आमच्या १० वी ची पंचविशी..
लेखनप्रकार
आपल्याला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून जितकी वर्षे झाली ना तितकीच वर्षं आम्हाला १० वीचा चषक जिंकून(की हारून?)झाली.
त्यामुळे पेपराततल्या रौप्यमहोत्सवाच्या बातम्या वाचून आमच्या मित्रमंडळींना आठवण झाली की आपल्या १०वीने पंचविशी गाठली की! मग एकेकाचे विरोप यायला सुरूवात झाली.मागच्या २ ,३ बॅचनी १० वीची पंचविशी कशी कशी साजरी केली त्याची वर्णनं समजायला लागली. 'हे विश्वची माझे घर'असल्याप्रमाणे आमची मित्रमंडळीही अशी जगभर सगळीकडे पसरली आहेत ,त्यांची एकत्र मोट बांधली जाईल तेव्हा जाईल पण विरोपाविरोपीला तर सुरूवात झाली.
१० वी नंतरही आत्ता आत्तापर्यंत आम्ही काही मित्रमैत्रिणी आवर्जून भेटतो.पण आता वाढत्या भौतिक अंतरांमुळे घाऊक प्रमाणातल्या प्रत्यक्ष भेटी फार कमी झाल्यात. भारतात गेल्या गेल्या एकेकाचा फोन फिरवू लागले.मनसोक्त गप्पा,हाहाहा,हुहुहु... सुरू झाले.संजू म्हणाला,"तुला एक मस्त न्यूज देतो.तुझी डार्लिंग मैत्रिण सुध्दा सध्या भारतात आहे." "काय? मनीषा? ?व्वॉऑऑऑऑऑऑव".. मी किंचाळलेली पाहताना दिनेशच्या चेहर्यावर बायको कामातून गेली.. असे भाव होते.युरोपातून मी आणि अमेरिकेतून मनिषा दोघीही चक्क एकाच वेळी भारतात! असं ठरवून सुध्दा झालं नसतं.त्रिखंडातल्या आम्हा मित्रमंडळींची मृदुला आणि गीताने मोट बांधली आणि दुसर्या दिवशी माझ्या आईकडे आणि बहिणीच्या मोबाईलवर समस आणि फोनांचा पाऊस सुरू झाला.त्यात मी मोबाईल जवळ न बाळगल्याबद्द्ल शिव्याही होत्या!संध्याकाळी ५ वाजता गीताच्या घरी जमायचे ठरल्याचे कळेस्तोवर ५ वाजून गेले होते.पण तरीही मी तिथे जाणारी शेवटची नव्हते,:)
जिना चढतानाच खिदळणे ऐकायला यायला लागले होते. वैद्यबाईंना पाहून आनंदाचा धक्काच बसला.बाईंनी कवेतच घेतले एकदम! सगळ्यांनी आपापल्या मुलांना दुसर्या खोलीत पिटाळले आणि नुसता दंगा सुरु झाला!संजयने एक कागुद दिला हातात.त्यात वर्गातल्या मुलांची नावं होती आठवतील तेवढी. बाकीच्यांनी आपापली स्मरणशक्ती ताणून त्यात भर घातली. बाईंना म्हटलं,बाई आता हजेरी घ्या..कोण कुठे कोणाच्या शेजारी बसायचं? कोणत्या तासाला जास्त दंगा करायचो? गॅदरिंगच्या गमती, ट्रीपची धमाल सगळ्या सगळ्याची उजळणी सुरू झाली.
आमची गणित आणि सायन्सची सेमीइंग्रजी माध्यमाची पहिली बॅच! शाळेतल्या काही शिक्षकांचा त्याला टोकाचा विरोध पण आमच्या वैद्यबाई आणि गोडबोलेबाईंनी मात्र खिंड लढवली!गणित आणि सायन्स शिकवणार्या त्या दोघी असल्याने इतरांचे काही चालले नाही आणि आजतागायत सेमी इंग्लिश माध्यम आमच्या शाळेत चालू आहे.
असं काही काही बोलत असताना जोरात वीजा कडाडल्या..आणि ती आठवण सगळ्यांनाच आली. ७वीत असतानाची गोष्ट.आमच्या लाडक्या गाडगीळबाईंचा इंग्लिशचा तास चालू होता. सगळे एकदम तल्लीन झाले होते.एकदम विजा कडाडायला लागल्या आणि सगळेच दचकले.माझ्या शेजारच्या बाकावर बसलेल्या मंजूने एकदम उडी मारली आणि मला मिठीच मारली तिने.सगळे एकदम हसायला लागलो,बाई तर सगळ्यात जास्त.. लग्गेच तिला पुण्याला फोन लावून सगळा दंगा ऐकवला,एवढ्यात नरेंद्र आला.अजून अमूल कसा नाही आला म्हणून शेवटी बाईंनीच त्याला फोन लावला.
