मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्रीचे अस्तित्व!

अश्विनि कोल्हे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला. या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते. कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते. आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय. स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही "आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो. अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा? लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते. तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो. प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो. पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत? पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं . प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते. शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते. पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे. मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते. तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे. म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा. तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन. जय महाराष्ट्र! रचना-सौ.अश्विनी कोल्हे.

वाचन 30926 प्रतिक्रिया 170

वेल्लाभट Mon, 04/13/2015 - 16:28
कविता वाटलीच नाही. त्यामुळे आवडली नाही. आणि विचार फारच एकांगी. बोझाखाली, कुचलून वगैरे हिंमराठी शब्द का लागतात? मराठी संपन्न आहे. -हस्वदीर्घही काही ठिकाणी गडबड (कदाचित टाईप करताना चुकलं असावं) असो. प्रयत्न बरा होता असं म्हणतो. पु.ले.शु.

In reply to by वेल्लाभट

काळा पहाड Mon, 04/13/2015 - 16:55
हेच म्हणायचं होतं. मुक्तछंदातली असली तरी कवितेला लय असते. ती यात सापडली नाही. ही तर वाक्य तोडलेली गद्य वाक्यरचना आहे.

In reply to by वेल्लाभट

म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. धन्यवाद. मी कोणी मोठी कवियिञी नाहीय.लेखनाच्या बालवाडीत नविनच प्रवेश केलेली विद्यार्थिनी आहे. दुसरे असे की, माझा विचार एकांगी नाहीय. ही सत्यस्थिती आहे.आपल्या आजुबाजुला कदातिच अशी परिस्थिती बघितली नसेल, पण समाजात अजुनही बर्याच ठिकाणी मुलींना, स्रीयांना अशी वागणुक मिळतेय. पुरुषांनी विचार करावा की आपण तर असे वागत नाही ना. एकुणच समाजातील पुरुष जातीची विचारधारा बदलण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे.

In reply to by अश्विनि कोल्हे

@.लेखनाच्या बालवाडीत नविनच प्रवेश केलेली विद्यार्थिनी आहे.>> द्येको...मै क्या बोल्या था!!! @दुसरे असे की, माझा विचार एकांगी नाहीय. ही सत्यस्थिती आहे.आपल्या आजुबाजुला कदातिच अशी परिस्थिती बघितली नसेल, पण समाजात अजुनही बर्याच ठिकाणी मुलींना, स्रीयांना अशी वागणुक मिळतेय.>> १०० परतिसादांची खात्री...

In reply to by अश्विनि कोल्हे

अश्विनी बाई तुम्ही जरा चाणक्य नीती वाचा,आणि त्यामध्ये स्त्री चे गुणही सांगितले आहेत काय असतात ते वास्तविक . तेही वाचा

सूड Mon, 04/13/2015 - 16:49
ठीक आहे, पण हे सत्तरच्या दशकातल्या स्त्रीचं वर्णन वाटतंय. आताच्या स्त्रिया "स्त्रियांसाठी" लिहीलेल्या जागेवर कोणी पुरुष बसला असेल तर त्याला उठवतात आणि एकमेकींकडे बघून कुत्सित हसतात. त्यांची एक मैत्रिण उभीच असते. मग "स्त्रियांसाठी" असं लिहीलेलं "नसलेल्या" जागी जिथे पुरुष बसलेले असतात तिथे आपल्याला बसायला मिळेल याची ती वाट बघत असते. आणि त्यातलीच उभं राहावं लागलेली एखादी मग मिपावर येऊन स्त्रीमुक्तीच्या कविता लिहीते. पुरुष कित्ती वैट्ट असतात आपल्याला बसायला पण जागा देत नाहीत वैगरे वैगरे!!

