मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कल्की

निलरंजन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील. त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल. तो भारतात जन्म घेईल. भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल तो वाईट लोकांना शिक्षा देईल पापी लोकावर तो दया करणार नाही. कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर, कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल

वाचन 23693 प्रतिक्रिया 136

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ Mon, 02/24/2014 - 02:12
मला मीच नव्याने ओळखले
त्यांना स्वतःलाच पुनःप्रत्ययाचा आनंद मिळालाय. आणि तुम्ही चेष्टा करु राहिले...

In reply to by आत्मशून्य

निलरंजन Mon, 02/24/2014 - 08:31
ते ज्ञान कालही होते अन आजही आहे महत्व आहे ते वैज्ञानिक भाव ठेवून ते आपल्याला जनकल्याणासाठी कसे वापरता येईल याला शून्यात राहून ते कसे साध्य होईल? आणि राईट बंधु नी आपल्या कडील विमानाचे डिझाईन वापरले जे मुंबई च्या एकाने तयार केले आणि इंग्रजानी तुटपुंजा पैसा देवून विकत घेतले शेवटी व्हॅली तरी कोण जास्त आहेत ...भारतीय च ना पण आपल्या ला सवय लागली स्वतः ला देशाला नाव ठेवायची आणी दूसरया देशाचे गोडवे गायचे

In reply to by निलरंजन

कवितानागेश Tue, 02/25/2014 - 18:41
जनकल्याण म्हणजे नक्की काय करायचं? आणि ते वैज्ञानिक भावानी कसे करायचे? काहितरी वैज्ञानिक असेल तर तिथे 'भाव' कसा काय येइल? आणि 'भावना' वैज्ञानिक कशी काय असेल? काहीच कळेना! :(

In reply to by कवितानागेश

निलरंजन Tue, 02/25/2014 - 19:22
जनकल्याण म्हणजे एखाद्या शोध किंवा ज्ञानाचा रोजच्या वापरासाठी किंवा फायदयासाठी केलेला वापर भाव धार्मिक असण्याऐवजी वैज्ञानिक असावा म्हणजे त्यातून नक्कीच काहीतरी फायदा होईल कळ्ळलं....

In reply to by कवितानागेश

निलरंजन Tue, 02/25/2014 - 22:04
कलियुग थोर आहे किती कल्याण करायचे ठरवलं तरी 100 कोटी जनतेस आपण किती पुरणार अवतार त्या त्या वेळी होईल कृष्णाने सांगितले प्रमाणे ध्रमस्थापनेसाठी

In reply to by कवितानागेश

विटेकर Wed, 02/26/2014 - 16:23
विज्ञान आणि जनकल्याणाचा फार जवळचा संबंध आहे. विनाशकारी विज्ञान हवे आहे का तुम्हाला? चारित्र्य संपन्न समाज हीच कल्याणाप्रत नेणारी गोष्ट आहे. निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है सृजनहीन विज्ञान व्यर्थ है यदि मानव का प्यार नहीं है भौतिकता के उत्थानोमे , जीवनका उत्थान न भूले.

In reply to by निलरंजन

मनीषा Mon, 02/24/2014 - 14:23
मला आजवर वाटत होते, इतिहास म्हणजे कुणीतरी जे बघितलेले, ऐकलेले असते, ते कुणाला सांगून अथवा लिहून ठेवलेले असते -- त्याला म्हणतात. इतिहास जतन करण्यासाठी योगसाधना म्हणजे अवघड आहे.
अस कुणास भगवंत दश॔न होत नाही
??? मग कल्की महाराज पृथ्वीवर अदृश्य स्वरूपात वावरणार आहेत की काय ?

In reply to by निलरंजन

मनीषा Tue, 02/25/2014 - 10:54
धन्यावाद हो! पण मला मोक्षप्राप्तीची आस नाही. मला इथेच पृथ्वीवर बरं वाटतय. बाकी तुमच्या पूर्वावताराची थोडीफार कल्पना येऊ लागली आहे, बरं का !

In reply to by विनायक प्रभू

मनीषा Tue, 02/25/2014 - 20:32
अर्थ काय काढावे तितके निघतात. (असं म्हणतात मराठी भाषा इतकी लवचिक आहे, की वाकवावी तेव्हढी आणी तशी वाकते.) पण मी नेहमीच सरळ सरळ अर्थ घेते. उगीचच तिरका, गूढ, द्वयर्थं वगैरे जमत नाही.

In reply to by मनीषा

शैलेन्द्र Mon, 02/24/2014 - 21:16
सगळं काही वेदांत लिहीलेलं असताना अजून पुराव्यांची गरजच काय म्हणतो मी? बाकी तुम्हाला मोक्षाचं फ्री टिकीट मिळतय तर घेवून ठेवा.

In reply to by शैलेन्द्र

मनीषा Tue, 02/25/2014 - 11:00
असं कसं ? पुरावा हवाच सामान्य जनांना जरूरी वाटला नाही, तरी इतिहास संशोधकांना त्याची गरज लागते ना! मला मिळालेलं फ्री टिकीट मला नकोय, म्हणून विकायचय. कुणाला हवं असेल तर कळवा. *biggrin* :-D

In reply to by जेपी

धन्या Fri, 02/28/2014 - 10:25
से विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा वल्लीला आवाज दिला असतात तर त्याने ढिगाने स्वतः घेतलेले फोटो दिले असते. :)

जेपी Fri, 02/28/2014 - 10:34
विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा वल्लीला आवाज दिला असतात तर त्याने ढिगाने स्वतः घेतलेले फोटो दिले असते फोटो टाकता येतो का ते बघत होतो .:-) १००

