मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुसलमानांसाठी राखीव

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
मुसलमानांसाठी राखीव काल आय बी एन मधे एक सनसनाटी बातमी बघत होतो..एका गुप्त चौकशी मधे असे आढळले कि मुसलमान लोकांना कुणीच फ्लाट विकत ना्ही, व जागा हि भाड्याने देत नाहि..मुंबई व दिल्लीच्या लोकांची पहाणी केल्यावर असे आढळून आले कि ८०% मालक मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात.. यात अनेक शिकलेल्या घर मालकांचा हि लोकांचा पण भरणा आहे. .इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि..... यावर मार्ग काय? नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय?? धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वास अश्या वागण्या मुळे बाधा येति का?.

वाचने 55225 वाचनखूण प्रतिक्रिया 207

In reply to by प्रशान्त पुरकर

विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 11:10
बरयाच गुजराति / मारवाडि सोसायट्या सुद्धा मासाहार करनारया मराठि लोकाना घर दएत नाहि असे ऐकुन आहे... सरसकट गुजराथी मारवाडी असे म्हणू नका. केवळ जैन सदस्य असलेल्या सोसायट्या असे करीत असतात

In reply to by विजुभाऊ

गणपा Fri, 09/17/2010 - 13:19
आवांतरच आहे : आमच्या शेजारी काही गुजराथी कुटूंब रहायची (हो गुजरथीच जैन नाही.) रैवारी काही बाजर केला की यांचे सारखे टोमणे मारण चालु व्हायच. तरी बर दारात २-४ उदबत्या लावुन ठेवायचो आम्ही. ज्या काय गफ्फा टोमणे मारायच्या त्या आपापसात मारले असते तर ठिक येता जाता बोलत बसायचे. मग मी हट्टाला पेटुन दुसर्‍या दिवशी आईला सुकं (सुके मासे) करायला लावायचो. आणि सगळ्या उदबत्या पण मुद्दाम विझवायचो ;)

In reply to by गणपा

धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 13:42
ही हा हा.... मी असतो तर आणखी सरळ केलं असतं रे! आता कसं ते सांगितलं इथं तर हळुवार कोमल मनांच्या आयड्यांना प्रचंड मानसिक धक्का बसेल आणि उगा 'नर्व्हस ब्रेकडाऊन' की कायसं होईल. :D त्यामुळं ते इथे नकोच.

In reply to by गणपा

योगी९०० Fri, 09/17/2010 - 14:27
माझ्या माहीतीतले काही गुजराती (आणि जैन सुद्धा) इतके नॉनवेज खातात(ते पण घराबाहेर)..की मराठा लोकं सुद्धा तितके खात नाहीत. मी तर एका गुजराती मुलीला ओळखतो आणि ती कायम हपापल्यासारखी चिकन खाते. कधीही कंपनीची पार्टी असेल तर काही वेळेला तिच्यासाठी फक्त नॉनवेज मागावे लागते.

गांधीवादी Fri, 09/17/2010 - 08:56
>>८०% मालक मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात.. उरलेल्या २० टक्क्यापैकी २ टक्के राजकारणी लोकांचे असतील, त्यांना भेटायला सांगा. मुसलमान लोक त्यांना भेटतील, आपले राजकारणी एक गठ्ठा मतासाठी त्यांना भरपूर घरेदारे देतील, मुबलक अन्न देतील, आपल्या तोंडाचा घास त्यांना देतील, त्यातून ते चार-पाच बायका करतील, १०/१२ पोर काढतील, (काय तर म्हणे समान नागरी कायदा.) >>नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय?? हा अख्खा देशच घाला म्हणावं. >>धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वास अश्या वागण्या मुळे बाधा येति का?. असली फडतूस तत्वे फक्त हिंदूंसाठी आहेत, (विशेष करून हि तत्वे पांढर्या अतिरेक्यांनी, हिरव्या अतिरेक्यांच्या भल्यासाठी, भगव्या अतिरेक्यांना संपविण्यासाठी बनवलेली आहेत.) हिरव्याचं भलं होत असेल तर सर्व काही चांगलेच. कसाब तिकडे बिर्याणी झाडतोय, आणि सरकार साध्वीचे कंबरडे मोडत आहे, हाल हाल चाललेले आहेत त्यांचे.

पैसा Fri, 09/17/2010 - 09:08
प्रश्न फक्त धर्माचा नाही. बर्‍याच लोकांचा अनुभव आहे की मुसलमान शेजार्‍याकडे प्रचंड प्रमाणात पाहुणे येतात. जिन्याजवळच्या जागेत थुकतात, घाण करतात. बरेचदा त्याना सार्वजनिक स्वच्छतेबद्दल काही माहित नसतं. या सगळ्याला वैतागून माझ्या चुलतबहिणीने चांगल्या जागचा फ्लॅट स्वस्तात विकलेला मला माहित आहे.

In reply to by पैसा

सहमत आहे. एखाद दुसरा सन्माननीय अपवाद वगळला तर हा अनुभव सर्रास येतो. मी स्वतः एकदा माझे घर बदलले आहे याच कारणास्तव. बाकी धर्मनिरपेक्ष तत्वाला बाधा वगैरे सर्व फालतुपणा आहे. गांधीवादी यांनी म्हंटल्याप्रमाणे ही तत्वे वगैरे फक्त हिंदुंसाठी असतात. बाकीच्यांना ती पाळणे बंधनकारक नाहीये आपल्या देशात.

मस्त कलंदर Fri, 09/17/2010 - 10:20
माझ्या डोक्यावरच्या घरात एक मुस्लिम कुटुंब राहाते. वन बीएचकेच्या घरात तीन जोडपी आणि चार मुले एवढे सगळेजण राहतात. बर्‍याचदा कचरा बाथरूमच्या, घराच्या खिडकीतून खाली टाकतात. अगदी भरीस भर म्हणून बकरी ईदच्या वेळेस त्यांनी दोन भलेदांडगे बकरे आणून त्यांनी दोन दिवस सोसायटीच्या आवारात बांधून ठेवले होते. आणि त्यांना वरती नेताना ते माझ्या दरवाजाला जोरजोरात ढुशा देत गेले. आहे असे, की ही बिल्डिंग म्हाडाची जुनी चार मजली सोसायटी पाडून बांधली आहे. आणि हे कुटुंब आधीच्या सोसायटीतले जुने कूळ आहे. आणि अजूनही बर्‍याचशा ठिकाणी अजून नवीन कार्यकारिणी बनली नाही. जुने लोक आपलेच दात आपलेच ओठ म्हणून काही बोलत नाहीत आणि नव्यांना असा घाणेरडेपणा आवडत नाही. पण सध्या तरी याविरूद्ध कुणाची काही चालत नाही. काही महिन्यांपूर्वी माझा एक मित्र त्याच्या इथे बदलून आलेल्या बॉससाठी माझ्याच परिसरात घर शोधत होता. त्त्याचा बॉस मुस्लिम आहे हे कळाल्याबरोबर या पूर्ण भागात मुस्लिमांना घर विकले जात नाही असे सांगून एजंटांनी काढता पाय घेतला.

राजेश घासकडवी Fri, 09/17/2010 - 10:29
मला राखीव जागांचा प्रश्न कळला नाही. भारतात मुस्लिम कुठे राहातात? भारतात जन्मलेले सगळे हिंदूच असं कोणीतरी लिहिल्याचं आठवत होतं. मग राखीव जागांचा संबंधच कुठे येतो?

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी Fri, 09/17/2010 - 10:34
>>भारतात मुस्लिम कुठे राहातात? ब्वॉर मला पण अजून भारतात, भारतीय कुठे राहतात ते सुद्धा माहित नाही. संपादित कृपया प्रतिक्रिया लिहताना संयमित भाषा वापरावी ही विनंती - संपादक मंडळ

In reply to by विशाल कुलकर्णी

आमोद शिंदे Sun, 09/19/2010 - 20:47
मग त्यांच्यासाठी ही वेगळी आरक्षणे कशाला?
आरक्षणाचा इथे काय संबंध? सध्याची आरक्षणे कुणाला आहेत?

In reply to by आमोद शिंदे

अर्धवट Sun, 09/19/2010 - 10:56
तुम्ही हे उपहासानं लिहिलं नाही असं गृहीत धरून विचारतो.. तुम्हाला ती व्याख्या माहीत आहे का.. त्यात तीन अटी आहेत हे विसरताय का?

In reply to by अर्धवट

आमोद शिंदे Sun, 09/19/2010 - 20:42
नाही मी अजिबात उपहासाने लिहिलेले नाही. ती व्याख्या मध्यंतरी विकास ह्यांनी इथे दिली होती. त्यातल्या कोणत्या अटी मुसलमान समाजाचे लोक पूर्ण करत नाही ते सांगा.

नितिन थत्ते Fri, 09/17/2010 - 10:49
हिंदू लोकांमध्ये खालील गोष्टी घडत नाहीत ही नवीन माहिती या धाग्यावरील प्रतिसादांतून कळली. त्या दृष्टीने अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत. वन बीएचकेच्या घरात तीन जोडपी आणि चार मुले एवढे सगळेजण राहतात. बर्‍याचदा कचरा बाथरूमच्या, घराच्या खिडकीतून खाली टाकतात. बर्‍याच लोकांचा अनुभव आहे की मुसलमान शेजार्‍याकडे प्रचंड प्रमाणात पाहुणे येतात. जिन्याजवळच्या जागेत थुकतात, घाण करतात. बरेचदा त्याना सार्वजनिक स्वच्छतेबद्दल काही माहित नसतं.

In reply to by नितिन थत्ते

गांधीवादी Fri, 09/17/2010 - 10:56
संपादित. आपल्याला वारंवार सांगुन आपल्याकडुन पुन्हा-पुन्हा आक्षेपार्ह्य भाषेचा वापर होतो आहे ह्याची गांधीवादींनी त्वरित नोंद घ्यावी. हे प्रकार न थांबल्यास आपल्यावर कारवाई करावे लागेल अशी अंतिम सुचना आपल्याला करण्यात येत आहे. - संपादक मंडळ

In reply to by गांधीवादी

नितिन थत्ते Fri, 09/17/2010 - 10:59
हिंदू लोक दोन-चार लग्ने करत नाहीत व भर रस्त्यात दिवसा, शिवीगाळ करत फिरत नाहीत ही देखील नवीन माहिती प्रतिसादातून कळली. वरुणगांधीवादी यांना धन्यवाद.

In reply to by नितिन थत्ते

हिंदू लोक दोन-चार लग्ने करत नाहीत व भर रस्त्यात दिवसा, शिवीगाळ करत फिरत नाहीत ही देखील नवीन माहिती प्रतिसादातून कळली.>>>> अशा हिंदुंची संख्या आणि मुसलमानांची संख्या यांचे गुणोत्तर काय आहे याचा पण थोडासा विचार व्हायला हवा ना? ते गुणोत्तर जर १:५० असे असेल तर दोघांना सरसकट एकच निकष कसा लावता येइल?

In reply to by विशाल कुलकर्णी

गांधीवादी Sat, 09/18/2010 - 07:06
>>गुणोत्तर जर १:५० असे असेल तर कसले १:५० घेऊन बसले आहेत , मी जिथे राहतो, तिथे ४-५ हजार कुटुंबे असतील, तिथे एकही हिंदूने दोन लग्ने केलेली नाहीत. पण जवळच विशिष्ट जमातीतल्या लोकांनी दोन-दोन तीन-तीन लग्ने केलेली आढळून आलेली आहेत. हे गुणोत्तर कसे मोजू. ( हि विशिष्ट जमात व त्यांचे भले मोठ्ठे कुटुंब बघण्यास कोणाला जर खूपच रस असेल तर मी पत्ता देईन, स्वतः जाऊन बघणे, पण एक तरी हिंदू कळवा, ज्याने दोन लग्ने केलेली आहेत, पत्ता द्या, लगेच पोलिसाला कळवितो, त्यांच्या हातात बेड्या. मी नाय, कायदाच बोलतोय असं )

In reply to by गांधीवादी

नितिन थत्ते Sat, 09/18/2010 - 08:22
-धर्मेंद्रचे उदाहरण तर प्रसिद्धच आहे. -मला अजून आमच्या सीओईपीतले एक प्राध्यापक आणि शिक्षण/अध्यात्मसम्राटांबाबत अशीच माहिती आहे. -एका प्रसिद्ध नाटककारांनीही दुसरा विवाह केल्याचे माहिती आहे (अर्थातच जाहीरपणे केलेला नाही) -गेल्याच वर्षी चांद-फिजा प्रकरण झाले होते. त्यांनी लग्नापूर्वी इस्लाम स्वीकारल्याचे म्हटले जाते. [दुसरे लग्न करण्याची इच्छा झाली तेव्हा ते हिंदूच होते. धर्मेंद्रबाबतपण हल्ली असे म्हटले जाते]. ही प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे आहेत. चारातली दोन गाजली आहेत. दोनांचा काहीच गाजावाजा नाही. १९७१ च्या जनगणनेत या विषयी माहिती घेण्यात आली होती. त्यात बहुपत्नित्वाचे प्रमाण हिंदूंमध्ये ५.८% आणि मुसलमानांमध्ये ५.७% आढळले होते. इन फॅ़क्ट हे प्रमाण आदिवासींमध्ये सर्वाधिक, त्याखालोखाल बौद्धांच्यात होते. आणि हे एकपत्नित्वाचा कायदा येऊन १५ वर्षे झाल्यानंतर. नंतरच्या कोणत्या जनगणनेचा असा डेटा गुगलून मिळाला नाही. ५५ वर्षांपूर्वी एकपत्नित्वाचा कायदा झाला त्यामुळे आज बहुपत्नित्वाचे प्रमाण १:५० सुद्धा असता कामा नये. ०:५०००० असायला हवे. ते शून्यास शून्य असावे ही इच्छा ठीकच आहे. तशी जागृती मुस्लिमांच्यात व्हायला हवीच. पण सरसकटपणे मुसलमान बहुपत्निक असतात असे म्हणू नये. १०००:९०० असे जेव्हा पुरुष स्त्री प्रमाण असते तेव्हा बहुपत्नित्व सिग्निफिकंट प्रमाणात असूच शकत नाही. (अर्थात ठराविक क्लिशे वापरणार्‍यांना हे साधे गणित कळण्याची शक्यता नाहीच).

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Sat, 09/18/2010 - 10:36
१९७१ च्या जनगणनेत या विषयी माहिती घेण्यात आली होती. त्यात बहुपत्नित्वाचे प्रमाण हिंदूंमध्ये ५.८% आणि मुसलमानांमध्ये ५.७% आढळले होते. खोटे बोला पण रेटून बोला त्यातलाच हा प्रकार वाटतो आहे. आणि जर का बहुपत्नित्वाला विरोध नाही तर मग समान नागरी कायद्याला मुस्लिम विरोध का करतात ? आजही हिंदू कोड बिल आणि मुस्लिम कोड बिल वेगवेगळं का आहे ? मुसलमान पुरुषाने दुसरे लग्न केले तर मुस्लिम बाई कोर्टात दाद मागू शकत नाही. हिंदू बाई मात्र ही दाद मागू शकते. हिंदू कोड बिलानुसार बहुपत्नीत्व कायदेशीर आहे पण त्यासाठी त्या सगळ्या बायकांची या गोष्टीला मान्यता असेल तर.

In reply to by अप्पा जोगळेकर

नितिन थत्ते Sat, 09/18/2010 - 11:59
>>खोटे बोला पण रेटून बोला त्यातलाच हा प्रकार वाटतो आहे. हे घ्या >>बहुपत्नित्वाला विरोध नाही तर मग समान नागरी कायद्याला मुस्लिम विरोध का करतात मी २५ वर्षाचा होतो तेव्हा मलाही समान नागरी कायदा म्हणजे ४ बायका एवढेच कळायचे. :)

In reply to by नितिन थत्ते

मृत्युन्जय Sat, 09/18/2010 - 12:38
थत्तेकाका मला वाटते इथे मुद्दा १९६१ किंवा १९७१ मध्ये किती हिंदु बहुपत्नीत्वाची पद्धत बाळगुन होते यापेक्षा २०१० मध्ये किती जण बाळगुन आहेत हे बघणे महत्वाचे ठरेल. १९७१ चे निकषच वेगळे होते. अजुन थोडे म्हणजे ३० वर्षे मागे जाल तर समाज अश्या अवस्थेत होता की अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट काळाची गरज होती. आज तशी अवस्था आहे का? हिंदुंमध्ये बहुपत्नीत्वाची चाल शतकानुशतके चालत आलेली होती. हिंदु देवतांनी अनेक स्त्रियांशी विवाह केले होते. लोकोत्तर पुरुषांनी देखील केल्याचे दाखले होते. पण अचानक एक दिवस मग कायदा आला की बहुपत्नीकत्वाची हिंदुंना परवानगी नाही. मग अश्याच प्रकारचा कायदा मुसलमानांसाठी का नाही आला? परंपरेनुसार चालत आलेली गोष्ट हिंदुंसाठी बेकायदा होउ शकते तशी ती मुस्लिमांसाठी का नाही होउ शकली. २ लग्ने केल्यास एखाद्या हिंदुला कायद्याने शिक्षा होउ शकते तशी ती मुस्लिमांना का नाही होत? पहिली बायको असताना दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न करण्यार्‍याविरुद्ध पहिल्या बायकोने तक्रार केली म्हणुन पोलिसांनी अटक केली हे वृत्त आपण अधुनमधुन वाचत नाही का? अशी बातमी शारियत प्रमाणे लग्न करणार्‍या एखाद्या मुसलमानाबद्दल येउ शकते काय? तुम्हीच २-३ उदाहरणे दिलीत धर्मेंद्र, चांद फिझा वगैरे. त्यांनी पण शेवटी इस्लामचा सहारा घेतलाच ना? यातुन काय स्पष्ट होते? की हिंदुंना ही "फॅसिलिटी" उपलब्ध नाही. धर्मांतर करा. फायदे आहेत. आज परिस्थिती अशी आहे की एक लग्न करणे पण लोकांना जड जाते. दोन बायका फजिती ऐका अशी परिस्थिती कोण ओढवुन घेणार. पण तरीही एकाहुन आधिक कायदेशीर लग्ने केलेली मुस्लिम व्यक्तिमत्वे दिसतील तुम्हाला. कायदेशीररीत्या तरी किमान हिंदु असे करु शकणार नाहीत.

