुद्धी दे".. मग..पुढे हा राजा,राज्य परत मिळवतो..बोलल्यासारखं वागून दाखवतो.. सुखी होतो..मोक्षाचा अधिकारी होतो..इथे हे सर्व संपवून.. शेवटी ही (म्हणजे अशी सांगितली गेलेली..) कथा ही बोधकथे सारखी असते..असं सांगून या शेवटच्या अध्यायाचा आणि एकंदर कथेचा समारोप मी केलेला आहे... आता..वरती या पाच अध्यायांचं जे काही विवेचन मी केलेलं आहे ते खाली दिलेल्या या दोन रेकॉर्डिंग वर आपल्याला ऐकायला मिळणार आहे..या पैकी एक प्रकार मराठी कथेचा..तर दुसरा हिंदी कथेचा आहे.. दोन्ही रेकॉर्डिंग..ही मी गेल्या सिझनमधे केलेल्या पूजांमधे केलेली आहेत (live आहेत..) त्यामुळे वर केलेल्या विवेचना प्रमाणे ती अगदी शंभर टक्के असतीलच असे नाही..(८० टक्के नक्की आहेत..) परंतू कथाभागातले बदल जसेच्या तसे (ठेवलेले)आहेत.. सर्व कथा बोली भाषेत आहेत.. मूळ कथेतले चमत्कार नाहीत..तसेच फापटपसाराही त्यात नाही..जे नको ,ते उडवलं किंवा बदललं आहे.आणि हवं किंवा असावं..ते घातलेलं आहे..याखेरीजंही जे बदल तुंम्ही सुचवाल सांगाल..ते यथामती यथायोग्य (यापुढे..) स्विकारले जातीलच.. तेंव्हा ..मि.पा.करांन्नो.. चला आता (या आत्मू भटाची.. ;) )
ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
१) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकाला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg (कथा ऐकल्यानंतर साहेब असा आनंदून गेला..की त्यानी ती रेकॉर्ड केलेली कथा नंतर दिवसभर बँकेत अखंड लावली होती..माझ्या हिशोबी "हे" जरा जास्तच लाइव्ह झालं! :) ..असो.) ====================================================
दोन्ही कथाप्रकार ऐकून/ आस्वादून आपला अभिप्रायंही जरूर द्या . :)In reply to येवढाच चिखल आहेत तर त्या by सूड
In reply to काही कल्पना नाही ब्वॉ! जे by अत्रुप्त आत्मा
In reply to बरं आता तुम्हाला समजावं by सूड
In reply to हिन्दू धर्मातील कर्मकांडे by हेमंत लाटकर
In reply to आहेत! मग काय? by शब्दबम्बाळ
त्यांचं म्हणणं आहे की शेजारच्याच्या घरात कचरा आहे म्हणून मी माझ्या घरात त्याच्या दुप्पट ठेवणार,त्याच्या वासानी आणि त्रासानी घरचे आजारी पडले तरी बेहत्तर पण दुप्पट ठेवणार म्हणजे ठेवणारच !!!
दै "अडाणी लाटणी" मधील वडाची साल पिंपळाला या ज्ञानामृतातील अमृतकण
In reply to हिन्दू धर्मातील कर्मकांडे by हेमंत लाटकर
In reply to तसे म्हणले तर हिंदू धर्मातील by हेमंत लाटकर
In reply to हिंदू धर्मातलीच कशाला. by संदीप डांगे
In reply to करेक्ट ! by प्रसाद गोडबोले
ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥(ऋग्वेद संहिता आणि अन्य ठिकाणी) हेच विषमता समर्थक मूल्य गीता मनुस्मृती सगळी कड़े आहे... आणि हे म्हणतात त्याच्याकडे चला!
In reply to ह्हहा ह्हहा ह्हहा ! पुन्हा by अत्रुप्त आत्मा
In reply to ह्हहा ह्हहा ह्हहा ! पुन्हा by अत्रुप्त आत्मा
पुरुषसूक्त :- ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥मी काय म्हणतो, मान्य ह्यात विषमता आहे!! पौरोहित्याच्या अभ्यासक्रमातून हे पुरुषसूक्त काढून टाकायला तुम्ही काय प्रयत्न केलेत ते वाचायला आवडेल.
In reply to करेक्ट ! by प्रसाद गोडबोले
In reply to आता काय करायचे? ह्या by संदीप डांगे
त्यापासून सुटका नाही.हे काही खरे नाही , यज्ञात पशुबळी देणे हा कर्मकांडाचा भाग होता जो आचार्यांच्या कार्यांनंतर बहुतांशी बंद झाला ! आजच्या काळातही जी कर्मकाम्डे केवळ लुबाडणुक करण्यासाठी रचलेली आहेत त्यांचे पितळ उघडे पाडुन ती तरी नक्कीच बंद करता येतील !
