मुलगा झाला हो-अर्थात मेल ओपन
अश्वत्थामा म्हणतो त्याप्रमाणे मी पण कळत नकळ्त अपघाताने पालक झालो.
१ली पर्यंत मुलगा आखोंका तारा. नंतर ९वी पर्यंत रुटीन पालक. स्वतःत गुंतलेला. अर्थात सन्मान्य अपवाद सोड्ता सगळीकडे हेच असते. आणि म्हणुनच १ल्या टप्प्यात आठ आणि दुसर्या टप्प्यात चार मार्क दहापै़की.(मुलांच्या मार्काबरोबर आपल्याला पण मार्क द्यावेत पालकांनी)
९वीत एकदा खुप कमी मार्क मिळाल्यावर आमचे अर्धांग कडाड्ले.-" लो़कांची लुगडि धुता, माझ्या मुलाचे काय? (माझ्या मेहेनतीचे कायच नाय) गप्प रहाण्यात श हाणपणा होता.
९वी झाल्यावर सुट्टीला पुण्याला जाताना फलाटावर गाडीची वाट बघत असताना नागपुर एक्स्प्रेस आली. जनरल चे मधमाशाचे पोळे झाले होते. कोण गर्दी. कल्पनेची आय्डीया आली. मुलाला म्हट्ले बघ बाबा आपल्याकडे ए.सी चे तिकिट आहे. आणखी ६ वर्ष काढीन. नंतर तुला काय हव. जनरल का ए.सी.
उत्तर देताना डोळ्यात चमक दिसली. देवच पावला. म्हणाला, अर्थात ए.सी.
लागा कामाला लेको. कसं करायचे ते मी सांगतो. हा माझा अभ्यासाच्या बाबतीत पहिला आणि शेवट्चा संवाद. १०वीत ८७%. बायको तर हरखली. अख्य्या खानदानाला पार्टी ची कल्पना पुढे आली. मागुन पुढे आलेला म्हणुन सत्कार
झाला.पण गडी निर्विकार. बायकोला काही कळेना हा काय प्रकार आहे तो.
तीने मुलाला माझ्यासमोर विचारले.उत्तर ऐकल्यावर गोंधळ आण्खी वाढला मातेचा.१०वी च्या मार्काला काय महत्व नाही. मी यु.डी.सी.टी. ला गेल्यावर बघु. माझाच असल्याची खात्री पट्ली उत्तर ऐकुन. (हॉस्पिट्ल मध्ये बदला बदली
होते )
आता माझा पोपट झाला. कॉमर्स घेणार ह्या हिशोबात मी तयार नव्ह्तो सायन्सला आर्थिक स्वरुपाने. आले पैसे -उडवले पैसे.(आज काल गाढव रस्त्यावर दिसत नाही. कोणाला बघावेसे वाट्ले तर मला बघा. आणि आम्ही म्हणे समुपदेशक) तरीसुद्धा सर्व कॉलेजचे फॉर्म्स आणले. कॉमर्स चे सुद्धा. त्याचा निर्णय अंतिम. रुपारेल मध्ये नको म्हणाला. बायको परत हैराण. (रुपारेल मध्ये रोज सकाळी पेढे देतात काय असे म्हट्ल्यावर कोण काय बोलणार-माझा अभ्यास मलाच करावा लागणार). ह्यानंतर बायकोने परत कधी तोंड उघड्ले नाही. मला त्याच्यातल्या परिवर्तनाची जाणीव झाली.
आता हे होणार कि नाही ह्याची खात्री नव्हती. मला मेल ओपनचे त्रास काय असतात ह्याची संपुर्ण कल्पना असुन सुद्धा त्याच्या देहभाषेने बांधला गेलो.
११वी १२ वी ला त्याने केलेली मेहेनत आजही अंगावर शहारे आणते. अकॅडेमिक एक्सलन्स ची आपली कमी ही आपणच भरायची आहे आणि त्याकरिता इतर सर्व गोष्टीचा त्याग करायची शपथ त्याने पाळली. ११वी ला ८७ १२वी ला ८७ .सि.ई.टी ला १७२. आय्.आय्.टी नाही मिळाले. पण यु.डी.सी.टी. मिळत होते, हवी ती शाखा नव्हती. आरक्षण आडवे आले १ मार्काने. म्हणुन इलेक्ट्रोनिक्स ला जवळ्च्या कॉलेज मध्ये घेतले. वाट्लो आता सुट्लो.पुढ्च्या तयारीला लागुया. १० लाखाची पॉलिसी घेतली . कारण ११वी १२ वी मध्ये समभागामध्ये गुंतवलेले पैसे खर्च झाले होते.