In reply to by मृत्युन्जय

नितिन थत्ते Sat, 09/18/2010 - 17:36
समान नागरी कायद्याविषयी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हिंदूंना असे वाटते की सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदू विवाह कायदा हिंदूंवर लादला आणि मुसलमानांवर लादला नाही. किंवा हिंदू विवाह कायदा हा भारत देशाचा म्हणून एक कायदा आहे आणि त्यातून मुसलमानांना (व इतरांना) सूट दिलेली आहे. खरी स्थिती तशी नाही. सर्वांना समानच कायदा लागू आहे त्या समान कायद्यानुसार त्यानुसार सर्वांना त्यांच्या रूढीपरंपरांनुसार वैयक्तिक कायदा लागू आहे. हिंदूंच्या हिंदू खासदारांनी हिंदूंमधील तत्कालीन मानसिकतेनुसार त्यांच्या समाजासाठी एक कायदा लागू करावा अशी मागणी केली. त्यानुसार हिंदू विवाह कायदा व हिंदू वारसा कायदा हे अस्तित्वात आले. तो कायदा त्यावेळची हिंदू समाजाची परंपरा आणि न्यायाकडे वाटचाल करण्याची हिंदूंची इच्छा यामुळे झाला. तरीही हे दोन्ही कायदे सर्व हिंदूंना समान नियमांत बांधत नाहीत. तर बहुतेक जातीजमातींना त्यांच्या रूढीप्रमाणे विवाह करण्याची वारस ठरवण्याची मुभा आहे. आसाम व बंगाल येथील हिंदूंमध्ये जीमूतवाहनाच्या दायभाग पद्धतीप्रमाणे वारस ठरतात तर उर्वरित भारतातील हिंदूंमध्ये विज्ञानेश्वराच्या मिताक्षरा पद्धतीनुसार वारस ठरतात. विवाह झाला की नाही हे ठरवण्याचे निकषही वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळे आहेत. मी आधी म्हतल्याप्रमाणे समान नागरी कायदा म्हणजे एकपत्नित्व आणि बहुपत्नित्व एवढेच मी ही समजत असे. पण त्याचे बरेच पैलू आहेत. म्हणणे असे आहे की हिंदूंमध्ये बहुपत्नित्वाची पद्धत हिंदूसमाजाच्या आतून होत असलेल्या मागणीमुळे बंद झाली. [ही मागणी आगरकरांच्या काळापासून चालू झाली होती] आणि ती १९५५ मध्ये प्रत्यक्षात आली. त्यावेळीही परंपरावादी हिंदूंकडून याला विरोध होतच होता. आणि त्या विरोधामुळे नेहरू हिंदू कोडबिल संसदेत मांडायची टाळाटाळ करीत होते. तेव्हा आंबेडकर रागावले होते. आंबेडकरांनी मांडलेल्या मूळ बिलापेक्षा बरेच डायल्यूट केलेले कायदे शेवटी पास झाले. त्या पास होण्यात Advocates largely sought to convince the public that the Bills did not stray far from classical Hindu personal law याचा मोठा भाग होता. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातून जेव्हा मागणी होईल तेव्हा त्यांच्यासाठी प्रागतिक कायदा बनवता येईल. समान नागरी कायदा असावा हे तत्त्व म्हणून मला मान्यच आहे. परंतु तपशीलाबाबत मला माहिती नाही. कारन हिंदूंना समान कायदा लागू करायचा असे म्हटले तरी तो कायदा कोणता हे ठरवणे तितकेसे सोपे नसेल.

In reply to by नितिन थत्ते

पैसा Sat, 09/18/2010 - 17:41
गोव्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच समान नागरी कायदा लागू आहे. कोणीही त्याविरुद्ध बोंब मारत नाही. लोकांना एवढी सवय झाली आहे, की प्रत्येक लग्न आधी रजिस्टर्ड होतं आणि मग त्या त्या धर्मानुसार होतं.

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Sun, 09/19/2010 - 19:47
[ही मागणी आगरकरांच्या काळापासून चालू झाली होती] आणि ती १९५५ मध्ये प्रत्यक्षात आली. +१. याचाच अर्थ असा की कोणताही धर्म चोंबाळून सुधारणा होत नसते तर कठोर धर्मचिकित्सेमुळे सुधारणा होत असते. स्वधर्माची तशी चिकित्सा करणारे हिंदू जन्माला आले आणि मुस्लिम जन्माला आले नाहीत हा हिंदूंचा दोष नाही. इंग्रज सरकार कायम मुस्लिमांचे लांगूलचालन करत राहिले आणि हिंदूंना मार देत राहिले. हा मार देताना हिंदू धर्मावरही प्रहार झाले ज्याचा बर्‍याच अंशी इष्ट परिणाम झाला. शिवाय आपल्याला मार खावा लागतोय याची कारणे काय हेदेखील हिंदूंना शोधून काढणे भाग पडले. ही प्रक्रिया मुस्लिम समाजात घडू शकली नाही. कारण प्रत्येक खेपेला त्यांचे हितरक्षण करणारे इंग्रज त्यांच्या पाठीशी होतेच. अस्तित्वात असलेल्या श्रद्धांचा जेंव्हा पराभव होतो तेंव्हाच नविन विचार जन्माला येतात. १०० वर्षांपूर्वीचा हिंदू आणि आजचा हिंदू यांच्यात आमूलाग्र फरक दिसतो तो यामुळेच. स्वातंत्र्यानंतर सरसकट सगळ्या धर्मियांना एकच काय तो नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा सर्वाधिक विरोध झाला तो मुस्लिमांचा तो याच कारणासाठी. ( म्हणून मग समान नागरी कायदा लागू होण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जावेत असे मार्गदर्शक तत्व इन्क्ल्यूड केले गेले. हे मार्गदर्शक तत्व हिरव्यांना वारंवार बोचते आणि म्हणून हे मार्गदर्शक तत्वच काढून टाका असाही हट्ट नंतर धरला गेला. आता या मार्गदर्शक तत्वाचं काय झालंय ते ठाउक नाही.) त्याच वेळेला जो कोणी अशा कायद्याआड येईल त्याला ठोकण्याचे, तोडण्याचे, फोडण्याचे, कापण्याचे, झोडण्याचे कायदेशीर प्रयत्न झाले नाहीत आणि आजही होत नाहीत हीच खरी गडबड आहे. हा प्रश्न हिंदू, मुस्लिम किंवा इतर कोणतेही धर्मीय यांच्यापुरता मर्यादित नाही. आपण धर्माचे अतित्व इहलोकाशी निगडीत समस्यांसंदर्भात नष्ट करु शकतो का हा खरा प्रश्न आहे. आणि इहलौकिक बाबीमध्ये सगळ्यात जास्त ढवळाढवळ करणारा भिकार धर्म म्हणाजे म्हणजे मुस्लिम धर्म होय. म्हणून त्यामध्ये सुधारणा होणे प्रामुख्याने आवश्यक आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

नितिन थत्ते Sun, 09/19/2010 - 21:39
>>स्वधर्माची तशी चिकित्सा करणारे हिंदू जन्माला आले आणि मुस्लिम जन्माला आले नाहीत हा हिंदूंचा दोष नाही. तो हिंदूंचा दोष आहे असे कुणी म्हटले? सांगण्याचा हेतू हा होता की 'सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंवर कायदा लादला' असे नाही. >>स्वातंत्र्यानंतर सरसकट सगळ्या धर्मियांना एकच काय तो नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा सर्वाधिक विरोध झाला तो मुस्लिमांचा तो याच कारणासाठी नाही. सर्वांना समान कायदा लागू करायला विरोध हिंदूंमधूनही झाला. म्हणूनच हिंदू कायद्यात सुद्धा परंपरांनुसार वागण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. 'धर्मात् रूढिर्बलीयसि' हे तत्त्व आजही अबाधित आहे. सर्व हिंदुंना समान कायदा (तपशील माहिती नसताना) लागू करायलासुद्धा माझा विरोध आहे. बंगालमधली वारसाची दायभाग पद्धत मला लागू केली तर मला नाही चालणार. आणि ख्रिश्चन आणि मुसलमानांसारखे वारसा/दत्तक कायदे हिंदूंना समान नागरी कायदा म्हणून लागू केले तर मला नाही चालणार. बहुधा तुमचा समज असा आहे ही हिंदूंना जो कायदा लागू आहे तो निर्दोष, प्रागतिक आणि न्याय्य आहे आणि तोच समान कायदा म्हणून सर्वांना लागू करावा. अतिअवांतर : मुसलमानांना एकपत्नित्वाची सक्ती झाली आणि ट्रिपल तलाक चालणार नाही असा कायदा केला तर समान नागरी कायदा झाला बुवा असे तुम्हाला वाटणार आहे का? (मी २५ वर्षांचा होतो तेव्हा मला तसे वाटत असे). >>आणि इहलौकिक बाबीमध्ये सगळ्यात जास्त ढवळाढवळ करणारा भिकार धर्म म्हणाजे म्हणजे मुस्लिम धर्म होय. हे म्हणणे मान्य नाही. हिंदू धर्मसुद्धा (अध्यात्माची बकवास करीत) ऐहिक बाबीतच ढवळाढवळ करतो. पारलौकिक बाबतीत धर्म काय करतो याच्याशी कोणाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अमुक माणसांनी मांसाहार करू नये, अमुक काळात विवाह करू नये, तमुक महिन्यात खरेदी करू नये ही ऐहिकच बाबतीतली ढवळाढवळ आहे. मुस्लिम धर्मात घडली नाही ती गोष्ट म्हणजे कायद्याचे कोडिफिकेशन. म्हणजे जसा हिंदू विवाह कायदा कोडिफाय झाला तसा मुस्लिम विवाह कायदा कोडिफाय झाला नाही. ही नक्कीच त्रुटी राहून गेली आहे. त्यामुळे खटल्यात काय निर्णय द्यावा हे संदिग्ध राहते ही गोष्ट खरी आहे. सर्वांना समान कायदा असावा ही इच्छा मला तत्त्वत: मान्य आहे.

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 10:08
'धर्मात् रूढिर्बलीयसि' हे तत्त्व आजही अबाधित आहे. +१. पण हे तत्व दुबळे करणे हेच खर्‍या लोकशाहीचे कार्य आहे. आणि हे तत्व शंभर वर्षांपूर्वीचे हिंदू आणि आताचे हिंदू या तुलनेच्ञा संदर्भात तपासा. तसेच शंभर वर्षांपूर्वीचे मुसलमान आणि आताचे मुसलमान यांच्या संदर्भात तपासा. या दोन्ही तौलनिक निष्कर्षांची पुन्हा एकदा तुलना करा. म्हणजे सत्य काय हे आपोआपच कळून येईल. पण निष्पक्षपातीपणाने सत्य शोधण्याची तयारी असली पाहिजे. काकदॄष्टीने आणि परधार्जिण्या वॄत्तीने विचार केला तर निखळ सत्य कधीच सापडणार नाही. आमच्या हिंदू धर्मात आजही अनेक सुधारणांना वाव आहे आणि हे आम्हांला मान्य आहे. म्हणूनच अंनिस सारख्या चांगले कार्य करणार्‍या संस्थांविरुद्ध फारतर आमच्यातल्या काही हिंदूंच्या मनात फारतर असंतोष असू शकेल. पण आम्ही लगेच तुमच्या मुसलमान धर्मात निघतात तसे जहरी फतवे काढणार नाही. सर्व हिंदुंना समान कायदा (तपशील माहिती नसताना) लागू करायलासुद्धा माझा विरोध आहे. बंगालमधली वारसाची दायभाग पद्धत मला लागू केली तर मला नाही चालणार. आणि ख्रिश्चन आणि मुसलमानांसारखे वारसा/दत्तक कायदे हिंदूंना समान नागरी कायदा म्हणून लागू केले तर मला नाही चालणार. मला काय मान्य आहे, तुम्हाला काय मान्य आहे या बोलण्याला काहीच अर्थ नाही. तुमच्या माझ्या मान्यतेवर भारताचे संविधान अवलंबून नाही. काही शहाण्या लोकांनी एकत्र येउन हे संविधान बनवले आहे आणि ते पाळले गेले पाहिजे. सगळ्या नागरिकांना एकच एक कायदा लागू करणे हे कोणत्याही लोकशाही राष्ट्रातल्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. उद्या सगळ्या नागरिकांनी सतीची प्रथा लागू करा अशी मागणी केली तरी आपले संविधान अशा आत्मघाताची परवानगी देणार नाही. सगळ्या नागरिकांनी मिळून एक सरकार निवडले आहे आणि त्या सरकारला संविधानाच्या चौकटीमध्येच काम केले पाहिजे. अशा चौकटीत राहून सरकार काम करत नाही. अन्यथा समान नागरी कायदा लागू करावा हे संविधानातले मार्गदर्शक तत्व पाळून तो कायदा साठ वर्षांमध्ये लागू झाला असता. अमुक माणसांनी मांसाहार करू नये, अमुक काळात विवाह करू नये, तमुक महिन्यात खरेदी करू नये ही ऐहिकच बाबतीतली ढवळाढवळ आहे. अर्थातच. पण ही ढवळाढवळ आजच्या काळात तरी नक्कीच ऐच्छिक आहे. आमच्या हिंदू धर्मात गेल्या शंभर वर्षांत ज्या सुधारणा झाल्या त्याचा हा परिपाक आहे. (आणि अजूनही आमच्या धर्मात सुधारणेला वाव आहे असे मानणार्‍या आमच्या हिंदू धर्मीयांची संख्या हळूहळू का होईना वाढते आहे. ) पण तुमच्या मुस्लिम धर्मात अजूनसुद्धा वंदे मातरम म्हटले की सगळ्या मुल्लांचा पोटशूळ उठतो. आणि मतदानाच्या वेळी फतवा निघाला की ही सगळीच्या सगळी झुरळे जाउन फतव्यातल्या आदेशाप्रमाणे मतदान करतात. मुसलमान माणूस राष्ट्रीय वॄत्तीचा नसतोच, देशप्रेमी नसतोच, सुधारणावादी नसतोच, परधर्मसहिष्णू नसतोच असा याचा अर्थ नाही. अब्दुल कलाम, हुसेन दलवाई, इरफान पठाण, सलीम खान अशा कितीतरी मुसलमानांची नावे या सहिष्णू आणि राष्ट्रीय वॄत्तीच्या व्यक्तींच्या यादीत घालता येतील. पण जेंव्हा टक्केवारीचा विचार होतो त्यावेळेला अशा चांगल्या माणसांचे पारडे हलके होते आणि झुरळांचे पारडे जड होते. आणि या झुरळांना पोसणारे, मस्तवाल होउ देणारे बहुसंख्य लोक मात्र हिंदू असा हा विचित्र तिढा आहे. समान नागरी कायद्याला सर्वाधिक विरोध मुसलमानांचा झाला हे धडधडीत सत्य आहे. समान नागरी कायद्या संदर्भातली माहिती येथे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Uniform_civil_code_of_India श्री पेन, चोंबाळणे म्हणजे लांगूलचालन करणे याच अर्थाने तो शब्द वापरला आहे. किंवा ग्राम्य भाषेत ** तोंडात घेणे, चोखणे असाही अर्थ होतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 10:43
समान नागरी कायदा कसा असावा यावर काही विचार केला आहे का? की हिंदूंचा कायदा सर्वांना लागू करणे म्हणजे समान नागरी कायदा असे आहे? हिंदू कायद्यानुसार चुलत भावंडांचे विवाह अमान्य आहेत. पारशी लोकांनी हा नियम समान नागरी कायदा म्हणून का मान्य करावा? समान नागरी कायदा असावा हे मला, तुम्हाला, घटनेला सर्वांना मान्यच आहे. पण तपशील ठरवायचा प्रयत्नही न करता ६० वर्षांत तो लागू झाला नाही म्हणून गळा काढणे योग्य नाही. मुसलमानांचे बहुपत्नित्व बंद केले की समान नागरी कायदा झाला असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न आधीच्या प्रतिसादात विचारला होता. त्याचे उत्तर द्यावे. >>सगळ्या नागरिकांना एकच एक कायदा लागू करणे हे कोणत्याही लोकशाही राष्ट्रातल्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे भारतीय घटनेने तरी हे प्रथम कर्तव्य म्हणून मानलेले नाही. :)

In reply to by नितिन थत्ते

मृत्युन्जय Wed, 09/22/2010 - 10:52
मुसलमानांचे बहुपत्नित्व बंद केले की समान नागरी कायदा झाला असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न आधीच्या प्रतिसादात विचारला होता. त्याचे उत्तर द्यावे. थत्ते काका मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या फक्त की बहुपत्नीत्वाची चाल दोन्ही धर्मात रुढ होती. पण मग ती एका धर्माला चालु ठेवण्यास परवानगी देण्यात आली पण दुसर्‍या धर्माला नाही. असे का? "customs" या सदराखाली बहुपत्नीत्वाची पळवाट हिंदुना मिळत नाही हे आपण दोघेही जाणतोच. त्यामुळे समान नागरी कायदा हिंदुना पण बहुपत्नीत्वाची प्रथा बाळगण्याची अनुमती देतो हे निखालस खोटे विधान आहे. त्यामुळे कायदा २ धर्मांसाठी वेगळा ठेवला गेला असे का? मूठभर हिंदुंनी होकार दिला म्हणुन हिंदु धर्मावर ही गोष्ट लादली गेली तर मूठभर मुस्लिम पण मिळालेच असते मुसलमानांमधील बहुपत्नीत्वाची चाल बंद करण्यासाठी.

In reply to by मृत्युन्जय

नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 11:54
>>थत्ते काका मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या फक्त की बहुपत्नीत्वाची चाल दोन्ही धर्मात रुढ होती. पण मग ती एका धर्माला चालु ठेवण्यास परवानगी देण्यात आली पण दुसर्‍या धर्माला नाही. असे का? हे इंटरप्रिटेशनच मुळात चूक आहे. "सरकार नावाची एक बाह्य शक्ती होती तिने (परस्पर) ठरवले की एका धर्माला बहुपत्नित्वाची परवानगी द्यायची आणि एका धर्माला नाही" हे इंटरप्रिटेशनच मुळात चूक आहे. आम्ही हिंदूंनी आमच्याच संसदेचा पाठपुरावा करून आमच्यासाठी कायदा करून घेतला त्यात आमच्या समाजात बहुपत्नित्व नको असे आम्हीच ठरवले. सरकार नावाच्या बाह्य शक्तीने नाही. हे योग्य इंटरप्रिटेशन आहे.

In reply to by नितिन थत्ते

मृत्युन्जय Wed, 09/22/2010 - 12:11
थत्त्ते काका मी तुमचा आधीचा प्रतिसाद वाचला होत म्हणुनच म्हटले होते की मूठभर हिंदुंनी होकार दिला म्हणुन हिंदु धर्मावर ही गोष्ट लादली गेली तर मूठभर मुस्लिम पण मिळालेच असते मुसलमानांमधील बहुपत्नीत्वाची चाल बंद करण्यासाठी. मूठभर लोकांनी मान्य केलेल्या गोष्टीला "आम्ही हिंदुंनी ही गोष्ट मान्य केली"" असे विधान दिशाभूल करणारे ठरेल असे नाही वाटत तुम्हाला?

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 17:18
आम्ही हिंदूंनी आमच्याच संसदेचा पाठपुरावा करून आमच्यासाठी कायदा करून घेतला त्यात आमच्या समाजात बहुपत्नित्व नको असे आम्हीच ठरवले. संसदेतले खासदार हिंदूंचे, मुसलमानांचे किंवा विशिष्ट धर्मांचे प्रतिनिधी नसतात. ते त्या त्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रतिनिधी असतात. एखाद्या मतदारसंघातला खासदार हिंदू असेल तर तो त्या मतदारसंघातल्या मुस्लि,ख्रिस्ती जनतेचाही प्रतिनिधी असतो. या खासदारांनी हिंदू धर्मात ही प्रथा बंद व्हावी अशी मागणी केली ती धार्मिक परवानगी झिडकारुन मान्य झाली. याच खासदारांनी मुस्लिम धर्मातली ही प्रथा बंद व्हावी अशीही मागणी केली. ही मागणी मात्र धार्मिक भावना दुखावतील म्हणून अमान्य झाली. हे योग्य इंटरप्रिटेशन आहे.

