शब्दावेगळे
In reply to वेगळा विचार by पैसा
In reply to मूकबधिर लोकांच्या काही जाणिवा आपल्यासारख्या सामान्य लोकांपअसतात by मन१
In reply to मूकबधिर लोकांच्या काही जाणिवा आपल्यासारख्या सामान्य लोकांपअसतात by मन१
शब्द आणि अनुभव हे विरुद्धार्थी मानणेच ठिक वाटत नाही.शब्द आणि अनुभव विरुद्धार्थी आहेत असे नाही (लेखातही असे थेट म्हटलेले नाही). अनुभव आणि शब्द यांचा काहीएक संबंध नाही असे मला वाटते. अनुभव शब्दातीत असतात आणि ते इतरांना सांगण्यासाठी शब्दांची गरज पडते. परंतु हळूहळू शब्दालाच इतकं महत्त्व येत गेलंय की अनुभव पुरेसा भिडेपर्यंतच तो शब्दबद्ध करायची घाई होते. इतरांशी संवाद साधायला शब्दांची गरज आहे, पण स्वतःशी संवाद साधायला शब्दांची काय गरज?
In reply to शब्द आणि अनुभव हे by नगरीनिरंजन
In reply to येत गेलंय की अनुभव पुरेसा भिडेपर्यंतच तो शब्दबद्ध करायची घाई होत by मन१
आपल्या स्मृती पक्क्या करायलामाझ्यासाठी तरी माझ्या आठवणी मूकपट असतात. उदा. आजीची आठवण येते तेव्हा मला तिचा मऊ, सुरकुतलेला हात गालावरून फिरल्यासारखं वाटतं तेव्हा कोणताही शब्द माझ्या डोक्यात येत नाही किंवा आजी, हात, मऊ असे शब्द उमटत नाहीत. ते मला जाणवतं आणि मग त्याला मी शब्दरूप देतो (जसे आत्ता देत आहे). आधी स्पर्श जाणवतो आणि मग तो कसा आहे हे वर्णन करायला मी शब्द वापरतो. हा वर्णनाचा भाग अनुभवानंतरचा आहे. त्या भागावर जोर देऊन अनुभव (याठिकाणी स्मृती) कसा पक्का होणार? एक प्रसंग सांगतो, एका रात्री माझा मावसभाऊ जेवण झाल्यावर घराबाहेर निघाला आणि उंबर्यापाशी त्याला काहीतरी वळवळ जाणवली. त्याने वाकून पाहिले तर एक फुरसे त्याच्या पायाला अगदी तोंड लावून बसले होते. तो घाबरून आत आला आणि सांगू लागला की उंबर्यात साप आहे पण त्याला ते सांगता येईना. म्हणजे दातखीळ वगैरे बसली नव्हती पण त्याला शब्दच आठवत नव्हते. साप आहे हे कसं सांगायचं हेच त्याला समजत नव्हतं. इतका त्या अनुभवाचा पगडा जबरदस्त होता की वर्णनाच्या पायरीपर्यंत जायला त्याला खूप वेळ लागला. त्या प्रसंगाची त्याची आठवण म्हणजे ती भीतीची भावना; साप हा शब्द नाही. तो त्यानंतर कितीतरी वेळा साप म्हणाला असेल पण त्या शब्दाने त्याला त्या प्रसंगाची आठवण होईलच असे नाही.
एरव्ही शब्द म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्तारलं आहे आणि ज्या अफाट विस्ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्या किंवा ती प्रतिमा उभी राहण्यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे! त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्यासाठी आपण जोडत असलेली शब्दरुपी ठिगळे आणि चिंध्या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या शब्दांच्या लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही शब्दरुपी ठिगळे पाहिल्या शिवाय आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही. हा शब्दप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही शब्दप्रतिमा लोकांकडे फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्षणीक अर्थाने शब्दावडंबर माजवात जगत राहणारे लोक आहेत, आपण शब्दजीव आहोत. शब्दप्रतिमांच्या ठिगळांशिवाय आपलं चालु शकत नाही. शब्दप्रतिमांची ही ठिगळे विशिष्ट पद्धतीने जोडणे ही झाली भाषा.ही बहुतेक युजींचे विचार असावेत. शब्दांवर प्रेम करणारा तुमच्यासारखा माणूस असं लिहितो ना. तरीही विचार करता वरील 'शब्दां'तूनच शब्दांचं तोकडं रूप स्पष्ट होतंय. काही अंशी हे सुद्धा त्या 'शब्दां'चं यशच नाही का? आणि असं बघा की या शब्द-भाषेच्या मर्यादाच त्यांच्या उत्क्रान्तिकामी उपयुक्त होतात. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही पण शब्द आणि भाषा तरीही या तोकडेपणामुळेच परिपूर्णतेकडे जाण्याचा यत्न करू शकतात. म्हणूनच व्यक्तिशः मला उपरोल्लेखित विचार पटण्यासारखे वाटत नाहीत. बाकी,
युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही. थोडक्यात जगाला जाणून घेण्यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्यात शब्दांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा शब्दांच्या माध्यमातूनच झाला आहे. पण युजींचे शब्द हे फक्त ते ज्या अवस्थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत.यावरून युजी एकूणच प्रचंड भ्रमात होते आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला अशी खात्री वाटू लागली आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माझा नाईलाज आहे. :-)
