काही नवे करावे म्हणून.-भाग २
लेखनप्रकार
दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला,"ताई,मी आज जाऊन आलो फणसोपला.तो चाफेरकर (तलाठी)काय म्हणाला म्हीतीय? तुमची बहिण आणि मेहुणे मंत्रालयात आहेत न?मग मग त्यांना माहिती नाही वटते काम कसे करतात?वजन कसे ठेवतात?मी त्याला सांगून आलोय की, ताई येऊन तुझ्या डोक्यावरच वजन मारेल म्हणून?" "ठीक आहे."असे म्हणून मी फोन ठेवला. (क्रमशः)
जळ जळ महिन्याने मी गावी जायला निघाले.त्यवेळीही युती सरकार होते.मा.मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री होते.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सात बारा उतारा दर महिन्याला शेतकऱ्याच्या घरी पोस्टाने पाठवण्यात यावा असा शासन निर्णय निर्गमित केला होता.महसूल खात्यातून त्याची कॉपी मिळवली.अजून थोडी माहिती घेतली.पूर्वतयारी पूर्ण करून मी निघाले.रत्नागिरीला पोचून सकाळीच फणसोप गाठले.सोबत भाऊपण होता.एक आजी चालल्या होत्या.
चौशी केली," चाफेरकर कुठे राहतात? "
आजींनी विचारले,"कोन चापेरकर.?तलाटी?"
"हो.हो तेच."मी उत्तरले.
"मेलो रांडेचो ," आजींचे अनुद्गार.
मला बसलेला धक्का माझ्या तोंडावर प्रतिबिंबित झालेला पाहून आजींनी खुलासा केला."नाय,मंजे तसो नाय मरुक.पण मेलो तर बरा व्हतला."
'असं का बोलताय?" मी विचारले.
"काय सांगू बाय.माज्याकडे जेवानाचो डबो मागता न्हेमी.माजेच वांदे आसत.माजा हातावरचा प्वाट.कोणाकोणाची कामा करून मी माजा नि नातवाचा प्वाट भरतंय.चटणीभाकरीची येवस्था झाली तर बास.आणि ह्यास कवटा तरी हवीतच.मी कोंबड्या पाळलेल्या आसतना त्याच्येर मेल्याचो डोळो.मी कवटा विकताय आणि माज्या नातवाक शिकवतंय,"आजींनी सविस्तरपणे खुलासा केला.
मला आठवले,त्या दिवशी मी तलाठी कार्यालयात बसले असताना याच आजी तिथे होत्या.आणि तलाठी जेवणाचा डब्बा मागवतो अशी तक्रार तिथे जमलेल्या लोकांपुढे करत होत्या.
मी विचारले,"आजी ,पण तुमची तर जुनी जमीन असेल ना?मग तुमचे तिथे काय काय काम असतं?"
"माज्या कर्माच्ये भोग."आजी उसासली."माजो लेक दारू पीवून फटफटी चालवी होतो.आक्शिडन झालो नि माजी सून पण संगाती होती.दोगाय एकदम ग्येली.एक नातू हाय.थोडा रान हाय.थय गवत येता.गुरा असलेल्या लोकांका ता गवात दितंय आणि दूध घेतंय.हो मेलो सांगता कि तू माका जेवनाचो डब्बो नाय दिलंस तर तुजा रान कोणाच्याय नावावर लावीन.तू माझा काय बिगडवू शकनार नाहीस.मगे घालतंय त्याचे मढयार."मी हादरलेच.माझा भाऊ माझ्यासाबत होता.हा माझा भाऊ म्हणजे शेजारच्या काकींचा मुलगा.पण काकी म्हणजे त्याची आई तो लहान म्हणजे ३ वर्षांचा असताना गेली.आणि तो आमच्या घरातला सगळ्यात छोटा मुलगा बनला.गावातच लहानाचा मोठा झाला. पण आमचे संबंध खूप चांगले आहेत. गावातच वाढल्याने विचारसरणी आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याची.तो संतापून म्हणाला फटकावतोच त्याला आता
"शान्त हो मयू.तुला त्याला मारायचं होतं तर तू त्याच दिवशी मारायचं होतं,आता माझ्यावर सोपव."मी मयूची समजूत घातली.
"पण ते राहतात कुठे?"मी आजीना विचारले. "चला माज्यासंगाती,मी दाखवतंय.मी त्याचो डब्बोच घेवन चाललंय."आम्ही आजींच्या मागून निघालो.
(क्रमश:)
वाचने
8555
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
पुभाप्र
(@#$&*@!#$^*&#$)
In reply to (@#$&*@!#$^*&#$) by एस
+१
पुभाप्र. आणि मोठा भाग टाकावा
In reply to पुभाप्र. आणि मोठा भाग टाकावा by आदूबाळ
+१
पुढे काय होणार याची उत्सुकता
किती असंवेदनशील असतात काही
वाचतेय सुरंगी ताई..
वाचते आहे..
ईल्लुसा भाग का टाकला ताई. आता
पिरा,तत्कालिक शिक्षेपेक्षा
आदुबळ,सृजा इतका मोठ्ठा पुरे न
सुरंगी मॅडम, भाग अजून मोठा
बॅटमॅन,मला वाटलं होतं,हा भाग
पुभा प्र
सगळ्यांचे आभार.
मस्त, हा भागही आवडला
देवा!
पुढे