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 17:06
समान नागरी कायदा कसा असावा यावर काही विचार केला आहे का? मुसलमानांचे बहुपत्नित्व बंद केले की समान नागरी कायदा झाला असे तुम्हाला वाटते का? बहुपत्नित्व बंद होणे हा समान नागरी कायद्यातल्या तत्वाचा एक भाग आहे. याव्यतिरिक्त या कायद्यामध्ये आणखीन कोणकोणत्या बाबींचा अंतर्भाव होउ शकेल त्यासाठी मी आधीच्या प्रतिसादात दिलेल्या दुव्याचाच आधार घेतो. हा दुवा बर्‍यापैकी क्रेडिबल आहे असे माझे मत आहे. तेथे असा उल्लेख आहे की The common areas covered by a civil code include laws related to acquisition and administration of property, marriage, divorce and adoption. म्हणजेच बहुपत्नित्व अर्थात polygamy वरील निर्बंध ( ज्याचा वरील डेफिनेशनमध्ये उल्लेख नाही ) तसेच वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता आणि तिचे मालकी अधिकार, विवाह, घटस्फोट, अपत्यास दत्तक घेणे या बाबींसंदर्भात समान नागरी कायद्याने भाष्य करणे अपेक्षित आहे. मी भारतीय कायद्याचा तपशीलवार अभ्यास केलेला नाही. ज्यांनी तो केला आहे ते यासंदर्भात अधिकारवाणीने भाष्य करु शकतील. अर्थातच हे भाष्यकार पक्षपाती नाहीत याची खात्री पटल्यावर मगच त्यांच्या मताला किंमत देण्यात अर्थ आहे. पण तपशील ठरवायचा प्रयत्नही न करता ६० वर्षांत तो लागू झाला नाही म्हणून गळा काढणे योग्य नाही. माझ्या कुवतीप्रमाणे समान नागरी कायद्याचा विचार मी वरील दॄष्टीने केला. ज्यांना सरकार म्हणून जनतेने निवडून दिले त्यांनी नि:पक्षपाती तज्ञांची मदत घेउन या बाबीचा याहून कितीतरी अधिक गांभीर्याने आणि तपशीलवार विचार करणे आणि त्यानंतर ती इम्प्लिमेंट करणे अपेक्षित होते. हे त्यांना साठ वर्षांमध्ये करुन दाखवता आले नाही. जनतेच्या हिताचा विचार करुन झटपट निर्णय घेणे आणि ते राबवणे हेच सरकारला नेमून दिलेले काम आहे. ते काम त्यांनी केले नाही याबाबत त्यांची पाठराखण करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. भारतीय घटनेने तरी हे प्रथम कर्तव्य म्हणून मानलेले नाही. सर्व नागरिकांना एकच एक समान नागरी कायदा लागू करणे हे भारतीय घटनेने एक मार्गदर्शक तत्व अथवा ध्येय म्हणून स्वीकारलेले आहे. हिंदू कायद्यानुसार चुलत भावंडांचे विवाह अमान्य आहेत. पारशी लोकांनी हा नियम समान नागरी कायदा म्हणून का मान्य करावा? अमुक एक कायदा मी का मान्य करावा या म्हणण्याला काही अर्थ नाही. मला चोरी करणे मान्य आहे म्हणून कायद्यानेही ते मान्य करावे असेही कोणी म्हणेल. ते तुम्हाला मान्य आहे काय? हिंदू माणसाने चोरी केली की त्याला सहा महिने शिक्षा होते. मुसलमानाने केली की त्यालाही सहा महिने शिक्षा होते. धर्माधिष्ठित कायद्यानुसार जायचे झाले तर मुसलमान चोराचे हात तोडले पाहिजे कारण शरियत तसे सांगते. पण तसे प्रत्यक्षात होत नाही. शरियतचा ८०% भाग कायद्याने आधीच रद्द केला आहे. असे असताना २०% सोयीस्कर भाग तेवढा रिटेन करणे यात कोणता प्रामाणिकपणा आहे? हिंदूंना काय मान्य आहे, पार्शी लोकांना, हिरव्यांना, ख्रिस्ती लोकांना काय मान्य आहे अशा मान्यता घेत घेत फौजदारी कायदे बनवले गेले असते तर सगळीकडे अराजक माजले असते. फौजदारी कायदा सगळ्यांना समान पण नागरी कायदा मात्र वेगवेगळा याचे कारण काय ? हिंदूंचा कायदा सर्वांना लागू करणे म्हणजे समान नागरी कायदा असे मी म्हटलेले नाही. ही समजूत तुम्ही स्वतःच करुन घेतली आहे. समान नागरी कायद्याअन्वये हिंदू कायद्यातीलसुद्धा काही किंवा अनेक बाबी नष्ट होतील आणि अनेक नव्या बाबी ज्या हिंदू धर्माला मान्य नाहीत त्या लागूसुद्धा होउ शकतील. धर्माचे अस्तित्व पारलौकिक बाबींपुरते मर्यादित करणे आणि अधिकॄत, सरकारमान्य, कायदेशीर इहलौकिक बाबींसंदर्भात धर्माचे अस्तित्व समाप्त करणे याचा अर्थ सेक्युलॅरिझम हा आहे. असा सेक्युलॅरिझम जोवर कायद्याने कठोरपणे लागू होत नाही तोपर्यंत वेळोवेळी दंगली करुन मस्तवाल लोकांची नांगी मोडून टाकणे हेच आपले कर्तव्य होय असे बहुसंख्यांकांमधील काहींना वाटले तर ती बाब समर्थनीय नसली तरी निदान समजून घेण्याजोगी वाटली पाहिजे. नांगी मोडून टाकली की हे मस्तवाल खेकडे कसे सुतासारखे सरळ येतात याची अनेक उदाहरणे भूतकाळात आणि वर्तमानात पाहायला सापडतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 17:47
>>समान नागरी कायद्याअन्वये हिंदू कायद्यातीलसुद्धा काही किंवा अनेक बाबी नष्ट होतील आणि अनेक नव्या बाबी ज्या हिंदू धर्माला मान्य नाहीत त्या लागूसुद्धा होउ शकतील. या नव्या बाबी न्याय्य आहेत की अन्याय्य आहेत हे कसे ठरवणार? एकपत्नीत्व ही अशीच हिंदूकायद्यातील नवीन बाब होती. ती हिंदूंनी मागितली म्हणून झाली. तिसर्‍याच कोणी माऊंटबॅटन किंवा शेख अब्दुल्लाला वाटले म्हणून नाही झाली. मूळ हिंदू सिव्हिल कायद्याच्या मसुद्यात आणखीही काही गोष्टी होत्या त्या इम्प्लिमेंट झाल्या नाहीत कारण त्या नको अशी हिंदूंनी मागणी केली. अजूनही तुम्ही सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंवर कायदा लादला असेच समजून विधाने करीत आहात. समान नागरी कायदा हवा अशी मागणी सातत्याने करणार्‍यांनी आक्रस्ताळेपणा करून सारखे सारखे बहुपत्नित्वाचे तुणतुणे वाजवले नसते तर समान नागरी कायद्यावर व्यवहार्य चर्चा होऊही शकली असती. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे समान नागरी कायद्याला अनेक पैलू आहेत. त्याबाबत आजतागायत कोणताही संवाद करण्याचा (माझ्या माहितीनुसार) प्रयत्नही झालेला नाही. प्रयत्न झाला नाही याचे कारण समान नागरी कायद्याची भाषा करणार्‍यांनी त्यापलिकडे विचारच केलेला नसतो. (समांतर उदाहरण द्यायचे झाले तर भारत पाकिस्तान दरम्यान काश्मीर खेरीज अनेक मुद्दे आहेत. पण पाकिस्तान काश्मीर सोडून काही बोलतच नाही म्हणून गाडं अडूनच राहते). [बहुसंख्य मुसलमान खरोखरच चार बायका करतात असा मूर्ख विचार मिपावर कोणी करीत असतील असे वाटत नाही]

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 22:01
या नव्या बाबी न्याय्य आहेत की अन्याय्य आहेत हे कसे ठरवणार? एकपत्नीत्व ही अशीच हिंदूकायद्यातील नवीन बाब होती. ती हिंदूंनी मागितली म्हणून झाली. तिसर्‍याच कोणी माऊंटबॅटन किंवा शेख अब्दुल्लाला वाटले म्हणून नाही झाली. मूळ हिंदू सिव्हिल कायद्याच्या मसुद्यात आणखीही काही गोष्टी होत्या त्या इम्प्लिमेंट झाल्या नाहीत कारण त्या नको अशी हिंदूंनी मागणी केली. एक भारतीय नागरिक या नात्याने भारतातील विघातक धार्मिक प्रथा कायदेशीररीत्या बंद करण्याचा(मग ती कोणत्याही धर्मातली असूदे) कोणत्याही धर्माच्या नागरिकाला अधिकार आहे. हिंदूंच्या बहुपत्नीत्वाबद्दल बोलण्याचा किंवा त्याची मान्यता वैधानिक पद्धतीने रद्द करण्याचा अधिकार फक्त हिंदूंनाच होता असे नाही. तो अन्यधर्मीयांनाही होता. त्यांनी तो बजावला की नाही हा वेगळा मुद्दा आहे. हिंदूंच्या धर्मातील कायदेशीर बाबी हिंदूंनीच ठरवाव्यात, मुसलमानांच्या धर्मातील कायदेशीर बाबी मुसलमानांनीच ठरवाव्यात असा कुठलाही कायदा नाही. तुमच्याच मुळातल्या गॄहीतकात काहीतरी गल्लत झालेली दिसते. भारतामध्ये सगळ्या धर्मांना स्वातंत्र्य दिलेले नाही तर प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य दिलेले आहे. ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. अजूनही तुम्ही सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंवर कायदा लादला असेच समजून विधाने करीत आहात. समान नागरी कायदा हवा अशी मागणी सातत्याने करणार्‍यांनी आक्रस्ताळेपणा करून सारखे सारखे बहुपत्नित्वाचे तुणतुणे वाजवले नसते तर समान नागरी कायद्यावर व्यवहार्य चर्चा होऊही शकली असती. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे समान नागरी कायद्याला अनेक पैलू आहेत. त्याबाबत आजतागायत कोणताही संवाद करण्याचा (माझ्या माहितीनुसार) प्रयत्नही झालेला नाही. प्रयत्न झाला नाही याचे कारण समान नागरी कायद्याची भाषा करणार्‍यांनी त्यापलिकडे विचारच केलेला नसतो. सरकार ही कोणतीही बाह्य शक्ती नाही. ती सर्वधर्मीय भारतीय नागरिकांची अंतर्गत शक्ती आहे. जनजीवन चालवण्याचे सर्वाधिकार संविधानानेच या शक्तीला दिलेले आहेत. समान नागरी कायद्याची मागणी करणार्‍यांनी बहुपत्नीत्व हे एकच तुणतुणे वाजवले आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली नाही हे तुमचे म्हणणे मी वादापुरते गॄहीत धरतो(मी हे म्हणणे मान्य करत नाहीये वादापुरते गॄहीत धरतोय. ते मान्य करायचे की नाही याचा विचार तपशीलवार माहिती असेल तरच करता येईल.). असे जरी असले तरी या निमित्ताने का होईना त्यांनी या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न तरी केला. पण मग निरोगी आणि चांगली चर्चा व्हावी या उद्देशाने सरकारने या पैलूंना वाचा का फोडली नाही. त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्ही करत आहात तसा आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांच्याजवळ राहिला असता. पहिल्यापासून आत्तापर्यंत सरकारने हा विषय भिजत ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. बहुसंख्य मुसलमान खरोखरच चार बायका करतात असा मूर्ख विचार मिपावर कोणी करीत असतील असे वाटत नाही याबाबतची आकडेवार मला ठाउक नाही. पण अपार्ट फ्रॉम आकडेवारी, मला हे विचारायचं आहे की बहुसंख्य नागरिक खून करत नाहीत म्हणून खून करणे कायद्याने मान्य करावे काय? हा सगळा वाद जरी बाजूला ठेवला तरी समान नागरी कायद्याच्या निमित्ताने का होईना बहुपत्नीत्व रद्द करण्याची मागणी हे तुम्हाला तुणतुणे वाटते म्हणजे कमाल झाली. तुम्हाआम्हाला चर्चा करणे खूप सोपे आहे पण आज अनेक भारतीय मुसलमान स्त्रियांना स्वतःचा पती आपापसांत वाटून घ्यावा लागतो ही बाबच माणुसकीला, भारतीय सरकारला, भारतीयत्वाला काळिमा फासणारी गोष्ट आहे. मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून त्यांच्यावर कायदा लादणे तुम्हाला मान्य नाही. पण धार्मिक रुढीच्या आधारे हजारो,लाखो स्त्रियांचे आयुष्य निराशेच्या,गुलामीच्या अंधारात ढकलून देणे तुम्हाला मान्य आहे. तुम्ही सेक्युलर नाही तुम्ही मुस्लिम मूलतत्ववादी आहात.

In reply to by अप्पा जोगळेकर

नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 22:39
बहुपत्नित्व बंद व्हावे असे मला पण वाटते. मुसलमानांचं माहिती नाही पण समान नागरी कायदा म्हणून मला काय नियम लागू होणार याबाबत मी सुद्धा चिंतित आहे. कारण काय योग्य हे कोणीतरी ठरवू पहात आहे आणि तेच योग्य आहे असे मला दरडावून सांगू पहात आहे. >>मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून त्यांच्यावर कायदा लादणे तुम्हाला मान्य नाही धार्मिक भावना दुखावतील म्हणुन नव्हे. तुमचे नियम त्यांना लावू पहात आहात म्हणून. हिंदू पुरोगामी म्हणून फार टिमक्या वाजवू नका. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्यात महिलांना मालमत्तेत हक्क दिले गेले नव्हते. ते मिळायला २००७ (चूभूदेघे) साल उजाडले. >>तुम्ही सेक्युलर नाही तुम्ही मुस्लिम मूलतत्ववादी आहात कम्युनिस्ट लोकांमध्ये विरोध करणार्‍याला अशी 'भांडवलशहांचा हस्तक' वगैरे विशेषणे लावण्याची पद्धत असते. आता आपण त्याच त्याच गोष्टी लिहित आहोत. तेव्हा पुरे.

In reply to by नितिन थत्ते

Pain Wed, 09/22/2010 - 23:36
बहुपत्नित्व बंद व्हावे असे मला पण वाटते. मग तसे करणे म्हणजे मुस्लिम धर्मात हस्तक्षेप असा बागुलबुवा का दाखवत आहात ? धार्मिक भावना दुखावतील म्हणुन नव्हे. तुमचे नियम त्यांना लावू पहात आहात म्हणून. माणूसकी जपण्यासाठी केलेल्या नियमांना "तुमचे (हिंदूंचे)" असे सांगून मुस्लिमांना ते लावणे अन्यायकारक असल्याचा टाहो तुम्ही फोडत आहात. यावरून तुम्ही मुस्लिमधार्जिणे असल्याचे सिद्ध होते. मुसलमानांचं माहिती नाही पण समान नागरी कायदा म्हणून मला काय नियम लागू होणार याबाबत मी सुद्धा चिंतित आहे. कारण काय योग्य हे कोणीतरी ठरवू पहात आहे आणि तेच योग्य आहे असे मला दरडावून सांगू पहात आहे. बहुपत्नीत्वासारख्या गोष्टी अयोग्य आहेत आणि सर्वांनी बंद केल्या पाहिजेत हे सभ्यपणे सांगून समजत नसेल तर दुसरे काय करणार ? कोण सांगते, कसे सांगते याला नाही तर काय सांगते याला महत्त्व असते. हिंदू पुरोगामी म्हणून फार टिमक्या वाजवू नका. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्यात महिलांना मालमत्तेत हक्क दिले गेले नव्हते. ते मिळायला २००७ (चूभूदेघे) साल उजाडले. आत्ता ज्या दोन धर्मांविषयी बोलणे चालू आहे, त्यात हिंदू धर्मच अग्रेसर आहे; मोठ्या फरकाने. तुम्हाला ११० मान्य नसेल तर वाद घालू नका. कम्युनिस्ट लोकांमध्ये विरोध करणार्‍याला अशी 'भांडवलशहांचा हस्तक' वगैरे विशेषणे लावण्याची पद्धत असते. आता आपण त्याच त्याच गोष्टी लिहित आहोत. तेव्हा पुरे. तुम्ही मांडलेला मुद्दा आणि तुमचे आक्षेप, त्यांना अप्पा जोगळेकरांनी उत्तर दिले आहे. तुम्ही ते खोडून न काढता किंवा त्यावर काही न बोलता जे तुमच्या पहिल्या प्रतिसादात होते, तेच पुन्हा पुन्हा लिहित आहात. पुरे केलेत हे चांगलेच. या चर्चेवरून असे दिसते की तुम्ही उगाचच्या उगाच लोकांचा बुद्धीभेद करत आहात.

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Fri, 09/24/2010 - 08:54
कारण काय योग्य हे कोणीतरी ठरवू पहात आहे आणि तेच योग्य आहे असे मला दरडावून सांगू पहात आहे. ज्याला तुम्ही कोणीतरी म्हणताहात त्याला मी भारतीय संविधान असे म्हणतो आहे. भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटना मान्य असणे अपेक्षित आहे आणि ही गोष्ट ऑप्शनल नाही, मँडेटरी आहे. संविधान कोणाच्याही मान्यतेसाठी अडून बसलेले नाही. ते सार्वभौम असून त्याने स्वतःच्या आणि नागरिकांच्या मर्यादा आखून ठेवल्या आहेत. या मर्यादा संविधानाने दरडावून सांगितलेल्या आहेत आणि हे दरडावणे मी माझ्या अल्पमतीप्रमाणे तुम्हाला समजावून सांगितले . ( संविधानाच्या दरडावण्याला कोणी विचारत नाही ह्च दु:खाची गोष्ट आहे.) हिंदू पुरोगामी म्हणून फार टिमक्या वाजवू नका. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्यात महिलांना मालमत्तेत हक्क दिले गेले नव्हते. ते मिळायला २००७ (चूभूदेघे) साल उजाडले. हिंदू धर्माच्या मर्यादा मला ठाउक आहेत. माझ्या 'हिंदू धर्म्,वर्णव्यवस्था वगैरे वगैरे' या लेखात या मर्यादा स्पष्ट करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. त्यावर तुम्ही 'उपक्रम' वर काहीशी अनुकूल प्रतिक्रिया दिलीत कारण त्यामध्ये हिंदू परंपरांवर टीका केली होती. बहुधा 'हिंदू' या शब्दाने तुमचा पोटशूळ उठतो. जर या लेखात मी हिरव्या धर्मावर टीका केली असती तर तुम्ही आत्तासारखेच इर्ष्येने भांडला असतात. आता आपण त्याच त्याच गोष्टी लिहित आहोत. तेव्हा पुरे. तुम्ही पांढरे निशाण फडकवलेच आहे तर मीदेखील युद्धविराम घोषित करतो. या प्रतिसादाला उत्तर देउन तुम्ही 'जितं मया' चे समाधान मिळवू शकता. कारण हा माझा या संदर्भातील शेवटचा प्रतिसाद आहे. स्वतःकडे कमीपणा घेउन दुसर्‍याचे मन न दुखावणे ही आमची हिंदू परंपराच आहे. अवांतर - १. एका बेसलेस मुद्द्याचे तुम्ही ज्या जोरकसपणाने समर्थन केलेत त्यावरुन तुमचे वादपटुत्व आणि हुशारी जबरदस्त असणार याबाबत माझ्या मनात तरी कोणतीही शंका उरलेली नाही. ही काँम्प्लिमेंट उपहासात्मक नाही हे नमूद करणे मी आवश्यक समजतो. २.स्वतःचा एखादे मत चुकीचे असेल हे नंतर लक्षात आले तर ते बदलून घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. फार मोठमोठ्या माणसांना आपल्या विचारांची पूर्ण दिशाच आयुष्याच्या उत्तरार्धात बदलावी लागली आहे. जसे - महात्मा गांधी. आपण सगळे तर खूपच छोटी माणसे आहोत. त्यामुळे मनाचा प्रांजळपणा दाखवण्यात कोणताही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. असे नरहर कुरुंदकर म्हणंत असत.

