किती भाग्यवान आम्ही!
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!
उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!
आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!
प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
वाचने
3374
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
ह्म्म.. आवडली.
हम्म्म्! खरेय.
याची
In reply to याची by नाखु
यातल्या उपहासातच दुखणे आहे.
परत या
आवडली कविता! पोटासाठी माणूस
छान लिहले आहे.
समजून घेऊन वाचल्या बद्दल