मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्षणभंगुरता

माम्लेदारचा पन्खा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज तूही जगात आहेस आज मीही जगात आहे आपल्यात काहीतरी बिनसलंय हे दोघांनाही ज्ञात आहे कधीकाळी जुळली होती आपली मने मग दिसू लागले फक्त एकमेकांचे उणे वाढत्या अंतराने दुरावतच गेलो आयुष्याच्या प्रवाहात वहावतच गेलो आज मागे वळून पाहताना वाटतंय की नसतं झालं असं तर बरं झालं असतं दबलेल्या अगणित भावनांचं ओझं इथपर्यंत वागवावं लागलं नसतं उद्या कदाचित तूही नसशील …. किंवा मीही नसेन तरीही असंच अव्याहत चालू असेल जग क्षणभंगुर आयुष्य आहे हे आपलं हे राग लोभ कशाला हवेत मग? सगळं सोडून देऊन बघू एकदाच जसं काही झालंच नाहीये मी तयार आहे विसरायला मागचं पण दोन पावलं तूही पुढे ये !!

वाचने 2653 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सौन्दर्य गुरुवार, 05/07/2015 - 00:46
छान कविता. वामनाने तीन पावलात तिन्ही लोक व्यापले, तुम्ही दोन पावलात अमर्याद अंतर पुसून टाकण्याची इच्छा दर्शवता आहात. सुंदर.

बहुगुणी गुरुवार, 05/07/2015 - 08:21
नकारात्मक सुरु झालेल्या कवितेचा सकारात्मक शेवट आवडला. +१

वेल्लाभट गुरुवार, 05/07/2015 - 18:17
छान कविता. वाचताना मेहदी हसन साहेबांची ही गज़ल मनात येत होती. अबके हम बिछडे तो शायद कभी ख़ाबों में मिले जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले आणि त्यातला हा आवडता शेर.... तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फरिश्तों जैसा दोनो इन्सां है तो क्यूं इतने हिजाबो में मिले

खूप आभारी आहे …… हो… ती पावलं उचलणं ही क्रिया सोपी असते पण हातून घडत मात्र नाही… अनेक कारणं आहेत… मीपणा ,संकोच ,भीती …. पण त्यावर मात केली तर त्यासारखा दुसरा आनंद नाही