मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
फुटे दुःख भवती, गळे रुद्ध झाले तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले रणीँ हासुनी बोलले जे महात्मे जरा टोकता मी किती कृद्ध झाले किती सर्वव्यापी तुझा न्याय होता मुले जायबंदी, लुळे वृद्ध झाले चिता जाळण्याची नको आज चिँता पहा लोक सारे इथे गृद्ध झाले किती हाय करुणे तुझा बोलबाला कसाई जुने ते अता बुद्ध झाले तुझा यद्न्य हा छानसंपन्न झाला बलीदान माझे पहा शुद्ध झाले तुझ्यावीण नाही इथे बुद्ध हसला तुझ्यावीण केव्हा इथे युद्ध झाले डॉ.सुनील अहिरराव

वाचने 3586 वाचनखूण प्रतिक्रिया 17

पोटे 12/03/2014 - 15:59
कसाई जुने ते अता बुद्ध झाले

In reply to by पोटे

बॅटमॅन 13/03/2014 - 02:09
ही ओळ तर क्लायमॅक्स अन कहर आहे!!!!
“कसाई जुने ते अता बुद्ध झाले” ही ओळ खरंच छान आहे. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला या वाक्यात जेवढी ताकद आहे तेवढीच तुमच्या या ओळीत आहे. पण या उलट असंही वाटतं की तुम्ही ‘युद्ध, बुद्ध, क्रुद्ध, वृद्ध, शुद्ध’ यांना यमकांत गुंफण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या कवितेला विनाकारण बंदिस्त करून टाकलंत. ‘समृद्ध युद्ध’ म्हणजे तुम्हांला नेमकं काय म्हणायचंय ?

drsunilahirrao 16/03/2014 - 06:53
कुर्लेकार सर, इथे छान, समृद्ध शब्द उपरोधाने आले आहेत. आपल्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. गजलेसारखी रचना लक्षणीय आणि सुंदर होऊ शकते पण कवितेएवढी मुक्त होऊ शकत नाही.