भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”
आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.
ध्येय(Goals): एक भारत, श्रेष्ठ भारत, सुशासन, सर्वसमावेशक सर्वस्पर्शी व सर्वदेशी विकास
आव्हाने(Challenge): भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, आर्थिक विषमता, देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास, वित्तीय नुकसान(CAD), रुपयाचे झालेले अवमूल्यन, परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था, देशातील अंतर्गत बाजारपेठेत चीन व इतर देशांनी काबीज केलेला मोठा वाटा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय निर्यातीचा घटलेला वाटा.
मुख्य कार्यवाही केंद्र(Focus for Action): महिला सबलीकरण व संरक्षण, शेतकरी, कामगार, विद्ध्यार्थी, रोजगार निर्माण करणारे छोटे व्यावसायिक यांना हव्या त्या सुविधा स्वस्तात पुरविणे, लहान लहान खेड्यांपर्यंत रस्ते व मुलभूत साधनसुविधा उपलब्ध करणे, औद्योगिक उत्पादने, जल व उर्जा स्वतंत्रता, रस्ते-जहाज व नवीन गोदी बांधणी, शिक्षण, स्वास्थ्य व संशोधन यात अग्रेसर होणे, सिंचनाचे आधुनिक मार्ग अवलंबणे, नवीन मार्ग शोधणे व जरूर पडल्यास नदीजोड प्रकल्प उभरणे, पर्यटन व निर्यात यात मुलभूत सुधारणा, आर्थिक क्षेत्रासाठी व प्रामुख्याने NBFC साठी चांगले नियंत्रक उभे करणे व भारताला आर्थिक महासत्ता बनविणे.
काश्मीर व राममंदिरासारख्या मुद्द्याला भारतीय घटनेला अनुसरूनच कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
- काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार. कठोर उपाययोजना करणार.
- कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार.
- विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
- ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या वाढीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, तेथेच एफडीआयला परवानगी देणार.
- नाशवंत शेतीमालाचा इतर भागांमध्ये पुरवठा करण्यासाठी अॅग्री रेल नेटवर्क उभारणार.
- हायस्पिड ट्रेन नेटवर्कसाठी डायमंड क्वॉड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करणार.
- महागाई रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शिक्षण आणि उद्योगात अल्पसंख्याकांना अधिक संधी देणार.
- केंद्र आणि राज्य सरकार या मधील संबंध सुधारण्यावर भर देणार.
- ज्युडिशिअल रिफॉर्म, इलेक्ट्रोल रिफॉर्मला प्राथमिकता देणार.
- नवीन आरोग्य धोरण आणले जाईल.
- ग्रामीण भागात वाय-फाय झोन उभारणार.
- महिला सबलीकरणासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड.
- टॅक्स व्यवस्था आणि बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर.
- प्रत्येक राज्याच्या राजधानीत एम्स उभारले जाईल.
- नॅशनल ई-वाचनालय सुरू केले जाईल. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. उर्दू भाषेचे संरक्षण आणि प्रसार केला जाईल.
- एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण करण्यावर भर.
- शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी दूर करणार.
- प्रत्येक भारतीयाला पक्क्या घराचे आश्वासन.
सर्व वर्ग, प्रांतिय व धर्मियांना सुख, शांती, समाधान, सुरक्षा, विकास व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची विक्रयमूल्य (ब्रांड व्हॅल्यू) वाढविण्यासाठी गुजराथचे सलग तीन वेळेला निवडून आलेले व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले “माननीय श्री नरेंद्र भाई मोदी” व “भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षांचे खासदार पदासाठीचे इतर अधिकृत उमेदवार” यांनाच निवडून आणावे, ही विनंती माननीय श्री लाल कृष्ण अडवाणी व श्री राजनाथ सिंग यांनी केलेला आहे.
