Skip to main content

नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द

लेखक कौशिक लेले यांनी मंगळवार, 01/04/2014 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द". चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!. हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील. साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा. १) दुकानांवरच्या पाट्या २) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस्‌ करते" ई. ३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई. ४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड ५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !! तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे ! https://www.facebook.com/groups/494409877351095/ आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील. http://navin-marathi-shabda.blogspot.in/ म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!

वाचने 93750
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

मला मदत करशील या ऐवजी सरसकट सगळ्या मालीकांत " माझी मदत करशील ( मेरी मदद करोगे) असे हिन्दाळलेले शब्द येत असतात

स्वैपाक करण्याऐवजी "जेवण बनवतात". .. असो, पण कौशिकभाऊंना इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द हवेत. शोधूया ...!!

पण ह्या मराठीकरणाच्या नादात भाषेला भयाण आणि अकलेचा खंदक दाखवणारे गचाळ शब्द बहाल करू नका ही नम्र विनंती. उदा: तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste ह्या वरच्या टुकार शब्दांबरोबरच काही चांगले समर्पक शब्दही मराठी भाषेला मिळाले आहेत. उदा: खरडवही - scrapbook जालनिशी - blog

In reply to by आदिजोशी

हा हा आयबॉल म्हणजे मीगोळा का ?

In reply to by आदिजोशी

तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste
हे अतिउत्साही लोकांचे उपद्व्याप आहेत. ही सारी उदाहरणे "विशेषनामे" आहेत. विशेषनामांचे शब्दशः भाषांतर होत नाही. त्यामुळे इंग्रजीतील "युटयुब" हा शब्द असलेले वाक्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत होतात "युटयुब" असेच राहायला हवे.

In reply to by प्रचेतस

"फेसबुक" हे इतर भाषांमध्ये सुद्धा "फेसबुक"च राहायला हवे. ते विशेषनाम आहे. उदा. "अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले" हे वाक्य इंग्रजीत भाषांतरीत करताना ते "Atrupt Aatma hid buttermilk pot" असे होईल. "Unsatisfied soul hid buttermilk pot" असे नाही होणार. "Atrupt Aatma" हे विशेषनाम आहे.

In reply to by धन्या

सहमत आहे. माझा आक्षेप फक्त 'मुखप्रुष्ठाविषयीच' होता.
अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले
वाक्य कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्षात अत्रुत आत्मा भांडे लपवित नसून 'भांडे का लपविता' असे विचारीत असतो

In reply to by धन्या

संस्कृतमधील ऋ या स्वराचा मराठीत 'रु' असा उच्चार होतो, इतकाच काय तो फरक. वरिजिनल ऋ चा उच्चार ३ प्रकारे केला तर चालतो. पण पाणिनीचे सूत्र पाहू अगोदर. ऋटुरषाणां मूर्धा| याचा अर्थ असा, की ऋ, ट-ठ-ड-ढ आणि ष या सर्व वर्णांचे उच्चारस्थान मूर्धा आहे. बाकी डीटेल्स जाऊद्यात. वरीलप्रमाणे ऋ चा उच्चार करणे अत्यंत सोपे आहे. आम्रविकन लोकांचे उच्चार ठौक असतीलच. त्यात उदा. we're going there या. वाक्यामध्ये r चा उच्चार कसा असतो? तसाच याचा उच्चार करावा. अन हा उच्चार मराठीत "ऴ" ने दाखवता येतो. "तमिऴ" मध्येही हाच उच्चार आहे.

In reply to by बॅटमॅन

किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल.

In reply to by बॅटमॅन

किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम"
आम्हाला आमच्या बाई/मास्तरांनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर आमचे पण व्याकरण थोडेफार सुधारले असते. ;)

In reply to by शिद

:) आम्हाला आमच्या बाईंनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर.. आमचे पंटर म्हन्ले अस्ते.. बहुत प्यार करते हैं, तुमको मॅडम्म.. हंम्महंम्म्..म्म ;)

In reply to by बॅटमॅन

हे उच्चार कुमार सानूनं म्हटलेले की बाबूजींनी (बाबूजी भक्तांनी हलकं घ्या. कुमार सानूभक्त फारसे नसावेत ;) )

