मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रानी

ऊध्दव गावंडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नथं नाकातं खुलली लाली गालात फुलली कई होटातं ऊलली कोन्या जगातं भुलली खाली झुकली नजर कायं दिसलं गोजरं मले पाऊनं खरचं तूह्यं हासनं लाजरं तुले कोनाची कदरं डोई घेतला पदरं चालू नकोसं तर्तरं जीवं उळते वधरं पापन्याची फळंफळं पदराची सळंसळ कायं मनी गळंबळं सांग मले घळंघळं डूलं डुलतातं कानी मानं सुरई च्या वानी मोठ्या मोठ्या डोयातनी रूपं साकारलं रानी

वाचने 1450 वाचनखूण प्रतिक्रिया 6

In reply to by ऊध्दव गावंडे

श्रीरंग_जोशी Tue, 06/23/2015 - 00:30
कवितेचा अर्थ कोणता तर जो वाचणार्‍याला भावेल तसा असं कुणीतरी मिपावर लिहिलं होतं. असो, इतरांच्या प्रतिक्रियांची वाट पाहतो. अर्थाबद्दल आताच चर्चा करून इतरांचा रसभंग करणे योग्य होणार नाही.

कंजूस Tue, 06/23/2015 - 08:10
थोडी चर्चा करून रसभंग करतोच-जळगाव ,अमळनेर ,नंदुरबार भागातली अहिराणी बोली आहे का ?लग्न न झालेल्या मुली नाकात नथ घालतात का ?कोणता दागिना घालतात?

रुपी Wed, 06/24/2015 - 02:28
पापन्याची फळंफळं आणि मानं सुरई च्या वानी या दोन ओळी तर खूपच आवडल्या.