सुमन कल्याणपुर - एक दिव्य स्वर!
लेखनप्रकार
सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. अनेक वर्षे अज्ञातवासात असलेल्या सुमनताई "झी गौरव्"च्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने समोर आल्या.
सध्या बांग्लादेशात असलेल्या ढाका येथे २८ जानेवारी १९३८ साली सुमन हेमाडी यांचा जन्म झाला. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मो. शफी यांनी संगीत दिलेल्या "मंगु" (१९५४) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे". त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड हि चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले.
सुमनताईंच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते. "जिथे सागरा धरणी मिळते" असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, "घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात" असे म्हणणारी सासुरवाशीण, "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि" हि अंगाई, "कशी गवळण राधा बावरली" हि गवळण, "सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी" हे विरहगीत, "नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे", "केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर" हे भावगीत, "केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा", "जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे", "देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा" सारखी भक्तीगीते, "उठा उठा चिऊताई", "या लाडक्या मुलांनो या" सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो. सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी श्री दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच आज मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली आहेत.
सुमन कल्याणपुर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे.
"न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया", "ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा", "तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी", "परबतो के पेडो पर शाम का बसेरा है", "अज हु ना आये बालमा", "तुमने पुकारा और हम चले आये" "मेरे मेहबुब न जा", "नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे", "आपसे हमको बिछडे हुए", "चले जा चले जा....जहां प्यार मिले", "मन गाए वो तराना", "दिल ने फिर याद किया" या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती. आणि लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदम गाणे गायचे सोडुन दिले. काहि अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदि बरोबर गाण्याचे सोडुन दिल्याने लतादिदिंची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. (मनात कधे कधी असा विचार येतो की हा वाद अजुन काहि काळ असता तर सुमनताईं आणि मो. रफी यांची आणखी काहि गाणी ऐकायला मिळाली असती ). कारण काहिहि असो पण त्याकाळच्या स्पर्धेच्या युगात एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते. कधी असेहि वाटते कि त्यांना अजुन संधी मिळाली असती तर त्यांच्या नावने सुद्धा आज एखादा पुरस्कार दिला गेला असता....... असो.......
लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या "चांद" ह्या हिंदी चित्रपटाकरीता एकत्र गायल्या होत्या. (बहुदा पहिले आणि शेवटचेच) :(. गाण्याचे बोल होते कभी आज कभी कल कभी परसो, ऐसे हि बीते बरसो.
आजही इतक्या वर्षांनीहि सुमनताईंची गाणी परत परत ऐकावीशी वाटतात. तेंव्हा सुमनताई तुम्ही परत एकदा या, सारे काहि विसरून पुन्हा मनमोकळेपणाने गा. आम्ही सर्व रसिक, तुमचे चाहते या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहे.
सुमनताईंनी गायलेली काहि मराठी गाणी:
आई सारखे दैवत सार्या जगतात नाहि
अक्रुरा नेऊ नको माधवा
आकाश पांघरून जग शांत झोपलेले
आली बघ गाई गाई
केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर
वाट इथे स्वप्नातील संपली जणु
अरे संसार संसार
असावे घर ते आपुले छान
चल उठ रे मुकुंदा
देवा दया तुझी
दिपक मांडले
एक तारे सुर जाणे
एकदाच यावे सखया
गेला सोडुनी मजसी कान्हा
घाल घाल पिंगा वार्या
हाले हा नंदाघरी पाळणा
हि नव्हे चांदणी हि तर मीरा गाते
जिथे सागरा धरणी मिळते
जगी ज्यास कोणी नाहि
जुळल्या सुरेल तारा
का मोगरा फुलेना
कुणी निंदावे वा वंदावे
कशी गवळण राधा बावरली
कशी करू स्वागता
केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा
क्षणी या दुभंगुनी
मज नकोत अश्रु घाम हवा
मस्त हि हवा नभी
मी बोलले काहि
मी चंचल होऊनी आले
मृदुल करांनी छेडित तारा
नकळत सारे घडले
नंदाघरी नंदनवन फुलले
नाविका रे वार वाहे रे
निंबोनीच्या झाडाखाले
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
पहिलीच भेट झाले
पाखरा जा दुर देशी
पैलतीरी रानामाजी
पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय
पाण्यातली परी मी
पिवळी पिवळी हळद लागली
प्रीत हि डोळ्यात माझ्या
प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे
रिमझिम झरती श्रावणधारा
सांग कधी कळणार तुला
सहज तुला गुपित एक
सावळ्या विठ्ठला
शब्द शब्द जपुन ठेव
श्रीरामाचे चरण धरावे
लिंबलोण उतरता
जाग रे यादव
ते नयन बोलले काहि
तुझ्या बोटाला कृष्णा
तुझ्या कांतीसम
तुला ते आठवले
उघडले एक चंदनी दार
उर्मिला मी
उठा उठा चिऊताई
वार्यावरती घेत लकेरी
विसरशील तु सारे
या झोपल्या जगात
या कळ्यांनो या फुलांनो (मंत्र वंदे मातरम)
या लाडक्या मुलांनो
असे हे जगचे फिरे चक्र बाळा
वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी
गणाधिपा हो उठा लवकरी
ओम नमो हा सुर
जो त्रिगुणांची मुर्त जाहला
पार्वती वेचिती बिल्वदळे
देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावला
वाचने
9037
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
दोन चांगली गाणी.
In reply to दोन चांगली गाणी. by जयंत कुलकर्णी
सुमन
In reply to सुमन by विसोबा खेचर
१००+ सहमत
In reply to १००+ सहमत by तिमा
हे जरा अतीच होतंय.
In reply to हे जरा अतीच होतंय. by प्रमोद देव
मान्य
In reply to मान्य by तिमा
एखादे
सुमन ताई
खरचं
In reply to खरचं by मदनबाण
मदनभाऊ, तुमचा ई-मेल आय.डी. द्या!
खूप छान
अशोक पत्की
सदर लेख
काल मुम्बई