Skip to main content

हनुमंताची व्यथा !

लेखक चिगो यांनी गुरुवार, 09/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशीच्या पेपरात कूठल्याशा गावची खबर होती खबर जरी लहान असली तरी तिची मजा जबर होती.. गाव म्हणे आकारानं तसं जरा छोटं होतं गावकुसाच्या शिवेवर हनुमानाचं मंदिर मोठं होतं.. जेव्हा कधी गावात लग्नाची वरात यायची व-हाडी मंडळी मंदिराच्या सावलीला आडोशाला हायची.. वरातीतल्या बायका मात्र कधीमधी मंदिरात जायच्या हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल अंगावरच्या साड्या बदलायच्या.. सालोसाल असंच घडुन अखेर ती एक रीत झाली मात्र शेवटी हनुमंताच्या ब्रम्हचर्याची जीत झाली.. एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं मुर्तीनं डोळे मिटले होते कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे आता पारणे फिटले होते...!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6384
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे आता पारणे फिटले होते...!
येवड्या ओळी सोडुन बाकी कविता आणि कल्पना झक्कास हो.

सॉरी... Disclaimer द्यायला विसरलो.. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही..

In reply to by चिगो

नाही हो.. गोतमारे. आमच्या धार्मिक भावना नाही दुखावत. कोण मुद्दाम लिहितं आणि कोण अजाणतेपणे लिहितं हे नक्की कळतं आम्हाला. तेवढी बुद्धी आम्हाला बुद्धिमंत हनुमानाच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. :)

राजकुमाराशी सहमत... बाकी, मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते !!! ;) संदर्भ:--- नवनाथ भक्तिसार (अध्याय ३) (अल्लख निरंजन... ;) )

In reply to by मदनबाण

मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते
घामाचे थेंब पण चालत बहुदा ;) मकरध्वज आठवतोय ना ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

ह्म्म. मग त्या मूर्तीचे डोळे पूर्वीपासून मिटलेलेच असतील. ध्यानस्थ मारूती असेल तो. ;) लोकांनी आत्ता पाहीले असे. जर त्याने बायकाना आत येताना पाहून भु:भुकार केला असता तर त्या सगळ्याच गाभण झाल्या असत्या ना.

अजून येऊ दे....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ दे....!
कोण ? ;) नाही कविता वाचुन भलतीच शंका आली म्हणुन विचारले हो प्रा. डॉ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>> कोण ? अजून कविता येऊ दे असे म्हणायचे आहे. च्यायला, या पराच्या...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुलाशाबद्दल धन्यवाद हो. तुम्हाला कविता म्हणजे काव्य अभिप्रेत आहे हे मी समजुन घेतले आहे.

एक दम सहि

सुरेख सुन्दर पेक्षा मला ही एकदम ढिन्च्याक कविता वाटली. सह्ही लिहिल आहे. आडोसा म्हणुन साड्या बदलताना ....बिचारा हनुमान अन बिच्चार्‍या स्त्रिया !!

कल्पना छान आहे...

अवलियाजींशी सहमत. बाकी कविता एकदम भन्नाटच.