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
आपल्या मूळ अस्तित्वापासून एक पर्याय निवडून आपण इतके दूर आलो आहोत की दुसरा पर्याय आहे असा विचार पचवणेही खूप जड जाते. स्वतःच तयार केलेल्या एका आभासी दुनियेत आपण राहतो आणि ही आभासी दुनिया निर्माण व्हायची पहिली पायरी म्हणजे भाषा होय. ज्याप्रमाणे नयनरम्य ठिकाणी गेलेले टुरिस्ट समोरचे दृष्य खरोखर पाहण्याऐवजी कॅमेर्यात बंदिस्त करायला धडपडतात त्याप्रमाणेच आपणही थेट भिडणार्या अनुभवाला सामोरे जाण्याऐवजी तो शब्दबद्ध करायला धडपडतो.हे अगदी खरं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा दुर्गुण नाही, तर सगळ्यांचा स्वभाव आहे. मी युजींचा संदर्भ घेऊन लिहायला सुरुवात केलीय कारण, ते त्या अनुभवापर्यंत गेले आहेत आणि मला कुठेतरी, काहीतरी धुसर जाणवतं आहे. नगरीनिरंजन म्हणतात की,
''आपणही थेट भिडणार्या अनुभवाला सामोरे जाण्याऐवजी तो शब्दबद्ध करायला धडपडतो.''मी मला जे जाणवतंय ते शब्दबद्ध करायला धडपडलो. का? मला त्याचं कारण माहित नाही, पण असं वाटतं की थेट अनुभव ही तेव्हाचा 'जाणवतो' जेव्हा आपण तो शब्दांच्या अनेक फुटक्या तुटक्या तुकड्यांमध्ये सांधतो. म्हणून असेल कदाचित.. पण अजूनही मला पक्क समजलेलं नाहीय. नगरीनिरंजन पुढे म्हणतात की,
अगदी मनातल्या मनातही आपण आपल्या जाणीवा शब्दबद्ध करण्यात अर्धी शक्ती घालवून त्या बोथट करतो.हे ही खरंय. इथंही पुन्हा वरीलप्रमाणेच कारण संभवते. जाणीवा बोथट होतात, त्या मांडताना त्रासही होतो हे अनुभवतो आहे.
असो. शब्दाशिवाय राहणे हे सध्यातरी अशक्यप्राय वाटते आहे.ते खरंच, पण माझ्यासमोर धूसर चित्र उभं राहतंय, ते चितारण्याचा प्रयत्न केला इतकंच. पेठकर काका
सदरहू लेखातून मांडलेला विचार मनाला पटला नाही. क्षमस्व.हरकत नाही. मी पूर्णपणे सगळे मंतव्य स्पष्ट करायला कमी पडलो आहे हे मला जाणवतं आहे. ऋषिकेश
शब्दावेगळे रहाण्याचे सुचविणारा लेख मात्र शब्दबंबाळ वाटला (हे म्हणजे मौनावरील भाषणासारखे वाटले!)Wink मला सध्यातरी शब्दांशिवाय वेगळा व्यक्त होण्याचा मार्ग सापडलेला नाहीय. तो सापडला की निश्चितच माझे शब्द तुम्हाला दिसणार नाहीत. आणि हो, शब्दावेगळे रहा असं मी सुचवलेलं नाहीय, शब्दावेगळे काही असेल ते तुटपुंज्या प्रयत्नातून समोर मांडलं आहे. पैसा
शब्दाला त्यामागच्या प्रतिमेपासून वेगळं करणं ही फारच कठीण गोष्ट आहे. फारच कठीण!इथं खरी गोम आहे. शब्दाला त्यामागच्या प्रतिमेपासून वेगळं करणं म्हणजे स्वत:ला या पसार्यातून बाहेर काढणं. ते कठीणच नाही, काही वेळा शब्दश: डोकं भ्रष्ट करणारं आहे (सध्या त्याच वेदनेतून जातोय). मन
हो. खरय. पण म्हणून शब्दसामर्थ्य गमावण्याची मनिषा बाळगणे कसे इष्ट होइल? मुळात शब्द आणि शांतता, शब्द आणि अनुभव हे विरुद्धार्थी मानणेच ठिक वाटत नाही. शब्द हे अनुभवास पूरक(complementry) असतात.इथे गैरसमज झालाय. शब्दसामर्थ्य गमावून बसायचं असं नाही. डोक्यावर झालेलं ओझं थोडं बाजूला टाकून रहाता येतं का तो प्रयत्न करुन बघायचा. प्रास
ही बहुतेक युजींचे विचार असावेत. शब्दांवर प्रेम करणारा तुमच्यासारखा माणूस असं लिहितो ना. तरीही विचार करता वरील 'शब्दां'तूनच शब्दांचं तोकडं रूप स्पष्ट होतंय. काही अंशी हे सुद्धा त्या 'शब्दां'चं यशच नाही का? आणि असं बघा की या शब्द-भाषेच्या मर्यादाच त्यांच्या उत्क्रान्तिकामी उपयुक्त होतात. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही पण शब्द आणि भाषा तरीही या तोकडेपणामुळेच परिपूर्णतेकडे जाण्याचा यत्न करू शकतात. म्हणूनच व्यक्तिशः मला उपरोल्लेखित विचार पटण्यासारखे वाटत नाहीत.भाषा परिपूर्णतेकडे जात नाहीय. शब्द, भाषा मेलेलीच आहे. तीच मढी शब्दांच्या प्रतिमांच्या रुपात आपल्या छातीवर बसली आहेत. आपला उरलासुरला जीवंतपणाही हे मृत शब्द व भाषा खाऊन टाकत आहे. पण शब्दच नसतील तर काय, त्यामुळं मी मांडलेला विचार पटण्यासारखा नसेल.. पण शब्दातीत असं काही असेल, ते मी मांडू शकत नाहीय हा माझा तोकडेपणा.
