मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मम आत्मा गमला..२

यशोधरा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

वाचने 10066 वाचनखूण प्रतिक्रिया 21

श्रावण मोडक 27/11/2009 - 21:04
आटोपशीर, चांगल्या आठवणी. अजून हव्याशाही... पहिला लेखही या निमित्ताने वाचला. कारवार, बेळगाव, धारवाड, गोवा, सांगली, कोल्हापूर म्हणजे गाणारा मुलूख असं संजय संगवई म्हणायचेच नाही तरी. ते सार्थ होतंच.

In reply to by श्रावण मोडक

घाटावरचे भट 28/11/2009 - 06:34
सहमत आहे. गोव्याने महाराष्ट्राला जेवढे प्रसिद्ध गाणीगिणी करणारे दिले तेवढे इतर कुठल्याही प्रांताने दिले नाहीत.

धमाल मुलगा 27/11/2009 - 21:27
जुन्या आठवणी... ती मखमली गाणी.... आजी आजोबांचे ते थरथरते-सुरकुतलेले हात... मस्त तिय्या जमवुन आणलास गं :)

बिपिन कार्यकर्ते 27/11/2009 - 22:05
यशोताई, एवढंच म्हणेन... एक छान वाचनानंद दिल्याबद्दल धन्यवाद. बास्स!!! तो 'समाप्त' मात्र अन्यायकारक आहे. भाग २ एवढ्या दिवसांनी आला... जमेल तसं, वाटेल तेव्हा अजून (अगदी असंच नाही) पण छान मुक्तकं येऊ देत. बिपिन कार्यकर्ते

मदनबाण 28/11/2009 - 06:21
मस्त लेखन... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

बहुगुणी 28/11/2009 - 07:41
इतके भरभरून देऊ शकणारे आजी आजोबा लाभले तुम्हाला तर आठवणी इतक्या कमी लांबीच्या लेखांत कशा गुंडाळताय? जरा आणखी विस्ताराने येऊ द्यात. या निमित्ताने आम्हाला आमचेही आजी आजोबा आठवतात, तो आठवणींचा प्रवास आणखी लांबू द्या.

चतुरंग 28/11/2009 - 08:07
अशा छोट्या छोट्या आठवणींच्या धाग्यांनी विणलेलं आयुष्याचं वस्त्र कोणत्यातरी क्षणी अचानक एखाद्या गर्भरेशमी साडीचा पदर उलगडून दिसावा तसं चमकून जातं आणि मग आठवणींना पारावार रहात नाही. हेच तर संस्कार आणि संचित. अशीच अधून मधून लिहिती रहा. थोड्या आणखीन विस्तारानं लिहिलंस तरी आवडेल. चतुरंग

क्रान्ति 28/11/2009 - 08:39
एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. अतिशय सुरेख लिहिलेस दोन्ही लेख यशो! अगदी डोळ्यांपुढे उभी राहिली सगळी दृश्यं! रात्र रात्र जागून जुन्या भल्यामोठ्या नॅशनल एकोच्या रेडिओवर बाबांसोबत ऐकलेली गाणी, त्यांचं बाबांनी केलेलं रसग्रहण सगळं सगळं आठवलं! अशाच रेशीमलडी अजून येऊ देत! :) क्रान्ति अग्निसखा

प्राजु 28/11/2009 - 09:20
खरंच आठवणींच्या धाग्यांचं एक सुंदर तलम वस्त्र उलगडून दाखवलंस. मनाचा एक कोपरा हा आठवणींनी नेहमीच सुगंधी झालेला असतो.. आणि तो तसाच रहावा. कारण या आठवणी सुखात दु:खात नेहमीच सोबत असतात. - प्राजक्ता http://www.praaju.com/

धनंजय 28/11/2009 - 09:44
हा लेख "समाप्त" केलात तरी अधूनमधून असेच लिहित जावा!

मुक्तसुनीत 28/11/2009 - 09:46
लिखाण आवडले. आणि त्याचबरोबर , भावनांची कदर करणारे प्रस्तुत संस्थळावरील प्रतिसादसुद्धा. अवांतर : "गंधर्वयुग" अशा नावाचे गंगाधर गाडगीळांचे पुस्तक अगदी अलिकडे प्रसिद्ध झालेले आहे. बालगंधर्वकालीन मिथक-सदृष परिस्थितीचे यथातथ्य चित्रण त्यात आलेले आहे.

गणपा 28/11/2009 - 15:56
पहिला भाग आधी वाचला न्हवता, दोन्ही आत्ताच वाचुन काढले. सुरेख आठवणी . अजुन वाचायला आवडल असत.

स्वाती२ 28/11/2009 - 18:18
सुरेख आठवणी. बालगंधर्व माझ्या आबांचाही विकपॉइंट. आबा उत्तम सतार आणि बासरी वाजवायचे. दिवसभराचे पेशंट संपले की हातात बासरी. गाण्याची आवड ही खास आजोळची देणगी.

प्रभो 29/11/2009 - 21:20
सुरेख लेख...आवडला.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

दशानन 01/12/2009 - 12:55
मस्तच. छान लिहले आहेस यशो. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 01/12/2009 - 15:04
के व ळ सु रे ख ... सू हा स...