मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा पाऊस

रातराणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दाट दाट झाकोळली, आज आभाळाची काया गूज धरितीशी करण्या, होई अनावर तो राया भारावला आसमंत सारा, स्पर्श होताच मखमली स्तब्ध होऊनी ऐकते, ती आर्जव अंतरातली का उठते वादळ? तिच्या आसपास उडे पाचोळा कुणी सांगा त्यांना, हा त्रुप्तिचा अबोल सोहळा किती काळाचा विरह बाई, कसा सोसते शांत तोही विसरून भान, मग जाई तिच्या कुशीत बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?

वाचने 2347 वाचनखूण प्रतिक्रिया 9

यशोधरा 25/07/2015 - 11:01
सुरेख..
बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?
वा, वा..