आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले,
जिवंतपणाची निशाणी मिटवून माझी मला बोडके करून गेले…
आता वारा त्याला अलगद त्याच्या वाटेवरती घेऊन जाईल,
कुण्या बापुड्या पाखराच्या घरट्याचा ते भाग होईल,
पण मला एकटे करून ते खूप दूर निघून गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…
एकटा असलो तरीही मी शोक काही करत नाही,
का करावा शोक जर सांत्वन करायला कोणी नाही,
वाट पहात होतो मरणाची पण तेही पाठ फिरवून गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…
एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे,
साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे,
मी ज्यांची साथ केली ते मला सोडून दूर गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1736
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
धन्यवाद!
In reply to वा! by चुकलामाकला
छान आहे
धन्यवाद!
In reply to छान आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पान
धन्यवाद! :)
In reply to पान by तिमा
एकट्यानेच जर राहायचे असेल तर
खरच की!
In reply to एकट्यानेच जर राहायचे असेल तर by अनुप ढेरे
सुंदर कविता