Skip to main content

किणारा अन् लाट

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 23/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
किणारा अन् लाट अजब मैत्री आहे किणारा अन् लाटेची, काय जादू आहे निसर्गाच्या या किमयेची? स्पर्शून हळूच जाते लाट हि किणार्‍याला, विलीन होत सागरात खुणावित जाते वार्‍याला! काय उपमा द्यावी दोघांच्या या नात्याला? यात कसे विसरता येईल नटखट वेड्या वार्‍याला? यल्लप्पा सटवाजी कोकणे १८ एप्रिल २०१५ ९८९२५६७२६४
लेखनविषय:

वाचने 3341
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

हं

In reply to by टवाळ कार्टा

त्यांच्या कवितेच्या चाहत्यांनी इतक्या वेळात त्यांना मेजर वैताग दिला असेल. मी "किणारा" ऐवजी चुकून "किराणा" वाचलं होतं.

In reply to by नाव आडनाव

मी पण. बाकी मोबाईल नंबर दिल्याबद्दल थँक्यू. जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्‍यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला.

In reply to by काळा पहाड

जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्‍यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला. कसं काय सुचतं हे असं ???!!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बिग बाझारात गेल्यावर सगळ्या पैल्यांदा हे लोक जवळ जमा होतात. आणि दर पाच मिनिटानी नवीनच माणूस येवून विचारतो, "सर नाम और फोन नंबर लिखिये. हॉलीडे पॅकेज मिल सक्ता है".

In reply to by नाव आडनाव

मी सुद्धा 'किराणा आणि लाट' असे वाचून कॉमेडी समजून आलो वाचायला… मोकालाया आठवले। रच्यकने तो धागाहि आज वर आलाय पुन्हा

=))

In reply to by सूड

सव्वा महिने वयाच्या मानाने बरंच लिहीलंय म्हणायचं

In reply to by नीलमोहर

अस लिहा: सव्वा महिणे वयाच्या माणाणे बरच लिहिलय म्हणायचं!

In reply to by नाव आडनाव

परत परतणार नाही या धाग्याकडे..आधीच शुद्धलेखनाची बोंब आमच्या, त्यात हे असे वाचले तर जे येते ते ही विसरुन जाइल!

खरे किणारा घराण्याचे कवी !!!! कट्ट्यावर सटीप काव्यवाचनाचा कारेक्रम झालाच पाहिजे. मिपाचे त्रयी (सूडेश पापड्गांवकर - जॅक आपट-प्रगो धुरंध्रीकर )

दुर्दैवाने 'किणारा' या शब्दातले गूढ माधुर्य, सौदर्य कुणाला जाणवलेले दिसत नाही. नाजुक लाट तटावरील रेतीला हळुवार, मृदु स्पर्श करून नटखट वेड्या वार्‍याला खुणावीत सागरात विलीन होते, तेंव्हा संवेदनशील, कविमनाच्या व्यक्तीला अतिशय कोमल अशी किणकिण ऐकू येते, ती अनुभूति 'किणारा' या शब्दातून नेमकी व्यक्त होते. होय ना यल्लप्पा सायेब ?

हे बघा लोकांच्या सूद्द्लेकणाच्या चूका काडन्यापेक्षा ट्रॉलार्थ समजूण घेने जास्तं म्हत्वाचं णाहि का?