In reply to by बॅटमॅन

बहुत सुंदर ! "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल. अशी उदाहरणे देऊन मराठी शिकवायला सुरुवात केली तर "मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे" किंवा "मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिली/बोलली जाते" ही भिती कमी व्हायला मदत होईल ! :)

In reply to by धन्या

शाळा कादंबरीतली व्याक्रणाची उदा. आठवली: "सुरेशने महेशला मारिले", "महेश दूध पितो", "महेश मार खातो", इ.इ.इ. =))

In reply to by धन्या

धन्या काका तुमचे बरोबर आहे. आत्र एक चूक आहे फेसबुक या नावाचे भाषाम्तर करणे म्हणजे "नील आर्मस्ट्राँग" याचे भाषांतर निळूभाऊ भुजबळ असे किंवा उदा " मायकेल शूमाखर" चे भाषांतर "मायकेल चांभारे" असे भास्।आम्तर करण्यासारखे आहे.

In reply to by प्रचेतस

@मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी 'मुखपृष्ठ' हा शब्द बरोबर वाटतो.>>> राम..राम..राम..राम... कहर झाला. :-/ अहो ते मोबॉइल वरून पृ टाइप करता येत न्हाई! तिथे पृ च्या जागी प्रु च टाइप करावं लागतं ! :-/ तरिही खाली आलेलं खाटुकम्यानाचं अप्रतिम विवेचन पहाता.. झालं ते बरच(अवांतर) झालेलं असलं ;) तरी बरच झालं! :D

अरे मूळ धाग्याचे काय झाले ??

आहे ती मराठी टिकवा त्यापेक्षा..... तू असं का बोलला? (या नंतरचा 'स' नेहमी गाळला जातो. 'बोललास' असं रूप असतं) मी तुला भेटेल. (भेटेल????? तृतीयपुरुष एकवचन आहे का?) मी तिला बोलली, ती मला बोलली..... (अरे काय!!!) अगणित चुका असतात... अगणित...! त्या सुधारायची मोहीम काढली तर बरं. अजून नवीन शब्दांची गरज नाही !

In reply to by वेल्लाभट

खरंय. बर्‍याच जागी पुस्तक, वह्या पण 'भेटतात' लोकांना.

खालील वाक्यांवर स्वतंत्र धागा होऊ शकतो.
मी चहा पिलो / प्यायलो / पिली / प्यायली (?) तो चहा/ती चहा (?)
सद्या मी "मी चहा प्यायलो" असेच म्हणतो/बोलतो. मी ठाण्याचा रहिवासी/रहिवाशी आहे.

केसं, दगडं किवा असेच काही .. आणि आजकालची मराठी गाणी सुद्धा याच वाटेने चालली आहेत. उदाहरणार्थ - आयचा घो आयचा घो येडा झाला का रे आयचा घो आयचा घो पागल हुआ है ये आपणच अशी गाणी लिहायची आणि वर मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे वगैरे यावर चर्चा झाडायची.

हिंदीच्या अतिप्रचारामुळे आणि सुलभीकरणाच्या भोंगळ कल्पनांमुळे मराठीचा संपूर्ण साचा बदलत चालला आहे आणि माझ्या मते तो योग्य नाही. उदा. मी अकोला जातो. विभक्ती प्रत्यय कुठे गेला? माझा वाढदिवस पुण्यात मनवला. मनवला? साजरा केला असे म्हणतात मराठीत. विभक्ती प्रत्यय तर हरवत चालले आहेत. मी त्याची मदत केली हे आणखी एक उदाहरण. पैसे भेटले. भेटले? पैसे काय मनुष्य आहेत काय भेटायला? असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हिंदीच्या अतिप्रचाराबद्दल अतिशयच सहमत. तदुपरि भेटणे हे कियापद मिळणे या अर्थी वापरणे हे फक्त अलीकडचे नसावे असे वाटते. विदर्भ इ. भागांत अगोदरपासून असेच बोलत असावेत असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भाषा सतत बदलत असते. विभक्ती प्रत्ययांची रुपे बदलत असतात. इतर भाषांच्या संपर्कामुळे नवनवे प्रयोग होत असतात. जीभेला ऐकायला बोलायला जे नीट वाटतात ते रुढपावत असतात. असंच आणि असंच हवं या हव्यासापोटी संस्कृत मृत झाली. मराठीबद्दल अजुन आशा आहे. पैसे मिळाले हेच योग्य रुप हे कुणी ठरवल? त्यांना तो हक्क कुणी दिला? समोरचा माणुस पैसे भेटले म्हटल्यावर ज्याला सांगत आहे त्याला समजले ना? संवाद पूर्ण झाला. संवाद होणे महत्वाचे. असो.