In reply to by सूड

संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 17:32
च्यायला डोक्यात जातात अशा बायका... हल्ली तर मी 'स्त्रियांसाठी' असणार्‍या जागा मोकळ्या असतांना इतर जागेवर (या जागांना 'पुरुषांसाठीच्या' म्हणू शकत नाही) बसणार्‍या स्त्रियांना तेवढ्याच हलकटपणे उठवून लावून जागा मिळवतो. बाकी एखादी 'स्त्रियांसाठी'ची जागा मोकळी असतांना त्यावर पुरुष (वय कोणतेही) बसल्यावर तो जणू काही आपल्या मांडीवरच बसला आहे या आविर्भावात त्याचा पाणउतारा का करतात? त्याला सौम्य भाषेत सांगू शकत नाही का? मुंबईत सुरुवातीपासूनच हा भयंकर प्रकार पाहिल्याने जागा रिकामी असेल तरी मी बसत नसायचो. इस बात पे एक किस्सा: एक सहप्रवासीसोबत घडलेला त्याने स्वतः सांगितलेला अनुभव. तो मार्केटींग निमित्त मुंबईभर भटकंती करत असतो. दिसायला सामान्य सावळा वर्ण, टीपीकल मिशी वैगेरे ठेवणारा, एका विशिष्ट मागास वर्गातला वाटावं असं व्यक्तिमत्व. त्याचे एवढे वर्णन सांगण्याचे कारण लोकांचा पुर्वग्रह कसा असतो ते कळावे म्हणून. एकदा बस मधे भयंकर गर्दी असता त्याला सीट मिळाली. पुढच्या कुठल्यातरी थांब्यावर एक पस्तीशीतली स्त्री चढली, सोबत कदाचित ५-६ वर्षाचे मूल असेल. आपल्या नायकाने सोबत मुल बघून प्रतिक्षिप्त क्रियेने तीला स्वत:चे आसन दिले आणि गर्दीमुळे तो तिच्याच बाजूला उभा राहीला. ५-१० मिनिटे गेली आणि ती त्याच्यावर भयंकर चिडली. उठून तिने याच्या सण्ण्कन थोबाडीत मारली. ह्याला काय समजेना काय झालं. ती म्हणाली, "@#$#%&$, जगह दिया तो क्या चान्स मारेगा क्या?" ती काय म्हणते आहे नक्की ते याच्या मेंदूपर्यंत पोचण्याआधी अक्ख्या बसला कळलं. झालं ना पब्लिक नेहमीप्रमाणे सुरु. त्याने तिचा प्रतिकार करण्याचा, तिचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला पण 'पुरुष अस्सेच असतात' या सर्वमान्य पुर्वग्रहापुढे त्याचे काहीच चालले नाही. गर्दीमुळे त्याचा तीला धक्का लागत होता आणि ती भलताच समज करून बसली. तर बंधुंनो, "हीच अशी असेल" म्हणून स्त्रियांना दोष देणारे वेळेनुसार "ह्यानेच काहितरी केले असेल" इतपत बदलू शकतात. त्यामुळे सांभाळून र्‍हावा. जमाना खराब हैं| अवांतरः घरी झालेल्या भांडणाचा राग कविता लिहून काढतात कधी कधी.

In reply to by सूड

कुठल्या जगात जगत आहात आपण? आजही एखाद्या स्री अर्भकाला रस्त्यावर फेकुन दिलं जातंय. तुमच्या विचारांवर खुप हसावंसं वाटलं. केवळ बसमध्ये जागा बळकावणार्या मुली तुम्हाला दिसल्या,पण त्याच बस मध्ये एखादी एकटी मुलगी बघुन तिच्यावर अत्याचार केला जातो हे नाही दिसलं तुम्हाला? मी कोणी बसमधील जागा न मिळालेली मुलगी नाहीय,जी सर्व पुरुषांना वाईट म्हणतेय. पुरुषांनी स्वतःची मानसिक विचारधारा बदलण्याची गरज आहे.