प्रथमदर्शनी अशक्य भासणारे परंतु तितकेच महत्वाचे मुद्दे ऐकून माझे कान टवकारले गेले व हातातील कामे सोडून मी टीवीवर नजर खिळवून बसलो. देशहिताला प्रथम व पूर्ण प्राधान्य देवून भाजप व मित्र पक्षांनी निवडणूक जिंकल्यावर काय चांगले होवू शकते यावर केलेला विचार मनाला पूर्ण भावून गेला. निवडणुकीला सामोरे जातांनाच अगदी पहिल्या पायरीवरच या तऱ्हेने बारीकसारीक गोष्टींचा पूर्ण विचार करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे व पक्षाची देशाप्रती असणारी एकूण तळमळ (प्रतीबद्धता) या “संकल्प पत्रा” द्वारे व्यक्त केली गेली आहे असेच वाटले.
चांगला मुद्दा हाती नसल्यामुळे, अगदी निवडणूक सुरु होण्याच्या मुहूर्तावरच हे प्रकाशन झाले आहे, यावरच बऱ्याच पक्षांनी टीका केली आहे. इतर सर्व पक्षांनी निव्वळ कागदी प्रकाशनाची औपचारिकता दाखवून केवळ मतदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असेच वाटते. त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे. या आरक्षणामुळे फक्त वरवर लेप लावून खालची जखम तशीच भळभळत ठेवण्यासारखेच आहे, हे आजवर कोणाच्याही लक्षात कसे आलेले नाही?
नुसती खोटी प्रलोभने देत व मोठमोठे घोटाळ्यांचे विश्वविक्रम रचलेल्या कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात तर पुढच्या एका वर्षात १० लाख रोजगार निर्माण करू अशी पोकळ आश्वासने दिली आहेत, ज्यावर कोणा मतदाराचा विश्वास बसेल का?
गरिबांच्या रोजच्या खर्चावरचे चमत्कारिक व अवास्तव गणित करून कोंग्रेसच्या नियोजनमंत्र्यांनी त्यांच्या तोंडावर चपराक मारलेली आहे, हे कोणी विसरेल का?
विदेशी अर्थपुरवठ्याशिवाय विकास शक्य नाही असेच इतर सर्व विरोधी पक्षांना वाटत असतांना, आजपर्यंत असा आमुलाग्र बदल घडवण्याचा “१८०अंश विरुद्ध” विचार कोणत्याही पक्षाला करणे जमलेले नाही. पण काळाची हीच खरी गरज आहे, ज्यामुळे मरगळलेली भारतीय मने निश्चितच जागरूक होऊन भारत एक आर्थिक महासत्ता बनेल अशी खात्री वाटू लागते. व त्याचा परिणाम कि काय गेल्या १० वर्षात रुपयाचे मूल्य ४० वरून ६८रुपये प्रती डॉलर एवढे घसरलेले असतांना नुसते “मोदीच निवडून येतील असा मतदारांचा आशावाद” दोन महिन्यात ५९ रुपया प्रती डॉलर पर्यंत मूल्यवर्धन करू शकतो, याचा अर्थ मोदी निवडून येण्याबद्दल किती उत्सुकता व विश्वास आहे हेच दिसून येते.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!
एक आवाहन: मेरा देश लंगडा हो गया है|आप देशको उठाकर चला दिजीये|
वाचने
57514
वाचनखूण
प्रतिक्रिया
219
In reply to पण भाजपच्या नाड्या संघाच्याच by संपत
संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे
In reply to संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे by अर्धवटराव
स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार!
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
नारुमुळे मेंदु अधु होतोच.
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
सर्किट असताना मान्य न करता
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
आपण जरा जास्तच बोलत आहात
In reply to स्वतःलाच सर्कीट म्हणणार्याकडून कितपत विचार होणार! by संजय क्षीरसागर
उलटी गंगा
In reply to संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे by अर्धवटराव
पण नाड्या संघाच्या हातात
In reply to पण नाड्या संघाच्या हातात by संपत
मोदिंची वाराणसीची उमेदवारी मागच्या महिन्यात ठरली नाहि.