In reply to by अप्पा जोगळेकर

चिंतामणी Wed, 09/22/2010 - 17:27
अब्दुल कलाम, हुसेन दलवाई, इरफान पठाण, सलीम खान अशा कितीतरी मुसलमानांची नावे या सहिष्णू आणि राष्ट्रीय वॄत्तीच्या व्यक्तींच्या यादीत घालता येतील. या यादीत मी छोटिशी पण महत्वाची भर घालू इच्छितो. १९६५च्या युध्दात अतुलनीय प्रराक्रम करून शहीद झालेला शूर विर अब्दुल हमीद. त्याल मरणोत्तर "परमविर" चक्र देउन गौरविण्यात आले.

In reply to by नितिन थत्ते

Pain Mon, 09/20/2010 - 01:12
तरीही हे दोन्ही कायदे सर्व हिंदूंना समान नियमांत बांधत नाहीत. तर बहुतेक जातीजमातींना त्यांच्या रूढीप्रमाणे विवाह करण्याची वेगवेगळ्या पद्धातीने विवाह केल्यास काय फरक पडतो ? विवाहानंतर आत्ताच्या समाजमान्य पद्धतीप्रमाणे हक्क आणि जबाबदार्‍या असल्या की झाले. आसाम व बंगाल येथील हिंदूंमध्ये जीमूतवाहनाच्या दायभाग पद्धतीप्रमाणे वारस ठरतात तर उर्वरित भारतातील हिंदूंमध्ये विज्ञानेश्वराच्या मिताक्षरा पद्धतीनुसार वारस ठरतात. याचा अर्थ कळला नाही. विवाह झाला की नाही हे ठरवण्याचे निकषही वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळे आहेत. उदाहरण देता का ? चित्रपट प्रमाण मानता येणार नाहीत पण त्यातही हिंदूंच्या लग्नासाठी एकच विधी दाखवतात. मराठी, गुजराती, पंजाबी यात थोडाफार फरक आहे पाण माळ घालणे, सप्तपदी वगैरे गोष्टी समानच आहेत.

In reply to by नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर Sat, 09/18/2010 - 10:50
मुसलमानांच्या बाजूने बोलले म्हणजे सेक्युलॅरिझम सिद्ध होतो असे समजू नये. धर्माचे स्थान पारलौकिक बाबींपुरते मर्यादित करणे म्हणजे सेक्युलॅरिझम होय आणि इहलौकिक बाबींना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक अडचणी लक्षात घेउन सामोरे जाणे म्हणजे सेक्युलॅरिझम होय. . प्रतिसाद संपादित. वैयक्तिक टिपण्या करू नयेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

गणपा Sat, 09/18/2010 - 15:11
मुसलमान लोकांचा कळवळा आहे वा मी फार सेक्युलर आहे अशातलीही गोष्ट नाही. पण इथले आपले काही मित्र इतकी टोकाची उदाहरण देतायत की तीच उदाहरण जणुकाही आपल्या लोकांत (हिंदुत) दिसतच नाहीत. जरा आधी डोळे उघडुन अजुबाजुला पहाच. अशी अनेक उदाहरण दिसतील. आता मी ही थत्ते काकां सारख म्हणतो की बरीच नवी माहीती समजली.

In reply to by गणपा

मस्त कलंदर Sat, 09/18/2010 - 15:45
थत्ते काकांनी माझ्या प्रतिसादातली काही वाक्ये उचलली आहेत म्हणून पुन्हा इथे प्रतिसाद देतेय. माझा प्रतिसाद हे पैसातैंच्या मुस्लिमांच्या अस्वच्छपणाला उप-प्रतिसाद होता, त्यामुळेही आणि वेळेअभावीही फक्त मी माझा शेजार्‍यांबद्दलचा अनुभव लिहिला होता. १. कुणाच्या घरात किती माणसे असावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मग एवढ्या सगळ्या लोकांमुळे तयार होणार्‍या कचर्‍याचे व्यवस्थापन करावे ना मग. कसाही खिडक्यांमधून फेकून इतरांना का त्याचा त्रास? २. त्या शेजार्‍यांनी सोसायटीच्या आवारात बकरे बांधून आणखी कचरा केला. आणि ते दांडगे बकरे दरवाजाला धडका देत गेले. तेव्हा त्यांनी शिंगे मारून माझा दरवाजा खराब केला नाही, हे माझेच नशीब. या गोष्टी सोयीस्कररित्या दुर्लक्षिलेला दिसतोय. ३. माझ्या गावी आमच्या गल्लीच्या शेजारीच मुस्लिम मोहल्ला आहे. रोज सकाळी ५:३० ची अजान ऐकली की वाटते, "चला, अजून रात्र बाकी आहे. दोन-तीन तास आणखी लोळायला हरकत नाही". तिथल्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत. पण जेव्हा तो शेजार शेजारच्या गल्लीतून अगदीच शेजारी आल्यावर त्रास झाला, तोच इथे मी मांडला. जर ती नवीन माहिती असेल तर छानच. कुणी कुठे राहावे आणि कुणी कुणाला घर विकावे हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न. सगळेच मुस्लिम असे घाणेरडे नसतीलही. त्यामुळे त्याबद्दल भाष्य मी आधीही केले नव्हते आणि आताही करत नाही. आणि हो, मी राहात असलेल्या परिसरात मुस्लिमांना घरे न विकले जाण्याचे कारण वेगळे आहे. असो.

In reply to by मस्त कलंदर

पैसा Sat, 09/18/2010 - 17:44
पण फ्लॅटस असलेल्या सोसायटीत बकरे कशासाठी? ते जर घरात मारण्यासाठी आणले असतील तर ती नक्कीच वाईट गोष्ट आहे. मला वाटतं तसे करणे हा कायद्यानेही गुन्हा असावा.

In reply to by पैसा

चित्रा गुरुवार, 09/23/2010 - 04:44
ते सार्वजनिक स्वच्छतेचे आहेत. लहानपणी माझ्या मुस्लिम मैत्रिणीच्या घरी गेले असताना थेट ओट्यावरच कापून ठेवलेले मांस पाहून मलाही विचित्र वाटले होते, पण मैत्री चांगलीच असल्याने ते विसरूनही गेले आज ते या सर्व चर्चेमुळे आठवले. पण अमेरिकेत आल्यानंतर पाहिले की बायका थेट संगमरवरी ओट्यावरच पोळ्या लाटतात. आता यासाठी पोळपाट का घेत नाहीत, टीव्ही वर - फूड नेटवर्कवर पाहिलेले कुक तसे करताना दिसतात म्हणून करत असावेत असा मी समज करून घेतला. माणूस जे बघतो तसे साधारणतः त्याचे वागणे होते. बकरे आणून घरात कापणे हे आपल्याला रुचणार नाही पण जिवंत खेकडे/चिंबोर्‍या हिंदूही घरी खायला आणत असतात. त्यात मुसलमान अधिक वाकबगार, म्हणून त्यांना आपण यात काही गैर करतो आहोत हे वाटत नसावे. गैर आहे का नाही, हे आपल्याकडच्या कायद्यांप्रमाणे पाहिले पाहिजे. वन बीएचके मध्ये मुंबईला सायनच्या भागात राहणारी कित्येक गुजराती/जैन व्यावसायिक कुटुंबे एकत्र दोन तीन पिढ्या (आईवडिल, तीनचार भाऊ, त्यांची प्रत्येकी एक किंवा दोन मुले) राहतात. त्यांना घरात आल्याआल्या पार्टिशने करणे, गॅलरीची बेडरूम करणे, असे करण्याशिवाय पर्यायच नसतो. हे मी ९० च्या दशकातील सांगते आहे. आता कदाचित थोडे काही बदलले असेल, फार बदलले असले तर मला कल्पना नाही. गुजराती हे केवळ अनेक होते म्हणून त्यांचे नाव घेतले आहे, कोकणातून आलेले मराठी देखील असे करत असतीलच. हे लोक भरपूर पैसा असलेले होते, प्रत्येकाच्या गाड्या असत, त्या रोज गाड्या धुवत, त्यासाठी सोसायटीचा गुरखा वापरत. आमच्या गाडीला बाहेर जाण्यासाठी हमखास वाट नसे. सकाळच्या वेळी त्यांना झोपेतून उठवावे लागत असे, की बाबारे, आमची गाडी बाहेर काढायची आहे, त्यासाठी तुझी गाडी आधी बाहेर काढ. मग अशा लोकांचे काय करायचे? त्यांना हे 'गुज्जु", हे "हिंदू" असेच वागणार, असे म्हणायचे का? का हे प्रॉब्लेम जास्त "जनरल" स्वरूपाचे आहेत? त्यात ते हिंदू म्हणून असे करतात पेक्षा त्यांना कसे वागायचे कळत नाही असे म्हणणे योग्य आहे? कचरा वरून खाली टाकणे ही मुस्लिमांची नाही, तर भारतीयांची खोड आहे. मी लहानपणी अशा ठिकाणी वाढले आहे जिथे निदान २०% जनता मुस्लिम होती, बाकीची गरीब हिंदू होती. दोन्ही वस्त्यांमध्ये खाणे पिणे यातील फरक सोडले तर राहण्यात फार काही वेगळेपणा होता असे नाही.

वेताळ Fri, 09/17/2010 - 10:54
हिंदु जन्माला येतानाच रिसाईकल पॅक एक्ट्रा घेवुन जन्माला येतात. जेवायला त्याना गोळ्या लागतात व बाहेर टाकताना ते फक्त गॅसेस सोडतात. त्यामुळे कचर्‍याची शक्यता नाहीच. जैनांच्या व गुजरमारवाड्याच्या बिंल्डींगमध्ये मिश्राहारी हिंदुना कशी वागणूक दिली जाते ह्याबद्दल कोणी हिंदु भाष्य करेल काय?

In reply to by गांधीवादी

राजेश घासकडवी Fri, 09/17/2010 - 11:28
मिपावर सभ्य शब्दांत खेळीमेळीने चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. तुम्ही लिहिलेल्यांसारखे हीन शब्द वाचले की आपण सभ्य, सुसंस्कृत माणसांमध्ये वावरत नसून असंस्कृत, दारू पिऊन बरळणाऱ्या लोकांचं बेलगाम बरळणं ऐकतो आहोत असं वाटतं. मग तोंडात असल्या कटू विचारांची कडवट चव राहाते. मिपाच्या प्रत्येक पानावर ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा फोटो दिसतो. आत्ता तर बाजूला गणपतीचाही फोटो आहे. तेव्हा आमच्यासाठी नाही तरी त्यांना पाहून तरी सबुरीने घ्या एवढीच विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

छोटा डॉन Fri, 09/17/2010 - 11:30
मिपावर सभ्य शब्दांत खेळीमेळीने चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. तुम्ही लिहिलेल्यांसारखे हीन शब्द वाचले की आपण सभ्य, सुसंस्कृत माणसांमध्ये वावरत नसून असंस्कृत, दारू पिऊन बरळणाऱ्या लोकांचं बेलगाम बरळणं ऐकतो आहोत असं वाटतं. मग तोंडात असल्या कटू विचारांची कडवट चव राहाते. मिपाच्या प्रत्येक पानावर ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा फोटो दिसतो. आत्ता तर बाजूला गणपतीचाही फोटो आहे. तेव्हा आमच्यासाठी नाही तरी त्यांना पाहून तरी सबुरीने घ्या एवढीच विनंती.
+१, अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही. बाकी चालु द्यात.

In reply to by छोटा डॉन

सहज Fri, 09/17/2010 - 11:37
गांधीवादी यांनी संयमीत शब्दात आपले म्हणणे मांडावे. प्रतिसाद प्रकाशित करा कळ दाबण्या अगोदर पुन्हा पुन्हा वाचुन शक्य तेवढे आक्षेपार्ह शब्द वगळायचा प्रयत्न करावा.

In reply to by छोटा डॉन

आमोद शिंदे Sun, 09/19/2010 - 20:49
गांधीवादी ह्या आयडीने आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे समाजतल्या विकृतींचे ओंगळवाणे प्रदर्शन होते. योग्य संपादन!

In reply to by आमोद शिंदे

गांधीवादी Mon, 09/20/2010 - 10:39
जीवनाची पहिली १५ वर्षे मंगळवार पेठ झोपडपट्टीत, नंतरची वर्षे कासेवाडीत घालविली आहेत. असल्या माणसाकडून तुम्हाला समाजतल्या विकृतींचे ओंगळवाणे दर्शन होणार नाही तर काय निसर्गरम्य कथा, कविता वाचायला मिळतील काय. आयुष्यात जेवढ्या वेळा बगीच्यात गेलो तेवढ्या वेळा तिथले कारकून लोक माझा (आणि मित्रांचा) अवतार बघून हाकलून देत असत. मी काय इथे बालगीते गाऊ काय ? नशिबाने आज ४ पैसे कमावून एका खोक्यात इंटरनेट वापरायला मिळत आहे. माझ्या व्यथा इथे मांडल्या तर तुम्हाला लगेच वास येतो का राव ? आम्ही दुनियेची गटार गंगा अंगावर सहन केलेली आहे (करत आहे) तुम्हाला वास सुद्धा सहन होत नाही. इथले वर्णन लिहून पाठवू का, कि मंगळवार पेठेतील एक दिवस हि गोष्ट सांगू ? कि अश्या माणसांनी इथे येऊन आपले म्हणणे मांडूच नये कि काय ? असे असाल तर सांगा राव. मला माहित आहे इथले हजारो लोक शिव्या घालत असतील, पण त्यांनी एकदा तरी ते आयुष्य जगून बघावे, जे इथल्या लाखो लोकांच्या नशिबाला येते. मग खुशाल उचलावी जीभ आणि लावावी टाळ्याला. इथल्या खूप (परदेशी) मंडळींनाजग जे दिसत असेल ते जग आम्ही कधी पहिलेच नाही, तर कसे गुण गाऊ त्या जगाचे सांगा ?

In reply to by गांधीवादी

वेताळ Tue, 09/21/2010 - 09:53
तुमच्या मनातील कडवटपणा असणे स्वाभाविक आहे पण त्याची भडास एकाद्या समुदायावर काढणे चुकीचे आहे.गांधीवादी ह्या आयडी कडुन सहिष्णु आणि मानवतावादी लिखाणाची अपेक्षा होती. तिला एकदम तुमच्या हिंसक व जहाल भुमिकेमुळे छेद गेला. त्यामुळे आम्ही मिपाकर बावचळुन गेलो आहे.

In reply to by वेताळ

गांधीवादी Tue, 09/21/2010 - 11:22
एकाद्या समुदायावर नाही, दोन(च) समुदायावर, एक पांढरे दहशतवादी, आणि काही धर्मवेडे. धर्मवेडे का ? इथेच, ह्याच व्यासपीठावर पुनर्लेखनाच्या नावाखाली देवी, देवतांवर मागे इतकी चिखल फेक झाली, किती जणांना , किती जणांनी लगेच 'तुझा contact दे' म्हणून धमकावले ? >>त्याची भडास काढणे चुकीचे आहे कोण भडास काढतंय ? भडास काढतोय असे तुम्हाला वाटते. मला नाही. >>आम्ही मिपाकर तुम्ही मिपाकर, मग आम्ही कोण ? बरं 'आम्ही मिपाकर' म्हणजे तरी नक्की कोण कोण ? >>बावचळुन गेलो आहे. नाव घेऊन लिहिले तर बावचळून जाता, स्वताला गांधीवादी म्हून घेऊन एकशे एक अराजकीय कृत्ये करणारे बघून मी पण बावचळून गेलो आहे. त्याचंही कृत्ये संपादित करणारा संपादक शोधात आहे.

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादी Sat, 09/18/2010 - 07:40
राजेश साहेब, हे असले देवी देवतांचे आवाहन करू नका हो , अगदी एक अक्षम्य अपराध केल्या सारखे वाटते. जे शब्द तुम्हाला, मिपाला हीन वाटले तेच शब्द जसेच्या तसे, बर्याच ठिकाणी उघडपणे सर्रास वापरण्यात येतात. तेच तुम्हाला हीन वाटले त्यात मी खरतर काही करू शकत नाही. बाकी त्यात शब्दन मध्ये मी जे नमूद केले होते ते सत्यच आहे. हे तुम्ही देखील नाकारू शकत नाही. लहान मुलांवर , स्त्रियांवर होणारे अत्याचार हे स्वतः डोळ्याने पाहत आलेलो आहे. आणि हो मनावर खूप नियंत्रण आहे. आणि त्यामुळेच हे सगळे बघून सुद्धा अनेक त्या विशिष्ट जमातीतले अनेक मित्र देखील आहेत. >>तुम्ही लिहिलेल्यांसारखे हीन शब्द वाचले की आपण सभ्य, सुसंस्कृत माणसांमध्ये वावरत नसून असंस्कृत, दारू पिऊन बरळणाऱ्या लोकांचं बेलगाम बरळणं ऐकतो आहोत असं वाटतं. मी तरी अजून पर्यंत जाणून बुजून कोणाचा अपमान केलेला नाही. व अशी विधाने केलेली नाही. आपल्याला कशी आढळून आली देव जाने. मी जे मांडतो ते बर्याच जनाच्या मनात असते, फक्त ते पांढर पेश्या लोकांच्या कानाला तिखट वाटते, एवढाच. ना आवडतीचे मीठ पण आळणी लागते, नीट बघा, तसेच काही तरी असेल, भारत सरकारने त्यांना दिलेली अवाजवी सूट ह्याबद्दल कोणीच काही बोलत नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. >>मिपावर सभ्य शब्दांत खेळीमेळीने चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. आपल्याला केवळ मिपावर हे अपेक्षित आहे हे बघून आनंद कमी दुख: जास्त झाले, आम्हाला हे ह्या विश्वात अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील करतो, एखाद विशिष्ट जमातीतल्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न देखील केला कि तुमच्या जमातीतले क्रूर कायदे बंद करा म्हणून, पण पालथ्या गाड्यावर पाणी. लहान पोरे ओरडताना तुम्ही कधी पहिले आहे का ? खाटिक पण बरे असे म्हणण्याची वेळ येते.

In reply to by गांधीवादी

राजेश घासकडवी Sat, 09/18/2010 - 10:17
हीन शब्द वापरण्याचं अश्लाघ्य वर्तन काही ठिकाणी होतं म्हणून ते मिपावरही चालून गेलं पाहिजे हा तर्क कळला नाही. या प्रतिसादात एकही हीन शब्द न वापरल्याबद्दल धन्यवाद. असंच लिहीत राहा. या विषयावर मला अधिक चर्चा करायची इच्छा नाही.

विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 11:18
जैनांच्या व गुजरमारवाड्याच्या बिंल्डींगमध्ये सरसकट गुजरमारवाडी हा शब्द वापरून नये ही विनन्ती अवांतरः सरसकट मराठी भाषीकाला घाटी म्हंटले तर ते बरोबर होईल का?

