प्रवास
लेखनविषय:
काव्यरस
पायवाट म्हणाली, "सांभाळ!
अनवाणीच आहेस
ठाऊक नाही मुक्काम तुला.
प्रश्न सुरवातीला नसतोच,
ते येतात तेव्हा
उत्तरांचा शोध सुरू होतो,
वाटेकडं दुर्लक्ष होतं..."
वाट राखणं
हे तर जगणं, अन्यथा
सारेच प्रवास महामार्गी!
"महामार्गाचं बरं असतं,
तो बदलतो
माझं तसं नसतं
मी मातीचीच असते.
अनवाणी चालताना
पाय मळतील म्हणून सांगतेय..."
चालताना केव्हा तरी
वाट सुटली, भरकटली
आता पायाखाली केवळ
माती अन मातीच आहे
मी चालतोच आहे...
'मातीचे पाय'चा
दागिना मिरवत!
वाचने
3178
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
वा वा श्रामो सध्या तुमच्या
In reply to वा वा श्रामो सध्या तुमच्या by चतुरंग
दीपावलीचा काव्यबहर......
In reply to दीपावलीचा काव्यबहर...... by मस्त कलंदर
+२
व्वा.सुंदर
छान कविता...
प्रवास आवडला
हम्म....
सुंदर...!
छान
आवडली.