नेहेमीच असं होतं ,असं नाहि..
पण जेव्हा होतं ,तेव्हा सगळ बेचैन होतं
कुठल्याशा एका अनामिक भितीनं ,
सगळच जग हळुहळु व्यापून जातं ...
अश्यावेळी मायेच्या एकाच शब्दाची फुंकरहि बास होते
पण ती भोवताली घुटमळणार्या कुठल्याच मुखातुन
येत नाहि. असं का?.. अगदी कासाविस ..!
बराच वेळ जातो ,सुचत मात्र काहिच नाहि ,
आजुबाजुला खळखळुन हसणारं कुणीतरी हवय
असं वाटु लागतं ..पण
..पण आत्ता कुणीच नाहि !
कुठेतरी शुन्यात नजर लागते,फार उशिर झालाय
ह्याचीहि तेव्हा काळजी नसते..
कुठे जायचय ? काय करायचय?
काहि काहि माहित नाहि ....
कदाचित सुचतच नाहि ...
भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकलेत ,
दुरुस्त होणारच नाहित का ??..काहिशी तगमग!
मग सारं आठवु लागतं ,सारं सारं...
पावसाच्या सरी झेलताना झालेली आठवण
उगाच फिरताना " काय चालु असेल आता? "
उगाच आणि नेमके असेच आलेले विचार .
कधितरि "तुटलच आता!" असं वाटायला लावणं
तर कधी " फोरेव्हर !" म्हणायला लावणं ..
नेमक्या कुठल्या चक्रव्युहात अडकलोय आपण?
शक्य असेल तितकं आता लांब जायचय..
पण हे,जमेल का आपल्याला ? ....एक..प्रयत्न!
शेवटी जीव लागलाय आपला ,ही जाणीव सगळ्यात बेक्कार
म्हटलं तर चांगलं ...म्हटलं तर त्रासाचा वाढता आकार ..
शेवट कुणाला चुकत नाहि ,
पण शेवट सहज मिळत नाहि ..
मिळवायचच असेल तर मग 'प्रेम 'मिळव ..असं ऐकायला लागतं
जगवायचिच असेल तर 'माणुसकि ' जगव...असहि म्हणणारे म्हणतात
शेवटी काय? हे असलं डोक्यात लवकर घुसत नाहि
जिव्हाळ्याचा शोध काहि केल्या संपत नाहि
मग मात्र कमतरता जाणवु लागते ..
"आयुष्य एकट्यानेच जगायचं?" अशीच ,अगदी हिच भिती वाटु लागते
क्षणभर मागे पाहिलं तरी ," एकटेच आपण ?"
ह्या जाणिवेनं जीव जड होतो ..उरते .....फक्त गरज !
भावना ,मन याच्या तोडीला माया ,जवळीक
बर्याच शब्दांचं नुसतच बंबाळ !
मग त्यात ओघाने दरवळ ,मुग्ध ,श्वास
ह्या नाजुक शब्दांची ही तुडुंब गर्दी!
काय असतं हे सगळं नेमकं कळत नाहि
"मन तर माझं असं मोकाट पळत नाहि ?"
असेल सुद्धा .माणुस म्हणुन जगताना मनाला फार जपावं लागतं..
आपल्या मनाला जपणारं कुणी भेटेल ह्या आशेवर जगावं लागतं...
सतत गोड शब्दांचा मारा बसतो ,तरी हवाहवासा वाटतो
सततच्या मारामारीनच मग एकदिवस प्रेमाचा झरा आटतो ..
वाट बघायची सवय लागते ,पापण्या ओल्याच रहायला लागतात
झोपेतुन दचकुन जागं झाल्यावरहि गोड शब्द आठवायला लागतात ..
भेटलं तर बोलुच आपण याचीही शास्वती नाहि
तरीहि " भेटायचय! "..ओढहि संपत नाहि
सारखीच ....एकसारखी हुरहुर!
प्रतिक्रिया
29 Nov 2012 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
बालिकेचं मुक्तक बालिकेसारखच!
29 Nov 2012 - 8:02 am | अनिल तापकीर
छान आहे
29 Nov 2012 - 9:08 am | श्री गावसेना प्रमुख
छान सुचतय हो तुम्हाला
29 Nov 2012 - 9:15 am | लीलाधर
:)
29 Nov 2012 - 9:54 am | ज्ञानराम
छान
29 Nov 2012 - 11:12 am | सस्नेह
पूजा, आता लवकर परत ये भारतात...!
29 Nov 2012 - 11:58 am | अभ्या..
स्नेहातैचं तरी ऐक
ये लवकर ;)
29 Nov 2012 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
आवडेश.
29 Nov 2012 - 11:33 am | सुहास..
जमायला लागलय :)
29 Nov 2012 - 12:02 pm | श्री गावसेना प्रमुख
आम्हाला बी शिकवा की
29 Nov 2012 - 12:04 pm | बॅटमॅन
ओ नादान परिंदे घर आजा ;)
29 Nov 2012 - 1:07 pm | चेतन माने
सुंदर खूपच छान !!!
:)
29 Nov 2012 - 1:21 pm | निवेदिता-ताई
छान छान
29 Nov 2012 - 3:24 pm | सोत्रि
छानच!
-(मुक्तक आवडलेला) सोकाजी
29 Nov 2012 - 5:18 pm | प्यारे१
वाचली नाही. पण सगळे म्हणत आहेत म्हणजे भारी असणार. वाचून झाल्यावर परत प्रतिसाद देईनच.
29 Nov 2012 - 6:48 pm | निश
पुजा पवारजी, अतिशय मस्त आहे कविता.
कविता वाचतानाच त्यातला आशय अतिशय सहजपणे तुम्ही वाचकांपुढे आणता.
मस्त कविता तितकाच कवितेचा आशय सुंदर.
29 Nov 2012 - 7:46 pm | जयवी
ह्म्म्म......:)
29 Nov 2012 - 8:19 pm | पैसा
छान! आवडलं.
29 Nov 2012 - 11:08 pm | नावातकायआहे
क्लासच!
आवडेश!
वाचन खूण साठवली आहे.
29 Nov 2012 - 11:10 pm | अविनाशकुलकर्णी
सुंदर .. छान
29 Nov 2012 - 11:10 pm | अविनाशकुलकर्णी
सुंदर .. छान
30 Nov 2012 - 1:26 am | जेनी...
सर्व वाचकांना धन्यवाद ! :)
30 Nov 2012 - 2:47 pm | मालोजीराव
छानच !
30 Nov 2012 - 4:51 pm | राघव
चांगलं लिहिलंय!
पु. ले. शु. :)
राघव
30 Nov 2012 - 6:08 pm | अन्या दातार
अप्रतिम!
2 Dec 2012 - 1:57 pm | ज्ञानोबाचे पैजार
पुजाबाई,
तुमची घुसमट / रुखरुख समजण्या सारखी आहे. तुम्हाला ती शब्दात बांधता आली. मोठ्या भाग्यवान आहात तुम्ही.
वाचकाला खिळवुन ठेवायचे कसब आहे तुमच्या कडे.
बाकी स्वतःची काळजी घ्या,
पैजारबुवा,
3 Dec 2012 - 12:32 am | जेनी...
नक्की पैबु काका .
तुम्ही सगळे आहात :) मग छान वाटतं ... इथे येण्याचं 'कारण 'असता तुम्ही सगळे माझ्यासाठी
:)