१० वीच्या सुटीत आमच्या खास ट्रीपसाठी आलेल्या जोशीबाई आणि गुप्तेबाई आठवल्या. गुप्तेबाईंनी म्हटलेलं गाणंही.. १२ वीच्या सुटीतली बारवी डॅमची ती सहल आणि त्यातूनच पुढे आजपर्यंत टिकलेला आमचा ग्रुप.. वैद्यबाईंच्या घरी जमून केलेला दंगा.. विकास एम एस करायला अमेरिकेला निघाला तेव्हा त्याला दिलेला निरोप,संजूने केलेली झक्कास पावभाजी,फक्त सगळ्या मुलींनीच एकदा रात्री बाईंकडे जमून पाहिलेला इजाजत,सुजाताचं म्युरल पहायला मुलुंडला गेलेल्या मी आणि वैद्यबाई,मनीषाकडे गोरेगावला केलेली धमाल,आमच्या घराच्या गच्चीत रात्रभर जागवलेली कोजागरी,पावसाळ्यातली माथेरान सहल आणि ऍमब्युलन्स मधून केलेली दिवेआगरची ट्रीप..सगळं सगळं ताजं, आत्ता घडल्यासारखं वाटत होतं..
१०वीत असताना गॅदरिंगसाठी गोडबोले बाईंनी आमचं नाटुकलं बसवलं,पुलंच रविवारची कहाणी! खरं तर आमच्या क्लासटीचर वैद्यबाई पण त्यांची सख्खी मैत्रिण असलेल्या गोडबोलेबाईंनी स्वत:हून आमचं नाटुकलं गॅदरिंगसाठी बसवलं होतं.पुढे किती तरी वर्षांनी शंतनुच्या कॉलेजमध्ये आम्ही ते नाटक सादर करणार होतो म्हणून खास ते पहायला ठाण्याहून बाई 'नायर मेडिकल'ला आल्या होत्या त्याचीही आठवण झाली. गोडबोलेबाईंना जाऊन आता वर्ष होईल..सगळेच उदासलो.
संदीप आणि गीतूने केक आणला होता,भला मोठ्ठा! १९८३ ते २००८ असं झोकदार अक्षरांत लिहिलेला..बाईंना केक कापायला लावला.प्रत्येकाला बाईंनी केक भरवला. फोटोंचा धमाका उडाला.गीताने तिच्या दवाखाना आणि ऑपरेशन्स मधून वेळ काढून कधी तयारी केली होती तिलाच माहित! मस्त मिसळ,ढोकळा आणि जोडीला रशोगुल्ले..अर्थात संजयनेही मदत केली होतीच की..
प्रसादने आता नवी आयडीया काढली.सगळे जण मिळून एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीबरोबर कुठेतरी ट्रीपला जाऊ..म्हणजे मस्त एकत्र चार आठ दिवस राहता येईल!शेखचिल्लीचे पुलाव परत शिजायला लागले.गिरसप्प्यापासून नायाग्रापर्यंतची सगळी ठिकाणं जमेस धरून आणि बादही करून झाली. घड्याळ पुढे धावत होतं तरीही मनातून कोणालाच घरी जायचं नव्हतं.पूर्वीचे दिवस असते तर नक्कीच रात्र जागली असती पण "वक्त की दिमतने" सगळ्यांनाच मर्यादा घातल्या गेल्या होत्या.८३च्या सगळ्या बॅचचे,मोठ्ठे संमेलन डिसेंबरमध्ये कधी भरेल तेव्हा जाऊ शकेनच हे सांगता येत नाही पण अचानक ओंजळीत आलेले हे आनंदक्षण म्हणजे ह्या भारतवारीत मिळालेला मोठ्ठा बोनस!
वाचने
17356
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
वा! छान!
आनंदक्षण
सह्ही गं स्वाती
स्वाती,
In reply to स्वाती, by बिपिन कार्यकर्ते
२०११
वा...मस्तच
वा!!
अजून मजा आली असती...
एकदम मस्त...
ह्म्म्म्म.....
In reply to ह्म्म्म्म..... by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
स्वाती,
In reply to स्वाती, by प्रियाली
संबोधनांसाठी
In reply to संबोधनांसाठी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ह्म्म...
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
काय म्हणतोस?
In reply to काय म्हणतोस? by प्रियाली
आई ग्ग!!!
In reply to ह्म्म्म्म..... by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आम्ही...
In reply to ह्म्म्म्म..... by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
(स्वगतः
वैद्यबाईं
मस्तच
वर्णन आवडले.
सुंदर लेखन.
In reply to सुंदर लेखन. by llपुण्याचे पेशवेll
पेशवे
In reply to पेशवे by भाग्यश्री
नक्कीच.
स्वातीताई,
In reply to स्वातीताई, by चतुरंग
लिखाणातून
छान
मस्त लेख!
भाग्यवान
मस्तच
नशिबवान आहात
In reply to नशिबवान आहात by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
जोश्या...
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद!
भाग्यवान आहात
In reply to भाग्यवान आहात by चित्तरंजन भट
सहमत
धन्यवाद.
छान लेख
७९ च्या वर्षाची १० वी ची मुले.
वा!
आभार..