In reply to by विजुभाऊ

मृत्युन्जय Fri, 09/17/2010 - 12:37
सरसकट मराठी भाषीकाला घाटी म्हंटले तर ते बरोबर होईल का? विजुभै मला या वाक्याचा अर्थ खरोखर कळला नाही. जर हीन अर्थानेच वापरायचा असेल तर कुठल्याच मराठी भाषिकासाठी हा वापरला जाउ नये असे नाही का वाटत?

In reply to by नगरीनिरंजन

"हीन अर्थ..." तसे पाहिले तर 'घाटी' हा राज्याचा एक विशिष्ट सरळस्वच्छ असा भाग निदर्शक शब्द आहे. सह्याद्रीच्या कडेकपार्‍यात राहणारा 'देशी' माणूस. याला 'घाटवळ' असे इथे येणारे प्रवासी म्हणत. पण का कोण जाणे या घाटवळाला त्याच्या अडाणी राहण्यामुळे शिकल्यासवरलेल्यांनी नेहमी हीनतेचीच वागणूक दिली होती आणि साहजिकच कालौघात ती केमिस्ट्री 'घाटावर राहणारा माणूस म्हणजे अडाणीच' अशीच झाली व पुढे एकप्रकारे हे समीकरणच बनले....मग त्या स्थितीचे नामात रूपांतर झाले 'घाटी = अडाणी' इतपतच हीन दर्जा. [मानण्यावर आहे खरं तर....अडाणी म्हणजे 'वाचता लिहिता न येणारा' असा अर्थ आहे. विपरित परिस्थितीत अडाणी एखाद्या पंडितापेक्षा विलक्षण बुद्धी दाखवू शकतो..] इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

नगरीनिरंजन Sat, 09/18/2010 - 08:33
धन्यवाद इंद्रराज. कालौघात त्या शब्दाला असा अर्थ प्राप्त झाला हे समजले. पण आता लोक अडाणी राहिलेले नाहीत त्यामुळे पुन्हा कालौघात त्या शब्दाचा हीन अर्थ जावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.

In reply to by नगरीनिरंजन

"हीन अर्थ जावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत." ~~ बरोबर आहे, निरंजन. अमेरिका आणि युरोपच्या बर्‍याच देशात एकजात आफ्रिकन वंशाच्या लोकांना 'नीग्रो' असे नामाधिमान होते. युरोपच्या इतिहासाची १५/१६ व्या शतकातील पाने चाळली तर दिसून येईल की, स्पेन आणि पोर्तुगिजांना (जे नामवंत असे दर्यावर्दी होते त्या काळात..) त्यांच्याकडील हबशी गुलामांसाठी सामुदायिकपणे (कलेक्टिव्हली) बोलाविण्याचे नीग्रो हे 'नाम' होते. 'नीग्रो' हा मूळचा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ 'काळा' [तसेच 'अंधार'] असा आहे. बदलत्या काळानुसार पुढे ज्यावेळी हे 'गुलाम' समुद्रीसाहसे सोडून पोटापाण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत स्थलांतरीत होऊ लागले त्यावेळी त्यांच्याबरोबर 'नीग्रो' हे नावही मागे जावून चिकटले. सुरूवातीच्या काळात गोर्‍यांनी यांचा आपापल्या राष्ट्रात 'गुलाम' म्हणूनच उपयोग केला. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच [शिक्षणामुळे, तसेच सामाजिक स्तरावरील अन्यायाप्रती चिडीने...] नीग्रो समुदायात चांगलीच जागृती आणि प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि त्यांनी एकजुटीने अमेरिकेत ['केकेके' च्या विरोधाला तोंड देवून] 'नीग्रो' शब्दाच्या वापरावर बंदी आणण्यासाठी जोमाने प्रयत्न केले आणि शेवटी तिथे कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन अमेरिकेतील आफ्रिकन वंशाच्या समाजाला नीग्रो असे न संबोधता 'ब्लॅक' असे म्हटले गेले. पुढेतर काही नेत्यांनी 'ब्लॅक' च्या ऐवजी 'कलर्ड पीपल' असा बदल सुचविला आणि सद्या या लोकांचा असाच तिथे उल्लेख केला जातो. ही आहे एकजुटीची लक्षणे आणि हीनतेविरूध्दचा विजय. इथे महाराष्ट्राच्या त्या 'घाटी' लोकांना प्रथम आपला असा झालेला उल्लेख "हीन दर्जाचा" आहे असे वाटणे महत्वाचे आहे. जे घाणेरडे हिंदी चित्रपट आणि त्यापेक्षा गटारात फेकून द्यायच्या हिंदी मालिका आमची 'मराठी माणूस' मिटक्या चाटत पाहतो त्या प्रत्येकात घरातील नोकर आणि कामवाली "बाई" ही जाणीवपूर्वक 'महाराष्ट्रीयन'च दाखविली जाते. 'अरे ! वो कामवाली बाई आज नही आई..." असे ती दहा किलोचे रोंगण तोंडाला फासलेली नायिका किंवा तिची त्यापेक्षा एक किलो जादा रंगलेली मम्मी म्हणते, त्याचवेळी नऊवारी लुगडे नेसलेली लगबगीने आत प्रवेश करणारी 'घाटण' दाखवायची आणि तिच्या तोंडून ते टिपिकल हिन्दी-मराठी हेल..."ऐसा क्या बोल्ते ओ बाईसाब...ये क्या मै आयीच अब्बी..!" मराठी चित्रपटसृष्टीत 'राजा' सारखे स्थान आणि लोकप्रियता मिळविणारे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ज्यावेळी हिंदी चित्रपटातील स्वयंपाक्याची, ड्रायव्हरची, फालतु नायिकेच्या येड्या मामाची, नायकाच्या उल्लू मित्राची कामे आनंदाने स्वीकारतात आणि जाणीवपूर्वक 'घाटी' ला हीनत्व आणतात, त्यावेळी इतरांकडून काय अपेक्षा करायची? पैशापुढे शून्य आहेत बाकीच्या गोष्टी यांना. कितीजणांना खटकते हे डिस्क्रिमिनेशन ? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

नगरीनिरंजन Sat, 09/18/2010 - 09:31
अतिशय सहमत आहे. नोकर नेहमी मराठीच दाखवला/ली जातो/ते याचा मला भयंकर राग येतो. एका मालिकेतला एक प्रसंग चुकून पाहण्यात आला आणि माझ्या अंगाचा भयंकर तिळपापड झालेला मला अजूनही आठवतोय. त्या प्रसंगात एक उच्चभ्रू लोकांची कॉश्च्यूम पार्टी दाखवली होती. सगळे लोक चान चान वस्त्रं नेसून आलेले वगैरे आणि त्या पार्टीत एक घरंदाज आणि कुलीन अशी स्त्री (रोहिणी हट्टंगडी) नऊवारी पातळ नेसून आणि दागिन्यांनी मढून जाते, तर त्या यजमानीण बाई आणि त्यांची चौकडी तिची नोकरांचा वेष करून आली म्हणून टिंगल आणि अपमान करतात असं दाखवलं. पण या वृत्तीमागे त्या (म्हणजे उत्तरेतल्या) लोकांचा न्यूनगंडच आहे असा मला दाट संशय आहे. मोगलांनाच आपले राजे समजणार्‍या त्या गुलामांची मराठ्यांनी केलेली ससेहोलपट पिढ्या न पिढ्या त्यांच्या अंतर्मनात आकस निर्माण करत आली असावी असं मला वाटतं. त्यातूनच मराठे म्हणजे लुटारू, असंस्कृत असं पसरवायला सुरुवात झाली असावी. अर्थात हे हळू हळू का होईना बदलतं आहे. कलाकारांचंच उदाहरण घ्यायचं तर श्रेयस तळपदे, अतुल कुलकर्णी आणि रितेश देशमुख सारखे लोक आता मुख्य भूमिकांमध्ये दिसू लागलेत. आशुतोष गोवारीकरसारखे दिग्दर्शक चांगलं नाव मिळवून आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

सहज Sat, 09/18/2010 - 09:57
पूर्वग्रह असणे व पुन्हा तश्या भुमीका केल्याने बसणारा शिक्का यावर एका मुस्लीम अभिनेत्याचे भाष्य सात मिनिटे २० सेकंदानी पहा. अर्थात संपूर्ण क्लीप विनोदी आहे. लुटा लुत्फ!

In reply to by इन्द्र्राज पवार

अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 10:30
इन्द्रराज पवार ++. प्रांतभेद नको म्हणणारे कुठे बसलेत तोंड लपवून? फाटली की काय आता ? त्यांनी आता उत्तर दिले पाहिजे.

हुप्प्या Fri, 09/17/2010 - 11:20
मला वाटते की असे होऊ नये. घरमालकाची भूमिकाही समजू शकतो. समजा कुणी अतिरेकी निघालाच तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागायचा. अगदी सुशिक्षित, नोकरीदार, कुटुंबवत्सल वाटणारा मुसलमान अतिरेकी निघू शकतो. पण यामुळे मध्यममार्गी मुस्लिम उरलेल्या समाजात पुरेसा मिसळू शकत नाही. एक आपल्याच लोकांचे कोंडाळे करुन ते रहातात. मग त्यात समाजसुधारणा, अन्य गटांशी तुलना वगैरे होत नाही. मुस्लिम बायकांना आपल्या दुय्यम स्थानाची कल्पना येत नाही. त्यामुळे त्यांचे धर्मांधपण अधिकच वाढते. बहुतांश मुस्लिम स्थानिक भाषा न बोलता मोडकी तोडकी उर्दू बोलतात. पण एकंदरीत हे विभक्तपण समाजाच्या हिताचे नाही.

In reply to by हुप्प्या

चिरोटा Fri, 09/17/2010 - 11:44
पण एकंदरीत हे विभक्तपण समाजाच्या हिताचे नाही
सहमत आहे. केवळ धर्मच नाही तर वर उल्लेखलेल्या पंथांमध्ये,विशिष्ट जातींमध्ये वेगळेपणाची भावना देशभर दिसून येते.जात,भाषा,धर्म्,पंथ अशा सर्वच बाबतीत स्वतःचे वेगळेपण दाखवून द्यायची चढाओढ सर्वत्र दिसून येते. मग आरक्षण असो,ऑनलाइन विवाह स्थळ असो, ऑर्कुटवरील ग्रूप्स असो वा ट्रॅडिशनल्/एथनिक डे वा परदेशातील राज्याचे नाव> मंडळ.

गांधीवादी Fri, 09/17/2010 - 11:52
मुस्लिम लोक शेजारी असणे हि एक खूप मोठी कटकट असते. त्यात मस्जिद शेजारी असणे म्हणजे खूप त्रास होतो आजूबाजूच्या लोकांना.(तसा तो गणपतीच्या उत्सवाने देखील होईल असे म्हणारे देखील आहेतच). त्यांचा सर्वात वाईट तो त्यांचा धर्मवेडेपणा, हा जरा घातकी स्वरूपाचा असतो. ह्यांच्यात खुद्द भावा-भावामध्ये अक्षरशः जीवघेण्या मारामार्या होतात हे डोळ्यांनी पहिले आहे. कोनिठी गोस्ष्ट डोके थंड ठून ऐकत नाहीत कि त्यावर विचार करत नाहीत. ह्याला अपवाद आहेतच नुकतेच पुण्याच्या CAMP भागात आमचे (family डॉक्टर) एक हकीम गृहस्थ वारले. खूप चांगले होते ते, हजारो औषधी वनस्पती आणि जडी बुटींचा अभ्यास होता त्यांचा. केवळ ५-१० रुपयांत बरे करायचे ते रोग्याला.

In reply to by गांधीवादी

"मुस्लिम लोक शेजारी असणे हि एक खूप मोठी कटकट असते. त्यात मस्जिद शेजारी असणे म्हणजे खूप त्रास होतो आजूबाजूच्या लोकांना...." ~~ या आक्षेपाला उत्तर देण्याचा मोह होत होता, पण त्याचवेळी श्री.गांधीवादी यांची पुढील कबुली वाचली.. "ह्याला अपवाद आहेतच..." मी यावरच लिहिण्याच्या बेतात होतो....पण आता राहु दे. (जाताजाता >> वरील प्रतिसादातील श्री.गांधीवादी यांची भाषामांडणी आणि विचारातील सौम्यपणा उल्हासदायक वाटला.) इन्द्रा

प्रचेतस Fri, 09/17/2010 - 12:01
अविनाश कुलकर्णी धागा काढणार | गांधीवादी गांधीवाद झुगारणार| संपादक मंडळ संपादन करणार | दंगा होणार निश्चित ||

In reply to by प्रचेतस

गांधीवादी Sat, 09/18/2010 - 08:20
>>गांधीवादी गांधीवाद झुगारणार| म्हणजे नक्की काय हो ? अवांतर : तुम्हाला स्वातंत्र्य काय गांधीवाद केल्यामुळे मिळालेले आहे, असे वाटते का ? तो जर अगोदरच झुगारणारला गेला असता तर कदाचित इतिहास वेगळा असला असता.(असे आमचे मत आहे)

आप्पा Fri, 09/17/2010 - 12:02
नमस्कार मंडळी, मुस्लीम व्यक्तीना घरे देण्यास बरेच ठिकाणी नकार मिळतो हि वस्तुस्थीती आहे. असे का होते? या विषयावर चर्चा झाली असती तर जास्त आवडले असते. या समाजावरील विश्वास उडाला आहे का? या लोकांचे रहाणीमान समाजाला आवडत नाही का? हा समाज धोकादायक आहे का? काही लोकांमुळे सर्व समाज बदनाम होत असेल तर समाजातील बाकींच्या लोकांची जबाबदारी वाढते. त्यांनी आपल्या समाजाबद्दल विश्वास वाढवला पाहीजे.

In reply to by आप्पा

चिंतामणराव Fri, 09/17/2010 - 13:10
त्यांनी आपल्या समाजाबद्दल विश्वास वाढवला पाहीजे. अस कांही काम कोणी कुठे करीत असेल तर मी सक्रीय मदत करायला तयार आहे

कानडाऊ योगेशु Fri, 09/17/2010 - 12:09
बेंगलोरमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली. नव्वदीच्या दशकांत जम्मु काश्मीर मधल्या मुसलमानांनी बेंगलोरमध्यल्या जमीनी खरेदी केल्या.मी राहतो तो बी.टी.एम भाग (विशेषतः बी.टी.एम १ स्टेज)हा मुस्लिमबहुल आहे.काही दिवसांपूर्वी घर खरेदी करण्यासाठी एक दोन ठिकाणी भेट दिली असता कळले की त्या जमीनीही मुस्लिमांच्याच आहेत.राहुन राहुन आश्चर्य वाटते की इतक्या दूरदृष्टीने एवढ्या मुस्लिमांनी बेंगलोरमध्येच जागा खरेदी करण्याचा निर्णय कसा काय घेतला असेल.? माझा घरमालक मुस्लिम आहे.बोलायला चालायला ठिक आहे पण घराच्या मेन्टेनन्ससाठी एकही पैसा खर्च करत नाही.

चिंतामणी Fri, 09/17/2010 - 12:40
या धाग्याला "संस्कृती" या सदराखाली आणणल्याबद्दल निषेध. यात संस्कृतीचा प्रश्ण आला कोठे? आता .इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि..... तुम्हाला आज नवीन विषय सापडला नाही का? म्हणून तुम्ही शिळ्या कढीला उत आणत आहात. त्यापेक्षा कुस्तीच्या जागतीक अजींक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण-या "सुशीलकुमार"च्या अभीनंदनाचा किंवा क्रिडामंत्र्यांनी सतपालचा अपमान केला का? असा धागा टाक़ला असता तर चालले असते.

चिरोटा Fri, 09/17/2010 - 12:43
राहुन राहुन आश्चर्य वाटते की इतक्या दूरदृष्टीने एवढ्या मुस्लिमांनी बेंगलोरमध्येच जागा खरेदी करण्याचा निर्णय कसा काय घेतला असेल.?
कारण कर्नाटकात जातिय्,धार्मिक तणाव ईतर राज्यांच्या मानाने कमी आहेत्(होते).शिवाय बी.टी.एम. भाग त्यावेळी शहरी भागाच्या तुलनेत खूपच स्वस्त होता.मुंबईत ६/७ लाखाला १ बी एच के, बेंगलोरमध्ये शहरात ३ ते ३.५ लाख,बी टी.एम मध्ये आणखी कमी असे त्यावेळी(९०च्या दशकात) होते. अवांतर-तसे मल्लेश्वरम,राजाजी नगर परिसरात मराठी बरेच आहेत.१५० वर्षापूर्वीच दूरदृष्टीने इथे आलेले!

टग्या टवाळ Fri, 09/17/2010 - 13:11
गांधीवादी बोलले ते खरच आहे. काही वर्षातच हिंदूं अल्पसंख्याक होणार आहेत. काळजी नसावी घर भाड्याने देण्याच म्हणाल तर मालकानो एखादा बाटगा असेल तर त्यला भाड्याने जागाच कय सायकल सुद्दा देउ नका.

बबलु Fri, 09/17/2010 - 13:31
>>मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात.. यात अनेक शिकलेल्या घर मालकांचा हि लोकांचा पण भरणा आहे. >>.इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि..... >>यावर मार्ग काय? >>नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय?? प्रस्तुत लेखकाच्या जिवाला बहुदा खूप त्रास होतोय हे वाचून डोळे भरून आले. माणुसकी माणुसकी कुठे असेल... तर ही पहा. आज माझे डोळे पावन झाले.

धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 13:33
तिच्च्यायला, ज्याचं घर असेल त्यानं ते कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा सर्वस्वी त्या त्या मालकाचा निर्णय. आता ह्यात तुम्ही आम्ही बोंबलणारे कोण? काय संबंध? आता ज्या मालक लोकांना 'अमुक अमुक माणुस्/कुटुंब माझ्या जागेत रहायला नालायक आहे' किंवा 'कुठं तिच्यायला फुकटची कटकट मागे लाऊन घ्या! असं वाटत असेल तर त्यांना नाकारण्याचा हक्क नाही? आता कुठं गेलं ते तुमचं तथाकथीत 'व्यक्तीस्वातंत्र्य'? मला तर कधीकधी प्रश्नच पडतो, काही काही (कागदोपत्री हिंदू) लोकांना काय पाकिस्तानातल्या मशिदींकडुन ज़कातीची खैरात मिळते की काय. बघावं तेव्हा परधार्जिणी वृत्ती!

In reply to by धमाल मुलगा

बबलु Fri, 09/17/2010 - 13:57
श्री धमु, छान प्रतिसाद. असो... मुघलांनी महाराजांचे काही अभेद्य गड/किल्ले फार लढाई न करता जिंकले होते. मुलांनो, ओळखापाहू कुणी मुघलांना मदत केली ?? बरोबर उत्तर देण्याराला मशिदीच्या पडोसच्या मोहल्ल्यात जागा फुकटात बक्षिश मिळेल. प्रतिसाद संपादित केला आहे संपादक मंडळ

In reply to by बबलु

धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 15:20
बबलुराव, ते श्री. तेव्हढं नेऊन घाला की हो बारा गडगड्याच्या विहिरीत्त! उगं हुच्चकर्मी झाल्यासारखं वाटतं ना. बाकी, तुमच्या प्रश्नावरुन औरंग्याच्या तोंडी (अर्थातच प्रभाकरपंत) घातलेलं वाक्य आठवलं..(वाक्य जसंच्या तसं नसेल कदाचित पण..) "अरे ह्या दख्खनच्या मुलकात जिथं गवतांनाही भाले फुटतात, तिथंच दगडांवरही फितुरीची फुलं फुलतात..."

