अन्नपुर्णा
लेखनप्रकार
अन्नपुर्णा
आपल्या येथे भक्त व देव यांचे एक अतूट नाते आहे. देव आपला माय-बाप असतो, बंधु-भगिनी आणि सखा-शेजारीही असतो, आपल्यातलाच एक असतो. आता शेजारी म्हटले की आपण शेजारच्या घरांत चाललेले नवरा-बायको यांचे तंटे-बघेडे जेवढ्या चवीने ऐकतो व इतरांना रसभरीत भाषेत, थोडा पदरचा मसाला घालून, सांगतो, तेचढ्याच तन्मयतेने कवींनी देवांच्या घरी चाललेली भांडणे रंगविली आहेत. आता घरांत लक्ष्मीची चणचण असेल तर भांड्याला भांडे जास्त वेळेला लागणार व आवाजही मोठा होणार हे ओघानेच आले. एकदा काय झाले
आता शंकर हा "विश्वनाथ", विश्वाचा अधिपती, पण यांनी त्याच्या हातात दिले काय तर भिक्षापात्र ! " जा, चार घरांत जाऊन भिक्षा माग, मिळेल काय ते घरी आण, मगच जेवण !" बिचारा हिंडायचा खरा, पण रोज मिळेलच याची खात्री काय ? एक दिवस हात हलवत घरी आले व पार्वतीला म्हणाले " मला तर काय मिळाले नाही, आज तू जा व बघ काही सोय होते कां." घरांत काहीच नाही म्हटल्यावर चरफडत का होईना पार्वती बाहेर पडली, जगन्माता घरी आली म्हणून लोकांनी भरभरून दिले. पोटभरून खावयाला मिळाले म्हटल्यावर खुष होऊन शंकर म्हणाले, " देवी, तू खरी "अन्नपूर्णा" ". आता मात्र पार्वती भडकली. आधीच लोकांकडे जाऊन पदर पसरावा लागला म्हणून अपमान झाला असे वाटणाया प्रजापतीदुहितेला संताप आवरेना. ती जरा तडकलीच व रागाने, थोड्या तिरस्कारानेच म्हणाली
रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्ला
रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्लाङ्गलं
प्रेतेशान्महिषं तवास्ति वृषभ:फालं त्रिशुलं तव !
शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कंदोस्तिगोरक्षणे,
खिन्नाहं हर भिक्षया कुरू कृषिं गौरीवच: पातु व: !
( रामात्. ..परशुराम, मेदिनी ..पृथ्वी, धनपती ..कुबेर, बालाल्लाङ्गलं .. बलरामाकडून् नान्गर, प्रेतेश् .. यम
फालं ..नान्गराचा फाळ, गोरक्षणे .. गाय-रेडा राखावयाला, स्कन्द् ...कार्तिकस्वामी, पातु व: जगाचे कल्य़ाण करो.)
या जगताच्या मातापित्यांचे गीर्वाणभारतीतील संभाषण जरा मराठीत बघू.
गौरी म्हणते, " देवा, या भीक मांगण्याचा खरचं कंटाळा आला आहे. थोडी शेती कां करत नाही ?" आता बायकोने कुठलेही काम सांगितले की नवरा ते टाळण्याकरित सबबी शोधतोच. शंकर म्हणतो, " बाई, तू म्हणतेस ते ठीक माहे पण माझ्याकडे जमीन कुठे आहे ?" गौरी म्हणते " तो परशुराम, तुमचा शिष्य, तर सगळी पृथ्वीच वाटावयास निघाला आहे, मागवा त्याच्याकडून ".( क्षत्रिय संहारानंतर परशुरामाने सगळ्या पृथ्वीचे दान केले होते) "अग, पण बियाणे ? " शंकराचा प्रश्न. शेतकरी सावकाराकडून बियाणे उसने आणतो, ते लक्षात ठेऊन गौरी म्हणते " आणा कुबेरा (जगाचा सावकार)कडून " "आणि नांगराचे विचारू नका, बलरामाकडून मिळेल." पुढच्या प्रश्नाचे उत्तर आधीच. "पण माझ्याकडे तर एकच बैल आहे ". "मग ? यम देईल की त्याचा रेडा नांगरणीपुरता." आणि हां, फाळाचे विचारू नका, तो काय तेथे त्रिशुल पडलाय !"
शंकराला काळजी आपल्या न्याहरीची, गौरी म्हणते, " मी आणीन बांधून". आता प्रश्न न्याहरीच्या वेळी बैल-रेड्याकडे कोणी लक्ष द्यावयाचे. गौरी म्हणते, "तो रिकामटेकडा कार्तिकेय, त्याला काय उद्योग आहे, बघेल त्यांच्याकडे."
असा गौरी-शंकराचा॒ संवाद जगाचे कल्याण करो.
मित्रहो, " नवरा काय प्रश्न विचारणार व त्याचे उत्तर काय " हे बायकांना आधीच कसे माहित असते या तुम्हाला नेहमी सतावणार्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ? आदीमातेने ते बाळकडून आपल्या सगळ्या लेकींना जन्मजातच पाजलेले असते !
शरद
वाचने
5470
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
छान.
समस्त नवर्यांवर डाफरण्याची
In reply to समस्त नवर्यांवर डाफरण्याची by नाना चेंगट
हम्म...
In reply to हम्म... by सस्नेह
हम्म
ठ्ठो!ऽऽऽ
वा अमीट गोडी असलेला लेख. खूप
ब्येस्ट
संवाद छानच आहे.
In reply to संवाद छानच आहे. by धन्या
+१
छान संवाद आहे..
लै भारी. मजा आली वाचून.
हाहाहा!
एक फार मोठा बदल म्हणजे
भारी वाटलं लेखन एकदम ...
मस्त आणि मजेदार.
व्वा शरदकाका, कमीत कमी शब्दात
शरद, लेख आवडला.