In reply to by मारकुटे

असहमत भाषा नवसंपर्क वगैरे वगैरे जरी असले तरी 'अति' वर्ज्य असावे आणि असावेच. मी मुंबईला जातोय च्या ऐवजी मी मुंबई जातोय हे कुठल्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. अशा अतिरेकी सुलभीकरणामुळेच मराठीची पिछेहाट होत आहे हे नक्की. एकतर न्यूनगंडापायी इंग्रजीचा केला गेलेला अतिरेकी स्वीकार आणि भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. विचारणार्‍याला विचारण्याचा हक्क कोणी दिला हे विचारण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असाही उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. झालंच तर आपल्या भाषेवर हिंदी, इंग्रजीचा प्रभाव पाडून घेण्यापेक्षा उलटा प्रयत्नही कधी करावा. भले लगेच जमणार नाही किंवा लगेच शक्यही नाही परंतु सुरुवात नक्की व्हावी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पैसे भेटले हा प्रयोग हिंदीच्या प्रभावाखालीच होतोय याला विदा काय? हिंदीचा मराठीशी खूप जवळून संपर्क फारतर गेल्या पन्नासेक वर्षांचा. त्याआधी हा प्रयोग असेल तर काय म्हणणार मग? अन उलटा प्रभाव हिंदीवर थोडासा का होईना, आहेच.

In reply to by बॅटमॅन

कदाचित हिंदीच्या प्रभावाचा मुद्दा आधी आल्यामुळे भेटणे वर त्याचा प्रादुर्भाव झाल्यासारखा वाटतो आहे. तसे नाही २न्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. विदाच पहायचा झाला तर पूर्वीचे चित्रपट , झालंच तर आकाशवाणीवरच्या श्रुतीका, नाटके यात पैसे भेटणे या वाक्प्रचाराचा अभाव दिसेल आणि तो मी लहान असल्यापासून अनुभवलाच आहे. झालंच तर विदर्भात तो वापरात असेल तर तो वीर वामनराव जोशी या वैदर्भिय नाट्यकाराच्या नाटकांमधे तो दिसत नाही. आणि हो प्रभावाबद्द्लच बोलायचे झाले तर मराठीतील विभक्ती प्रत्यय बाद करण्याचे कारण मला उमजले नाही. मग भले विदर्भातले लोक "मी नागपूर जातो" म्हणत असतील तरी ते चूकच आहे. मग अशा बोलण्याला कोणी बोलीभाषेचा लेप देऊ पाहत असेल तर त्याला विरोध नक्की करावा. कारण माझे जवळचे नातेवाईक देखील विदर्भातील आहेत परंतु तेही असे बोलताना ऐकले नाही. अर्थात त्याच्याशी तुम्ही आधीच सहमत आहात असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विभक्तीच्या मुद्यावर सहमती आहेच. बाकी तुम्ही दिलेली उदा. 'प्रमाण' मराठीची आहेत. नाटककार वैदर्भी असले तरी नाटके वर्‍हाडी बोलीचे प्रतिनिधित्व करतील असे क्वचितच दिसावे. त्यामुळे फक्त बोलीभाषेतली उदा. पाहिजे होती.

In reply to by बॅटमॅन

असे कोकणातही सर्रास बोलीभाषेत ऐकायला मिळते. प्रमाण मराठीत आहे तसा बोलीभाषेत 'मिळणे' आणि 'भेटणे' यात फारसा फरक नाही. याशिवाय 'गावले नाय' असंही म्हणतात. प्रमाण मराठीत मात्र 'गावले' म्हणजे फक्त 'सापडले'. कोंकणीतही मिळाले आणि भेटले या दोन्हीसाठी 'मेळ्ळे (मेळले)' असंच वापरलं जातं. तेव्हा हे शब्दप्रयोग चूक असं म्हणता येणार नाही. प्रमाण मराठीत वापरले जात नाहीत एवढंच.