In reply to by धमाल मुलगा

नितिन थत्ते Fri, 09/17/2010 - 14:35
>>ज्याचं घर असेल त्यानं ते कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा सर्वस्वी त्या त्या मालकाचा निर्णय. सहमत आहे. जस्टिफिकेशन द्यायची गरज नाही. :) [जस्टिफिकेशन म्हणून कारणे दिली आहेत ती अगदी तकलादू आहेत].

In reply to by नितिन थत्ते

आमोद शिंदे Fri, 09/17/2010 - 17:10
सर्वस्वी मालकाचा निर्णय? व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही घटनेचे उल्लंघन करू शकत नाही. The Constitution prohibits discrimination on the basis of a person's race, sex, religion, place of birth, or social status

In reply to by आमोद शिंदे

धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 18:35
>>व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही घटनेचे उल्लंघन करू शकत नाही. >>The Constitution prohibits discrimination on the basis of a person's race, sex, religion, place of birth, or social status जर मला माझी जागा एखाद्याला द्यायची नाहीये तर मी त्याचं कारण सांगणं गरजेचं नाही असं निदान मला तरी वाटतं. हवं असल्यास जे काय डिस्क्रिमिनेशन असेल ते केलं म्हणुन समोरचा कोर्टात जाऊ शकतो ना? कुणी अडवलंय? मग का नाही बरं गेले कोणी? कमॉन मॅन...टॉक रियल! हायपोथेटिकल बडबड करायला आयुष्यही पुरायचं नाही. :)

In reply to by धमाल मुलगा

आमोद शिंदे Fri, 09/17/2010 - 19:20
>> मला माझी जागा एखाद्याला द्यायची नाहीये तर मी त्याचं कारण सांगणं गरजेचं नाही असं निदान मला तरी वाटतं. कायदा तुम्ही हवा तसा वाकवू शकताच. पळवाटा शोधून खोटे बोलून इप्सित साध्य होतेच. 'जागा भाड्याने देणे आहे. मुसलमान लोकांनी जागेसाठी चौकशी करु नये' असा स्पष्ट बोर्ड लावून दाखवा. हायपोथेटीकल बडबड करायचा प्रश्नच उरणार नाही. >>हवं असल्यास जे काय डिस्क्रिमिनेशन असेल ते केलं म्हणुन समोरचा कोर्टात जाऊ शकतो ना? कुणी अडवलंय? मग का नाही बरं गेले कोणी? मी वाट्टेल तो कायदा मोडेन तुम्हाला काळजी असल्यास जा कोर्टात असे म्हणण्यासारखेच नाही का हे?

In reply to by आमोद शिंदे

धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 19:59
>>कायदा तुम्ही हवा तसा वाकवू शकताच. पळवाटा शोधून खोटे बोलून इप्सित साध्य होतेच. संपला विषय. देवाणघेवाण एकाच बाजुनं होऊ शकत नाही. मग स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा हे कधीही परवडतंच. '
जागा भाड्याने देणे आहे. मुसलमान लोकांनी जागेसाठी चौकशी करु नये' असा स्पष्ट बोर्ड लावून दाखवा. हायपोथेटीकल बडबड करायचा प्रश्नच उरणार नाही.
काय संबंध? कुणी काय बोर्ड लावायचा ते सांगण्यांचा अधिकारच काय? जागेच्या मालकाला जे वाटेल ते तो करेल. ती त्या मालकाची स्वतःची मालमत्ता आहे. त्याबद्दल काय करावं आणी कसं करावं हे सांगणारे कोण उपटसुंभ? आज घराबद्दल बाष्कळ बडबड चाललीये उद्या म्हणाल मुलगी द्या! उंटावरुन शेळ्या हाकायला आणि घेणं देणं नसताना शब्दांचे बुडबुडे काढत बसायला कष्ट काहीच पडत नाहीत. "ज्याचं जळतं त्यालाच कळतं. " नाही का? :) >>मी वाट्टेल तो कायदा मोडेन तुम्हाला काळजी असल्यास जा कोर्टात असे म्हणण्यासारखेच नाही का हे? =)) =)) =)) =)) =)) कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होईल हो? (स्वगतः आयला! काय मज्जा येऊन र्‍हायली भौ रिक्कामे शब्दखेळ करायला. )

In reply to by धमाल मुलगा

आमोद शिंदे Fri, 09/17/2010 - 21:40
>>जागेच्या मालकाला जे वाटेल ते तो करेल. ती त्या मालकाची स्वतःची मालमत्ता आहे. त्याबद्दल काय करावं आणी कसं करावं हे सांगणारे कोण उपटसुंभ? इथे कायदा हाच उपटसुंभ आहे. वाटेल ते करायला कायदा परवानगी देत नाही. उदा. जागा मालकाची असली म्हणून तिथे तो कुंटणखाना चालवू शकत नाही/ अंमली पदार्थ विकू शकत नाही. अर्थात कायदे वाकवून काही जागांमधे हे धंदे चालतातच की. तिथेही तुम्ही संपला विषय म्हणून दुर्लक्ष करता का? >>आज घराबद्दल बाष्कळ बडबड चाललीये उद्या म्हणाल मुलगी द्या! मला एक कळत नाही, बर्‍याच चर्चांमधे तुमचा सूर हा बाष्कळ बडबड, शब्दांचे बुडबुडे, हायपोथेटिकल बडबड असतो तरी तुम्ही चर्चांमधे इतका सहभाग कसा काय घेता? की फक्त तुमचेच शब्द अर्थपूर्ण असतात?

In reply to by पैसा

अगं धागा आधीच पेटला तरी त्याची उशीरा पेटली असेल थोडी ... ;-) पळा आता, मारतोय हा पुणेरी, निरागस म्रुत्युन्जय!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय Fri, 09/17/2010 - 23:04
बारामतीकरांकडुन शिकलो आहे पैसा कधीही कमावता आला तरी चांगलाच. वेळ गेलेली नाही. बाकी निरागस प्रमाणंपत्र दिल्याबद्दल धन्स

In reply to by आमोद शिंदे

सुधीर१३७ Sat, 09/18/2010 - 17:54
......यात घटनेचे उल्लंघन होत नाही. ...............................Constitution prohibits discrimination on the basis of person's race, sex, religion, place of birth, or social status.; but only by State and not by private persons or individuals. Please Read Constitution carefully.

In reply to by सुधीर१३७

पुष्करिणी Sat, 09/18/2010 - 22:51
सहमत. इंग्लंडमधेही घर कोणाला भाड्यानं द्यायच, विकायच आणि घरात कोणाला कामाला ठेवायच ( स्वयंपाकी, क्लिनर, आया, नर्स, शिकवणी देण्यास येणारे शिक्षक इत्यादी ) याचा हक्कं कायदेशीरपणे सर्वस्वी घरमालकाचा असतो. भारतातही तसच असावं

In reply to by धमाल मुलगा

अवलिया Fri, 09/17/2010 - 14:38
असं कसं धमुशेट.. यापेक्षा वेगळी संधी कशी मिळणार निरपेक्षता का काय ते असल्याचे सिद्ध करायला? समजुन घ्या ! त्यांना आपलं म्हणा !!

In reply to by अवलिया

गांधीवादी Fri, 09/17/2010 - 15:07
सगळ्यांनाच जर का आपला म्हणायचं असेल तर चिन्यांनी काय पाप केलंय ? चिन्यांना पण आपलं म्हणूयात. बोला हिंदी चीनी भाई भाई.

In reply to by धमाल मुलगा

ज्याचं घर असेल त्यानं ते कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा सर्वस्वी त्या त्या मालकाचा निर्णय. आता ह्यात तुम्ही आम्ही बोंबलणारे कोण? काय संबंध? हेच तर्कशास्त्र लावायचे तर मग मराठी लोकांना जागा न देणाऱ्या ज्या अनेक सोसायट्या मुंबईत आहेत त्या पण काही चुकीचे नाही करत. सोसायट्या कशाला, नवीन बांधून झालेल्या बिल्डींग मध्ये बिल्डर मराठी लोकांना जागा विकत नाहीत. लालबाग परळ मध्ये जे टॉवर होत आहेत तिथे अशी परिस्थिती आहे म्हणे. अशा लोकांना कानफटीत मारण्याची भाषा आपणच करणार आणि मुसलमानांना जागा नाही दिली तर तो व्यक्तिगत निर्णय?? एक काय तो स्टॅंड घेऊया ना भाऊ.....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तिथे ना सरळ आहे आम्ही भूमिपुत्र आहोत हा स्टँड घ्यायचा. साधी गोष्ट आहे. साला आमच्या भूमिवर येऊन आम्हाला माज करून दाखवला तर कानफटात मिळेलच. अरे स्वार्थीपण करायला शिका रे त्या चर्चिल कडून. आणि एक फरक लक्षात घेतला पाहीजे की त्या मुस्लिमांना जागा दिल्या जात नाहीत कारण ते अस्वच्छ राहतात. तिथे धार्मिक असहकाराचा मुद्दा नाहीये. जेव्हा लालबागच्या टॉवरमधे मराठी माणसे जागा विकत घ्यायला जातात तेव्हा ते चांगले कमावते असतात. आणि बहुतेक कमावता मराठी वर्ग हा स्वच्छतेच्या बाबतीत सुसंस्कॄत आहे. अगदी 'पान का मझा' घ्यायला रस्त्यात थुंकले तरी जिन्याच्या कोपर्‍यात थुंकत नाहीत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ठीक आहे. आता असे बघा, स्वच्छता हा तुमचा मुद्दा आहे, आणि मांसाहार हा त्यांचा मुद्दा आहे. आता कुठला स्वीकारार्ह आणि कुठला नाही हे कुणी ठरवायचे?? एकतर बहुतेक मुसलमान गलिच्छ असतात हे जे सामान्यीकरण आहे, तेच तपासून घेतले पाहिजे, पण असतात असे गृहीत धरूया. आता उद्या एखादा स्वच्छ मुसलमान आला आणि त्याने पुरावा दिला आपल्या स्वच्छ जीवनमानाचा तर त्याला जागा देतील का हे लोक पटकन??? धार्मिक असहकाराचा मुद्दा नाही असे म्हणणे म्हणजे ढोंग आहे. मुद्दा धार्मिक असहकाराचाच आहे. त्याला दुसरा मुलामा द्यायचा असेल तर खुशाल द्या. स्वार्थी पणा करायला शिकले पाहिजे, पण एकतर तो स्वार्थीपणा नाही, त्यामागे तर्क आहे हे जगाला पटवून देता आले पाहिजे किंवा तो निर्लज्ज पणे पचवता आला पाहिजे (त्याहून चांगले म्हणजे मिरवता आला पाहिजे). पेपर वाल्याने पैसे नाही घेतले म्हणून कासावीस होणारी जमात आपली. आपण काय स्वार्थी पणा करणार? आपण स्वार्थी पणा करणार तो दुसऱ्या मराठी माणसाकडे. (त्याबद्दल नंतर बोलू, फार अवांतर होईल)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ठीक आहे. आता असे बघा, स्वच्छता हा तुमचा मुद्दा आहे, आणि मांसाहार हा त्यांचा मुद्दा आहे. आता कुठला स्वीकारार्ह आणि कुठला नाही हे कुणी ठरवायचे?? हे आपण म्हणजे मराठी माणसांनी, स्थानिकांनी, भूमिपुत्रांनी ठरवायचे. जर ही परिस्थिती म्हैसूर मधे असली असती तर म्हैसूरच्या लोकांनी ते ठरवायचे, सूरतेत असते तर सूरतेच्या भूमिपुत्रांनी हे ठरवायचे. एकतर बहुतेक मुसलमान गलिच्छ असतात हे जे सामान्यीकरण आहे, तेच तपासून घेतले पाहिजे, पण असतात असे गृहीत धरूया. आता उद्या एखादा स्वच्छ मुसलमान आला आणि त्याने पुरावा दिला आपल्या स्वच्छ जीवनमानाचा तर त्याला जागा देतील का हे लोक पटकन??? धार्मिक असहकाराचा मुद्दा नाही असे म्हणणे म्हणजे ढोंग आहे. मुद्दा धार्मिक असहकाराचाच आहे. त्याला दुसरा मुलामा द्यायचा असेल तर खुशाल द्या. १. आता हे सांगा त्यांनी पुरावा द्यायचा म्हणजे नक्की काय दाखवायचे? २. एखाद्या भाडेकरूला त्याच्या स्वच्छतेचा पुरावा द्यावा लागणे ही त्याची नाचक्कीच नाही का? ३, धार्मिक असहकार जर लोकभावनेतून आला असेल तर तरीही तो त्याज्यच ? ४. धार्मिक असहकार (जसा गुजराथमधे गोध्राकांडानंतर झाला. मला आजतक वर वगैरे पाहील्याचे आठवते सुरतेतला एक मुसलमान शिंपी ज्याचे दुकान भर हिंदू वस्तीत होते. दंगल होऊनही ते जाळले गेले नव्हते. पण दंगलीनंतर त्याचे दुकान चालेनासे झाले. कारण जे बहुसंख्य हिंदू ग्राहक होते ते त्याच्यापासून दुरावले. ह्यावर एक २ तासाचा रिपोर्ट दाखवला होता आजतक ने) जर लोकानी स्वयंस्फूर्तीने पुकारला असेल तर जोपर्यंत तो दुसरा समाज स्वयंस्फूर्तीने सुधारणा दाखवत नाही तोवर या समाजाचा विश्वास जिंकता येणार नाहीच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>हे आपण म्हणजे मराठी माणसांनी, स्थानिकांनी, भूमिपुत्रांनी ठरवायचे. पुपे भाऊ, स्वतःच्या शब्दात अडकाल हो. मुसलमान हे भूमिपुत्र / मराठी नसतील असा नियम आहे काय?? पुण्याची सरहद्द सोडून थोडे पश्चिमेला गेलात ना, कोकण लागेल. तिथे अनेक मुसलमान आहेत. मराठी बोलतात (किंवा बागवानी) पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहत आहेत (अवांतर :- गणपती च्या उत्सवात सामील होतात. रामनवमी चा उपवास करतात. पण ते असो). राज्याच्या बाकीच्या भागात पण असतीलच असे मुसलमान. ते भूमिपुत्र नाहीत काय. मराठी माणूस नेहमीच भाषा आणि धर्म यात गल्लत करत आलेला आहे. हे खरे कि येथील अनेक मुसलमान जाणीवपूर्वक हिंदी बोलतात. पण माणूस धर्माने मुसलमान असेल तरीही मराठी असू शकतो की. मग मराठी बोलणारा (आणि स्वच्छ) मुसलमान आला तर घर देणार का पटकन ? वैचारिक गोंधळ यालाच म्हणत असावे कदाचित. बाकी धाग्याचे बरेच कल्याण आधीच झाले आहे. खव मध्ये बोलू पाहिजे तर.

सुनील Fri, 09/17/2010 - 15:31
अगदी बरोबर! मुस्लिमांना मिश्र वस्तीत जागा मिळत नाही. मग ते गावाच्या/शहराच्या दुसर्‍या भागात वस्ती करतात. हळू हळू त्या भागात त्यांची बहुसंख्या होते. त्यांचे एकसंघ मतदार होतात. मग त्या भागातून निवडून येणे सोपे जाते...... त्यावर पुन्हा "एकगठ्ठा, एकगठ्ठा" म्हणून गलका करायला आम्ही मोकळे....

In reply to by सुनील

धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 15:39
वस्तीचा मतदारसंघ? हां हां...वार्ड का काय ते म्हणतात ते होय? मी आपला लोकसभा मतदारसंघाचा नकाशा डोळ्यापुढं घेऊन गांगरलो ना. आणि एकगठ्ठा एकगठ्ठा काय बोंबलायला एकाच जागेवरुन मिळतात काय? बरं असं म्हणु की एखाद-दुसरा नगरसेवक अश्या ठिकाणाहुन निवडुन येतो एकगठ्ठा मतांमुळं..... लोकसभेचं काय आण्णा? तिथंही तेच आहे ना? का त्यांच्यासाठी तालुके जिल्हे वेगळे असतात?

In reply to by धमाल मुलगा

सुनील Fri, 09/17/2010 - 15:54
अगदी लोकसभा नसली तरी विधानसभेचे काही मतदारसंघ दक्षिण मुंबईत जरूर आहेत! आणि लोकसभादेखिल का नाही? प्रचारासाठी, लोकांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी, अशा एकसंघ वस्त्या सोयीच्या असतात!

In reply to by सुनील

धमाल मुलगा Fri, 09/17/2010 - 16:39
मुंबई=देश? :) >>आणि लोकसभादेखिल का नाही? प्रचारासाठी, लोकांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी, अशा एकसंघ वस्त्या सोयीच्या असतात! आणि त्या तशा नसल्या तर एकत्र करण्यासाठी आणि वापर करुन घेण्यासाठी इतर सोपे मार्गच नाहीत? ह्यांचे निरोप कसे पोहोचतात आणि जमाव कसा जमा होतो ह्याची वस्तुस्थिती ठाऊक नसेल आणि जाणुन घ्यायची असेल तर एखाद्या क्राईमब्रँचमधल्या अगदी हवालदाराला विचारा. आपण 'हायपोथेटिकली ज्या गप्पा मारतो त्या घटनांच्या/प्रोसेसच्या मागे नक्की काय आणि कसं असतं ते जाणवतं. :( अवांतरः मुळात मला एक प्रश्न पडला, आपण भिडतोय की मिश्र वस्तीत जागा दिली नाही म्हणुन बाहेर वस्ती करतात आणि मग पुढचं चर्‍हाट.. पण कित्येक वर्षांपासून गावा-गावातही 'ब्राम्हणाआळी' वेगळी, कोळीवाडा वेगळा, कोष्टी गल्ली-कुंभारवाडी-वडारवाडी वेगवेगळ्या, मोमिनपुरा वेगळा, ख्रिश्चन कॉलन्या वेगळ्या....अशीच धाटणी दिसून येते. आता ह्याचा अर्थ काय ते मला गरीबाला काही कळेना बुवा. :)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 16:55
मुस्लीम एकगठ्ठा मतदान करतात्...... हे विधान आपल्या निवडणूका पद्धतीला लागू होते का? हे म्हणजे प्रत्येक मुस्लीमाचे मत शाही ईमाम ठरवतो. तो ठरावीक उमेदवारानाच मत देणाचा फतवा काढतो आणि महत्वाचे म्हणजे गुप्त मतदान पद्धतीत मतदार आपली मतपत्रीका कुठल्यातरी मुल्लाला दाखवून मगच मतपेटीत टाकतो असेच ना? मग हे दलीत वस्त्यानादेखील लागू होईल की.. पस्चीम महाराष्ट्रात अनेक गावांत मुस्लीम लोक गणेशोत्सवात हिरीरीने सहभागी होतात. शिवाजी महाराजाना मानतात.स्वच्छ मराठी बोलतात. तुम्ही जितके मराठी आहात तितकेच तेही मराठी आहेत. प्रत्येक समाजाच्या वस्त्या प्रत्येक गावात आहेत. महारवाडा , सिद्धार्थनगर , मारवाडीपेठ , गुजर आळी , कुंभाराअळी प्रत्येक गावात आहे. पुण्यात पहाल तर महात्मा फुले पेठ , सवीवार पेठ , सदाशिव पेठ , कुंभार वेस ,नाना पेठ , घोरपडी , उंदरी वगैरे वस्त्या पेठात एखाद्या विशिष्ठ समाजांतील लोकांची वस्ती जास्त दिसते . एकत्र रहाणे ही समाजाची गरज असते. जेथे मुस्लीम मतदार आहेत तेथे जर दोन मुस्लीम उमेदवार बहुतेकवेळा उभे रहतात . तेथे एकगठ्ठा मतदान झाले तरी काही फरक पडत नाही. मुस्लीम जसे एकत्र येऊन काही राजकीय पक्षाना वाकवू शकतात ( असा सार्वत्रीक समज आहे) मग तसे इतर समाज वाकवत नाहीत असे का तुम्हाला वाटते. ज्या समाजाच्या हातात भारतातील सर्वाधीक औषधी निर्माण करणार्‍या कंपन्या आहेत तो समाज तर काही ; न बोलताही बरेच काही करवून घेत असतो. चित्पावन्न ब्राम्हणांनी एकत्र यावे म्हणून प्रयत्न करणारे मुस्लीम किंवा गुजराथी मारवाडी एकत्र आले म्हणून त्याना नावे ठेवतात. राजकीय फायद्यासाठी मुंडे ,भुजबळ ओबीसी संघटनांचे राजकारण करतात त्यांचे मात्र कौतूक करतात हा दुटप्पीपणा का? असो. वरुण गांधीवादी साहेबाना भारतात फक्त मुस्लीम लोकच गैर वागताना दिसतात हा त्यांच्या पिवळेच दाखवणार्‍या चष्म्याचा चमत्कार आहे

In reply to by विजुभाऊ

गांधीवादी Fri, 09/17/2010 - 17:11
मला आपण एक तरी असा वैज्ञानिक शोध सांगा कि जो ह्या विशिष्ट जमातीने समाजभल्यासाठी लावला आहे. ह्या विशिष्ट जमातीतले काहीतरी चांगले गुण सांगा ना, सांगितले तरच कळणार आहे राव. आत्ता पर्यंत कोणी सांगितलेच नाही. त्यामुळे आमचे मत जसे आहे, तसे आहे. नक्की बदलेल त्यांच्या बद्दलचे मत , पण काहीतरी चांगले तरी ऐकू दे पहिले त्यांच्या बाबतीत.