पेट्लेल्या कोळ्शावरुन चालणे ते सुद्धा अनवाणी म्हण्जे काय ते आता कळ्णार होते. उपरवाला हस रहा था. जादा शान्पती कर रहा बे. अभी देख तेरी पुंगी कैसी बजती है. राहिलेले भोग क्रमशः
मराठी चा संबध सुटुन ३० वर्ष झाली. त्यामुळे प्रकटनात थोडीशी गड्बड होते. पण तुम्ही पैलवान संभाळुन घ्याल अशी खात्री आहे.
माझी ह्या सर्व विषयात काही मते-
१. दहावी आणि बारावी च्या मार्काची सांगड आयुष्यातल्या यशाशी घालु नये.
२. पालक मंडळी ने शैक्षणिक क्षेत्रात वेगाने होणार्या बद्लाची फर्स्ट हँड माहिती बाळ्गावी.
३.कोणी तरी बाबाने सांगितलेल्या कहाणी वर संपूर्णपणे विश्वास ठेवू नये.
४. तुम्ही समजता त्याच्यापेक्षा शिक्षणाचा खूप वाढ्णार आहे.
५. मिळालेल्या माहिती चा तुमच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये मुल्यमापन करा. हर्ड मेंटॅलिटी ने कोणतेही निर्णय घेउ नका. बबन नेघेतल म्हणुन छगन ला पेलेल असे नाही. अपवादाला नियम समजु नका.
६. मेल ओपन चे आव्हान पेलायला बरेच खांब सोडावे लागतील. दोन वर्ष जरा दमाने घ्या. स॑र्व मजा करुन १८०+ मिळ्तील असे तुम्हाला वाट्ते तर रिस्क घ्यायला हरकत नाही.(बबनला जमले म्हणुन छ्गनला जमेल असे नाही.)
७.सि.ई.टी त चांगले मार्क मिळाले म्हणजे सर्व काही झाले असे नाही. आणि मिळाले नाही तरी जग काही संपत नाही. उदंड संधी उपलब्ध आहेत. असल्या यशाची भरपुर उदाहरणे सापड्तात.
८.१०वी त मिळाले म्हणुन १२वी त मिळ्तात असे नाही. आणि १२ वीत मिळाले म्हणजे सि.ई.टी. त मिळतात असे तर मुळीच नाही. भरपूर मेहनत हा एकच उपाय.
९.मी माझ्या पाल्याला घडवणार च्या गमजा मारु नयेत. तुम्ही फक्त प्रेम करु शकता त्याच्यावर.
१०.बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना तुमच्या वेळी काय झाले चे संदर्भ टाळा. आणि ते लवकर विसरा.
मोझेस बाबाच्या टेन कमांड्मेट्स पैकी काही पट्णार नाहीत. बरोबर आहे. कारण तुम्ही आज वेगळ्या प्लेन वर आहात. ऍक्सिस बदलला की बिंदु ची व्याख्या बदलते.
हे प्रतिपादन मी पालकांना रोज करतो. ऐकल्यासारखे करतात. परत पाच मिनिटाने ९०% चा फॉर्मुला विचारतात. मी आजकाल चालणे कमी केले आहे. पुरेसा गॅस नको का? सिझन सुरु आहे.
जाता जाता: मी आदर्श पालक नाही. आदर्श पालक व्हायचे क्लासेस चालतात असे ऐकते. ३ तासाचे ४ सेशन्स. ८०००रुपये मोजावे लागतात.
And remember once for all. All events turn into nonevents once the event is over so do not worry about evetuallity of events turning into non events look for further events and enjoy. आता जमतील तेव्ढ्या वि.प्र. च्या प्रु. वर प्र. करा. खांब सोडले आहेत मी पणाचे.
वाचने
6045
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
मस्त! बरेचसे पटले
१. दहावी
१. दहावी
भयंकर उपयोगी!
>>९.मी
छानच
दहावीच्या मार्कांची
In reply to दहावीच्या मार्कांची by वाचक
बर्याच अंशी सहमत!
In reply to दहावीच्या मार्कांची by वाचक
सहमत
In reply to दहावीच्या मार्कांची by वाचक
बरोबर आहे!
जनरेशन गॅप
टू गुड
All events turn into
आमचं पोरगं पहिलीत जाईल
हे वाचायचं राहून गेलं होतं