In reply to by पैसा

सहमत. गावणे हाही शब्द आहेच. प्रमाण मराठी सोडूनही मराठीचे एक प्रचंड मोठे विश्व आहे त्यात काय काय घडतं याची नोंद करून ठेवणे मस्ट आहे.

In reply to by बॅटमॅन

सध्या मिपावर आणि इतर अनेक संस्थळांवर हे दिसत आहे.....
पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.
बर्‍याच मालिकांत ऐकू येते - मी काय म्हणली, तू काय म्हणला, ते काय म्हणले....

In reply to by सुहासदवन

केल्या गेला आहे इ.इ. ही मिपावरची स्टाईल आहे, मराठवाड्यातल्या मंडळींनी पापिलवार केलेली. ती इतरांनी उचलली, इतकेच. अन म्हणला इ.इ. तर बोलीभाषा आहेच-फक्त त्यांना दरवेळेस अशुद्ध अशुद्ध म्हणून हिणवल्या जाऊ नये.

In reply to by बॅटमॅन

पण इतर अव्याकरणीय जालीय संस्थळांच्या यादीत आपले मिपा मात्र नसावे हे माझे स्पष्ट मत आहे. ह्या संस्थळावर अनेक सुन्दर आणि अभ्यासपूर्ण लेख / लेखमालिका सातत्याने येत असतात. इस्पीकचा एक्का, ऋषिकेश, क्लिंटन, गवि, बॅटमॅन आणि इतर अनेक मान्यवर लेखक बरीच मेहनत घेऊन हे लेख मांडतात. त्या ले़खांचे प्रयोजन, त्यात असणारी माहिती, शब्दभांडार, व्याकरण, उपमा इत्यादी आम्हा सार्‍या वाचकांसाठी एक पर्वणीच असते. अगदी त्या लेखांखालील असणाऱ्या टिप्पण्या देखील बऱ्याचदा खूप मार्मिक आणि माहितीपूर्ण असतात. आजच्या युगात जिथे छापील पुस्तके आणि त्यातही व्याकरणासारखं काहीतरी कठीण वाचण्यास जेव्हा अजिबात वेळ नसतो त्यावेळी मिपा सारखी संस्थळे दर्जेदार वाचनाची भूक भागावितात. आणि हेच मिपाचे यश देखील आहे. पण ह्या लेखांनी आणि त्या खालील असणाऱ्या टिप्पण्यानी आपल्या दर्जा बरोबरच आपल्या मराठी भाषेची शब्द प्रामाण्यता टिकवली तर किती चांगले होइल... कारण अनेक युवक / युवती हे लेख आणि लेखमालिका आपल्या किंवा मित्रांच्या संदर्भांसाठी उतरवून घेतात, अशा वेळी आपली भाषा किती सशक्त आणि प्रमाणबद्ध हे माहित पडते. अशा वेळी अगदी एखादा चुकीचा शब्द किंवा चुकीचे व्याकरण भाषेचे सौंदर्य नकळत नष्ट करू शकते आणि चुकीच्या व्याकरणाचा पायंडा पाडू शकते. आणि मला वाटते ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, मराठी भाषा टिकवायची असेल तर… कारण चांगली सवय पटकन लागत नाही पण चटकन सुटते वाईट सवय पटकन सुटत नाही पण चटकन लागते. इथे कोणालाही सुनावण्याचा, दुखावण्याचा काहीही हेतू नाही. कृ. ह. घ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>>भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. भाषाभिमान आणि बदल ( ते सुद्धा म्हणे टुकार..ब्वार) यांची गल्लत होत आहे, पतंजली २००० वर्षांपूर्वी म्हणाला होता जसे कुंभाराकडे जाऊन हवे तसे मडके मागतो, बनवुन घेतो तसे कुणीही वैयाकरण्याकडे जाऊन शब्द पाडून घेऊन वापरत नाही, तर त्याचा वापर सुरु करतो. वैयाकरणी केवळ त्याची नोंद घेत व्याकरण बनवतो (जे दर काही वर्षांनी बदलत असते.) बाकी चालू द्या ... आम्ही मुर्ख आहोत हे मान्य !

