तू
लेखनविषय:
कधी तुझी याद....संधीप्रकाशात
आणि मग खळबळ....कुठेतरी आत
चिंब जणू तू....चिंब पावसात
ओला ओला शहारा....चिंब शरीरात
उरी काहिली काहिली....जरी चांदरात
होई काळीज निखारा....तुझ्या विरहात
मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात
आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात
कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात
तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात
कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत
कधी माझी लाट....नेई तुला सागरात
दूर देशी तू....तरीही मनात
ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात
वाचने
2516
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
आवडली.
छान आहे.
छान आहे
मस्त ! :)
In reply to मस्त ! by मदनबाण
छान कविता!.. खूप दिवसांनी कुणाची तरी आठवण झाली!.. थॅन्क्स चाणक्य!
फारच छान चाणक्य!
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासातहे कडवे विशेषकरुन!
दिलखुष..... :)
आवडली
कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत
कधी माझी लाट....नेई तुला सागरात
या ओळी विशेष आवडल्या. सुंदर रचना !
सुंदरच! आवडली.
आवडली.