In reply to by गांधीवादी

वाहीदा Fri, 09/17/2010 - 23:45
Wellknown Muslim Astronomers and Astrophysicists Kerim Kerimov, a founder of Soviet space program, a lead architect behind first human spaceflight (Vostok 1), and the lead architect of the first space stations (Salyut and Mir) Farouk El-Baz, a NASA scientist involved in the first Moon landings with the Apollo program Muslim Astronomers and Astrophysicists * Khalid ibn Yazid (Calid) * Jafar al-Sadiq * Yaqūb ibn Tāriq * Ibrahim al-Fazari * Muhammad al-Fazari * Naubakht * Al-Khwarizmi, mathematician * Ja'far ibn Muhammad Abu Ma'shar al-Balkhi (Albumasar) * Al-Farghani * Banū Mūsā (Ben Mousa) o Ja'far Muhammad ibn Mūsā ibn Shākir o Ahmad ibn Mūsā ibn Shākir o Al-Hasan ibn Mūsā ibn Shākir * Maryam al-Asturlabi * Al-Majriti * Muhammad ibn Jābir al-Harrānī al-Battānī (Albatenius) * Al-Farabi (Abunaser) * Abd Al-Rahman Al Sufi * Abu Sa'id Gorgani * Kushyar ibn Labban * Abū Ja'far al-Khāzin * Al-Mahani * Al-Marwazi * Al-Nayrizi * Al-Saghani * Al-Farghani * Abu Nasr Mansur * Abū Sahl al-Qūhī (Kuhi) * Abu-Mahmud al-Khujandi * Abū al-Wafā' al-Būzjānī * Ibn Yunus * Ibn al-Haytham (Alhacen) * Abū Rayhān al-Bīrūnī * Avicenna * Abū Ishāq Ibrāhīm al-Zarqālī (Arzachel) * Omar Khayyám * Al-Khazini * Ibn Bajjah (Avempace) * Ibn Tufail (Abubacer) * Nur Ed-Din Al Betrugi (Alpetragius) * Averroes * Al-Jazari * Sharaf al-Dīn al-Tūsī * Anvari * Mo'ayyeduddin Urdi * Nasir al-Din Tusi * Qutb al-Din al-Shirazi * Ibn al-Shatir * Shams al-Dīn al-Samarqandī * Jamshīd al-Kāshī * Ulugh Beg, also a mathematician * Taqi al-Din Muhammad ibn Ma'ruf, Ottoman astronomer * Ahmad Nahavandi * Haly Abenragel * Abolfadl Harawi * Kerim Kerimov, a founder of Soviet space program, a lead architect behind first human spaceflight (Vostok 1), and the lead architect of the first space stations (Salyut and Mir) * Farouk El-Baz, a NASA scientist involved in the first Moon landings with the Apollo program * Sultan bin Salman bin Abdulaziz Al Saud * Muhammed Faris * Abdul Ahad Mohmand * Talgat Musabayev * Anousheh Ansari * Amir Ansari * Sultana Nurun Nahar, specialist in atomic astrophysics and spectroscopy Muslim Chemists and Alchemists * Khalid ibn Yazid (Calid) * Jafar al-Sadiq * Jābir ibn Hayyān (Geber), father of chemistry * Abbas Ibn Firnas (Armen Firman) * Al-Kindi (Alkindus) * Al-Majriti * Ibn Miskawayh * Abū Rayhān al-Bīrūnī * Avicenna * Al-Khazini * Nasir al-Din Tusi * Ibn Khaldun * Salimuzzaman Siddiqui * Al-Khwārizmī, Father of Al-Gabra, (Mathematics) * Ahmed H. Zewail, Nobel Prize in Chemistry, 1999 * Mostafa El-Sayed Muslim Economists and Social Scientists * Abu Hanifa an-Nu‘man (699-767), economist * Abu Yusuf (731-798), economist * Ishaq bin Ali al-Rahwi (854–931), economist * Al-Farabi (Alpharabius) (873–950), economist * Al-Saghani (d. 990), one of the earliest historians of science * Shams al-Mo'ali Abol-hasan Ghaboos ibn Wushmgir (Qabus) (d. 1012), economist * Abū Rayhān al-Bīrūnī (973-1048), considered the "first anthropologist" and father of Indology * Ibn Sina (Avicenna) (980–1037), economist * Ibn Miskawayh (b. 1030), economist * Al-Ghazali (Algazel) (1058–1111), economist * Al-Mawardi (1075–1158), economist * Nasīr al-Dīn al-Tūsī (Tusi) (1201–1274), economist * Ibn al-Nafis (1213–1288), sociologist * Ibn Taymiyyah (1263–1328), economist * Ibn Khaldun (1332–1406), forerunner of social sciences such as demography, cultural history, historiography, philosophy of history, sociology and economics * Al-Maqrizi (1364–1442), economist * Akhtar Hameed Khan, Pakistani social scientist; pioneer of microcredit * Muhammad Yunus, Nobel Prize winner Bangladeshi economist; pioneer of microfinance * Mahbub ul Haq, Pakistani economist; developer of Human Development Index and founder of Human Development Report Muslim Geographers and Earth Scientists * Al-Masudi, the "Herodotus of the Arabs", and pioneer of historical geography * Al-Kindi, pioneer of environmental science * Ibn Al-Jazzar * Al-Tamimi * Al-Masihi * Ali ibn Ridwan * Muhammad al-Idrisi, also a cartographer * Ahmad ibn Fadlan * Abū Rayhān al-Bīrūnī, father of geodesy, considered the first geologist and "first anthropologist" * Avicenna * Ibn Jumay * Abd-el-latif * Averroes * Ibn al-Nafis * Ibn al-Quff * Ibn Battuta * Ibn Khaldun * Piri Reis * Evliya Çelebi * Zaghloul El-Naggar Muslim Mathematicians * Al-Hajjāj ibn Yūsuf ibn Matar * Khalid ibn Yazid (Calid) * Muhammad ibn Mūsā al-Khwārizmī (Algorismi) - father of algebra and algorithms * 'Abd al-Hamīd ibn Turk * Abū al-Hasan ibn Alī al-Qalasādī (1412–1482), pioneer of symbolic algebra * Abū Kāmil Shujā ibn Aslam * Al-Abbās ibn Said al-Jawharī * Al-Kindi (Alkindus) * Banū Mūsā (Ben Mousa) o Ja'far Muhammad ibn Mūsā ibn Shākir o Al-Hasan ibn Mūsā ibn Shākir * Al-Mahani * Ahmed ibn Yusuf * Al-Majriti * Muhammad ibn Jābir al-Harrānī al-Battānī (Albatenius) * Al-Farabi (Abunaser) * Al-Khalili * Al-Nayrizi * Abū Ja'far al-Khāzin * Brethren of Purity * Abu'l-Hasan al-Uqlidisi * Al-Saghani * Abū Sahl al-Qūhī * Abu-Mahmud al-Khujandi * Abū al-Wafā' al-Būzjānī * Ibn Sahl * Al-Sijzi * Ibn Yunus * Abu Nasr Mansur * Kushyar ibn Labban * Al-Karaji * Ibn al-Haytham (Alhacen/Alhazen) * Abū Rayhān al-Bīrūnī * Ibn Tahir al-Baghdadi * Al-Nasawi * Al-Jayyani * Abū Ishāq Ibrāhīm al-Zarqālī (Arzachel) * Al-Mu'taman ibn Hud * Omar Khayyám * Al-Khazini * Ibn Bajjah (Avempace) * Al-Ghazali (Algazel) * Al-Marrakushi * Al-Samawal * Averroes * Avicenna * Hunayn ibn Ishaq * Ibn al-Banna' * Ibn al-Shatir * Ja'far ibn Muhammad Abu Ma'shar al-Balkhi (Albumasar) * Jamshīd al-Kāshī * Kamāl al-Dīn al-Fārisī * Muḥyi al-Dīn al-Maghribī * Maryam Mirzakhani * Mo'ayyeduddin Urdi * Muhammad Baqir Yazdi * Nasir al-Din al-Tusi, 13th century Persian mathematician and philosopher * Qāḍī Zāda al-Rūmī * Qutb al-Din al-Shirazi * Shams al-Dīn al-Samarqandī * Sharaf al-Dīn al-Tūsī * Taqi al-Din Muhammad ibn Ma'ruf * Ulugh Beg * Lotfi Asker Zadeh, Iranian computer scientist; founder of Fuzzy Mathematics and fuzzy set theory * Cumrun Vafa * Jeffrey Lang Professor at the University of Kansas Muslim Biologists, Neuroscientists and Psychologists * Ibn Sirin (654–728), author of work on dreams and dream interpretation * Al-Kindi (Alkindus), pioneer of psychotherapy and music therapy * Ali ibn Sahl Rabban al-Tabari, pioneer of psychiatry, clinical psychiatry and clinical psychology * Ahmed ibn Sahl al-Balkhi, pioneer of mental health, medical psychology, cognitive psychology, cognitive therapy, psychophysiology and psychosomatic medicine * Najab ud-din Muhammad, pioneer of mental disorder classification * Al-Farabi (Alpharabius), pioneer of social psychology and consciousness studies * Ali ibn Abbas al-Majusi (Haly Abbas), pioneer of neuroanatomy, neurobiology and neurophysiology * Abu al-Qasim al-Zahrawi (Abulcasis), pioneer of neurosurgery * Ibn al-Haytham (Alhazen), founder of experimental psychology, psychophysics, phenomenology and visual perception * Abū Rayhān al-Bīrūnī, pioneer of reaction time * Avicenna (Ibn Sina), pioneer of physiological psychology, neuropsychiatry, thought experiment, self-awareness and self-consciousness * Ibn Zuhr (Avenzoar), pioneer of neurology and neuropharmacology * Averroes, pioneer of Parkinson's disease * Ibn Tufail, pioneer of tabula rasa and nature versus nurture * Teepu Siddique, neurologist and pioneer in neurogenetics and ALS research. Muslim Physicians and Surgeons * Khalid ibn Yazid (Calid) * Jafar al-Sadiq * Shapur ibn Sahl (d. 869), pioneer of pharmacy and pharmacopoeia * Al-Kindi (Alkindus) (801-873), pioneer of pharmacology * Abbas Ibn Firnas (Armen Firman) (810-887) * Al-Jahiz, pioneer of natural selection * Ali ibn Sahl Rabban al-Tabari, pioneer of medical encyclopedia * Ahmed ibn Sahl al-Balkhi * Ishaq bin Ali al-Rahwi (854–931), pioneer of peer review and medical peer review * Al-Farabi (Alpharabius) * Ibn Al-Jazzar (circa 898-980) * Abul Hasan al-Tabari - physician * Ali ibn Sahl Rabban al-Tabari - physician * Ali ibn Abbas al-Majusi (d. 994), pioneer of obstetrics and perinatology * Abu Gaafar Amed ibn Ibrahim ibn abi Halid al-Gazzar (10th century), pioneer of dental restoration * Abu al-Qasim al-Zahrawi (Abulcasis) - father of modern surgery, and pioneer of neurosurgery, craniotomy,hematology and dental surgery * Ibn al-Haytham (Alhacen), pioneer of eye surgery, visual system and visual perception * Abū Rayhān al-Bīrūnī * Avicenna (Ibn Sina) (980-1037) - father of modern medicine, founder of Unani medicine, pioneer of experimental medicine, evidence-based medicine, pharmaceutical sciences, clinical pharmacology, aromatherapy, pulsology and sphygmology, and also a philosopher * Ibn Miskawayh * Ibn Zuhr (Avenzoar) - father of experimental surgery, and pioneer of experimental anatomy, experimental physiology, human dissection, autopsy and tracheotomy * Ibn Bajjah (Avempace) * Ibn Tufail (Abubacer) * Averroes * Ibn al-Baitar * Ibn Jazla * Nasir al-Din Tusi * Ibn al-Nafis (1213–1288), father of circulatory physiology, pioneer of circulatory anatomy, and founder of Nafisian anatomy, physiology, pulsology and sphygmology * Ibn al-Quff (1233–1305), pioneer of embryology * Kamāl al-Dīn al-Fārisī * Ibn Khatima (14th century), pioneer of bacteriology and microbiology * Ibn al-Khatib (1313–1374) * Mansur ibn Ilyas * Saghir Akhtar - pharmacist * Toffy Musivand * Muhammad B. Yunus, the "father of our modern view of fibromyalgia" * Sheikh Muszaphar Shukor, pioneer of biomedical research in space * Hulusi Behçet, known for the discovery of Behçet's disease * Ibrahim B. Syed - radiologist * Mehmet Öz, cardiothoracic surgeon Muslim Physicists & Engineers * Jafar al-Sadiq, 8th century * Banū Mūsā (Ben Mousa), 9th century o Ja'far Muhammad ibn Mūsā ibn Shākir o Ahmad ibn Mūsā ibn Shākir o Al-Hasan ibn Mūsā ibn Shākir * Abbas Ibn Firnas (Armen Firman), 9th century * Al-Saghani, 10th century * Abū Sahl al-Qūhī (Kuhi), 10th century * Ibn Sahl, 10th century * Ibn Yunus, 10th century * Al-Karaji, 10th century * Ibn al-Haytham (Alhacen), 11th century Iraqi scientist, father of optics, pioneer of scientific method and experimental physics, considered the "first scientist" * Abū Rayhān al-Bīrūnī, 11th century, pioneer of experimental mechanics * Avicenna, 11th century * Al-Khazini, 12th century * Ibn Bajjah (Avempace), 12th century * Hibat Allah Abu'l-Barakat al-Baghdaadi (Nathanel), 12th century * Averroes, 12th century Andalusian mathematician, philosopher and medical expert * Al-Jazari, 13th century civil engineer, father of robotics, father of modern engineering * Nasir al-Din Tusi, 13th century * Qutb al-Din al-Shirazi, 13th century * Kamāl al-Dīn al-Fārisī, 13th century * Hasan al-Rammah, 13th century * Ibn al-Shatir, 14th century * Taqi al-Din Muhammad ibn Ma'ruf, 16th century * Hezarfen Ahmet Celebi, 17th century * Lagari Hasan Çelebi, 17th century * Sake Dean Mahomet, 18th century * Tipu Sultan, 18th century Indian mechanician * Fazlur Khan, 20th century Bangladeshi mechanician * Mahmoud Hessaby, 20th century Iranian physicist * Ali Javan, 20th century Iranian physicist * Bacharuddin Jusuf Habibie, 20th century Indonesian aerospace engineer and president * Abdul Kalam, Indian aeronautical engineer and nuclear scientist * Abdus Salam, Pakistani Theoretical Physicists and a Nobel Prize winner(1979). * Mehran Kardar, Iranian theoretical physicist * Cumrun Vafa, Iranian mathematical physicist * Nima Arkani-Hamed, American-born Iranian physicist * Abdel Nasser Tawfik, Egyptian-born German Particle Physisist * Munir Nayfeh Palestinian-American Particle Physicist * Riazuddin, Pakistani theoretical physicist * Abdul Qadeer Khan, Pakistani nuclear scientist * Munir Ahmad Khan, Pakistani nuclear engineer * Pervez Hoodbhoy, Pakistani nuclear physicist * Ali Musharafa, Egyptian nuclear physicist * Sameera Moussa, Egyptian nuclear physicist * Mehmet Keçeci, Turkey theorical physicist Muslim Political Scientists * Syed Qutb * Abul Ala Maududi * Hasan al-Turabi * Hassan al-Banna * Mohamed Hassanein Heikal * Shoaib ur Rehman Mughal ~ वाहीदा परिंदों को मिलेंगी मंज़िलें,ये फैले हुए उनके पर बोलते हैं | वही लोग रहते हैं खामोश अक्सर, ज़माने मे जिनके हुनर बोलते हैं ||

In reply to by वाहीदा

अगं वाहीदा, तू एवढी नको डिस्टर्ब होऊस! ज्यांना भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामही आठवत नाहीत त्यांना एवढं सांगून तू का उगाच "गीतापठण" करते आहेस? :-)

In reply to by वाहीदा

मृत्युन्जय Sat, 09/18/2010 - 00:05
यातले स्वातंत्र्योत्तर काळातले भारतीय किती हे समजुन घ्यायलाही आवडेल. यात एपीजे अब्दुल कलाम नसतील तर आमच्यासाठी ही यादी बाद ठरवण्यात येइल. :) झाकीर हुसैन देखील कुठे दिसत नाहीत. पिरी रिस चे नाव वाचुन अंमळा मौज वाटली. उद्या औरंगजेबाचे नाव लिहाल याच्यात :) यादी थोडी अपुरी आहे. अजुनही कित्येक महान लोकांची नावे यात नाहीत. किंवा कदाचित माझ्या नजरेतुन सुटली असतील. यात बरेच संगीतकार, गायक, वादक दिसत नाही आहेत. मुहम्मद अली नाही. झिदान नाही. अजुनही बरेच खेळाडु नाहीत.