नागपुरी मराठी अशीच हिंदाळलेली आहे.. मी आली/गेली/बोल्ली, तो चाल्ला गेला, काहीही काय बोलून राहिला?? वगैरे.. अलीकडे मराठी टीव्ही जाहिरातींत सुद्धा डोक्यात जाणारे शब्दप्रयोग असतात.. उदा. "काय आपल्या टूथपेस्टमधे मीठ आहे?" (कुठ्ल्या मराठी मधे असे वाक्य असते??)

केलेल्या जाहीराती आणि चित्रपट हे "रेम्या" डोक्याचे असतात त्यामुळे व्याकरणाचे "शिकरण" झालेले आसतेच आसते.

मिस करणे =तु नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटतंय . इक्सपायर झाले =वारले . तुमच्या लुकला सुट होईल =तुम्हाला खुलुन दिसेल .तुम्ही या कपड्यात चमकाल . ट्रेंडी =चलाख चटपटीत तरतरीत . फ्रेश होऊन आलोच =आवरून आलोच . टेंशन घेऊ नका =एवढा ताण देऊ नका . डाइअट करा =पथ्य पाळा . हेल्थी फुड =पौष्टिक खाणं . मेन डिश =पक्वान्न ,स्वीट =गोड पदार्थ . बेसिकली =मुळातच . क्लायमैक्स =टोकच गाठलं अपडेटस =नवीन कळवा . रेंटल अपाटमेंट =महिना भाड्याने . फाटली =फजिती झाली ,वाजंत्री वाजली ,आडवाच झालो ,फरफट झाली . बोअर झालो =अगदी कंटाळलो . ऑफ झालो =सुन्न झालो . टेक इट ऑर लीव इट मिपाशटाईल आइ मिन =मला असं म्हणायचं होतं मिप्पाछाप पटलं तर घ्या हेवेसांन .

लूट, ठग, जंगल, गुरु, अवतार,योगा, डे़कॉईट, चटनी, चड्डी, आलू, देसी, गोरा, यार,अछा, अंग्रेज, बदमाश, धोती सारखे शब्द त्यांनी घेतले. ते लोक पण असाच विचार करतात काय हो ???

शेजारच्या घरी मत्स्यपेटिका आणली होती. व्यवस्था ठेवण्यात काहीतरी गडबड झाली आणि काही मासे मेले. तर घरातली छोटी (वय वर्षे पाच) मुलगी दु;खाने सांगू लागली, 'ममा, ते सगळे फिश सँड मध्येच बसलेत. ते वरच येत नाहीयेत. ते सगळे मेले झालेत का?(आर दे डेड?)' सोसायटीमध्ये मांजरांच्या पिल्लांची संख्या खूप झालीय. एकदा त्यातले एक पिल्लू मेले. तर एक चिमखडा धावत येऊन सांगू लागला, 'ती कॅट मेरली. ती पाठीवर पडली, वॉमिट केरली आणि मग ती मेरली' मेली, केली ही मुलांच्या दृष्टीने अनियमित रूपेच आहेत. पडली, बसली, उठली प्रमाणे मरली, करली असे व्हायला पाहिजे. पण आपण मोठी माणसे तर मेली, केली म्हणतो. मग मुलांनी आपल्या मतीने मेली केलीतला 'ए'कार आणि त्यांच्या दृष्टीने योग्य मरली, करली ही रूपे यांचा मेळ घालून मेरली, केरली ही नवी रूपे निर्माण केली!

'स्वीकारार्ह' नाही, 'वर्ज्य' असावे हे काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. म्हणजे असे प्रयोग वापरणार्‍यांना आपण मराठीच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण देऊन शिक्षा करू शकतो. पण फार मोठ्या प्रमाणातल्या मौखिक मराठीचे काय? तिथे निर्बंध कसे काय आणि कोणाकोणावर घालणार? नवनव्या शब्दांचा आणि शब्दप्रयोगांचा खूप मोठा आणि ताकदवान लोंढा मराठीच्या पात्रात घुसतो आहे. तेव्हा मूळ नदी आपले पात्र बदलणारच. हे पात्र विस्तारणे नव्हे तर एका वेगळ्याच दिशेने वाहू लागणे आहे. ह्याला व्याकरणनियमरूपी धरणांनी किंवा बांधांनी आवरता येण्याजोगे नाही. इफ यु कान्ट रेज़िस्ट, एन्ड्युअर, असे वचन आहे; त्याची आठवण होते. तसे तर नपुंसक लिंगही मराठीतून नामशेष होऊ घातले आहे. 'सर्वांचे धाबे दणाणले आहेत' किंवा 'हे ऋण फेडता येण्याजोगे नाहीत' हे सररास ऐकू येते. बदल हे व्हायचेच. ज्ञानेश्वरी, गाथा, गुरुचरित्र त्यातल्या भाषेमुळे आज दुर्बोध आहे. अगदी निबंधमाला सुद्धा वाचताना मध्ये मध्ये ठेच लागते. पण ती भाषा 'मराठी'च आहे आणि सध्याची आणि भविष्यात बदलणारीसुद्धा 'मराठी'च असेल. तेव्हा काळजीचे कारण नाही.