म्हैस Fri, 02/28/2014 - 18:17
आपल्याकडे अफाट ज्ञान आहे हो. सामान्य माणसं सुधा त्याचा उपयोग करू शकली असती. पण हजारो वर्षांपासून हे ज्ञान वेद, उपनिषदे , धार्मिक ग्रंथ ह्यांमध्ये एका विशिष्ट वर्गाने बंदिस्त करून ठेवलं. सामान्य माणसांना जर हे ज्ञान मिळालं आणि ती योग्य दिशेने विचार करू लागली, समृद्ध होऊ लागली तर आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणून मुद्दामच लोकांना ह्या ज्ञानाची कवाड बंद केली गेली. त्यामुळे आपल्याकडे काय आहे आणि काय नाही हे पुष्कळ लोकांना माहित सुधा नाहीये. राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे तळपदे शास्त्रींनी भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं. ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, महादेव गोविंद रानडे आणि अजून १ कोणीतरी ब्रिटीश अधिकारी होता . ह्या तिघांच्या उपस्थितीत ८००० फूट उंच उडवून दाखवला. त्यानंतर ब्रिटिशांनी ती technology तळपदे शास्त्रींकडून विकत घेतली आणि त्यानंतर तळपदेनचा खून झाला. ती केस लगेच बंद करून टाकण्यात आली. त्यामुळे आधुनिक युगातल पाहिलं विमान उडवणारे राईट बंधू नाहीत. तिबेट मध्ये तर राईट बंधूंच्या आधी कितीतरी वर्षांपासून अशी विमानं उडवली जातात. फार पूर्वी सुधा आपल्याकडे असणार्या अफाट ज्ञानाचा उपयोग करून पुष्पक विमान, किवा उडणारे घोडे वगेरे तयार करण हि काही फार आश्चर्याची गोष्ट नाहीये.

In reply to by म्हैस

धन्या Fri, 02/28/2014 - 18:24
राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे तळपदे शास्त्रींनी भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं. ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, महादेव गोविंद रानडे आणि अजून १ कोणीतरी ब्रिटीश अधिकारी होता . ह्या तिघांच्या उपस्थितीत ८००० फूट उंच उडवून दाखवला. त्यानंतर ब्रिटिशांनी ती technology तळपदे शास्त्रींकडून विकत घेतली आणि त्यानंतर तळपदेनचा खून झाला. ती केस लगेच बंद करून टाकण्यात आली.
याविषयी अधिक वाचायला आवडेल. काही संदर्भ देऊ शकाल का अधिक वाचनासाठी?

In reply to by धन्या

यसवायजी Mon, 03/03/2014 - 18:39
हो ते तर आहेच. पण या तळपदेंबद्दल इतर २-४ ठिकाणी ऐकले होते. अजुन कुणाकडे विश्वासार्ह दुवा आहे का? किंवा रानड्यांनी काही लिहिलंय का?

In reply to by यसवायजी

बॅटमॅन Mon, 03/03/2014 - 18:42
त्यांचा वरिजिनल दुवा केसरी किंवा तत्सम ठिकाणी पाहिला पाहिजे. तदुपरि: या तळपदेंनी काही खर्रेखुर्रे विमान उडवले नव्हते. जे काही उडवले होते ते बलूनसदृश काही असण्याचा चान्सच जास्त, असे एके ठिकाणी वाचलेले आहे. अन यातही युनिक असे काही नाही. १८९५ साली तळपद्यांनी 'विमान' उडवले, त्याच्या आधी १०-१५ वर्षे गुजरातेत एतत्सदृश काही उडवल्याचे ऐकले आहे.

In reply to by म्हैस

आत्मशून्य Fri, 02/28/2014 - 19:08
तशी विमाने मी सुधा शिशु वर्गाच्या ग्रंथा वरून तयार करत असे. मुद्दा हा आहे या विमानात सामान्य माणुस तिकिट काढुन बसु शकत होता काय ? कोमन मेंला त्याचा काय उपयोग झाला ? त्यापेक्षा सिलिकोन वेलित जे घडते ते आज ना उद्या प्रत्येकाच्या आवाक्यात येते . असे नाही की फक्त त्यांचे त्यांच्यात राहते.

निलरंजन Sun, 03/02/2014 - 22:54
अजून ही व्हॅलीची ओढ काही सुटत नाही बाबा तुझी अरे पण आपण आपल्या देशात संशोधनाने नाही का जगाला दाखवू शकत का? आपल्या कडे शास्त्र नाहीये का शास्त्रज्ञ? जगाला जीवनपद्धती शिकवणारया भारताला अमेरिकेची गरज का?

म्हैस Tue, 03/04/2014 - 16:11
@आत्मशून्य अरे भल्या माणसं ते पहिला विमान होतं हे समजत नाहीये का ? कि अजूनही शिशु वर्गातच आहात ?

In reply to by म्हैस

आत्मशून्य Tue, 03/04/2014 - 16:25
बाकी तुमच्या सिलेक्टीव रिडींगचे कौतुक आहे. माझ्यावर व्यवस्थीत चिखफेक केलीत पण उपस्थित केलेल्या मुद्यांना मात्र उत्तरे दिली नाहीत :(

म्हैस Tue, 03/04/2014 - 16:15
काही संदर्भ देऊ शकाल का अधिक वाचनासाठी?
ह्याच्यावर सकाळ मध्ये फार दिवसांपूर्वी लेख आला होतं. त्यात पुस्तकाचा संदर्भ दिला होतां. पण आत्ता मला त्याचं नाव आठवत नाहीये. बहुतेक विकिवर अजून दुवे मिळू शकतील