वैदिक धर्म नेमका काय आहेनक्कीच ! खव मध्ये काही प्रतिसाद देत आहे . आमच्या श्रीधर स्वामींचे आर्य धर्म नावाचे पुस्तक प्रसिध्द आहेच , त्याची लिन्क सपडली तर देतो ( अन्यथा सज्जनगडावर जावुन विकत घ्यावे लागेल )! बाकी आचार्यांन्नी अगदी सोप्प्या शब्दात सांगुन ठेवली आहे व्याख्या वैदिक धर्माची द्विविधो हि वेदोक्तो धर्मः - प्रवृत्तिलक्षणः निवृत्तिलक्षणश्चजगतः स्थितिकारणम् । प्राणिनां साक्षात् अभ्युदयनिःश्रेयसहेतुः य्ः स धर्मः ब्राह्मणाद्यैः वर्णिभिः आश्रमिभिः श्रेयोर्थिभिः अनुष्ठीयमानः । http://sanskritdocuments.org/doc_giitaa/gitaabhaashhya.html?lang=hi :)
In reply to सुसंवादाबद्दल धन्यवाद डांगे by प्रसाद गोडबोले
आजच्या काळातही जी कर्मकाम्डे केवळ लुबाडणुक करण्यासाठी रचलेली आहेत त्यांचे पितळ उघडे पाडुन ती तरी नक्कीच बंद करता येतील !पण ती कर्मकांड करुन कोणाला आनंद मिळत असेल, बरं वाटत असेल तर काय हरकत आहे. हा दॄष्टीकोन यनावालांसारखाच झाला. करु दे की कोणाला काय करायची ती कर्मकांडं आणि देवु देत भटजींना पैसे. वाटत असेल बरे असे काहीतरी करुन. एखाद्याचा तो आनंद पण काढुन घ्यायचा का?
In reply to आजच्या काळातही जी कर्मकाम्डे by प्रसाद१९७१
पण ती कर्मकांड करुन कोणाला आनंद मिळत असेल, बरं वाटत असेल तर काय हरकत आहे.अगदी अगदी अनुमोदन ! ज्याने त्याने ज्याच्ज्या त्याच्या आनांदाला हवे ते करावे , त्यात आपण लक्ष घालण्याची गरज नाही ,सत्यनारायण कोणत्याही प्रकारे वैदिक तत्वज्ञानातील संदेश देत नाही , त्याने फक्त भडजी लोकांचा स्वार्थ साधला जातो इतकेच मी म्हणत होतो , आता हे सारे माहीत असुनही कोणाला सत्यनारायण करायचाच असेल तर करु दे की ... त्याच्या आनंदाला हरकत घेणारे आपण कोण ! बाकी सत्यनारायण पुजेपेक्षा ईशावास्योपनिषद हे किमान १००० पट जास्त आणि चिरकाल आनंद देणारे आहे ह्यात शंका नाही :)
In reply to आजच्या काळातही जी कर्मकाम्डे by प्रसाद१९७१
करु दे की कोणाला काय करायची ती कर्मकांडं आणि देवु देत भटजींना पैसे. वाटत असेल बरे असे काहीतरी करुन.करु देत की!! पण हेच भटजी मी करतोय ते आधुनिक आणि बाकी टनाटनी असा प्रत्येक ठिकाणी स्टँड घेत असतील तर आधुनिकपणा समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करु शकतात की लोक, आता वर दिलेला पुरुषसुक्ताचा रेफरन्स पहा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते विषमतावादी आहे. जर तसं असेल, तर पौरोहित्यात ते शिकवलं जाऊ नये म्हणून असे 'आधुनिक' भटजी काय करतात ते माहिती करुन घ्यायला हवंच की!!
In reply to करु दे की कोणाला काय करायची by सूड
करु देत की!! पण हेच भटजी मी करतोय ते आधुनिक आणि बाकी टनाटनी असा प्रत्येक ठिकाणी स्टँड घेत असतील तर आधुनिकपणा समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करु शकतात की लोकएकदम मान्य. भटजींकडुन उत्तर अपेक्षीत आहे.
In reply to करु दे की कोणाला काय करायची by सूड
In reply to आजच्या काळातही जी कर्मकाम्डे by प्रसाद१९७१
In reply to ईच्छा वा परिस्थिती नसूनही by संदीप डांगे
जसे वर मी मुंजीचे उदाहरण दिले. की हट्टाने पेटून मी नाही मुलांची मुंज केली तर ज्ञातीबांधव तितक्या सहज स्विकारतील का मुलांना? आजूबाजुला सगळे मुंज झालेले मित्र-नातेवाईक बघून त्यांना आपण कोणीतरी वेगळे आहोत असा फील येऊ शकतो वा आणून दिल्या जाऊ शकतो.त्यात काय झालं? वडिलांनी माझी मुंज केलेली नाही. सुरुवातीला काही वर्षे अधूनमधून " मुंज झाली नाही म्हणजे तू खरा ब्राह्मण नाहीस" , "अजून कशी काय मुंज नै झाली?" छाप शेरे मारले लोकांनी, एकदादोनदा "मुंज न झालेल्याला गायत्री मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही" असेही नुकतीच मुंज झालेल्या मुलाने ऐकवले होते. पण ते वगळता त्रास काही झाला नाही. वैयक्तिक पाहिले तर मुंज न करून फार काही साधले असे मला वाटत नाही-तसे मी बोलूनही दाखवलेले आहे, पण नाहीच केली मुंज तरी फार काही फरक पडत नाही. सध्याच्या काळात तर नाहीच नाही. पंधरावीस वर्षांपूर्वी अजून जास्त पडत असे.
In reply to जसे वर मी मुंजीचे उदाहरण दिले by बॅटमॅन
In reply to जसे वर मी मुंजीचे उदाहरण दिले by बॅटमॅन
In reply to १०० by जेपी
In reply to १०० झाल्याबद्दल बुवांचा by प्रचेतस
In reply to १०० झाल्याबद्दल बुवांचा by प्रचेतस
In reply to बुवा ची फार इच्छा आपल्या by अभ्या..
In reply to धाग्यावर सेंच्युरी लागल्यावर by pacificready
In reply to तर मग शांती, कालसर्प, नारायण by हेमंत लाटकर
In reply to या धाग्याचे 200 झाले तर by जेपी
In reply to http://anita-patil.blogspot by हेमंत लाटकर
)
काही कल्पना नाही ब्वॉ! जे