In reply to by अश्विनि कोल्हे

सूड Mon, 04/13/2015 - 18:14
पुरुषांनी स्वतःची मानसिक विचारधारा बदलण्याची गरज आहे.
ती फक्त पुरषांनीच बदलणे गरजेचे आहे म्हटलात तेव्हाच कळलं आपली वैचारिक पोच काय आहे!! =))))

In reply to by अश्विनि कोल्हे

संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 18:19
पुरुष अर्भकाला फेकण्याच्या घटना माहित नाहीत तुम्हाला? बरेचदा बर्‍याच बसेसमधे एकटी मुलगी असते, त्या प्रत्येक मुलीवर बलात्कार नाही होत हो. मिपावरच कुणीतरी म्हटलंय, की कोट्यावधी वर्षे होऊनही पुरुषांची विचारधारा बदलण्याची इच्छा असणारी स्त्रीयांची विचारधारा कधी बदलणार? याच जगात घडणार्‍या ह्या घटनाही बघा: http://ekhusbandkimaut.blogspot.in/ नेहमी एकाच बाजूचे अतिरंजीत चित्र दाखवून वातावरण गढूळ का करावे?

In reply to by संदीप डांगे

टवाळ कार्टा Mon, 04/13/2015 - 19:48
मिपावरच कुणीतरी म्हटलंय, की कोट्यावधी वर्षे होऊनही पुरुषांची विचारधारा बदलण्याची इच्छा असणारी स्त्रीयांची विचारधारा कधी बदलणार? मीच तो...मीच तो

In reply to by टवाळ कार्टा

संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 03:30
हो हो. तुम्हीच ट का भौ. द वन यँड वोन्ली. काल-परवाच कुठेतरी वाचलं तुमचं विधान आणि डोक्यात फिट्ट होऊन गेलं बगा...

In reply to by सूड

वेल्लाभट Mon, 04/13/2015 - 21:17
चायला जाम दिवस झाले यावर लिहायचंय. कित्येकदा विचार करायला बसलो आणि नुसता राग राग झाला. लिखाण झालंच नाही. तू पुन्हा ठिणगी पाडलीस आज. आज बशीतही एक अशी केस बघितली. सो आता एक तिकाट जिलबी पाडायलाच हवी.

In reply to by सूड

ज्योति अळवणी Sun, 04/19/2015 - 14:03
आजही आपल्या समाजात स्त्री लग्नानंतर पतिच्या घरी जाते. जावयाचा मान आयुष्यभर राखला जातो... कधीतरी सणा-समारंभाला बोलावून. आज जरी पति-पत्नी स्वतंत्र राहात असले तरी पतिच्या पालकांची जवाबदारी अध्यारुत आहे आणि पत्नीच्या पालकांसाठी जावयाने काही केले तर त्याची कौतुकास्पद मोठी चर्चा आहे. आजची स्त्री स्वतंत्र आहे. ती तिचे विचार परखड़पणे मांडू शकते. तिचे अधिकार हक्काने घेते... पण मग खाजगीत ती 'भांडकुदळ, तापट....' इत्यादि असल्याची चर्चा होतेच. मुद्दा एवढाच की काळा बरोबर वागण्यात बदल आहे; विचारात नाही.

चिनार Mon, 04/13/2015 - 17:16
कविता आहे की निबंध ? दोन्हीला १५ पैकी ३ मार्क .. या कवितेला चाल लावून दाखवा ...त्याचा लकडी पुलावर जाहीर मुका घ्यायला मी तयार आहे . आता थोडं कवितेच्या आशयाविषयी १. नक्की कुठल्या काळातली स्त्री आहे ही ? २, स्त्र्रीयांवर अन्याय आजही होतात हे मान्य ! पण ते या स्वरूपाचे असतात यावर आक्षेप !

In reply to by चिनार

त्यांना कवियट्री-व्हायचं असेल.. ! म्हणून तयार होऊ पहाणार्‍या बल्लवा प्रमाणे त्या पिझ्झा आधी थालपीठ लाऊन बघत आहेत! हो णा हो कवियट्री टाई!

कहर Mon, 04/13/2015 - 18:18
मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते
मागच्या आठवड्यात खोटे लग्न करून सगळा माल गोळा करून अनेक पुरुषांना गंडा घातलेल्या 'स्त्री ' ची बातमी पहिली नाही का ? कुठल्या जगात आहात ?

