धनदांडग्यांना अन्न, वस्त्र, अमर्याद निवारा. मग बाकीच्यांनी कुठे जायचे ?
इसवी सन १९९५, आयटी काळ भरभराटीला येण्यास सुरुवात झाली होती. घरांच्या किमती साधारणपणे ९००,१२०० प्रती चौरस फूट इतक्याच सीमित होत्या. पुढे ह्या क्षेत्राने भारी मारली आणि ४ अंकी दिसणारे पगाराचे आकडे ५/६ अंकांपर्यंत नेऊन ठेवले. तिथून सुरु झाली एक स्पर्धा, जास्तीत जास्त घरे घेण्याची. एक दोन करता करता काही जणांनी आपली पूर्ण संपत्ती पणाला लाऊन जास्तीत जास्त घरे आपल्या पदरात पडून घेतली आणि ती घरे आता भाड्याने देऊन आपली भविष्याची निश्चिंती केली. इथपर्यंत तरी सगळे ठीक होते, पण हळूहळू हे वेड वाढतच गेले आणि ज्याला त्याला जमेल तितकी घरे घेण्याची एक नशाच चढली. घरे बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी सुद्धा त्यांनाच परवडतील अशीच घरे बांधायचा सपाटा चालू केला. ह्यातूनच पुढे घरांच्या किमती आकाशाला भिडू लागल्या. ज्यांचे पगार गलेलठ्ठ आहेत, त्यांनी एकेक करून आपला स्वार्थ साधून घेतला. पण सामान्य माणसाच्या पदरी काय ?
जर हे खूळ असेच वाढणार असेल तर जी काही भूमी आहे ती ज्यांच्याकडे बक्कल पैसा आहे तेच बळकावणार हे नक्की. मग एक घेतलेली प्रतिज्ञा आठवते, "भारत माझा देश आहे". पण ह्या भारत देशात रात्री सुखाने डोके ठेवायाल मात्र १०X१० ची खोली सुद्धा मिळणे दुरापास्त होत आहे. एक दिवस सर्व जमीन सर्व धनदांडग्यांनी बळकावली तर मग कुठे जाणार सामान्य माणूस ? काय उपाय आहे ह्याच्यावर ?
भारतातील सर्व नागरिकांना कमाल जमिन संपादन करण्याचा, तसेच मर्यदित घरे असण्याचे बंधन असावे असे वाटते. असा काही कायदा केला तर निदान जमिनीचा काही तुकडा वा एखादे घर तरी सामान्य माणसांच्या नशिबात येईल आणि ह्या अवाजवी वाढणाऱ्या घरांच्या किमतीलाही आळा बसेल.
जर भारत माझा देश असेल तर त्या देशाने मला ह्या देशात वाजवी किमतीत घरे उपलब्ध करून दिली पाहिजे आणि धनदांडग्याच्या अमर्याद आकांक्षेला वेसन घातले पाहिजे.
प्रत्येकाला समान जमीन तसेच समान घरे असण्याचा अधिकार असावा व कोणासही ह्या देशात ठराविक प्रमाणापेक्षा जास्त जमीन अथवा घरे आपल्या नावावर लाटण्यास बंदी असावी.
नुकतेच महाकाय चीनने देखील तिथे एक कुटुंब एक घर असा कायदा केलेला आहे असे वाचनात आले.
वाचने
5703
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
सर्व लोकानी धनवान बनावे या
खूपच अप्रतिम लेख...... सध्या
In reply to खूपच अप्रतिम लेख...... सध्या by स्पा
अहो, आपण एकाच नावेतले प्रवासी
In reply to अहो, आपण एकाच नावेतले प्रवासी by अप्पा जोगळेकर
मी पार आता कल्याण -शिळ रोड
नुकतेच महाकाय चीनने देखील
In reply to नुकतेच महाकाय चीनने देखील by मृत्युन्जय
मला माफ करा, मला सुद्धा ह्या
अगदी सहमत आहे. भारतात
हे जे काही आहे ते बरोबरच आहे
पटले
सहमत
In reply to सहमत by नितिन थत्ते
मला वाटते की जर गृहकर्जावरील
In reply to मला वाटते की जर गृहकर्जावरील by क्लिंटन
सहमत
In reply to मला वाटते की जर गृहकर्जावरील by क्लिंटन
गुरगावसारख्या ठिकाणी या
In reply to मला वाटते की जर गृहकर्जावरील by क्लिंटन
प्रत्येक शब्दाशी सहमत आहे.
मुळावर घाव घालायला हवा!
In reply to मुळावर घाव घालायला हवा! by सर्वसाक्षी
एखाद्याच्या उत्पन्नावर का
In reply to मुळावर घाव घालायला हवा! by सर्वसाक्षी
वाडवडिलार्जित संपत्ती असेल
भाव कसे वाढवले जातात
वाचतेय.
स्वप्न...!!
In reply to स्वप्न...!! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद इंद्रा...... खरंच
In reply to स्वप्न...!! by इन्द्र्राज पवार
तरीपण
गैरसमज
राजकिय इच्छाशक्तीचा आभाव व गाव गांधींचा भ्रषटाचार.
देणारा देतो म्हणुन घेणारा घेतो
चांगली बातमी