मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भुकेल वासरू

माहीराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं.. चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं.. मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही.. नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही, गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही.. थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं, पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं.. डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, .. माळरानी चालुन चालुन पुरतं थकुन गेलं होतं.. चुकलेलं वासरू खरचं जिवनाला मुकुन गेलं होतं..    

वाचने 3138 वाचनखूण प्रतिक्रिया 16

एस Wed, 10/14/2015 - 13:48
वासराला कधी औताला जुंपलेलं पाहिलं नाही. गोर्‍ह्यालाही जास्त कष्टाची कामं लावत नसतात. औताला जुपतात ते बैलांना. तेव्हा कवितेत वापरलेली प्रतिमा चुकीची आहे. इथे शब्दशः अर्थ अपेक्षित नाही हे समजतेय, तरीही कवीने आपल्या काव्यातल्या वा लेखकाने लेखनातल्या प्रतिमा वापरताना जागरूक असायला हवे असे समीक्षेच्या दृष्टीने पहायला गेल्यास वाटते.

In reply to by माहीराज

एस Wed, 10/14/2015 - 22:45
बरोबर आहे. या कवितेची संक्षीस्टाईल चिरफाड करावी असं फार वाटलं. पण जाऊ द्या. तुम्हांला विधायक समीक्षा सहन होत नाही, ती कशी सहन होणार. पुढच्या रतीबासाठी शुभेच्छा. अजून प्रतिसाद देऊन हा धागा वरती तरंगवत ठेवण्यात अर्थ नाही. चालू द्या.

मांत्रिक Wed, 10/14/2015 - 21:49
साध्या व सच्च्या शब्दांत लिहिलेली कविता!!! प्रतिकात्मक आहे हे कृपया ध्यानात घ्यावे. व्यवहाराचे कठोर नियम लावले तर प्रत्येक साहित्यकृतीचा चिवडाच होईल.

सौन्दर्य Wed, 10/14/2015 - 23:10
खरं म्हणजे कवीला आपल्या कविते विषयी स्पष्टीकरण द्यावे लागू नये असे म्हणतात. काही प्रतिसादा नंतर तुम्ही ते दिलेत. परंतु ते स्पष्टीकरण वाचण्या आधी कविता वाचताना डोळ्यासमोर आली ती मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करणारी छोटी मुले. काही कळायचं आतच ती मुले पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, अस्तित्वासाठी संघर्ष करतात. नशीब जर चांगले असेल तर मोठं झाल्यावर ह्या संघर्षमय परिस्थितून बाहेर येऊन थोडी स्थिरावतात. परंतु असे चांगले नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही. कविता अतिशय साधी, सोप्या शब्दात लिहिली आहे. अभिनंदन.