कहर Mon, 04/13/2015 - 18:21
स्री ही शक्ती आहे. मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते. तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे.
तरी पुरुषांनी तिचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करायचे ? बात कुछ हजम नाही हुई

In reply to by जेपी

संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 18:49
जेपीभौ.... जरा सत्काराच्या तयारीला लागा. कार्यकर्त्यांना पळवा. 'भव्य महीलांचा सत्कार' सोरी 'महिलांचा भव्य सत्कार' करायला लागंल. पन्नाशी आता हुईल अर्ध्या तासात, मग टायम नाय गावंल बगा. कशानं सत्कार करायचा तो आयटेमबी ठरवा बुवा सर्वांचं मत घीऊन... आम्हाला माफ करा. आम्हाला अहंकाराचा ठसका लागलाय... डोळे पांढरे झालेत... काय जीव कुचूलून गेलाय जणू.

In reply to by अजया

नाखु Tue, 04/14/2015 - 09:24
फोडणीची पळी नुसती द्यायची का फोडणीसकट हा यक्षप्रश्न आणि सोबत घासणी आणि साबू द्यावा लागेल तो वेगळाच (वर हे साहीत्य दिलंच आहे तर जर घासून ही द्या मागणी होऊ शकते) स्त्री-पुरुष दोघेही समान स्वातंत्र्यप्रिय असावेत पण स्व तंत्र (स्वैराचारी) नसावेत अशी प्रतीगामी मते असलेला भोट नाखू

In reply to by नाखु

अजया Tue, 04/14/2015 - 11:03
पळी द्या,फोडण्या घालण्यात तै एकसपर्ट दिसत आहेत. घासणी आणि साबू!!किती ते इस्त्रीवरील अन्यायाचे प्रतिक!! असं लिहिता मग भाव्ना कुचल्ली जाते. प्रतिगामी कुठचे!!

In reply to by अश्विनि कोल्हे

खटपट्या Mon, 04/13/2015 - 23:02
मला समजलाय आशय. मी तुमच्या पाठीशी आहे. या अशाच कविथा मरगळलेल्या मराठी साहीत्यविश्वाला वळण लावतील. लीवा बिंधास्त.

In reply to by अजया

हाडक्या Mon, 04/13/2015 - 18:49
अहो तै, टाळी एका हाताने वाजत नै. आता काकूंच्या मदतीस कोणी आले तर टाळ्या वाजायला लागतील हो, नै तर नुसताच एका हातानेच वारा घातल्यासारखं व्हईल. ;)

पिलीयन रायडर Mon, 04/13/2015 - 18:57
एकतर्फी लिहीलयहो तै फारच.. नाही म्हणजे आहेत खरंच खुप प्रॉब्लेम्स.. पण तुम्हाला वाटतय तेवढंही जग वाईट नाहीये.. असंच जाता जाता.. सौ. अश्विनी कोल्हे हे सासरचं नाव की माहेरच? (असंच विचारलय.. जज वगैरे काहीही करणार नाहीये..)

जेपी Mon, 04/13/2015 - 19:00
प्रतिसाद वाचुन हसुन मरतय .. जगल तर हाफशेंच्युरी निमीत्त कार्यकर्त्याकडुन सत्कार करण्यात ईल . कार्यकर्ते -टवाळ कार्टा ,चिमणराव

पियुशा Mon, 04/13/2015 - 19:03
काय रे ए ब्याटया आत्मुस न सुड ईथेच तुम्ही कवितेला नाव ठेवून सिद्ध केल आहे की पुरुष ही औरत को छळ्ता है काही नविन करायला गेल की नाव ठेवता है,सिद्ध झाल,:प। तै तुम्ही लिहा ही फाट्यवर मारा सगळ्या पुरुषाना बाला गोपालना :प

यसवायजी Mon, 04/13/2015 - 19:10
तुम्हाला डणकून पाठिंबा. आज 'स्री'चा जो छळ चाल्ला आहे त्याविरोद्धात आवाज उठवलाच्च पाहिजे. इथल्या टवाळांकडे लक्ष देऊ नका अशे मी तुम्हाला याठिकाणी 'आव्हान' करतो.