यावरून युजी एकूणच प्रचंड भ्रमात होते आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला अशी खात्री वाटू लागली आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माझा नाईलाज आहे.असं म्हटल्याने काहीही फरक पडत नाही. किमान हे मत दिलखुलास आहे हे महत्त्वाचं आहे. हुच्चभ्रुपणाची झूल पांघरुन शब्दांचे इमले बांधत इथे घोटीव व उसन्या तर्काचा आधार घेतलेला नाहीय. अशा मतामुळं भावना दुखावत नसतात, शक्यच नाही. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
कसं शक्य आहे राव. शब्दामुळे जी जाणीव अंतस्तरावर जिथे कुठे होत असेल असं ते मर्मस्थान नाहीसं करणं काय सोपं काम आहे काय. अशी अवस्था म्हणजे वेडं होणं असे मला वाटते.पुढं कधी वेडाफिडा झालो तर गाववाले म्हणून मला सांभाळून घ्या. :)
In reply to मला आज खरोखर एक मिपाकर म्हणून by यकु
भाषा परिपूर्णतेकडे जात नाहीय. शब्द, भाषा मेलेलीच आहे. तीच मढी शब्दांच्या प्रतिमांच्या रुपात आपल्या छातीवर बसली आहेत. आपला उरलासुरला जीवंतपणाही हे मृत शब्द व भाषा खाऊन टाकत आहे.असं मत बरेचदा बर्याच जणांकडून व्यक्त होताना बघायला मिळतं. पण या बद्दल किमानपक्षी माझ्या मनात तरी शंका आहे. भाषा मृत केव्हा मानली जाते? मला वाटतं, जेव्हा त्या भाषेचा, त्यातल्या शब्दांचा उपयोग संवादासाठी होणं थांबतं तेव्हा ती मृत झाल्याचं समजतात. संवादासाठीच्या मुद्याचा विचार करता, संवाद किमान दोन व्यक्तिविशेषांमधला गृहित धरून त्याबद्दल म्हणता येतं की एकाच्या मनातला अभिप्रेत असलेला अर्थ दुसर्याला अजिबात न कळणं हे संवादाच्या अभावाचं लक्षण मानावं लागतं. असं होताना आजच्या भाषांसंदर्भात दिसतंय का? तसं दिसत असेल तर जरूर म्हणावं की भाषा मृत झालेली आहे अन्यथा कमीत कमी तिच्यात धुगधुगी तरी आहे हे मान्य व्हावं. नाही का? आता शब्द आणि त्यांचे अर्थ यांचंही या संदर्भात विवेचन आवश्यक ठरेल. खूपदा एखाद्या शब्दाच्या वा शब्दांच्या उच्चारणानंतर त्या उच्चारणाने मनःपटलावर काही प्रतिमांचे उमटणे होते आणि त्यातून अर्थनिष्पत्ती मानली जाते. बहुतांशी ही अभिव्यक्ती पूर्वानुभवांवर आधारीत असल्याचं समजतं. पण प्रत्येक अर्थनिष्पत्तीमध्ये हीच प्रक्रिया होईल असं काही आपल्याला म्हणता येत नाही. हे वि. का. राजवाड्यांनी त्यांच्या लेखामध्ये चांगलं स्पष्ट केलं आहे. (सं. राजवाडे लेखसंग्रह) काव काव करणारा तो कावळा हे पूर्वानुभवातून समजणारं प्रतिमायुक्त अर्थनिष्पत्तीचं उदाहरण मानलं जाईल पण सूई शब्दातून एका बाजूला टोक आणि दुसर्या बाजूला छिद्रं असणारी लोखंडाची छोटी वस्तु अशा प्रकारची प्रतिमा उत्पन्न होणं कठीण आहे. तेव्हा सांगण्याचा मुद्दा हा की शब्द आणि अर्थ यांच्यासंदर्भात सतत नवी जडणघडण आणि निर्मिती होत असते. हिलाच काही अंशी भाषेची उत्क्रान्ति का मानू नये? हेच मी भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण मानतो आणि माझ्याही. :-) युजींच्या रुपांतरणोत्तर असो किंवा संतांनी सांगितलेल्या अध्यात्मिक अनुभवांनंतर असो, जे काही फरक व्यक्तीच्या शरीर आणि मनासंदर्भात होतात ते त्यांचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे असंच सर्वमान्य मत आहे. एकदा हे तसंच आहे आणि पराकोटीचं वैयक्तिक आहे हे मान्य केलं की त्यासाठी तोकडेपणावरून शब्दांना आणि पर्यायाने भाषेला लांछन लावण्याची काहीच गरज नाही असंच मला म्हणायचं आहे. अर्थात या लेखात तुम्ही मांडलेला विचार वेगळा आहेच हे आधीही जाणवलं होतंच. युजींबद्दलंचं माझं वैयक्तिक मत खुल्या दिलाने घेतल्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर दुणावला आहे. :-)
In reply to यकुशेठ, by प्रास
भाषा परिपूर्णतेकडे जात नाहीय. शब्द, भाषा मेलेलीच आहे. तीच मढी शब्दांच्या प्रतिमांच्या रुपात आपल्या छातीवर बसली आहेत. आपला उरलासुरला जीवंतपणाही हे मृत शब्द व भाषा खाऊन टाकत आहे.>>>>>असं मत बरेचदा बर्याच जणांकडून व्यक्त होताना बघायला मिळतं. पण या बद्दल किमानपक्षी माझ्या मनात तरी शंका आहे. भाषा मृत केव्हा मानली जाते? मला वाटतं, जेव्हा त्या भाषेचा, त्यातल्या शब्दांचा उपयोग संवादासाठी होणं थांबतं तेव्हा ती मृत झाल्याचं समजतात. संवादासाठीच्या मुद्याचा विचार करता, संवाद किमान दोन व्यक्तिविशेषांमधला गृहित धरून त्याबद्दल म्हणता येतं की एकाच्या मनातला अभिप्रेत असलेला अर्थ दुसर्याला अजिबात न कळणं हे संवादाच्या अभावाचं लक्षण मानावं लागतं. असं होताना आजच्या भाषांसंदर्भात दिसतंय का? तसं दिसत असेल तर जरूर म्हणावं की भाषा मृत झालेली आहे अन्यथा कमीत कमी तिच्यात धुगधुगी तरी आहे हे मान्य व्हावं. नाही का? नाही. इथे भाषा/ शब्द वेगळ्या अर्थानं मृत आहे/त. तुम्ही जे सांगितलंय ते भाषाशास्त्रीयदृष्ट्या, भाषेच्या वापराविषयी, साहित्य व्यवहाराविषयी, संभाष़ण पूर्ततेविषयी लागू होतं. इथे शब्द/ भाषा मृत आहे म्हणजे शब्दांचा चिन्ह म्हणून वापर तेवढ्याच जोरदार असेल.. पण शब्द म्हणजे एक तुकडा आहे. एक प्रतिमेचा तुकडा. हे तुकडे काही जीवंत नाहीत. त्यात कसलाही जीव नाही. ते तुमच्या-आमच्या वापरात येतात तेव्हा जीवंत होतात. त्यावर तुमच्या-आमच्या अभिनिवेशाचं आरोपण होतं तेव्हा त्यांच्यात जीव येतो. या दृष्टीने भाषा जीवंत आहे. या तुकड्यांचं तुमच्या मनात प्रतिबिंब पडून हे तुकडे पक्षी भाषा जीवंत असल्याचा अनुभव येत असेल.. जीवंत तुम्ही/ आम्ही आहोत.. भाषा नाही.. या दृष्टीकोनातून ती जीवंत असू शकत नाही.
तेव्हा सांगण्याचा मुद्दा हा की शब्द आणि अर्थ यांच्यासंदर्भात सतत नवी जडणघडण आणि निर्मिती होत असते. हिलाच काही अंशी भाषेची उत्क्रान्ति का मानू नये? हेच मी भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण मानतो आणि माझ्याही.Smile भाषेची उत्कान्ती जरुर माना - पण ती फक्त भाषिक दृष्टीकोनातून. तुम्ही वेगळे, तुमची भाषा वेगळी. तुम्ही आणि तुमची भाषा एकच भासत असले तरी तसे खरंच तुम्ही आहात काय? तुमच्या जीवंतपणाशी भाषेच्या जीवंतपणाचा काही संबंध नाही. आज तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा बोलत असाल ते फक्त ती फक्त चिन्हे आहेत.. हां, शब्दात, भाषेत तुमचं हृदय, अभिनिवेश गुंतला असेल म्हणून भाषा तुम्हाला तुमच्या इतकीच जीवंत वाटत असेल. पण ती खरेच तशी आहे का? नक्कीच नाही.
