चूक
लेखनप्रकार
तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता.
आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची.
जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत. तिला दोन दणकट भाऊ असते, तर मी तिची छेड काढली असती का?
हलकी वडांग (शेताचे काटेरी कुंपण) पाहूनच जनावरे आत शिरतात. मीसुद्धा ती कमजोर होती म्हणून तिची छेड काढली. ती एक लहान बहीण आणि बेवडा बाप असलेली गरीब मुलगी, माझं करून करून जाय वाकडं करणार होती? सुरुवातीला दोन वेळा तिने दुर्लक्ष केलं, पण तिसऱ्यांदा तिने आपल्या बापाला सांगितलं. तिचा भाबडा विश्वास होता की तिचा बाप माझा बंदोबस्त करेल. पण तिच्या बेवड्या बापाला हाच चान्स वाटला. त्याने तिचं कॉलेज बंद केलं आणि शहरातल्याच एका मुलाशी २ महिन्यात लग्न लावून दिलं.
आता तिचा नवरा गॅरेजमध्ये १२ तास काम करून पिऊन तर्र होऊन येतो. तिला मारण्यासाठी त्याने लोखंडी पाइप घरी आणून ठेवलाय. आई-बाबांना आणि लहान बहिणीला भेटायला तिला बंदी आहे. पत्र्याच्या अतिक्रमणात असलेल्या त्या झोपडीत ती आणि तिची गोंडस लहान मुलगी दारात बसलेले असतात.
तो माझा रोजचा वापरायचा आहे. आमची नजरानजर होते. माझी दागिने मिरवनारी बायको ती पाहते. तिची ती संतापलेली नजर मला सतत विचारत राहते, “माझी काय चूक होती? माझी काय चूक होती?…..”
वाचने
3369
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
चुक कुणाची शिक्षा कुणाला....
In reply to चुक कुणाची शिक्षा कुणाला.... by कर्नलतपस्वी
धन्यवाद.
In reply to चुक कुणाची शिक्षा कुणाला.... by कर्नलतपस्वी
धन्यवाद कर्नलसाहेब.
वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते.....शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.अशा बाबतीत मुलीनी कणखर
In reply to अशा बाबतीत मुलीनी कणखर by विजुभाऊ
अशा बाबतीत मुलीनी कणखर
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्या नवर्याला कधीतरी बदडून काढायला हवे.एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.In reply to अशा बाबतीत मुलीनी कणखर by अमरेंद्र बाहुबली
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर
जबरदस्त लिहिली आहे, अप्रतिम
In reply to जबरदस्त लिहिली आहे, अप्रतिम by Vichar Manus
खुप खुप आभार.
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. अनेक बिचार्या आधार
छेड काढणारे कधीच प्रेम करत
In reply to छेड काढणारे कधीच प्रेम करत by विवेकपटाईत
छेड काढणारे कधीच प्रेम करत
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही.सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.चुक ती चुकच !
In reply to चुक ती चुकच ! by चौथा कोनाडा
सहमत आहे.
माझ्या ओळखीतल्या एक गायीका