मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.
मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.
आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.
आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)
आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.
लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्यांसाठी टांकसाळ?"
असो,
पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.
भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."
मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."
गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."
जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.
एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.
गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्यात गेलो.
जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.
दक्षिणा विचारली.
भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"
मी,"हो."
भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."
योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.
डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वाचने
45238
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा वा. इतरांनी गाय मारली
In reply to चोक्कस .... by विटेकर
अरे तुम्हाला का वाईट वाटते आहे ?
In reply to वा वा वा. इतरांनी गाय मारली by बॅटमॅन
राजकारण्यांपासून ते
In reply to चोक्कस .... by विटेकर
+१११
In reply to राजकारण्यांपासून ते by अत्रुप्त आत्मा
फक्त _/\_
In reply to राजकारण्यांपासून ते by अत्रुप्त आत्मा
_/\_गुर्जी.
In reply to फक्त _/\_ by बॅटमॅन
प्रामाणिक आणि मोलाचा प्रतिसाद
In reply to राजकारण्यांपासून ते by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to प्रामाणिक आणि मोलाचा प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून
In reply to +१ by नाखु
घरोघरी जसे फ्यामिली डोक्टर
In reply to एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून by विटेकर
तीर्थे धोण्डा पाणी ! असे
In reply to घरोघरी जसे फ्यामिली डोक्टर by विटेकर
चोक्कस
In reply to तीर्थे धोण्डा पाणी ! असे by विटेकर
हे खूप आवडले ! कानाखाली की
In reply to एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून by विटेकर
माझा मुद्दा इतकाच की , जगभराची पापे आम्ही करून येणार आणि एखादी पूजा / अभिषेक द्वारे त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार, या देवाण घेवाणी मध्ये पुरोहीताने मात्र पैसा कमावता कामा नये , ही अपेक्षा गैर आहे ! बहुतांशी पूजा - अर्चा या सकाम उपासना स्वरुपातच असतात, हा साधा व्यवहार आहे , तुम्ही मला पैसे द्या , त्याबदल्यात मी तुमच्या पापाचे परिमार्जन करतो/ झाले आहे असे जाहीर करतो, तुमच्या डॉन स्कूल टाईप शाळा भरमसाठ फी घेऊन मुलाला शिक्षण दिले असे जाहीर करतात , तेव्हा तुम्ही करतात त्याचे व्याल्यु ऑडीट? मग पुरोहितांसाठीच का ? व्हाय धिस डबल स्टंन्डर्ड ?मुद्दा तर बिनतोड आहे.
In reply to हे खूप आवडले ! कानाखाली की by डॉ सुहास म्हात्रे
प्रश्नच नाही
In reply to मुद्दा तर बिनतोड आहे. by बॅटमॅन
आध्यात्मिक पर्यटन
In reply to प्रश्नच नाही by विटेकर
तुमच्या या सकारात्मकतेला मी
In reply to प्रश्नच नाही by विटेकर
त्र्यंबकेश्वरच्या गर्दीत,
ह्म्म
कशाला देवळात जातात लोक? एवढं
वायझेडपणा हेही एक महत्त्वाचे
In reply to कशाला देवळात जातात लोक? एवढं by पिलीयन रायडर
तेवढेच का?
In reply to वायझेडपणा हेही एक महत्त्वाचे by बॅटमॅन
एवढा बिनडोकपणा उघड उघड डोळ्याला दिसत नाही का?
In reply to कशाला देवळात जातात लोक? एवढं by पिलीयन रायडर
व्यवहारात कॉमन नसतो कॉमन
In reply to एवढा बिनडोकपणा उघड उघड डोळ्याला दिसत नाही का? by अर्धवटराव