युजींच्या रुपांतरणोत्तर असो किंवा संतांनी सांगितलेल्या अध्यात्मिक अनुभवांनंतर असो, जे काही फरक व्यक्तीच्या शरीर आणि मनासंदर्भात होतात ते त्यांचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे असंच सर्वमान्य मत आहे. एकदा हे तसंच आहे आणि पराकोटीचं वैयक्तिक आहे हे मान्य केलं की त्यासाठी तोकडेपणावरून शब्दांना आणि पर्यायाने भाषेला लांछन लावण्याची काहीच गरज नाही असंच मला म्हणायचं आहे. अर्थात या लेखात तुम्ही मांडलेला विचार वेगळा आहेच हे आधीही जाणवलं होतंच.नाही. भाषेला किंवा शब्दांना लांच्छन लावलं जात नसून शब्दातून किंवा भाषेतून आमच्यावर पडणार्या बंधनांवर, बेड्यांवर लांच्छन लावलं जात आहे. त्या बेड्या तुटाव्यात, तरीही भाषा, शब्द जीवंत राहू शकतात हा अनुभव आहे. :)
In reply to यकुशेठ, by प्रास
In reply to मला आज खरोखर एक मिपाकर म्हणून by यकु
...तथाकथित हुच्चभ्रुची कातडी ही फार पातळ असते. थोडासा हटकून हुच्चभ्रुपणा करणारा हा लेख तिथे काय दिसला, त्या तथाकथित अभ्यासू सदस्याला त्याच्या घोटीव हुच्चभ्रूपणावर अतिक्रमण झाल्यासारखं वाटलं आणि हा लेख 'अनाठायी' व 'मिथ्या' असल्याचा निर्णय देऊन ते हुच्चभ्रु म्हणून नावाजलेले महाशय मोकळे झाले. (मग माझा त्यांच्याबद्दलचा अनुभव होता तो जसाच्या तसा तिथे मांडावा लागला.) इथे मात्र मी ऑनलाइन नसतानाही आपण सर्वांनी कसलाही आव न आणता चर्चा केलीत त्याबद्दल शतश: आभार.धाग्यावर आलेले प्रतिसाद पचत नसतील तर लिहित जाऊ नका. मुळात धाग्यावर धाग्याच्या विषयासंबंधित प्रतिक्रीया कोणी दिली असेल तर त्यावर वैयक्तिक टिप्पणी करणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. तुमची स्तुती करायची असो नाहीतर शिव्या द्यायच्या असो, त्यासाठी तुम्ही ऑनलाईन आहात का नाहित हे पहायचे कारण इथे फोरमवर तरी नसते. (तुमचा आक्रस्ताळेपणा पुर्वीच्या यु.जी. वर लिहलेल्या लेखांनंतर आलेल्या प्रतिसादांवरही पाहिलेला आहे. त्यामुळे लेखावर प्रतिक्रीया देत नाही. दिली तर तुमचे पुर्वग्रहदुषित प्रतिसाद काय येतील याची कल्पना आलीच आहे.) टीपः कोणा गाढवाने 'हे संस्थळ ते संस्थळ' अशा प्रकारे मला प्रश्न विचारल्यास उत्तर दिले जाणार नाही.
In reply to वैचारिक दिवाळखोरी. by Nile
धाग्यावर आलेले प्रतिसाद पचत नसतील तर लिहित जाऊ नका.सल्याबद्दल मंडळ आभारी आहे. कुठे लिहायचे आणि लिहायचे नाही याबद्दल आमचे मस्तक शाबूत असल्याने आम्ही ते विचारात घेऊच. पण तरीही आपण जो बहुमोल सल्ला दिला आहे तो जे तुमच्या वैयक्तिक प्रतिमांनी प्रभावीत होत असतील त्यांना द्या. सबब आपले शब्द इथे व्यर्थ गेले आहेत. शब्दांचा वापर नीट शिकून या. आपले कधीही, कुठेही स्वागत आहे.
मुळात धाग्यावर धाग्याच्या विषयासंबंधित प्रतिक्रीया कोणी दिली असेल तर त्यावर वैयक्तिक टिप्पणी करणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.हो का? हे आपण लिहीलेत हे बरे केलेत. सध्या आपण ज्या व्यक्तिच्या शब्दबंबाळ अतैव त्याज्य प्रतिमेवर भुलून इथे हे ज्ञानकण उधळता आहात त्या व्यक्तीने काय म्हटले आहे तुम्हाला ऐकवतो -
विचारांचा ब्रम्हराक्षस पुरता मारायचा असेल तर मौनापेक्षा हाराकिरी, अफूची मोठी मात्रा खाणे, वगैरे उपाय अधिक तडकाफडकी कार्यक्षम होत. फार त्वरा नसेल, तर सबुरीचा साधा मार्ग त्यातल्या त्यात सुखावह आहे. एखाद्या व्यक्तीने शंभर-दीडशे वर्षे शांतपणे वाट बघण्याचे ठरवले, तर बहुधा त्या मुदतीच्या आतच कधीतरी त्या व्यक्तीच्या विचारांचा ब्रम्हराक्षस मरून जाईल.काही कळले का? तुम्ही आम्हाला व्यक्तिपूजेतून मुक्त होण्याचा सल्ला दिला आहे. पण स्वतः हे काय चालवले आहे? जो प्रगल्भ म्हणून अनेक संस्थळावर मिरवतो, त्याने तोंड फोडून लोकांना अफू खाण्याचे, हाराकिरी करण्याचे सल्ले दिलेले चालतात. त्याच्या प्रतिमेचा तुमच्यावर प्रभावही पडतो. पडो. पण पुन्हा इथे आपले शब्द बापुडे केवळ वारा सोडू नका.. त्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. आमची ती व्यक्तिपुजा आणि तुमचं ते इन्स्पिरेशन किंवा काय जे असेल ते?