In reply to मोदिंची वाराणसीची उमेदवारी मागच्या महिन्यात ठरली नाहि. by अर्धवटराव
लखनौ, वाराणसी, एक सीट
In reply to मोदिंची वाराणसीची उमेदवारी मागच्या महिन्यात ठरली नाहि. by अर्धवटराव
हा मुद्दा जाहिरनाम्यातुन
In reply to हा मुद्दा जाहिरनाम्यातुन by संपत
सध्यापावेतो तरी...
In reply to सध्यापावेतो तरी... by अर्धवटराव
तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचला.
In reply to संघाचा इन्फ्लुएंस नक्कीच आहे by अर्धवटराव
शी बै अर्धवटराव. असा आभ्यास
In reply to पण भाजपच्या नाड्या संघाच्याच by संपत
कैच्याकै
In reply to कैच्याकै by क्लिंटन
१९९२ -९३ साली राम मंदिर
In reply to १९९२ -९३ साली राम मंदिर by संपत
काय सांगता राव
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
अयोध्येत बाबरी सोडा असे
In reply to अयोध्येत बाबरी सोडा असे by संपत
संपतराव,
In reply to संपतराव, by प्यारे१
जाऊ द्या न आवले साहेब. ह्या
In reply to जाऊ द्या न आवले साहेब. ह्या by संपत
तुमच्या घराचा एक कोपरा तुम्ही
In reply to तुमच्या घराचा एक कोपरा तुम्ही by प्यारे१
राममंदिराचा मुद्दा आणला कुणी
In reply to राममंदिराचा मुद्दा आणला कुणी by संपत
बर्याच राज्यांमध्ये भाजपचं
In reply to बर्याच राज्यांमध्ये भाजपचं by प्यारे१
दुधाने पोळलेला ताकदेखील
In reply to दुधाने पोळलेला ताकदेखील by संपत
दुसर्या हॉटेलचा मेनू बघा मग!
In reply to दुधाने पोळलेला ताकदेखील by संपत
गरम दूध
In reply to अयोध्येत बाबरी सोडा असे by संपत
ठिक आहे
In reply to नवीन काहीच नाही. by विकास
त्यात नवीन काहीच नाही.
In reply to बिजेपीचा `खरा अजेंडा' by आयुर्हित
हा हा हा सोयीस्कर ग्राफ. हे
In reply to हा हा हा सोयीस्कर ग्राफ. हे by विजुभाऊ
म्हणजे बाप वाईट असेल तर मुलगा
भारत के लिए 'मोदी' नीति जरूरी : वॉशिंगटन पोस्ट
In reply to भारत के लिए 'मोदी' नीति जरूरी : वॉशिंगटन पोस्ट by आयुर्हित
आयुर्विमा!
In reply to आयुर्विमा! by संजय क्षीरसागर
झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले?
In reply to झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले? by आयुर्हित
आयुष्यमान!
In reply to आयुष्यमान! by संजय क्षीरसागर
बीजेपी ला त्यांच्या ह्यातीत
In reply to आयुष्यमान! by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागरजी, उठा, उठा, जागे व्हा!
In reply to संजय क्षीरसागरजी, उठा, उठा, जागे व्हा! by आयुर्हित
आयुर्जी, प्रशम घ्या त्यानं शांत झोप लागेल!
In reply to आयुर्जी, प्रशम घ्या त्यानं शांत झोप लागेल! by संजय क्षीरसागर
असं का म्हणु नये की
In reply to झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले? by आयुर्हित
सरेशवाला ह्यांच्यावर मोदींना
In reply to सरेशवाला ह्यांच्यावर मोदींना by संपत
येस!
मूळ धागा..
हिब्रु आणि तमिळ
In reply to हिब्रु आणि तमिळ by पैसा
मलापण.
