मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळाच्या मरणकळा

वैभव कुलकर्नि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आस लागली पाण्याची ती कणकण उरात भरली काही पेरलेले जाळून गेले मयत झाली जमीन सारी होरपळलेल्या मयतावरती लाल उन्हाचा कपडा भारी उघडे चोच एखादा दाणा कोरडा घास त्याच्या दारी किती हरपले किती करपले कोण कोणास ना तारी थरथरना-या काळजावरती जमीनीवर आल्या मरणाच्या धाडी उन्मळलेले मूळ उठले हंबरडा फोडी नभाच्या कानी नभानेही मग सूर लावला मरणकळाच्या सोडून तानी

वाचने 1127 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/07/2013 - 17:43
लिहित राहा. (बाकी, अमित सांगलीशी किंचित सहमत) -दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी 12/07/2013 - 17:49
छान रचना. फक्त 'मयत झाली जमीन सारी' हि वाक्यरचना बरोबर आहे कां?