तुमची स्तुती करायची असो नाहीतर शिव्या द्यायच्या असो, त्यासाठी तुम्ही ऑनलाईन आहात का नाहित हे पहायचे कारण इथे फोरमवर तरी नसते.बरं. मग? इथे आपला कुठे संबंध येतो?
(तुमचा आक्रस्ताळेपणा पुर्वीच्या यु.जी. वर लिहलेल्या लेखांनंतर आलेल्या प्रतिसादांवरही पाहिलेला आहे. त्यामुळे लेखावर प्रतिक्रीया देत नाही. दिली तर तुमचे पुर्वग्रहदुषित प्रतिसाद काय येतील याची कल्पना आलीच आहे.)मग आता इथे कशाला येणे केलेत? एकदा शिकलेला धडा पुन्हा पुन्हा विसरता आणि असे दुसर्यावर आरोप करीत सुटता.
टीपः कोणा गाढवाने 'हे संस्थळ ते संस्थळ' अशा प्रकारे मला प्रश्न विचारल्यास उत्तर दिले जाणार नाही.असे कुणीही आपणास विचारणार नाही ही समस्त सदस्यांच्या वतीने मी तुम्हाला हमी देतो. तुम्ही नजर ठेऊन पहा. मी त्यांच्याशी बोलणारही नाही, तरी ते असले मूर्खपणाचे तुमच्याच मनात निर्माण झालेले प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीत. स्वतःच कल्पना करुन आपण त्या प्रश्नांनी उगीच बेजार होत आहात. तस्मात आराम घ्यावा. व्यक्तिपुजेतून मुक्त होण्याचे सल्ले देणार्यांनी जरा स्वतः च्या कृत्यांवर नजर टाकावी. बाकी आपण एक जालीय मित्र म्हणून आम्हाला कधीही हवेच आहात. अर्थात हे विधान केल्यानं आम्ही तुम्हाला आमचा अपमान करण्याची संधी देत आहोत.. पण मैत्री हवी तर एवढं चालायचंच.. नाही का?
अंतर्मुख ऊहापोहासाठी मौनाचा फायदा असला, तरी शब्द/सांकेतिकता वगैरे यांच्याबाबतचे वरील तात्त्विक विवेचन अनाठायी आहे. इतकेच काय, मनाने केलेल्या जगाच्या खोट्या घटकांच्याबाबत शब्दांच्या साहाय्याने देखील "मिथ्या" असा निर्णय करता येतो.
In reply to धाग्यावर आलेले प्रतिसाद पचत by यकु
आपले कधीही, कुठेही स्वागत आहे.कुणाच्याही स्वागताची आम्हाला गरज नाही आणि अपेक्षाही नाही. आम्हाला जिथे जायचं तिथे आम्ही जातो.
सध्या आपण ज्या व्यक्तिच्या शब्दबंबाळ अतैव त्याज्य प्रतिमेवर भुलून इथे हे ज्ञानकण उधळता आहातहा पुर्वग्रहदूषित मुर्खपणा पुरे. हा निष्कर्ष कसा काढलात? मी वरती लिहलेले मत कोणाही बाबत खरे आहे. हेच मत मी पुर्वीही अनेकदा व्यक्त केले आहे. (पहा: http://www.misalpav.com/node/18205#comment-316333 ) कोणाची बाजू घेणं वगैरे फालतू आरोप करून तुमची वैचारिक दिवाळखोरीच जाहिर होते आहे. तेव्हा लेबलं लावून तुमचा आक्रस्ताळेपणा अजून सिद्ध करायची आवश्यकता नाही.
जाहीर धागा काढणे म्हणजे पब्लिक मध्ये नागडं होण्यासारखं आहे, मग इतरांनी हसल्यावर तक्रारी करू नयेतत्याशिवाय, एका संस्थळावर वाईट प्रतिक्रीया आली म्हणून दूसर्या संस्थळावर जाऊन रडगाणे गाऊन दाखवणे, त्या कारणाने इतरांना हुच्चभ्रु म्हणून हिणवण्याने तुम्हाला दोन चार मूर्ख समर्थक कदाचित मिळतील पण तरीही हा प्रकार बालीशच आहे.
एकदा शिकलेला धडा पुन्हा पुन्हा विसरताआम्ही कोणताही धडा शिकलेला नाही. आम्हाला उलट मजा येते अशा प्रकारांमुळे, म्हणून पुन्हा पुन्हा येतो. माझ्या मतांव्यतिरीक्त कोणतेही स्पष्टीकरण मला विचारण्यात अर्थ नाही, त्याचे स्पष्टीकरण देण्यास मी बांधील नाही.