पहील्याच दिवशी पहील्याच कवितेवर इतके आक्षेप पाहुन खचली नाहीय मी. मजा आली माञ. मी लिहीणारच. मिसळपाव वर पण टाकणार.कितीही आक्षेप आले तरी. मिञांनो वाट पहा माझ्या नविन कवितेची.

In reply to by अश्विनि कोल्हे

तिमा Mon, 04/13/2015 - 20:06
जरुर लिहा हो कोल्हेताई, पण तेवढ्या त्या 'ञ' या अक्षरापासून वाचवा हो आम्हाला. माञ मधे 'त्र' च्या ऐवजी 'ञ' पाहून बाराखडी बसली हो आमची! (t+r = त्र.) बाकी चालून द्या.

In reply to by अश्विनि कोल्हे

चिनार Tue, 04/14/2015 - 09:09
ये बात !!! आमचा पोपकोर्न चा धंदा जोरात चालणार की हो आता ! समस्त मिपा बांधव आणि भगिनींनो , भागीदारी करायची असल्यास व्यनी करा. IPO चं काढावा म्हणतो एखादा !

In reply to by अश्विनि कोल्हे

नक्की लिहा. अच्रत मेल्यांच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही लिहिलं नाहीत तर आम्हालाही प्रतिसादामधे काही लिहायची पेर्णा मिळणार नाही मग.

In reply to by अश्विनि कोल्हे

पॉइंट ब्लँक Mon, 04/13/2015 - 19:38
असो! एक शंका, तुमचं खरं नाव दिपिका पादुकोन आहे का हो? बाकी खरं उत्तर द्यायचं का नाही हा "युवर चॉईस" !

In reply to by अश्विनि कोल्हे

सूड Mon, 04/13/2015 - 19:42
काकू तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो. मराठीत बायका खचली, जेवली, आली असं म्हणतात ते नेहमी तृतीयपुरुषी असतं. स्वत:बद्दल बोलताना नेहमी खचले, जेवले, आले असं म्हटलं जातं. खरडफळ्यावर एक 'उडवल्या जाईल' झालं आहे तेवढं पुरे!

In reply to by सूड

संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 19:47
@सूडभौ, ताई आमच्या इदर्भातल्या हायेत भौतेक. @कोल्हेताईस, तुमी आपल्या मात्रुभाशेत लिहा कायतरी... ते अजुन जास्त चांगलं असेल...

In reply to by सूड

अर्धवटराव Tue, 04/14/2015 - 00:05
मराठीत बायका खचली, जेवली, आली असं म्हणतात ते नेहमी तृतीयपुरुषी असतं. स्वत:बद्दल बोलताना नेहमी खचले, जेवले, आले असं म्हटलं जातं.
विदर्भात खचली, जेवली, आलि, असच ऐकलय. तिथे जर खचले, जेवले वगैरे म्हटलं तर "काय भैताड बाई आए बे" वगैरे टोमणे ऐकावे लागतात.

जेपी Mon, 04/13/2015 - 19:35
टिपीकल कंपुबाजाचा धागा झाला आहे.

In reply to by जेपी

सस्नेह Mon, 04/13/2015 - 21:19
मघाशी मेला होतास ना ? आता कसा आलास मेल्या ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड Mon, 04/13/2015 - 20:06
ठेविली कढई ,झारा केला वर ठेविली कढई ,झारा केला वर . . . टक्या आता तांब्या तू गच्च धर! :-D
गुरुने शिष्याच्या नावे घेतलेला पहिलावहिला आंतरजालीय उखाणा!! =))))

In reply to by अत्रुप्त आत्मा

पियुशा Mon, 04/13/2015 - 20:55
@ आत्मुस कक्का मिपावर स्मैल्या नाहीत तर तुम्हाला फारच सुन सुन वाटत् असेल नै? सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या टैप :प