भूमी अधिग्रहण कायदामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने काही बदल केले आहेत.
त्यामधले मुख्य बदल खालीलप्रमाणे
१. पूर्वी संपादनासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती बंधनकारक होती . ही अट आता काढून टाकण्यात आली आहे.
यामुळे विरोध असतानाही सरकार बळजबरीने खाजगी / सरकारी प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेउ शकते .
२. संपादन केलेली जमीन त्या प्रोजेक्टसाठी जर ५ वर्षात वापरली गेली नाही तर ती जमीन मूळ शेतकर्याला परत करण्यात यावी . ही अट काढून टाकली आहे.
या मुळे जमीनी फक्त संपादीत करून योग्य भावाची वाट बघत पड ठेवण्याचे प्रमाण वाढेल. आणि शेतकर्याकडे असलेला जमिनीचा ट्क्का अजून कमी होइल. उदा : सासवड , फलटण , सांगली येथे MIDC उभारल्या आणि उद्योजकांना जमिनी दिल्या पण तेथे कोणतेही उद्योग सुरू झाले नाहीत . अशा जमिनींचे प्रमाण वाढेल.
३. बागायत / उपजाउ जमीन घेता येणार नाही . किमान दोन पिके घेण्यात येत असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करता येणार नाही. ही जी अट होती ती पूर्णपणे काढून टाकली आहे . याने उत्पादित क्षेत्र कमी होइल .
या अटीमुळे जे कमी उत्पादीत पडीक क्षेत्र आहे . जे दुष्काळी क्षेत्र आहे त्यांचा पण फायदा झाला असता कारण अशा जमीनींचे अधिग्रहण वाढले असते . ही अट काढल्यामुळे पाणी जवळ असणार्या बागायत / उत्पादीत जमिनींचे क्षेत्र कमी होइल. याचा फटका अन्नधान्य वाढीस बसेल.
४.लोकसुनावणी आणि ग्रामसभा : पुर्वीच्या कायद्यात प्रकल्पाला विरोध असेल तर लोकसुनावणी घेउन , ग्रामसभेची परवानगी लागत असे . ही अट काढून टाकली आहे.
५. बीओटी तत्वांवरील प्रोजेक्टसाठी काहीही उल्लेख नव्या मसुद्यामधे नाही.
नवीन उद्योगांसाठी जमीन लागणार आणि ती मिळाली पाहिजे हे १०० % सत्य आहे . त्याशिवाय उद्योगधंद्याची प्रगती होणार नाही . पण यासाठी पडीक जमीन , कमी उपजाउ जमीन घेतली पाहिजे . सर्व उद्योग धंदे मुंबई- पुणे अशा सुपीक पट्ट्यात सुरू झाले तर इथला शेतकरी विस्थापित होइल . त्यांममुळे जमीन संपादीत करताना उद्योगांना भूमीपुत्रांना नोकरी , पुर्नवसन अशा अटी ठेवायला हव्या होत्या . ५ वर्षात उद्योग सुरू करायसारख्या योग्य अटींसुद्धा काढून टाकल्या आहेत.
त्यामुळे अशा अध्यादेशामुळे हे सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे असे वाटत आहे.
वाचने
16275
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे
भूमी अधिग्रहण कायदा, खरेचखुप
धन्यवाद.
या मुद्द्यावर निदान थोडक्यात
In reply to धन्यवाद. by गंगाधर मुटे
नुसते शेतकरीविरोधीच नाही तर
In reply to धन्यवाद. by गंगाधर मुटे
सुधारणेच्या नावाखाली जमीन लाट्ण्या ची चांगली संधी आहे सरकारला
भारतीय कायदे ईम्ग्रजांच्या
In reply to सुधारणेच्या नावाखाली जमीन लाट्ण्या ची चांगली संधी आहे सरकारला by माम्लेदारचा पन्खा
झेरॉक्स कसली.... सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे...
In reply to भारतीय कायदे ईम्ग्रजांच्या by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to झेरॉक्स कसली.... सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे... by माम्लेदारचा पन्खा
दुवा मिळेल का?
विकी वर थोडीफार माहिती आहे या कायद्याची
In reply to दुवा मिळेल का? by विकास
हा म्हणायचा आहे का?
In reply to विकी वर थोडीफार माहिती आहे या कायद्याची by अर्धवटराव
हो
In reply to हा म्हणायचा आहे का? by विकास
लिंक वर दिलेली बातमी वाचली.
In reply to हा म्हणायचा आहे का? by विकास
राज्य सभेत विरोध कोण करणार ,
In reply to दुवा मिळेल का? by विकास
उपजाऊ जमिनी का म्हणुन
सुपीक/पडीक
इंटरेस्ट
In reply to सुपीक/पडीक by अर्धवटराव
+१
In reply to इंटरेस्ट by कपिलमुनी
नक्की विदा देता येणार नाही.
In reply to सुपीक/पडीक by अर्धवटराव
+१..
In reply to नक्की विदा देता येणार नाही. by प्रसाद१९७१
कर्माचे अच्छे दिन
भयानक आहे
लिंक
ग्रेट
In reply to लिंक by भुमन्यु
शेकडो पळवाटा
In reply to लिंक by भुमन्यु
काहिंना कदाचीत हा कायदा जुलमी
नेमके उदाहरण
In reply to काहिंना कदाचीत हा कायदा जुलमी by गणेशा
या विषयी काहि टंकावं का हा प्रश्नच आहे.
अण्णा जागे झालेत
In reply to या विषयी काहि टंकावं का हा प्रश्नच आहे. by अर्धवटराव
मी पण अण्णाजींना साथ देणार.
In reply to अण्णा जागे झालेत by विकास
व्हिक्टीम
In reply to या विषयी काहि टंकावं का हा प्रश्नच आहे. by अर्धवटराव
:(
In reply to व्हिक्टीम by विकास
जमीन अधिग्रहण
In reply to व्हिक्टीम by विकास
+१
In reply to जमीन अधिग्रहण by कपिलमुनी
मला वाटते..
In reply to जमीन अधिग्रहण by कपिलमुनी
अलिकडेच( १ महिन्याच्या आसपास)
In reply to जमीन अधिग्रहण by कपिलमुनी
हि लिंक त्याची
In reply to अलिकडेच( १ महिन्याच्या आसपास) by गणेशा
इथे बिका एका धरणग्रस्तांच्या
In reply to हि लिंक त्याची by गणेशा
कुळ कायद्यात आमच्या जमिनी
In reply to इथे बिका एका धरणग्रस्तांच्या by हाडक्या
राज्य सभेत विरोध कोण करणार ,