In reply to पुर्वग्रहदुषित मुर्खपणा by Nile
मुळातच लेख डोक्यावरून गेलाय.तर आपल्याकडून पास करण्यात आलं आहे....
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
यक्कु सेठ, अहो लेख प्रकाशित केला की 'गंगार्पणमस्तू' म्हणावे आणि मागे वळून देखील बघू नये हे आम्ही तुमच्या सारख्या >>>>>लेख गंगार्पणच हो. पण हुच्चभ्रंच्या शब्दकोशात विचारस्वातंत्र्य, परमत सहिष्णूता असं काहीसं असतं असं फार वेळा ऐकून होतो हो... आणि त्याचा जयघोष नेहमी कानीकपाळी पडत होता. सार्या जगाला ढोंगी ठरवणारे हे हुच्चभ्रू, ज्यांच्याकडं सद्सदविवेक बुद्धीचा अंश शिल्लक असेल अशी आमची आशा होती तेच महाढोंगी निघाले.. आम्ही ते हलगी वाजवून जाहीर करतोय.. एवढंच.. :)
In reply to यक्कु सेठ, अहो लेख प्रकाशित by यकु
In reply to @ पराशेठ.. गुस्ताखी माफ by गवि
एवढा निर्विकारपणा / निरिच्छपणा / निरपेक्षपणा कोणी इथे करु शकत असेल किंवा कसे अशी घनदाट शंका आहे. असं असेल तर लेख लिहीण्याची प्रेरणा तरी कशी व्हावी जर वळूनही बघायचे नसेल तर? आपण साद देतो ती प्रतिसादाच्या आशेनेच / इच्छेनेच ना?गवि अहो माझे वाक्य निट वाचलेत का ? :- हे आम्ही तुमच्या सारख्या विद्वानाला समजवायचे होय ? मी यक्कुंसारख्या विद्वान माणसाबद्दल बोलत आहे हो :) तुमचा-आमचा प्रश्नच वेगळा आहे. आम्ही तर कितीदा निव्वळ धिंगाणा घालायला म्हणूनच धागे काढतो. आपण स्कोर सेटल केले, वाद घातले, फाटक्यात पाय अडकवले तर ठिक आहे हो, ते आपण करतोही ;) मुद्दा विद्वानांचा आहे.
..माफीसह ही शंका नोंदवतो..असे बोलल्याबद्दल आपणास २ क्वार्टरींचा दंड लागु केल्या गेला आहे, जो आम्ही पुढील विकांतास आपल्या नगरीत येऊन वसूल करूच.
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
मी यक्कुंसारख्या विद्वान माणसाबद्दल बोलत आहे हो Smileआमच्या पुढच्या पुणें भेटीत एक भरदारशी पगडी आणि उपरणे यांची तजवीज करणे. आता विद्वान ही पदवी दिलीच आहे आपण तर विद्वत्तेची परंपरागत वस्त्रेही द्यावी लागणार आहेत हे ध्यानात ठेवावे.. ;-) बाकी कार्यक्रम कुठं लकडी पुल की बालगंधर्व चौक, की स.पे.?
In reply to मी यक्कुंसारख्या विद्वान by यकु
In reply to हॅ हॅ हॅ..झिरमिळ्या नकोत का by गवि
@पराशेट.. २ क्वार्टर दोघांत पुरतील का?काय गवि? इतका अतिसभ्य प्रश्न? अहो, ती संख्या पऱ्यानं स्वतःपुरता हिशेब करून सांगितली आहे. ;)
In reply to अत्यंत बकवास लिखाण. या पेक्षा by आत्मशून्य
"नेमकी" प्रतीक्रीया आपण नक्किच समजू शकाल.ती सकाळीच तिकडे समजली आत्मशून्य. तिकडे गेला नाहीत का तुम्ही?
In reply to "नेमकी" प्रतीक्रीया आपण by यकु
थोडासा हटकून हुच्चभ्रुपणा करणारा हा लेख तिथे काय दिसला, त्या तथाकथित अभ्यासू सदस्याला त्याच्या घोटीव हुच्चभ्रूपणावर अतिक्रमण झाल्यासारखं वाटलं आणि हा लेख 'अनाठायी' व 'मिथ्या' असल्याचा निर्णय देऊन ते हुच्चभ्रु म्हणून नावाजलेले महाशय मोकळे झाले.त्यांनी प्रतिसाद नीट वाचलेला नाही, आणि आणि लेखाला मिथ्या आणि अनाठायी म्हटले आहे, असा त्यांचा गैरसमज झालेला आहे. असे नव्हे. लेखक ज्याला "प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्या किंवा ती प्रतिमा उभी राहण्यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे!" त्याला सहमतीने "मिथ्या" म्हटलेले आहे. मात्र त्या ठिकाणाहून शब्दांना दोष देणे हे अनाठायी म्हटले आहे. - - - "अनाठायी" आणि "मिथ्या" शब्द वापरलेली वाक्ये संदर्भासह वाचता यावीत तो प्रतिसाद पूर्णच येथे डकवत आहे.