In reply to by मृत्युन्जय

वाहीदा Sat, 09/18/2010 - 00:35
Piri Reis (full name Hadji Muhiddin Piri Ibn Hadji Mehmed, reis/rais is Turkish and Arabic for captain) (about 1465–1554 or 1555) was an Ottoman-Turkish Kaptan-ı Derya, geographer and cartographer born between 1465 and 1470 in Gallipoli on the Aegean coast of Turkey. He is primarily known today for his maps and charts collected in his Kitab-ı Bahriye (Book of Navigation), a book which contains detailed information on navigation as well as extremely accurate charts describing the important ports and cities of the Mediterranean Sea. He gained fame as a cartographer when a small part of his first world map (prepared in 1513) was discovered in 1929 at Topkapı Palace in Istanbul. The most surprising aspect was the presence of the Americas on an Ottoman map, making it the oldest known Turkish map showing the New World, and one of the oldest maps of America still in existence in the world. (The oldest known map of America that is still in existence is the map drawn by Juan de la Cosa in 1500, which is conserved in the Naval Museum (Museo Naval) of Madrid, Spain.) The most striking characteristic of the first world map (1513) of Piri Reis, however, is the level of accuracy in positioning the continents (particularly the relation between Africa and South America) which was unparalleled for its time. Even maps drawn decades later did not have such accurate positioning and proportions; a quality which can be observed in other maps of Piri Reis in his Kitab-ı Bahriye (Book of Navigation). Piri Reis' map is centered in the Sahara at the Tropic of Cancer latitude. Charles Hapgood argued that the Piri Reis map preserved knowledge of Antarctica from an Ice Age civilization Sir Abdul Kalam's is missing from the List for which I apologise but your sarcastic remark sounds more of taunt स्वातंत्र्योत्तर काळातले मुस्लिम भारतिय शोधा ना मग सापडतील पण काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत .. कुछ लोग हमारा वजूद ही मिटाना चाहते है लेकीन वोह इतना आसान नहीं .. दिलका मैल छुपाये नहीं... छुपता ! यह नफरतें पता नहीं कहां ले जायेगी :-( ~ वाहीदा कुछ बात है की, हस्ती मिटती नही हमारी , सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा :-)

In reply to by वाहीदा

मृत्युन्जय Sat, 09/18/2010 - 01:25
पिरी रीस चे नकाशे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच त्याची चाचेगिरीही. त्याचे नकाशे पण अशाच एका लूटीमधुन मिळालेले आहेत असाही एक मतप्रवाह आहे. बाकी औरंगजेबाबद्दल मी काय लिहावे? मला जर तुम्हाला टोमणेच मारायचे असले असते तर मी कसाब. अफ्झल, अझरुद्दीन ही नावे सुद्धा उद्धृत करु शकलो असते असे नाही का वाटात तुम्हाला? स्वातंत्र्योत्तर काळातले मुस्लिम भारतिय शोधा ना मग सापडतील पण काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत .. काही नावे तर मीच तुम्हाला सुचवली. अल्लारखा, बिस्मिला खान अशीच अजुनही काही नावे आहेत हे ही अप्रत्यक्षरीत्या सुचवले. त्यात मी कुठेही अतिरेकी, चोर, गुंड लोकांची नावे नाही सुचवली (औरंग्या सोडला तर). तरीही तुम्हाला माझा प्रतिसाद टोमणेवजा वाटला? मुस्लीम समाज किंवा धर्मावर मी काहीही टीका नाही केली. मुस्लिम समाजाच्या मनोवृत्तीवर काही नाही बोललो. एपी़जेंना तर आम्ही अक्षरशः देवासमान मानतो. त्यांचे नाव नसेल तर आमच्यासाठी यादी अपुर्ण आहे असेही म्हणालो. तरी तुम्हाला असे वाटले की आम्हाला तुमचे अस्तित्व मिटवायचे आहे. ८० कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदु समाजासाठी मनात आणाली तर ही अवघड गोष्ट आहे असे वाटते का तुम्हाला? जेव्हा कलामांसारख्या लोकांनी देशसेवा केली तेव्हा त्यांना आम्ही डोक्यावर घेउन नाचलो सुद्धा. पण मग कोणी देशद्रोह केला तर सोडुन द्यायचे? त्याला नावे नाही ठेवायची? मोहम्मद अझरुद्दीन हा एकेकाळी माझा खुप आवडता खेळाडू होता. सचिन पेक्षा जास्त आवडायचा. पण मग जेव्हा त्या नालायकाने पैसे खाउन देश विकला तेव्हा तो निर्लज्ज पणॅ म्हणाला की मी मुसलमान असल्यामुळॅ माझ्यावर हे आरोप होत आहेत. अर्रे गोणपाटा जेव्हा लोक डोक्यावर घेउन नाचत होते तेव्हा नाही असे वाटले का की मुसलमान असल्यामुळे डोक्यावर घेतले आहे म्हणुन? आता तुम्हीच सांगा की आम्ही जर मुस्लीमद्वेष्टे आहोत तर कलामांना देवासमान का मानतो? अझरुद्दीनला पैसे खाण्यापुर्वी डोक्यावर का घेतले होते? खानत्रयी, कॅटरीना, दिलीपकुमार, मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी यांच्यावर २-३ पिढ्यांनी जीव का ओवाळुन टाकला? हे सगळॅ लोक काय केवळ भारतातील मुस्लिमांमुळे प्रसिद्ध झाले असे म्हणायचे आहे का तुम्हाला? ज्या देशाने मुसलमानांना एवढा मान सन्मान दिला, प्रेम दिला तो देश, ते तुमचे देशबांधव तुमचे अस्तित्व मिटवायला निघाले आहेत असे म्हणताना जीभ कशी रेटते वाहीदाजी? आणी जर तुम्ही याला (तुम्ही काही हा शब्द वापरला आहे म्हणून बोलतोय) फक्त काही लोक जबाबदार आहेत किंवा फक्त काही लोकांची तशी इच्छा आहे असे वाटते तर मग ते विधान उगाच इथे करण्याचे कारण काय? हिंदुचे अस्तित्व मिटवाया उत्सुक असलेले मुसलमान भारतात (आणी जगात) नाहीतच असे वाटते का तुम्हाला? आता मुद्दा घर भाड्याने न देण्याचा. तर कित्येक जण उत्तर भारतीय हिंदुना पण जागा भाड्याने देत नाहीत. संस्कृती, वागणुक, विचारसरणी, आवडीनिवडी यात फरक असतो त्यामुळे हे होते. यात एखाद्याचे मुस्लिम असणे महत्वाचे नसते. मुस्लिमबहुल भागांमध्ये हिंदुंबरोबर देखील हेच होइल. आता एक दुर्दैवी उदाहरण. मी जिथे राहतो तिथे आजुबाजुला पुर्ण हिंदु वसाहत आहे. मुसलमान अजिबात नाही. २ वर्षापुर्वी एक बिर्‍हाड आले मुसलमानी. २ बायका ७ पोरे, २ सुना, ३ नातु असा भरभक्कम परिवार. पणा एकटाच. आल्यानंतर १ वर्षात त्याने इस्त्रीचे दुकान टाकले होते त्या माध्यामातुन ५०-६० घरांना चुना लावला. नंतर पद्धतशीरपणे लोकांना दमदाटी करुन झाली. त्या माणसाचा तिसरा मुलगा चक्क गुंड निघाला. आमच्याइथल्याच एकाला तुफान धुतला आणी मग स्वतः ३-४ दिवस आत होता. आता आता ते कुटुंब इथुन हलले. त्या सोसायटीने दुसर्‍या दिवशी अघोषित निर्णय घेतला की मुस्लिम कुटुंबाना जागा भाड्याने देता येणार नाहीत. तुम्ही त्या सोसायटीच्या लोकांना दोष देउ शकता. गेल्या १० वर्षात आमच्या भागात राहणार्‍या कुठल्याही माणसाने दंगा केल्याचे लोकांना माहित नव्हते. हे एकमेव कुटुंब दुर्दैवाने असे निघाले. दुर्दैवच होते ते हे मलाही माहिती आहे/ सगळे मुसलमान असे नसतात. आजुबाजुच्या बर्‍याच लोकांना पण हे पटते. पण रिस्क कशाला घ्या असा विचार होतो. एकाला ठेवुन बघितले ना? किती गोंधळा घातला त्याने असा युक्तिवाद केला जातो. नाइलाज आहे. प्रतिसाद संपवताना एवढेच सांगतो की माझा याआधीचा प्रतिसाद खरेच उपरोधात्मक किंवा खोचक नव्हता. हाही नाही

In reply to by मृत्युन्जय

कवटी Sat, 09/18/2010 - 02:30
म्रुत्युंजयशेठ, उच्च प्रतिसाद! वाक्या वाक्याला सहमत. तुम्ही कायम लिहित चला हो.... आज कित्तेक दिवसाचा लेखन/लॉगिन उपास खास तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी मोडला. अता धम्याला प्रतिक्रिया देउन पापक्षालन करावे लागणार....

In reply to by मृत्युन्जय

समंजस Sat, 09/18/2010 - 15:47
यांचा हा प्रतिसाद योग्य आणि संतुलीत आहे. कुठलंही सरसकटीकरण नाकारणारा हा प्रतिसाद आहे. मुंबई मध्ये फक्त मुस्लिमांच्या बाबतीच घर देताना/घेताना भेदभाव होतो हा आरोप किंवा विधान हे सत्य नाही कारण मुंबई मध्ये ईतरांच्या बाबतीत सुद्धा मांसाहार/जात/भाषा/प्रांत यावरून भेदभाव होतो. परंतू असे काही सर्वच सोसायटींमध्ये होत नाही तर काही थोडयाच सोसायटींमध्ये असं होतंय. एवढंच नाही तर मुंबईत अश्या सुद्धा सोसायटी आहेत कि जिथे फक्त आणि फक्त सरकारी कर्मचार्‍यानांच(माजी/आजी) घर भाडयाने किंवा विकत घेता येते. अर्थातच सोसायटींचे हे नियम अलिखीत असतात :)

In reply to by समंजस

फक्त मुंबईत नाही पुण्यातही असे होते. शंकरशेठ रोड ला पुण्यामधे अशा सोसायट्या बांधण्यात आल्या होत्या त्याची जाहीरात सकाळमधे आली होती. "फक्त जैन बांधवांसाठी. थोड्याच जागा उपलब्ध". हे सगळे जैन बांधव म्हणजे मारवाडी जैन प. महाराष्ट्रातले जैन नाही. तेव्हा मी कॉलेज मधे होतो सकाळ प्रेसमधे जाऊन त्याचा निषेध नोंदवला होता. त्याचा कितपत परिणाम झाला माहीत नाही पण हल्ली बरेच दिवसात सकाळमधे अशा जाहिराती दिसल्या नाहीत.

In reply to by मृत्युन्जय

वाहीदा Sun, 09/19/2010 - 15:55
मृत्युन्जय सर , I am sorry as I have mistaken you as Gandhiwadi(Another false id of Gandhiwadi). I hate this Id for spreading feeling of Hatereat. We are inevitably in need of integrity and unity, since such DeshDrohi forces are engaged in using all methods and resources Not only to jeopardize Hindus against Muslim and Muslim against Hindu but India as a Multi Cultural Nation Ideology too. They enjoy making people vulnerable against each other which also includes id like Avinash Kulkarni. We must create consensus and forget our differences so as to become a strong shield against conspiracies and guard our beliefs. As a Mulim We have our core issues and we do fight it wherever possible. But people like Gandhiwadi are not here to help he is there to divide and take advantage of the situation that is what is his Ulterior Motive. Donot Forget such IDs definitely belongs to a Politcal Parties I respect Hinduism and I had been invited and visited few places where no normal muslim been allowed. I have stayed with Jain family for 15 days in sensitive area like “Ahmedabad – Gujrat” and visited Jain Temples I agree the way Islam has been spread in India was wrong but that does not make it a wrong Religion. People whoever have done this, have got justice by Almighty too. And I Strongly believe whoever plays with religious Places, and with the people’s emotions in the Name of GOD donot get peaceful Death when they part from this World. Then u call any name “RAM / RAHIM/ ALLAH / JEJUS / NANAK/ BUDHHAA" It’s Almighty’s final justice !!

In reply to by वाहीदा

Pain Mon, 09/20/2010 - 01:42
People whoever have done this, have got justice by Almighty too. Definitely Wrong. All sultans, badshahas and their minions never got any punishment whatsoever. Few exceptions like aurangjeb killed his father, brothers etc are there but otherwise everyone enjoyed their life i.e luxires brought by converting, robbing, torturing, raping and killing hindu citizens all over India. That is the sole reason why muslims came to India in first place. This is not just about muslims. Majority criminals of all religions, don't get punishment of any kind because there is no god or if there is, he doesn't give a damn about us. eg. current politicians, criminals

In reply to by वाहीदा

समंजस Sat, 09/18/2010 - 15:55
>>>स्वातंत्र्योत्तर काळातले मुस्लिम भारतिय शोधा ना मग सापडतील पण काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत .. काय ? तुम्ही सुद्धा वाहिदातै ? हे एवढे टोकाचे विचार ?.....या पुर्वीच्या तुमच्या प्रतिसादातून तुमचे विचार संतुलीत वाटायचे. उच्च शिक्षण, चौफेर वाचन, चांगल्या वातावरणात वाढलेल्या, सर्वधर्मीयांशी संर्पक ठेवून असल्यामुळे तुमच्या विचारात जो संतुलीतपणा, समंजसपणा जाणवायचा तो अचानक कुठे तरी गायब झाल्या सारखा दिसतोय..... >>> कुछ बात है की, हस्ती मिटती नही हमारी , सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा.... हिंदू धर्माला दुसरा कोणताही धर्म संपवू शकणार नाही तसेच मुस्लिम धर्माला सुद्धा दुसरा कोणताही धर्म संपवू शकणार नाही. हाच ईतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्य आहे [ धोका कोणाला असल्यास तो संपुर्ण मानव जातीला आहे आणि तो धोका आहे खुद्द मानव जातीच्या स्वार्थापासून ]

In reply to by वाहीदा

Pain Mon, 09/20/2010 - 01:28
काहीजणांना आमचे अस्तित्वच संपवायचे आहे हे आम्ही ही जाणून आहोत .. कुछ लोग हमारा वजूद ही मिटाना चाहते है लेकीन वोह इतना आसान नहीं .. दिलका मैल छुपाये नहीं... छुपता ! यह नफरतें पता नहीं कहां ले जायेगी अरे वा! चोराच्या उलट्या बोंबा

In reply to by वाहीदा

हुप्प्या Sun, 09/19/2010 - 07:16
ह्या नराधमाचा ह्या यादीत घातल्याबद्दल निषेध. ह्या माणसामुळे मूलतत्ववादी इस्लामला नव्याने चालना मिळाली. आयमान अल-जवाहिरी, बिन लादेन वगैरे मंडळी ह्याच्या तत्वज्ञानामुळेच पुढे आली. मवाळ, उदार होत चाललेल्या मुस्लिम धर्माला अशा लोकांमुळे शेकडो वर्षे मागे नेले. ६ व्या शतकातील क्रूर, कठोर, निर्दय इस्लामचे पुनरुज्जीवन करायचे खूळ काही डोकेफिरु लोकांच्या मनात भरले आहे. ह्या माणसाचे तत्वज्ञान ही त्यांची प्रेरणा आहे. अल कायदा, मुस्लिम ब्रदरहूड ह्याची काही उदाहरणे. असल्या लोकांमुळे इजिप्तमधे स्थानिक ख्रिस्ती लोकांवर अत्याचार होऊ लागले. पिढ्यानपिढ्या इजिप्तमधे राहूनही त्याना तिथून परागंदा व्हायची वेळ आली. एकेकाळचे कलासक्त, मुक्त वातावरण असणारे कैरो शहर इस्लामी कोषात जाऊन बसले. इजिप्तच्या सरकारने ह्या माणसाला १९६६ साली फाशी दिले. इथे वाचा http://en.wikipedia.org/wiki/Sayyid_Qutb

In reply to by सुनील

प्रदीप Fri, 09/17/2010 - 16:33
अति झाले.
मुस्लिमांना मिश्र वस्तीत जागा मिळत नाही. मग ते गावाच्या/शहराच्या दुसर्‍या भागात वस्ती करतात. हळू हळू त्या भागात त्यांची बहुसंख्या होते. त्यांचे एकसंघ मतदार होतात. मग त्या भागातून निवडून येणे सोपे जाते......
मुंबईतील भेंडी बझार, माहीम (पश्चिम), बांद्रे खेरवाडी इ. वस्त्या अशा इतर भागातून नाकारल्यामुळे अगदी नाईलाजाने केलेल्या वस्त्या आहेत, असे म्हणायचे आहे काय?

In reply to by प्रदीप

नितिन थत्ते Fri, 09/17/2010 - 16:40
नाही. पण १९९२-९३ च्या दंगलींनंतर अनेक मुसलमान मिश्र वस्ती सोडून मुंब्रा, कुर्ला आणि मिरा रोड आदि ठिकाणी स्थलांतरित झाले ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by नितिन थत्ते

प्रदीप Fri, 09/17/2010 - 16:43
ह्या वस्त्या मुस्लिम बहुसंख्य 'हजारो' वर्षांपासून आहेत (नितीन, मला मुंबई सोडून फक्त २० वर्षेच झालीत, त्याअगोदर आयुष्याचा जवळजवळ सगळा काळ मुंबईत घालवलाय).

In reply to by प्रदीप

आमोद शिंदे Fri, 09/17/2010 - 17:19
ह्या वस्त्या मुस्लिम बहुसंख्य 'हजारो' वर्षांपासून आहेत हजारो? मुंबईसोडून २० वर्षे होण्यापूर्वी आधीची हजार वर्षे मुंबईतच काढलीत काय? :)

वारा Fri, 09/17/2010 - 15:57
जर का आपले कामातील सहकारी असे असतील तर १) यांना नेहमी कोणतरी आपल्यावर अन्याय करतोय अस वाटत असत आणि खासगीत नेहमी काहीतरी रडत असतात. २) आपल्याबरोबरीच्या लोकांच्यात नेहमी बरोबरी करायची सवय असते, ३) हुशारीपणा दाखवायची सवय असते. (उदा. फालतु जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणे व लोकांना भांबावुन सोडणे) ४) यांची कोणतीही गोष्ट हलक्यात घेतल्यास राग येतो , लगेच कही बोलत नाहीत पण नंतर कधीतरी मुद्दा उकरुन काढतात. असो अजुन बरच काही आहे हळुहळु सांगता येईल.

In reply to by सुनील

मूकवाचक Fri, 09/17/2010 - 16:41
अशा फार थोड्या गोष्टी आहेत ज्या आम्ही 'कधीच करत' नाही. म्हणूनच रोज आणि राजरोसपणे कुणी वाटेल ते करो, आम्ही 'मूक' असतो.

In reply to by वारा

गांधीवादी Fri, 09/17/2010 - 16:02
>>जर का आपले कामातील सहकारी असे असतील तर असे म्हणजे नक्की कसे ? >>यांना नेहमी कोणतरी आपल्यावर अन्याय करतोय अस वाटत असत म्हणजे नक्की कोण कोणावर अन्याय करतो, असे कोणाला वाटते, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते सांगावे असे मला वाटते. >>अजुन बरच काही आहे हळुहळु सांगता येईल. मग मी हळूहळू ऐकतो.

In reply to by वारा

प्रदीप Fri, 09/17/2010 - 16:37
हुशारीपणा दाखवायची सवय असते. (उदा. फालतु जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणे व लोकांना भांबावुन सोडणे)
दुसर्‍या संस्थलावर स्वत:ची हुशारी दाखवत रहाणारे काही जण मुस्लिम असावेत असे वाटले नव्हते. (ते जर तसे नसतील तर हा मुद्दा ह्या संदर्भात बाद!)