In reply to by राही

होत रहातात हे खरे,पण त्याला काही विधीविशेष असावा, नाही? मराठीतील रूढ अर्थाचे शब्द (विनाकारण) नव्या अर्थाने येऊ का लागावेत? उदा. 'प्रभावित', 'संपन्न'. ८० च्या दशकापासून 'शासकीय' मराठी, आमच्या भाषेत अगम्य बदल करू लागली. आता तर, माध्यमांच्या परिणामामुळे काही धरबंदच राहिलेला नाही. (जाता जाता, पूर्वी - म्हणजे अगदी सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर तरी नक्कीच- 'सरकार' हा शब्द खुद्द सरकारच वापरायचे. मग कधीतरी त्याचे 'शासन' झाले). आता मुंबई-पुण्याकडे जी लिहीली व बोलली जाते, ती भाषा मराठी नसून 'हिंदीठी' आहे. येथील मिपावरीलच लेखन पाहिले तर प्रत्यय यावा! भाषा प्रवाही असावी, हे ठीक. पण ह्याचा अर्थ निव्वळ दहा- वीस वर्षात, तिचे रूपडे ओळखू येऊ नये इतकी ती प्रवाही असेल, तर तिच्या प्रवाहाचे स्त्रोत तपासून पहावेत असे वाटते.

In reply to by प्रदीप

वेगवेगळ्या स्रोतांमधून 'जीवन' मिळू लागले तर त्यात वावगे काय? बदल सोपे वाटले, सर्वमान्य झाले तर टिकतील, नाही तर उडून जातील. मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार?

In reply to by राही

>>>मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार? सहमत आहे. गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे. हे सत्य स्विकारणे अनेकांना जड जाते त्यामधुन आम्ही बोलतो तीच मराठी बाकी भुक्कड ही प्रवृत्ती गेल्या पन्नास वर्षांत पुण्यामुंबईतील विशिष्ट वर्गातील लोकांमधे उदयास आलेली आहे. त्याचाच वापर करुन बोलण्यावरुन जात शोधुन त्याच्याशी व्यवहार करण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे.

In reply to by मारकुटे

गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे..... हे टाळीवाक्य इथे (म्हणजे सदर उपधाग्याच्या संदर्भात) अगदी गैरलागू आहे. माझा प्रतिसाद नीट वाचलात तर आपल्या लक्षात यावे की माझा आ़क्षेप कुठल्याही मराठी बोलीभाषेला नाहीच. उलट संस्कृताळलेले 'शासकीय मराठी' व हिंदीच्या अतिप्रभावातून आलेल्या बदलांविषयी मी लिहीले आहे. तेव्हा पुणेमुंबई, गावकुसाबाहेरील माणसे इ. इ. ह्या उपधाग्यावर गैरलागू.

In reply to by प्रदीप

आपलेच आशिर्वाद !!