शब्द म्हणजे जगाच्या औपचारिक/स्वेच्छेने ठरवलेल्या घटकांची (कन्व्हेन्शनने किंवा आर्बिट्ररिली ठरवलेल्या घटकांची) औपचारिक चिन्हे (कन्व्हेन्शनने ठरवलेली चिन्हे) आहेत, हे मान्य. तो उपचार/कन्व्हेन्शन अमान्य केले तर सध्याच्या शब्दाचा जगातील घटकांशी संबंध राहात नाही, तेही खरे. मात्र कुठलेही चिन्ह चालू शकेल. उदाहरणार्थ नि:शव्द स्वप्नातील "घटना" घटते, ती सुद्धा मनातील चिन्हव्यवहारच असतो. हे व्यक्तीच्या अंतर्गत. वेगवेगळ्या व्यक्तींच्या मध्ये आपापसात वेगवेगळी चिन्हे चालतील. लहान मुले सुद्धा नि:शब्द वाकुल्या-वगैरे चिन्हे वापरू शकतात. विचारांचा ब्रम्हराक्षस पुरता मारायचा असेल तर मौनापेक्षा हाराकिरी, अफूची मोठी मात्रा खाणे, वगैरे उपाय अधिक तडकाफडकी कार्यक्षम होत. फार त्वरा नसेल, तर सबुरीचा साधा मार्ग त्यातल्या त्यात सुखावह आहे. एखाद्या व्यक्तीने शंभर-दीडशे वर्षे शांतपणे वाट बघण्याचे ठरवले, तर बहुधा त्या मुदतीच्या आतच कधीतरी त्या व्यक्तीच्या विचारांचा ब्रम्हराक्षस मरून जाईल. मला हे पटते की केवळ उपचाराने ठरवलेले जगाचे कित्येक घटक हे जग जाणण्याकरिता निरुपयोगी असू शकतील. त्यांच्यासाठीचे शब्द आणि त्यांच्याबाबतचे संवाद निरुपयोगी असतील. मात्र हा शब्दांचा दोष नव्हे. किंवा शब्द औपचारिक चिन्हे असल्याचा नव्हे. जगाचे तसे कुठले घटक आहेत हा उपचार आधी ठरतो - तो मुळातला दोष - आणि एकदा का तसा कुठला घटक असल्याचे ठरवले, तर त्यासाठी चिन्ह म्हणून शब्द रिवाजाप्रमाणे मिळून जातो. अंतर्मुख ऊहापोहासाठी मौनाचा फायदा असला, तरी शब्द/सांकेतिकता वगैरे यांच्याबाबतचे वरील तात्त्विक विवेचन अनाठायी आहे. इतकेच काय, मनाने केलेल्या जगाच्या खोट्या घटकांच्याबाबत शब्दांच्या साहाय्याने देखील "मिथ्या" असा निर्णय करता येतो.
In reply to माझा उल्लेख by धनंजय
विचारांचा ब्रम्हराक्षस पुरता मारायचा असेल तर मौनापेक्षा हाराकिरी, अफूची मोठी मात्रा खाणे, वगैरे उपाय अधिक तडकाफडकी कार्यक्षम होत. फार त्वरा नसेल, तर सबुरीचा साधा मार्ग त्यातल्या त्यात सुखावह आहे. एखाद्या व्यक्तीने शंभर-दीडशे वर्षे शांतपणे वाट बघण्याचे ठरवले, तर बहुधा त्या मुदतीच्या आतच कधीतरी त्या व्यक्तीच्या विचारांचा ब्रम्हराक्षस मरून जाईल.हे जे वर लिहीलं आहे ना ती आपलीच मुक्ताफळं आहेत तिकड्च्या संकेतस्थळावर लिहीलेली. नेमक्या कुठल्या बुद्धी दौर्बल्यामुळे (आपण मनोरंजक लिहीत नाही, फक्त क्लिष्ट वैचारिक लिहिता हा आमचा समज आहे) आपल्याला हे लिहीण्याचे कष्ट पडले? हे जरा स्पष्ट केलंत तर आपल्या चाहत्यांच्या मनात जी प्रतिमा आहे तिच आमच्याही मनात स्थापित होण्यास मदत होईल.
अंतर्मुख ऊहापोहासाठी मौनाचा फायदा असला, तरी शब्द/सांकेतिकता वगैरे यांच्याबाबतचे वरील तात्त्विक विवेचन अनाठायी आहे.तुम्हाला हे कुणी सांगितले? की तुमच्या बुद्धीकुहरात जेवढा प्रकाश पडतो तेवढ्यावरच आपण विसंबून रहाता? तसं असेल तर मार्गच खुंटला. अशी बेधडक विधानं करण्यापूर्वी स्वतःचा आवाका तपासावा, मगच ते सांगावं.
इतकेच काय, मनाने केलेल्या जगाच्या खोट्या घटकांच्याबाबत शब्दांच्या साहाय्याने देखील "मिथ्या" असा निर्णय करता येतो.बर. असेल जे काय असायचं ते... आता काय.
In reply to आपल्याला सकाळी दिलेले उत्तर by यकु
In reply to आपल्याला सकाळी दिलेले उत्तर by यकु
एक वेगळिच संकल्पना समजली.