वाचा आणि शोधा
१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही.
२. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता.
३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते. हा शरीराने तुमच्या यंत्रणेला दूर होण्यासाठी दिलेला सिग्नल असतो.
४. मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते.
५. शरीराला फक्त दोनच गोष्टीत स्वारस्य असते: टिकून राहाणे आणि प्रजोत्पादन.
६. विचार करण्याची प्रक्रिया ही जात्यासारखी असते - कुठलाच विचार सर्वकाळ टिकत नाही, विचारांचे पीठ सतत मात्र पडत राहाते.
७. आजपर्यंत कुणीही मूलत: ओरिजीनल म्हणता येईल असा विचार केलेला नाही, नकला मात्र सर्व करीत असतात. विचार हा नेहमी विचाराबद्दलचा असतो.
८. विचारातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मग कुणी काहीही म्हटलेले असो.
९. बाल्यावस्थेचा काळ वगळता तुम्ही कधीच काहीही पाहात नाही; तुमच्याकडे असलेली कल्पनाच तुम्ही पाहात असता.
१०. लहान मुले ही अत्यंत जीवंत ऊर्जा असते. ती पृथ्वीवर जन्माला आलेला सर्वात नवीनतम माणसे असतात. ती जुन्या माणसांच्या संगतीत राहून त्यांचे वेगळे विशेष असे काहीही न करता जुन्या माणसांसारखीच होतात. कोणताही शिक्षक, गुरू शिकवू शकणार नाही एवढे त्यांच्याकडून शिकता येते. फक्त तुमचे कचराछाप (मग ते तुम्हाला कितीही महत्वाचे, अगत्याचे वाटोत ) विचार त्यांच्यात ओतण्याची घाई करू नये. त्यांना आजूबाजूची व्हॅल्यू सिस्टीम आणि स्पर्धा यात राहायचे असल्याने, त्यातच जगायचे असल्याने समाज, आई-वडील, शिक्षक या सर्वांनी टाकलेला कचरा वाहात राहावे लागते. लहान मुले जळता निखाराही सहज हातात घेतात - ते शिकत आहेत. लहान मुलांना साप कधीही चावत नाही, त्यांच्यात अजून वैरभावनाच तयार झालेली नसते. सापासारखे प्राणी तुमच्या मनातील वैरभावना झटक्यात ओळखतात आणि तुमच्यापासून दूर जाण्याचा उपाय नसेल तर आणि तरच चावा घेऊन दूर पळतात.
११. तुम्ही कधीही, कोणत्याही मार्गाने स्वत:चे शरीर परिपूर्णपणे अनुभवू शकत नाही - त्यासाठी दुसरे शरीर हवे असते.
पाश्वभूमी: यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याशी लोकांनी केलेली चर्चा.
हा कुणालाही, कसल्याही प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न नाही; त्यामुळे आक्रस्ताळे आक्षेप वाया जाऊ द्यायचे नसतील तर वेळीच आवरावेत. वाचा आणि शोधा.
वाचने
4840
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
क्रमांक ९ तर खासच! एकदम पटले!
In reply to क्रमांक ९ तर खासच! एकदम पटले! by इंटरनेटस्नेही
युवर इन्टेलिजन्स इज क्वेश्चनेबल इंप्रे.
मस्त रे
थोडं थांबा.. समजावुन घेतोय..
क्र १० चा विचार पटला नाही मग
In reply to क्र १० चा विचार पटला नाही मग by llपुण्याचे पेशवेll
युजी कृष्णमूर्तीं
मानसिक शांती, ध्यानातून
प्रीचिंग
In reply to प्रीचिंग by ३_१४ विक्षिप्त अदिती
येस्स!!!
In reply to येस्स!!! by यशवंतकुलकर्णी
लेट मी पुट इट धिस वे देन!
In reply to लेट मी पुट इट धिस वे देन! by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचा वरचा प्रतिसाद कारणीभूत आहे
"असे कर" असे सांगणे घातक आहे
तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच
In reply to तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच by निवांत पोपट
होय!!!!
In reply to होय!!!! by यशवंतकुलकर्णी
होय!!!! त्या पूर्णत: वेगळ्य़ा
हे यु.जी. कृष्णमूर्ती कोण ?
प्रयत्न करतेय
जालिंदरबाबा कुठे आहात?