In reply to by राही

एक प्रमाण भाषा असणे आवश्यक आहे. जसे कायदेशीर इंग्रजी हि अगदी इंग्लंड मध्ये जन्माला आलेल्या माणसाला सुद्धा कठीण जाते म्हणून ती सोडून द्यावी असे कोणी म्हणणार नाही. पण एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ असण्यासाठी किंवा दुसर्याला सांगण्यासाठी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. सर्वसामान्य माणसाला ती अवघड होते हि वस्तुस्थिती आहे. जर आपण law ,act आणि statute याचे भाषांतर कार्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणसाला कायदा हा एकाच अर्थ कळतो म्हणूनच अधिनियम, कायदा आणि विधी असे शब्द वापरावे लागतात. मुळात कोणतीही भाषा प्रमाण असो वा बोलीभाषा असो हि शुद्ध स्वरुपातच बोलली जावी. मालवणी भाषा आपल्या मूळ ढंगात जितकी गोड लागते तितकी संकरीत / अर्धवट हिंग्लिश मालवणी कानाला खटकते. हीच गोष्ट कोकणी किंवा वर्हाडी व खानदेशी भाषे बद्दल किंवा हिंदी किंवा कोणत्याही हिंदीच्या बोलीभाषे बाबत( मगधी, मैथिली वा भोजपुरी बद्दलहि) म्हणता येईल. थोडेसे च्या ऐवजी वाईच म्हणले तर कानाला गोड लागते पण "जरासी" हा हिंदी शब्द खटकतो. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

बास बास. माझा आक्षेप ज्याला होता ती गोष्ट डॉक्टरांनी अचूक हेरली. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

>>>आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही भाषाशास्त्रानुसार जी काही जशी काही बोलली जाते ती भाषा चांगलीच असते. त्यामधे शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट असं काही नसतं. अशी वर्गवारी कृत्रिम असून गेल्या दोनशे वर्षांत स्वत:चे स्थान डळमळीत झालेल्या वर्गाने इतरांवर कुरघोडी करण्याच्या हव्यासाचा परिपाक आहे.

In reply to by मारकुटे

मारकुटे साहेब, भाषेतील किंवा बोलीभाषेतील कोणताही शब्द वापर करण्यास हरकत नसावी पण परभाषेतील दोन शब्द प्रत्येक वाक्यात आणून हीच बोलीभाषा म्हणणार्या बद्दल काय म्हणावे. मला वेळ नाही च्या ऐवजी "टायम" नाही. किंवा वय विचारले तर "ट्वेंटी एट कम्प्लीट" होतील, अद्रक घालून चं पिली असे म्हणणे याला काय म्हणावे. माझे म्हणणे इतकेच कि आपण जी भाषा बोलत असाल तिच्यात सरमिसळ होऊ नये इतकेच. मग अहिराणी असेल तर अहिराणी असावी. हिंदी असेल तर हिंदी असावी किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी स्वच्छ असावी. दुर्दैवाने कोणतीही भाषा शुद्धच असते या आग्रहा पायी आपल्यातील काही लोक कोणतीच भाषा धड बोलू शकत नाहीत. आणि याने जेंव्हा आपण मुलाखतीसाठी जाता किंवा लेखी अर्ज करत तेंव्हा आपले अपरिमित नुकसान होते हे आपल्याला( मराठी माणसाना) लक्षात येत नाही. प्रमाण भाषे बद्दल असे आहे कि आपण एखादा प्रश्न माहितीच्या अधीकारात विचारला आणि कोणी आपल्याला अशा सरमिसळ भाषेत उत्तर दिले तर त्याचे नक्की अर्थ काढणे कठीण होते आणि नंतर अशी माणसे कायद्याचा कीस पडून आपल्या मुळ हेतूला हरताळ फासू शकतात. यासाठीच सरकार दरबारी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. दुचाकी वाहन चालवताना आपल्याकडे परवाना नसेल तर लोचा होईल /लफडा हो जायेगा असे आपल्याला कळवले तर कसे वाटेल. आपल्याला आपल्या जमिनीचा/ घराचा सात बाराचा उतारा अशा अर्धवट भाषेत मिळाला तर त्यावर येणारे कायदेशीर हक्क किंवा अधिकार आपल्याला सिद्ध करणे फार कठीण होईल आणि आपला लांबचा मावस चुलत भाऊ आपल्या हक्कावर "लोचा" करू शकेल. कोणत्याही भाषेला अधिकृत दर्जा देताना हा विचार करावा लागतो. सरकारी अधिकार्याला विचारलेल्या प्रश्नाला अधिकृत भाषेतच उत्तर देणे बंधनकारक ठरते . मग या प्रमाण भाषेला आपल्याला शुध्द म्हणायचे नसेल तर नसो. जर आपण वादासाठी वाद घालत असाल तर बोलणेच खुंटले.