भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १
मराठी - अमराठी वाद आज अगदी ऐरणीवर आला आहे अस मला वाटत होत. प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या जन्माआधीपासूनच हे भांडण चालू आहे अस एकंदरीत उल्लेखांवरून दिसून येत. कदाचित मिपाकरांना ह्यातल्या बय्राचश्या गोष्टींची माहीती असेल देखील पण मला बहुतेक सगळच नविन होत म्हणून माझ्यासारख्यांसाठी हा लेखन प्रपंच.
राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. त्यांच Thoughts On Linguistic States (१९५५) हे पुस्तक नुकतच वाचल. त्यात त्यांनी ह्या समस्येच्या वेगवेगळ्या बाजूंचा सविस्तर उहापोह केला आहे. काही (आज) मजेशीर वाटणाय्रा गोष्टींचादेखील उल्लेख त्यात आहे.
तसच मी शिवाजीराजे बोलतोय या चित्रपटानी मराठी माणसाच्या ज्या प्रव्रूत्तीवरती प्रश्नचिन्ह उभ केल आहे, ती प्रव्रूत्तीदेखील सनातन असल्याच दिसून येत (हे जाता जाता).
भारतात, हे पुस्तक लिहितेवेळी, Part A, Part B आणि Part C असे राज्यांचे तीन प्रकार होते.
पार्ट ए मधे आंध्र, आसाम, बिहार, मुंबई, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, पंजाब, उत्तर प्रदेश यांचा समावेश होता.
पार्ट बी मधे हैद्राबाद, जम्मू-काश्मीर, मध्य भारत, मैसूर, पटियाळा, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर-कोचीन यांचा समावेश होता.
पार्ट सी मधे अजमेर, भोपाळ, कुर्ग, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर, त्रिपूरा, विंध्य प्रदेश यांचा समावेश होता.
भाषावार राज्य पुनर्रचना समितीने प्रस्तावित केलेली राज्य होती ती अशी:
मद्रास (तामिळ), केरळ (मल्याळम), कर्नाटक (कानडी), हैद्राबाद (तेलगू), आंध्र (तेलगू), मुंबई (द्विभाषिक मराठी-गुजराथी), विदर्भ (मराठी), मध्य प्रदेश (हिंदी), राजस्थान (राजस्थानी), पंजाब (पंजाबी), उत्तर प्रदेश (हिंदी), बिहार (हिंदी), पश्चिम बंगाल (बंगाली), आसाम (आसामी), ओरिसा (उडीया), जम्मू-काश्मीर (काश्मीरी).
बाबासाहेब म्हणतात "एक राज्य, एक भाषा हे देश-कालातीत तत्व असून ते वेळोवेळी वापरल गेल आहे. आणि जेंव्हा ते पाळल गेल नाही तेंव्हा काय होत याच उदाहरण जून्या ऑस्ट्रीयन किंवा तुर्क साम्राज्यांमधे मिळत.
मुंबई द्विभाषिक राज्य कायम ठेवण्याच्या समितीच्या निर्णयावर ते म्हणतात;
The present State of Bombay is the best illustration of the failure of democracy in a mixed State. I am amazed at the suggestion made by the States Reorganisation Commission that the present Bombay State should be continued as it is to enable us to gain experience of how a mixed State flourishes. With Bombay as a mixed State for the last 20 years, with the intense enmity between the Maharashtrians and Gujaratis, only a thought less or an absent-minded person could put forth such a senseless proposal.
तोपर्यंत (१९५५) द्विभाषिक राज्य एकत्र राहीलं त्याच कारण त्यांच्याच शद्बात देण योग्य ठरेल;
The fact that they have been held together up till now is not in the natural course of things. It is due to the fact that both of them are bound by the Congress discipline. But how long is the Congress going to last? The Congress is Pandit Nehru and Pandit Nehru is Congress. But is Pandit Nehru immortal? Any one who applies his mind to these questions will realise that the Congress will not last till the sun and the moon. It must one day come to an end. It might come to an end even before the next election. When this happens the State of Bombay will find itself engaged in civil war and not in carrying on administration.
ते म्हणतात की दोन कारणांमुळ आम्हाला एकभाषिक राज्य हवं; एक म्हणजे लोकशाहीचा मार्ग सुकर करायला आणि दुसरं म्हणजे वांशिक आणि सांस्क्रूतीक तणाव नाहीसा करायला.
भाषिक राज्य हे सहजरित्या स्वतंत्र राष्ट्रीयतेला जन्म देउ शकत हा धोका ओळखून ते म्हणतात की अस होउ नये म्हणून प्रादेषिक भाषा ही त्या राज्याची अधिक्रूत भाषा न ठेवता हिंदी किंवा इंग्रजी ही राज्यभाषा असावी.
त्यावेळच्या लोकसंख्येनुसार हिंदीभाषिक ४८% लोकसंख्येची ४ राज्य आणि उरलेल्या ५२% लोकसंख्येसाठी १२ राज्य ही परिस्थती फारच चिंताजनक आहे. यामुळे पुढे जाउन जर हिंदीभाषकांच एकीकरण आणि बाकीच्यांच balkanisation (विभक्तीकरण?) झाल नाही तरच विशेष.
उत्तर आणि दक्षिणेत फार फरक आहे. उत्तर ही conservative आहे तर दक्षिण पुरोगामी. उत्तर superstitious (अंधश्रद्ध ?) आहे तर दक्षिण वास्तववादी (rational). दक्षिण शैक्षणिकद्रूष्ट्या पुढारलेली आहे तर उत्तर मागासलेली. दक्षिणेची संस्क्रूती आधुनिक आहे तर उत्तरेची प्राचिन.
क्रमश:
वाचन
10884
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
उत्तम लेख
In reply to उत्तम लेख by क्लिंटन
बाबासाहेबांचा संयुक्त महराष्ट्राला पाठींबा नव्हता
In reply to बाबासाहेबांचा संयुक्त महराष्ट्राला पाठींबा नव्हता by सातारकर
चांगली माहीती.
In reply to बाबासाहेबांचा संयुक्त महराष्ट्राला पाठींबा नव्हता by सातारकर
सातारकर
In reply to सातारकर by विकि
संयुक्त महाराष्ट्र
स्तुत्य लेखमाला
गुजराती
In reply to गुजराती by नितिन थत्ते
गुजराती लोकान्नी
In reply to गुजराती by नितिन थत्ते
होय
In reply to होय by अभिरत भिरभि-या
काही
In reply to काही by नितिन थत्ते
घ्या
In reply to घ्या by अभिरत भिरभि-या
धन्यवाद
पुढचा भाग
वेगळा विषय