१२एप्रिल२०१४ रोजीचे मोदींचे पुण्यातील भाषण
In reply to १२एप्रिल२०१४ रोजीचे मोदींचे पुण्यातील भाषण by आयुर्हित
मोदींचे पुण्यातील भाषणाची लिंक
निवडणूकी दरम्यान प्रत्येक
बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली!
In reply to बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली! by संजय क्षीरसागर
मुद्दा काय आपण बोलतो काय?
In reply to बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली! by संजय क्षीरसागर
लईच भारी. संक्शिसाय्ब, तुमी
In reply to बिजेपीप्रेमींचे विचार वाचून मजा आली! by संजय क्षीरसागर
राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध...
In reply to राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध... by विटेकर
?
In reply to ? by आजानुकर्ण
सोरटी सोमनाथ उभारणीमुळे
In reply to राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध... by विटेकर
राम आणि कृष्ण हे आम्हा
एवढा तिरस्कार?
च्यामारी, मोदी
In reply to च्यामारी, मोदी by Dhananjay Borgaonkar
कडक प्रतिक्रिया. ह्याला
एनडीटिव्ही
In reply to एनडीटिव्ही by विकास
एनडीटिव्हीच्या आज जाहीर
In reply to एनडीटिव्हीच्या आज जाहीर by क्लिंटन
निष्कर्ष
In reply to निष्कर्ष by विकास
शेवटची जनमत चाचणी...तरिही...
In reply to एनडीटिव्हीच्या आज जाहीर by क्लिंटन
पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ?
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
एक म्हण
In reply to एक म्हण by आयुर्हित
फारच बाळबोध म्हण आहे
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
भ्रम
In reply to भ्रम by क्लिंटन
>जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे
In reply to >जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे by संजय क्षीरसागर
हू केअर्स?
In reply to हू केअर्स? by क्लिंटन
हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
:)
In reply to :) by क्लिंटन
ज्यांना स्वतःचा राजकीय बेस आहे असे कोणते (खरं तर एकूण किती)
In reply to ज्यांना स्वतःचा राजकीय बेस आहे असे कोणते (खरं तर एकूण किती) by संजय क्षीरसागर
मला वाटते अडवाणी जोशीना
In reply to मला वाटते अडवाणी जोशीना by संपत
मोदिंची वाट बिकट आहेच.
In reply to मोदिंची वाट बिकट आहेच. by अर्धवटराव
मान्य. मुद्दा हा होता कि
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
अकलेचे तारे तोडू नका!
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
पण मग...
In reply to पण मग... by विकास
कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं!
In reply to कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं! by संजय क्षीरसागर
तरी पण...
In reply to कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं! by संजय क्षीरसागर
अपरीहार्यता..
In reply to अपरीहार्यता.. by विकास
मोदींसाठी बडोदा मतदारसंघ बिजेपीनं निवडला होता,
In reply to >जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे by संजय क्षीरसागर
ब्ररोब्र हाय तुमचं
In reply to ब्ररोब्र हाय तुमचं by गब्रिएल
ई-सकाळ मध्ये आंध्रात १५ फुटी
In reply to ई-सकाळ मध्ये आंध्रात १५ फुटी by सुहास..
(No subject)
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
वडोदरा
In reply to वडोदरा by विकास
पुन्हा ज्योक!
In reply to पुन्हा ज्योक! by संजय क्षीरसागर
बालीश उत्तर
In reply to पुन्हा ज्योक! by संजय क्षीरसागर
चोराच्या उलट्या बोंबा!
In reply to चोराच्या उलट्या बोंबा! by आयुर्हित
आयुर्विमा!
संजय साहेब,
In reply to संजय साहेब, by लोटीया_पठाण
मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ?
In reply to मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ? by संजय क्षीरसागर
+१
In reply to मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ? by संजय क्षीरसागर
राम मंदिर
In reply to राम मंदिर by मोहन
२. लोकसभेत पुरेसे संख्याबळ